Maage pudhe लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Maage pudhe लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २० जुलै, २०२१

मागे पुढे बऱ्याच काळाने

खूप खूप कालावधीनंतर या पानावर लिहितो आहे. पूर्वी खूप सुंदर प्रतिसाद आपण दिलेला आहेच. आता तारीखवार लिहिले आहे. आपण आवर्जून प्रतिक्रिया द्यालच ! 


 ५ मार्च २०२१ : 

 प्रयास कार्यकारिणीची पहिली सभा

स्थळ: रत्नागिरी विश्रामगृह 

वेळ : दुपारी ४ ते ५.             (उपस्थित)

.................

०५.०३.२०२१


रत्नागिरी विश्रामगृहात ०३.४४ ला  पहिला मी आलो. सभा सूरू होण्याआधी. 

०४.१२ ला सौ.चा घरून फोन. आबाची आई गेली. दापोलीला. तिला रात्री आणणार. मिटींग कंटिन्यू केली. संध्याकाळी घरी आलो. रात्री साडेनऊ वाजता आबाकडे गेलो. सर्व आलेले होते पण आबांची एक मुलगी पुण्याहून निघाली होती. ती रात्री दोन वाजता आली. सगळे होऊन तीन वा. घरी आलो. आंघोळ करून चहा घेतली. खालच्या अंगणातली लाईट काढायला पुढे आलो तर समोरच्या बंगल्यात लाईटी लागलेल्या ! तितक्यात, क्रांती बंगल्याच्या कंपाऊंडकडे बोंबटत आली. तिच्या सासऱ्याला वांत्या होत होत्या, घाम फुटला होता, तळमळत होता. लगेच तिच्या नवऱ्याला फोन केला आणि आम्ही तिघेही बंगल्यात गेलो.‌ थोड्या वेळाने मेघाच्या घरी जाऊन तिला घेऊन आलो.‌ मग क्रांतीचा नवरा आला. त्याने बंटी व विकीला बोलावून आणले. शेवटी पाच वा. पेशंटला सिव्हील हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करायला विकी त्याच्या कारमधून घेऊन गेला आणि आम्ही घरी आलो. तोपर्यंत उजाडत आले होते.

...................‌


०९.११.२०२०


गेले २ - ३ दिवस राकेश तसा झालाय. 


शेवटच्या गझलकाराच्या गझला , परिचय , फोटो म. नानिवडेकरांकडे आजच पाठवल्या. 


सायं. ०६.३७ ला सुनील आडीवरेकरचा सावंतवाडीहून फोन आला. भाऊ सुधीर व दोन मित्र असे चौघेजण उद्या रत्नागिरीत व आमच्याकडेही येणार आहेत.


अरविंद ग्रील बसवायला आज येणार होता. आला नाही.‌ फोन करून उद्या यायला सांगितले. 

........


१०.११.२०२०


स. ०९.३० वा. सुनीलला फोन केला तर त्याच्या आईची तब्येत बिघडल्याने सुधीर येत नाही व सुनील आत्ताच मित्रांसह निघाल्याचे कळले. 


संध्या. ०४.३० वा. अरविंद व पब्यादादा चंदरकर ग्रीलचे साहित्य घेऊन आले व अंगणात ग्रील तयार करू लागले. 


.....तोच सुनीलची गाडी आली. सावंत , कंग्राळकर हे सावंतवाडीचे व मागाहून आलेले टाकळे मिऱ्याचेच असे चौघेजण आले.‌ एल एम एल बिझीनेस. नो इंटरेस्ट.



११.११.२०२०



काल रात्री एक गझल सुचली. पण मधल्या एका शेराची दुसरी ओळ स्फुरली पण दुसरी समर्पक ओळ येईना. अखेर आज सकाळी ती ओळ सुचली. 


काल सतीश टोपकर आमच्याकडे येणार होता तो आला नव्हता. खालच्या अंगणात ठेवलेल्या वाळूच्या २८ पिशव्यांपैकी ०२ कमी झाल्याचे लक्षात आल्याने सतीशला त्याच्या माणसांकरवी त्या आमच्या अंगणात ठेवायला सांगितले होते. आता हे नोंदीत असतानाच सतीश त्या पिशव्या हलवतोय. सकाळचे १०.२० झाले आहेत. तेव्हढ्यात उदू आलाय.‌ दिवस पुढे सुरू झाला आहे.



दुपारी जेवणाच्या वेळी समोर लक्ष गेले. तीन तरूण बंगल्याच्या रहाटाजवळ दिसले. कदाचित भैय्या भाभी सोडून गेल्याने रिकामा झालेल्या बंगल्यात काॅलेजकुमार रहायला येणार असतील किंवा ती मालकाची मुलेही असतील, असा विचार करून मी किचनकडे वळलो. 

संध्याकाळी केस कापायला गावातला मुलगा आला. मी केस कापून घेतले. उद्या सौ. ते रंगवणार आहे. केस कापले जातांना कडीपत्ता न्यायला विकास आला. त्याला 

विचारले तर बंगल्यात नवीन कोण रहायला येणार हे त्यालाही माहिती नाही म्हणाला.


संध्याकाळी पुढच्या दारी पायरीवर मोबाईल बघत बसलो होतो तर क्रांती आली. ती स्वत:च म्हणाली की ती बंगल्यात रहायला येतेय. म्हणजे लवकरच आमच्या शेजारी क्रांतीपर्व सुरू होणार...



........


१२.११.२०२०


आज वसुबारस. 



सकाळी स्वप्नं पडले. मी व नार्वेकर एका काॅलेज हाॅस्टेलमध्ये आहोत. आणखी तीन चार जणही आहेत. ते फिरायला जाणार आहेत. तत्पूर्वी नार्वेकर मला संगणकावर महाकोष दाखवण्यासाठी संगणक सुरु करीत असतात. मी पासवर्ड नीट बघून ठेवला पाहिजे, हे बाहेर गेले की पंचाईत नको, असा विचार करतो. प्रोग्रामच्या टचमध्ये राहिले पाहिजे, असे मी बोललो तर तेही म्हणाले की , नाही तर विसरायला होतं. तेवढ्यात दोन काॅलेजकुमारी काही तरी विचारतात. मी त्यांना तुम्हाला तिकडे रुम दिली आहे असे समोर बोट दाखवून सांगतो. इथेच स्वप्नं संपते. 



आज सकाळी सौ.ने माझे केस काळे केले. 



आज‌ मुलाने मला नवीन शर्ट आणला आणि हिच्यासाठी दोन साड्या आणल्या. तीनही सुंदर आहेत. मुलाने स्वत:ला मात्र सांगूनही काहीच घेतले नाही. त्याचा मूड नाही हे मला कळते आहे. पण मी काही करू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. आयुष्यात कधी नाही तेवढा मी हताश झालो आहे. काळाच्या मनात काय आहे ते कळत नाही. आज मी तुम्हांला काही सांगू शकत नाही.



आज क्रांती बंगल्यात येईल असे वाटले होते पण अजून तरी कुठे जाग नाही. 



दुपार झाली. अरविंद अजून तरी आलेला नाही. संध्याकाळी तरी येतोय का ते बघू. 



अरविंद आला नाहीच. पण संध्याकाळी पाच वाजता समोरच्या बंगल्यात झाडलोट सुरू झाली. सतरा तारीखच्या आत रहायला येणार असं क्रांती माझ्या सौ.ला म्हणाली . 


.................


१३.११.२०२०


सकाळी ०७.३० वा. अरविंदला फोन केला. तो थोड्या वेळाने येतो म्हणाला. तासाभरात जोशी , चौगुले व अरविंद पण आला. आज दिवसभरात दुसरे ग्रील तयार होऊन दोघांनाही रंग पण काढून झाला. साडेपाच वाजता ते तिघेही निघून गेले. उद्या दिवाळी आहे. परवा येतो म्हणाले. 


संत्याने दोन्ही घरात आकाश कंदील लावून दिले.‌


स्वाती वहिनीने घरातली सगळी लादी पुसून काढली व ती गेली.  सौ.ने व मी पणत्या लावल्या. दोन्ही घरातील आकाश कंदील पेटवले. दरवर्षीप्रमाणे आम्ही लायटींगही केली आहे. पण खरं सांगू, आमच्या मनालाच उजेड हरवलाय. आताही रात्री साडेनऊ वाजता मुलगा गाडी घेऊन बाहेर गेला. बाहेर जातोय हे सांगितले पण आता रात्रीचा कुठे जातोयस विचारले तर जाऊन येतो म्हणाला आणि निघून गेला. मुलाचं हे विक्षिप्त वागणं आम्हां दोघांनाही अनाकलनीय झालंय. तो वीस मिनिटात परत आल्याने आमच्या जिवात जीव आला.‌



१४.११.२०२०


काही विशेष नाही.


१५.११.२०२०


आज दिवाळी. लक्ष्मीपूजनही. 


पहाटे स्वप्नं पडले. मी एका घरात पहिल्या मजल्यावर खिडकी जवळ खुर्चीत बसलेला. समोर कोणी तरी आहे. मी खिडकीतून बाहेर बघतो तर रिक्क्षाजवळ उभा असलेला रिक्षा ड्रायव्हर अगदी ओळखीचा असल्यासारखा मला हात दाखवून हसतो.‌ दुसऱ्याच क्षणी तो अनोळखी असल्याचे लक्षात येऊन मलाच विचित्र वाटते. मी खुर्चीतून खाली बसतो. पण तरीही तो मला दिसत असतो व त्यालाही मी दिसत असतो. तो पुढे येऊ लागतो. मी मान आणखी खाली घालतो. तो पुढे येऊन सांगतो की साॅरी हा, मला माझ्या ओळखीचेच वाटलात... म्हणून मी हात केला. त्यालाही आता ओशाळवाणे वाटत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.‌ इथे स्वप्नं संपले.




१६.११.२०२०


बंदूचे व त्याच्या वहिनीचे जोरदार भांडण झाले. सौ.चे आजारपण, मुलांचा गंभीर होणारा प्रश्र्न या पार्श्र्वभूमीवर एकूणच सगळे कठीण बनले आहे. 


 २७.११.२०२० ला तुळशी विवाहादिवशी अशोक व गार्गी आली.  


२९.११.२०२० ला अशोकच्या कारने वेंगुर्ल्याला गेलो.१.१२.२०२० ला सकाळी सावंतवाडीला गेलो.

वीस दिवस तिकडेच होतो. मुलांचे वर्क फ्राॅम होम सावंतवाडीतूनच चालू होते. सौ.च्या पायदुखीमुळे तिथल्या एका डाॅक्टरने तिच्या पायातून रक्तही काढले. नासके रक्त आहे म्हणाला.


मध्येच एक दिवस वेंगुर्ल्यात खवणे बीचला  पेडणेकर व हडकर फॅमिली बरोबर जाऊन आलो. तिथेही मुलाचा व सौ.चा खटका उडालाच.


वीस दिवसांनी घरी आलो.


२१.१२.२०२० पासून मुलाचे वर्क फ्राॅम होम नवीन बांधलेल्या वरच्या माळ्यावर सुरू झाले. 


२१.१२.२०२० ला बावादादा आला.


२५.१२.२०२० ख्रिसमस


मंगलला ११.४५ ला झोप लागल्यानंतर मुलगा खूप डिप्रेस्ड झाल्याचे लक्षात आल्याने , काल रात्री १२ ते १.३० पर्यंत त्याच्याशी बोललो. त्याला समजावून माळ्यावरुन खाली आलो आणि दोन वाजता सौ. अंगावर रॅशेस उठल्याने अंग खाजवत जागी झाली.  सुदैवाने मुलाचे काम लवकर संपले होते. मग आम्ही चार वाजेपर्यंत सौ. वर उपचार करीत राहिलो. नंतर थकून झोपलो तो ७.३० ला बावादादाने बेल मारली तेव्हा जागे झालो. असा आमचा हॅपी ख्रिसमस झाला.


.......

०२.०१.२०२१

मुलगा ३१.१२.२०२० रोजी रात्री मुंबईला गेला. आई आजारी असूनही थांबला नाही. त्याचा चेहरा बघून थांबवणेही जमले नाही. ०४ तारीखला सकाळी येतो म्हणालाय. 


भाची , तिचे मिस्टर, त्यांचा मामेभाऊ , दुसरी भाची तिची मुलगी गौरांगी असे कुडाळातून आले‌. जेवले आणि गेले पण. एवढ्या ला़बून येऊन थांबले नाहीत. 


संस्थेची पॅन अॅप्लीकेशनची रिसिप्ट आज ११ वा.  मिळाली. बॅंकेत फोन केला. बॅंकेचे साहेब म्हणाले , चार वा. या. गेलो. दिली. संस्था रजिस्ट्रेशनला एक वर्ष लागले ! आता बॅंक अकाऊंट कधी ओपन होणार त्याची वाट बघायची. जागतिक महासत्तेच्या स्वप्नांचा वेगच जास्त आहे. 


संध्याकाळी ०६ वा. पुण्याहून कांतीचा फोन आला. गेले काही दिवस आजारी असलेली विलासची छोटी गेली. अतिशय दुर्दैवी घटना.  


घरात सौ.ची पायदुखी वाढलीय. तेलाने माॅलीश करून इस्त्रीने शेकतोय. काय करावे तेच कळत नाहीय. 


...................


१०.०१.२०२१

आज सकाळी दादाची तब्ब्येत बिघडली. परकार हाॅस्पीटलला नेलं. बरा झाला. दादाची काळजी वाटते. 


दुपार चांगली गेली. संध्याकाळ सुंदर होती. 


पण रात्री साडे दहाला आम्हां तिघांचे घरगुती नाट्य सुरू झाले. ते दोन वाजेपर्यंत चालले. अडीचच्यानंतर कधीतरी झोप लागली असेल. 


.................


गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री असे द्रष्टे कवी सुरेश भट साहेब लिहून गेले. अशा ओळी कालातीत असतात. अमर असतात. अक्षय असतात. भटांनी केवळ विजा घेऊन येणाऱ्या पिढीलाच ओळखले होते असे नव्हे, तर आणखीही काही जणांची कुंडली त्यांना ज्ञात होती. म्हणूनच वाकुल्या दाखवी निकाल मला असेही ते लिहून गेले होते. उच्च पातळीवर काय होऊ शकते , हे सर्वसामान्य माणसाला कळतही नाही आणि कळू दिले जातही नाही. 


शिखंडी आडून येतो बाण एखादा

लबाडीने प्राण घेतो बाण एखादा


यंत्रणांना शिखंडी समजून त्यांच्याद्वारे अशी गत केली जाते. खास खोज्यांनी तशी व्यवस्था केलेली असते. भटांनी यावर कायम स्वरूपी मार्मिक भाष्य केले आहे. तुझ्या महालामधील खोजे तुझ्याहुनी बेगुमान होते हेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. हे खोजे वेळकाढूपणा करणार. समिती जन्माला घालणार, भिजत घोंगडे ठेवणार आणि त्यांना सोईच्या वेळेला ते वरही काढणार . म्हणून भटसाहेबांनी त्यांना बेगुमान म्हटलेलं आहे. आपण काय म्हणायचे ते ठरवा आणि म्हणा पण !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१४.०१.२०२१

...............


२४.०१.२०२१ रविवार एका फाॅर्मसाठी निलेश पाटील ने माळनाक्यावर आहार रेस्टाॅरंटमध्ये बोलावले. दादा व मी सह्या करून आलो. 


२६.०१.२०२१ सुट्टी


२७.०१.२०२१ निलेश पाटील ना अॅक्सिस बॅंकेत जाऊन बावादादासह भेटलो. आवश्यक त्या अंतिम दुरूस्त्या करून दिलेल्या.निलेश पाटील म्हणाले, आता फक्त एक फाॅर्म ६०चं एक अॅप्रूव्हल राहिले आहे. एक आठवड्यात ते मिळेल. मग अकाऊंट ओपन होईल. तेव्हा तिथे शेजारचा  हर्षद हेमंत सावंत (अॅक्सिस बॅंक कर्मचारी ) आला. त्यालाही ही गोष्ट बोललो. तो म्हणाला मी बघतो. एका बॅंकेत खाते उघडायला महिना लागतो ही डिजीटल युगाची शोकांतिका आहे. 


२८.०१.२०२१ सकाळी बावादादा मुंबईला रवाना. सौ. व मी बावनदीला डाॅ. बनेंकडे आजपासून जायला सुरुवात केली. 

........

०७.०२.२०२१

आज बावनदीला जाण्याचा शेवटचा दिवस. घराजवळच रिक्षा भेटली. रिक्शावाला ओळखीचा निघाला. थोडं पुढे गेल्यावर त्याने रिक्शा थांबवली. सरपंचपदी निवड जवळजवळ निश्र्चित झालेल्या उमेदवाराचे त्याने अभिनंदन केले. मग आम्हीही केले. पुढे रहाटाघरातून पांगरीमार्गे देवरूख बसने नेहमीप्रमाणे बावनदीला गेलो. अडीच वाजता घरी आलो तर मुलगा शहरात निघालेला. नीटसं जेवलाही नव्हता. नीट बोललाही नाही. मी लवकर ये म्हटलं. तो हा म्हणाला. त्याचा मूड कालपासूनच ठीक नव्हता. काळजी वाटत होतीच. साडेपाच वाजले तरी तो आला नाही. म्हणून फोन करीत असतांनाच एक बाई पाटीलवाडीत सुनील पाटीलने आत्महत्या केल्याचं सांगत आली. आमच्या काळजात धस्स झालं. मुलाला फोन करीतच होतो, पण रिंग होऊनही तो उचलत नव्हता. आमचं टेंशन वाढतच होतं. आम्ही फोन करीतच होतो. शेवटी साडेसहाला त्याने फोन उचलला. घरी येतोय म्हणाला. आम्ही पुन्हा पुन्हा फोन करीत राहिलो. तो येतो म्हणत राहिला. शेवटी तो रात्री आठ वाजता आला तेव्हा आम्ही सुटकेचा श्वास सोडला. रात्री आमच्याजवळ झोपवला. आता उद्या काय होईल या विचारात झोप नीट लागलीच नाही.‌

............

१०.०२.२०२१

पहाटे पाच वाजता मला स्वप्नं पडलं. पुढच्या अंगणात दक्षिण दिशेला दादा उभा असतो. त्याच्या डाव्या हाताला माझा मुलगा बहुतेक खाली बसलेला आहे. ते दोघे काही तरी शोधतायत. मी उत्तरेकडे उभा राहून काय शोधतायत ते विचारतो. दादा सांगतो की ते आमचा जुना खुणेचा दगड शोधतायत. माझ्या हातातल्या काठीने मी वायव्य आग्नेय अशी खूण करून तो दगड या पट्ट्यात कुठे तरी जमिनीत गाडला गेला आहे, असे सांगतो. इथे स्वप्नं संपलं. खरं तर तो दगड दादाच्याच अंगणात आमच्या शेवटच्या पायरीपासून दीडेएक फुटांवर पूर्वापार होता.  दादाने जुने घर पाडून नवे घर बांधले तेव्हा तो उभा दगड अंगणात घातलेल्या नवीन लादीखाली गेला. तो आम्हां तिघांनाही माहीत होता. मग दादा तो आताच का शोधत होता आणि मी छेद द्यावा तशी काठीने माझ्याच अंगणात रेषा आखून का दाखवतो ? काही तरी तिरकस घडणार या विचाराने मी दिवसभर अस्वस्थ होतो. तो छेद मनातून जात नव्हता. गेले काही दिवस मुलगाही विचित्र वागत होता. नीटसं जेवतही नव्हता. कुठलेच उत्तर सरळ आणि सहजतेने देत नव्हता. संध्याकाळी घाईघाईने शहरात गेला. परत आला तो चिडलेलाच होता. रात्री तो जेवलाच नाही. भूक नाही म्हणाला. आम्ही दोघंही टेंशनवरच होतो. काय झालंय तेही सांगेना.  रात्री अकरा वाजले तरी तो जेवायला तयार होईना.  आमचा जीव राहिना. अखेर मी जिन्याने वर जाऊन पुन्हा विचारले तर तो भडकलाच. मला एकट्याला राहुद्या म्हणाला. मी निराश होऊन खाली आलो. साडेअकरा वाजता त्याला वरती गारठा असल्याने खाली ये म्हणून हिने त्याला सांगितले. खूप मिनतवारीनंतर तो दणदणत खाली आला. शेजारी झोपला. पण रडू लागला. ही समजवायला गेली तर त्याने हिला झिडकारलंच. मी पण आमच्या दोघांच्या आजारपणांना आणि मुलांच्या ह्या विचित्र वागण्याला कंटाळलो होतो. मी माझ्या दुर्दैवाबद्दल काही तरी बोललो. त्यावर हिने मला दुजोरा दिला. त्यामुळे भडकून मुलगा हिला काही तरी बोलला ‌ झाले, मायलेकांचे भांडणं सुरू झाले. ही हायपर झाली. त्या उद्रेकामुळे हिच्या अंगाला खाज सुटली. हिचे दुखणे पुन्हा सुरू झाले. श्र्वास कोंडून ही तडफडू लागली. तसा तो माझ्या मदतीला आला. 


..............

१३.०२.२०२१ रात्रीच्या बसने मुलगा पुण्याला गेला. मित्राचे लग्नं आहे.

...............

१९.०२.२०२१ मित्राचे लग्न काल झाले. काल रात्री पुण्याहून निघून मुलगा आज सकाळी घरी आला. 

........... ( क्रमशः )

मंगळवार, २५ मे, २०२१

एक आवडलेली गोष्ट

 कोरोनाच्या ऐन भरातली ही डॉ . श्रीकृष्ण जोशी यांच्यासारख्या मातब्बर लेखकाकडून साकारलेली कथा.‌ तिच्यात काळजाला भिडणारं असं काही तरी नक्कीच आहे ! आपल्या ' मागे पुढे ' या पानासाठी बरेच दिवसांनी पोस्ट करीत आहे. अवश्य वाचा. व अभिप्राय द्या .‌‌‌‌‌...



*🌹इम्युनिटी अनलिमिटेड 🌹*


           *- डॉ . श्रीकृष्ण जोशी*


तिनं कटिंगचा ग्लास त्याच्यासमोर आदळला .

" हा चहा सातव्यांदा आणलाय , आता नाही म्हणालास तर..."

" सातव्यांदा ? मग माझ्या कसं लक्षात नाही आलं ? मग अगोदरच्या चहाचं काय झालं ?"

" आम्ही प्यालो ."

सगळे एका सुरात ओरडले .

" हरकत नाही , पण आता एक काम करा , सगळ्यांनी निघा इथून . शौनक , तू आजोबांकडे जायचं आहेस त्यांच्यासाठी वर्तमानपत्र घेऊन , आणि त्यातल्या निगेटिव्ह बातम्या वाचून दाखवू नकोस .आभा तुला सिस्टरच्या घरी जायचंय , केक घेऊन . त्या नर्स आहेत , आज कदाचित त्यांची ड्युटी वाढण्याची शक्यता आहे . मालन , आजींसाठी काहीतरी घेऊन जा खायला , आजतरी त्या काही खातात का बघ . तुझं संभाषण कौशल्य पणाला लाव . मोन्या , तुला आज नकला करून दाखवायच्या आहेत नाना नानी पार्क मध्ये , पण तिथल्या व्हीलचेअर वरच्या आजोबांचा हात हातात घे . त्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही , याची काळजी घे . जगन , तू जिथं जाणार आहेस ,त्या अपार्टमेंटमध्ये चार जण पॉझिटिव्ह आहेत , त्या चारही जणांचे जेवणाचे डबे , त्यातलं अन्न गरम असेपर्यंत नेऊन दे . विन्या , त्या टीपॉय वर सामोसे , वडापाव आणि पाण्याच्या बाटल्या आहेत , सगळ्या ऍम्ब्युलन्स मधल्या ड्रायव्हर्सना आणि स्मशान ड्युटी लागलेल्या सगळ्यांना दे आणि स्मशानात काम करणाऱ्या दादांना पण दे .कुणीही भुकेला राहता कामा नये . आता कोण राहिलं ? इरा , तुला दिलेल्या एरियातील हॉस्पिटलच्या बाहेर कुणी भांबावलेले , राहण्याची सोय नसलेले असे कुणी असतील तर त्यांची विचारपूस करून व्यवस्था कर , काही अडचण आली तर कॉल कर . नरेश तुझे पोलीस तुझी वाट पाहत असतील , त्यांना जेवणाचे पॅक नेऊन दे ."

" आणि तू काय करणार ? किमान तो चहा तरी पी ." आभा म्हणाली.


त्यानं चहा संपवला .


" - आणि कुठे कसं जायचं , आवश्यक ते फोननंबर्स अशी सगळी माहिती त्या टेबलावरच्या रजिस्टर मध्ये आहे . आणि हो , प्रत्येकाच्या नावाचं एक एक पाकीट ठेवलंय , त्यात खर्चासाठी लागणारी रक्कम आहे .ती कम्पलसरी घ्यायची आहे ."

" पण तू काय करणार आहेस , ते नाही सांगितलंस ."


" मी ? "


तो गप्प झाला .

त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं .

त्यानं ते वाहू दिलं .

" सॉरी वेदांत , आभानं असं विचारायला नको होतं , मी तिला सांगतो , ती नवखी आहे , उत्साहाच्या भरात विचारून गेली ."

जगननं त्याच्या खांद्यावर हात ठेवला .

" आम्हाला माहित्येय तू कुठे जाणार आहेस . " 

" ए चला रे , उशीर नको व्हायला ."


- सगळे निघाले .

आभा दारातून परत आली .

" सॉरी , माझं चुकलं " 

" इट्स ओके , चलता है , "

त्यानं डोळे पुसत आंगठा उंचावला .

ती बाहेर गेली .


त्यानं मोबाईल हाती घेतला . आणि व्हॉटसअपवर मेसेज टाइप करू लागला ...

" मित्रांनो , आभार नाही मानत मी तुमचे , पण कृतज्ञता व्यक्त करतो . तुम्ही आहात म्हणून इम्युनिटी अनलिमिटेड ला अर्थ आहे . थँक्स !"

मेसेज फॉरवर्ड करून तो उठला .

पुन्हा बसला .

 समोर भिंतीवर आजीआजोबांचं छायाचित्र होतं . 

त्यानं मनोमन नमस्कार केला .

आणि हृदयात कळ उठावी , तसा आभाचा प्रश्न मनात कल्लोळ माजवून गेला .

" तू काय करणार आहेस , ते नाही सांगितलंस ..."


काय सांगायचं ?

लहानपणी आईवडील गेल्यावर आजीआजोबांनी वाढवलं ते सांगायचं ?

की आजीआजोबांचा , दोघांचाही कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाल्यावर बेड्स मिळाले नाहीत , ऑक्सिजन मिळाला नाही , ते सांगायचं ?

की ज्यावेळी ते तडफडत होते तेव्हा आपण मदत करू शकलो नाही हे सांगायचं ?

की खूप पैसे जवळ असूनही शेवटच्या क्षणी त्यांच्याशी बोलायला , विचारपूस करायला आपल्याला जमलं नाही , शासकीय व्यवस्थेनं ते करू दिलं नाही , हे सांगायचं ?

की अंत्यदर्शनाऐवजी दोघांची डेथ सर्टिफिकेट्स तेव्हढी मिळाली , हे सांगायचं ?


-- विचार करकरून त्याच्या डोक्याचा भुगा झाला होता .


आजीआजोबांना कुठं अग्नी दिला असेल ते माहीत नसल्यानं त्यानं स्मशानात अंदाजानं एका जागेसमोर उभं राहून हात जोडले . 

आणि जड पायानं परत फिरला .


थ्री बेडरूम किचनची मोठाली जागा त्याच्या अंगावर आली .

तो मटकन खाली बसला .


आजीआजोबांच्या छायाचित्राकडे बघताना त्याला काहीतरी वेगळं जाणवू लागलं .


शेवटच्या दिवसात आजी आजोबांना काय वाटलं असेल ? 

त्यांची विचारपूस कुणी केली असेल का ? 

कुणी बोललं असेल का त्यांच्याशी ?

त्यांना वेळेवर जेवण मिळालं असेल का ?

तडफडत असताना माझ्या आठवणीनं हळवे झाले असतील का ?

आपण तरी ऑफिस टूर साठी जायलाच हवं होतं का ?

त्या सात आठ दिवसात सगळ्या भावविश्वात एवढी उलथापालथ ...?


सगळं चुकलंच म्हणायचं आपल्या कडून .


तो मनानं विदीर्ण झाला . खचला . 


पुढच्या आठदहा दिवसात तो वेड्यासारखा फिरत होता . 

हॉस्पिटल्स . 

स्मशानं.

ऍम्ब्युलन्स च्या जागा .

डॉक्टर्स , नर्सेस , सगळे कर्मचारी , पोलीस ...

सगळ्यांना भेटत होता ...


सगळ्यांचं एकच म्हणणं .

सगळ्यांनी इम्युनिटी पॉवर वाढवली पाहिजे .

अन्न चांगलं हवं .

हवा शुद्ध हवी .

औषधं मुबलक हवीत .

शरीरापेक्षा मनानं पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे .

आणि सर्वांनी संवाद वाढवला पाहिजे .


- ऍम्ब्युलन्स च्या एका ड्रायव्हरनं एकच वाक्य ऐकवलं .

तो म्हणाला ,

" विचारपूस करणारा कुणी असला की आम्हा सगळ्यांना बळ मिळतं . आणि माणूस कितीही आजारी असला तरी तो बरा होऊ शकतो ."


तो चक्रावला .

त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला .

तो तसाच घरी आला .

आणि त्याच्या डोक्यात अफलातून कल्पना आली .

त्याक्षणी त्यानं नोकरीचा राजीनामा पाठवून दिला , मेलनं .


आणि नव्या उपक्रमाची सुरुवात केली , *इम्युनिटी अनलिमिटेड* , या नावानं .

पुढच्या काही दिवसात तो पुन्हा सगळीकडे हिंडत राहिला .

आपल्यासारखे अनाथ झालेले शोधत राहिला .

त्यांच्या मनात तो उतरू लागला .

एकाचे दोन , दोनाचे सहा व्हायला वेळ लागला नाही .

काय करायचं ते स्पष्ट होतं .

पैशांचा प्रश्नच नव्हता त्याला .


संवाद साधायचा .

विचारपूस करायची .

कसलीही अभिलाषा न ठेवता , इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी जेजे करता येईल ते करायचं .


आजी आजोबांना हीच श्रद्धांजली !


त्याला हवा तसा ग्रुप मिळाला आणि अल्पावधीत रिझल्ट्स मिळायलाही लागले .

दिवसेंदिवस ग्रुपमध्ये वाढ होत होती आणि अनेक ठिकाणाहून वाट पाहिली जात होती .


- तो उठला .

आभाच्या प्रश्नानं उठलेलं वादळ शमलं होतं .


त्यानं बॅग उचलली .

त्या बागेत असंख्य खेळणी , वैविध्यपूर्ण खाऊ , गोष्टीची पुस्तकं आणि बरंच काही होतं .


अगदी लहान वयात आईवडिलांचं छत्र हरपलेली अनेक बाळं , त्याची वाट पाहत होती .


डोळे पुसून , आजी आजोबांच्या छायाचित्राला नमस्कार करून तो बाहेर पडला ...


*- डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी*

९४२३८७५८०६

-----------

कथा आवडली तर नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .


आणि हो , 

आपल्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या अभिप्रायाची सुद्धा वाट पहात आहे .

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

मागे पुढे पुन्हा एकदा

 ०९.११.२०२०


गेले २ - ३ दिवस राकेश तसा झालाय. 


शेवटच्या गझलकाराच्या गझला , परिचय , फोटो म. नानिवडेकरांकडे आजच पाठवल्या. 


सायं. ०६.३७ ला सुनील आडीवरेकरचा सावंतवाडीहून फोन आला. भाऊ सुधीर व दोन मित्र असे चौघेजण उद्या रत्नागिरीत व आमच्याकडेही येणार आहेत.


अरविंद ग्रील बसवायला आज येणार होता. आला नाही.‌ फोन करून उद्या यायला सांगितले. 

........


१०.११.२०२०


स. ०९.३० वा. सुनीलला फोन केला तर त्याच्या आईची तब्येत बिघडल्याने सुधीर येत नाही व सुनील आत्ताच मित्रांसह निघाल्याचे कळले. 


संध्या. ०४.३० वा. अरविंद व पब्यादादा चंदरकर ग्रीलचे साहित्य घेऊन आले व अंगणात ग्रील तयार करू लागले. 


.....तोच सुनीलची गाडी आली. सावंत , कंग्राळकर हे सावंतवाडीचे व मागाहून आलेले टाकळे मिऱ्याचेच असे चौघेजण आले.‌ एल एम एल बिझीनेस. नो इंटरेस्ट.


११.११.२०२०

काल रात्री एक गझल सुचली. पण मधल्या एका शेराची दुसरी ओळ स्फुरली पण दुसरी समर्पक ओळ येईना. अखेर आज सकाळी ती ओळ सुचली. 


काल सतीश टोपकर आमच्याकडे येणार होता तो आला नव्हता. खालच्या अंगणात ठेवलेल्या वाळूच्या २८ पिशव्यांपैकी ०२ कमी झाल्याचे लक्षात आल्याने सतीशला त्याच्या माणसांकरवी त्या आमच्या अंगणात ठेवायला सांगितले होते. आता हे नोंदीत असतानाच सतीश त्या पिशव्या हलवतोय. सकाळचे १०.२० झाले आहेत. तेव्हढ्यात उदू आलाय.‌ दिवस पुढे सुरू झाला आहे.


दुपारी जेवणाच्या वेळी समोर लक्ष गेले. तीन तरूण बंगल्याच्या रहाटाजवळ दिसले. कदाचित भैय्या भाभी सोडून गेल्याने रिकामा झालेल्या बंगल्यात काॅलेजकुमार रहायला येणार असतील किंवा ती मालकाची मुलेही असतील, असा विचार करून मी किचनकडे वळलो. 

संध्याकाळी केस कापायला गावातला मुलगा आला. मी केस कापून घेतले. उद्या सौ. ते रंगवणार आहे. केस कापले जातांना कडीपत्ता न्यायला विकास आला. त्याला 

विचारले तर बंगल्यात नवीन कोण रहायला येणार हे त्यालाही माहिती नाही म्हणाला.


संध्याकाळी पुढच्या दारी पायरीवर मोबाईल बघत बसलो होतो तर क्रांती आली. ती स्वत:च म्हणाली की ती बंगल्यात रहायला येतेय. म्हणजे लवकरच आमच्या शेजारी क्रांतीपर्व सुरू होणार...

........


१२.११.२०२०


आज वसुबारस. 

सकाळी स्वप्नं पडले. मी व नार्वेकर एका काॅलेज हाॅस्टेलमध्ये आहोत. आणखी तीन चार जणही आहेत. ते फिरायला जाणार आहेत. तत्पूर्वी नार्वेकर मला संगणकावर महाकोष दाखवण्यासाठी संगणक सुरु करीत असतात. मी पासवर्ड नीट बघून ठेवला पाहिजे, हे बाहेर गेले की पंचाईत नको, असा विचार करतो. प्रोग्रामच्या टचमध्ये राहिले पाहिजे, असे मी बोललो तर तेही म्हणाले की , नाही तर विसरायला होतं. तेवढ्यात दोन काॅलेजकुमारी काही तरी विचारतात. मी त्यांना तुम्हाला तिकडे रुम दिली आहे असे समोर बोट दाखवून सांगतो. इथेच स्वप्नं संपते. 



आज सकाळी सौ.ने माझे केस काळे केले. 



आज‌ मुलाने मला नवीन शर्ट आणला आणि हिच्यासाठी दोन साड्या आणल्या. तीनही सुंदर आहेत. मुलाने स्वत:ला मात्र सांगूनही काहीच घेतले नाही. त्याचा मूड नाही हे मला कळते आहे. पण मी काही करू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. आयुष्यात कधी नाही तेवढा मी हताश झालो आहे. काळाच्या मनात काय आहे ते कळत नाही. आज मी तुम्हांला काही सांगू शकत नाही.



आज क्रांती बंगल्यात येईल असे वाटले होते पण अजून तरी कुठे जाग नाही. 



दुपार झाली. अरविंद अजून तरी आलेला नाही. संध्याकाळी तरी येतोय का ते बघू. 



अरविंद आला नाहीच. पण संध्याकाळी पाच वाजता समोरच्या बंगल्यात झाडलोट सुरू झाली. सतरा तारीखच्या आत रहायला येणार असं क्रांती माझ्या सौ.ला म्हणाली . 


.................


१३.११.२०२०


सकाळी ०७.३० वा. अरविंदला फोन केला. तो थोड्या वेळाने येतो म्हणाला. तासाभरात जोशी , चौगुले व अरविंद पण आला. आज दिवसभरात दुसरे ग्रील तयार होऊन दोघांनाही रंग पण काढून झाला. साडेपाच वाजता ते तिघेही निघून गेले. उद्या दिवाळी आहे. परवा येतो म्हणाले. 


संत्याने दोन्ही घरात आकाश कंदील लावून दिले.‌


स्वाती वहिनीने घरातली सगळी लादी पुसून काढली व ती गेली.  सौ.ने व मी पणत्या लावल्या. दोन्ही घरातील आकाश कंदील पेटवले. दरवर्षीप्रमाणे आम्ही लायटींगही केली आहे. पण खरं सांगू, आमच्या मनालाच उजेड हरवलाय. आताही रात्री साडेनऊ वाजता मुलगा गाडी घेऊन बाहेर गेला. बाहेर जातोय हे सांगितले पण आता रात्रीचा कुठे जातोयस विचारले तर जाऊन येतो म्हणाला आणि निघून गेला. मुलाचं हे विक्षिप्त वागणं आम्हां दोघांनाही अनाकलनीय झालंय. तो वीस मिनिटात परत आल्याने आमच्या जिवात जीव आला.‌



१४.११.२०२०


काही विशेष नाही.


१५.११.२०२०


आज दिवाळी. लक्ष्मीपूजनही. 


पहाटे स्वप्नं पडले. मी एका घरात पहिल्या मजल्यावर खिडकी जवळ खुर्चीत बसलेला. समोर कोणी तरी आहे. मी खिडकीतून बाहेर बघतो तर रिक्क्षाजवळ उभा असलेला रिक्षा ड्रायव्हर अगदी ओळखीचा असल्यासारखा मला हात दाखवून हसतो.‌ दुसऱ्याच क्षणी तो अनोळखी असल्याचे लक्षात येऊन मलाच विचित्र वाटते. मी खुर्चीतून खाली बसतो. पण तरीही तो मला दिसत असतो व त्यालाही मी दिसत असतो. तो पुढे येऊ लागतो. मी मान आणखी खाली घालतो. तो पुढे येऊन सांगतो की साॅरी हा, मला माझ्या ओळखीचेच वाटलात... म्हणून मी हात केला. त्यालाही आता ओशाळवाणे वाटत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.‌ इथे स्वप्नं संपले.




१६.११.२०२०


बंदूचे व त्याच्या वहिनीचे जोरदार भांडण झाले. सौ.चे आजारपण, मुलांचा गंभीर होणारा प्रश्र्न या पार्श्र्वभूमीवर एकूणच सगळे कठीण बनले आहे. 


 २७.११.२०२० ला तुळशी विवाहादिवशी अशोक व गार्गी आली.  


२९.११.२०२० ला अशोकच्या कारने वेंगुर्ल्याला गेलो.१.१२.२०२० ला सकाळी सावंतवाडीला गेलो.

वीस दिवस तिकडेच होतो. मुलांचे वर्क फ्राॅम होम सावंतवाडीतूनच चालू होते. सौ.च्या पायदुखीमुळे तिथल्या एका डाॅक्टरने तिच्या पायातून रक्तही काढले. नासके रक्त आहे म्हणाला.


मध्येच एक दिवस वेंगुर्ल्यात खवणे बीचला  पेडणेकर व हडकर फॅमिली बरोबर जाऊन आलो. तिथेही मुलाचा व सौ.चा खटका उडालाच.


वीस दिवसांनी घरी आलो.


२१.१२.२०२० पासून मुलाचे वर्क फ्राॅम होम नवीन बांधलेल्या वरच्या माळ्यावर सुरू झाले. 


२१.१२.२०२० ला बावादादा आला.


२५.१२.२०२० ख्रिसमस


मंगलला ११.४५ ला झोप लागल्यानंतर मुलगा खूप डिप्रेस्ड झाल्याचे लक्षात आल्याने , काल रात्री १२ ते १.३० पर्यंत त्याच्याशी बोललो. त्याला समजावून माळ्यावरुन खाली आलो आणि दोन वाजता सौ. अंगावर रॅशेस उठल्याने अंग खाजवत जागी झाली.  सुदैवाने मुलाचे काम लवकर संपले होते. मग आम्ही चार वाजेपर्यंत सौ. वर उपचार करीत राहिलो. नंतर थकून झोपलो तो ७.३० ला बावादादाने बेल मारली तेव्हा जागे झालो. असा आमचा हॅपी ख्रिसमस झाला.


.......

०२.०१.२०२१

मुलगा ३१.१२.२०२० रोजी रात्री मुंबईला गेला. आई आजारी असूनही थांबला नाही. त्याचा चेहरा बघून थांबवणेही जमले नाही. ०४ तारीखला सकाळी येतो म्हणालाय. 


भाची , तिचे मिस्टर, त्यांचा मामेभाऊ , दुसरी भाची तिची मुलगी गौरांगी असे कुडाळातून आले‌. जेवले आणि गेले पण. एवढ्या ला़बून येऊन थांबले नाहीत. 


संस्थेची पॅन अॅप्लीकेशनची रिसिप्ट आज ११ वा.  मिळाली. बॅंकेत फोन केला. बॅंकेचे साहेब म्हणाले , चार वा. या. गेलो. दिली. संस्था रजिस्ट्रेशनला एक वर्ष लागले ! आता बॅंक अकाऊंट कधी ओपन होणार त्याची वाट बघायची. जागतिक महासत्तेच्या स्वप्नांचा वेगच जास्त आहे. 


संध्याकाळी ०६ वा. पुण्याहून कांतीचा फोन आला. गेले काही दिवस आजारी असलेली विलासची छोटी गेली. अतिशय दुर्दैवी घटना.  


घरात सौ.ची पायदुखी वाढलीय. तेलाने माॅलीश करून इस्त्रीने शेकतोय. काय करावे तेच कळत नाहीय. 


...................


१०.०१.२०२१

आज सकाळी दादाची तब्ब्येत बिघडली. परकार हाॅस्पीटलला नेलं. बरा झाला. दादाची काळजी वाटते. 


दुपार चांगली गेली. संध्याकाळ सुंदर होती. 


पण रात्री साडे दहाला आम्हां तिघांचे घरगुती नाट्य सुरू झाले. ते दोन वाजेपर्यंत चालले. अडीचच्यानंतर कधीतरी झोप लागली असेल. 


.................


गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री असे द्रष्टे कवी सुरेश भट साहेब लिहून गेले. अशा ओळी कालातीत असतात. अमर असतात. अक्षय असतात. भटांनी केवळ विजा घेऊन येणाऱ्या पिढीलाच ओळखले होते असे नव्हे, तर आणखीही काही जणांची कुंडली त्यांना ज्ञात होती. म्हणूनच वाकुल्या दाखवी निकाल मला असेही ते लिहून गेले होते. उच्च पातळीवर काय होऊ शकते , हे सर्वसामान्य माणसाला कळतही नाही आणि कळू दिले जातही नाही. 


शिखंडी आडून येतो बाण एखादा

लबाडीने प्राण घेतो बाण एखादा


यंत्रणांना शिखंडी समजून त्यांच्याद्वारे अशी गत केली जाते. खास खोज्यांनी तशी व्यवस्था केलेली असते. भटांनी यावर कायम स्वरूपी मार्मिक भाष्य केले आहे. तुझ्या महालामधील खोजे तुझ्याहुनी बेगुमान होते हेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. हे खोजे वेळकाढूपणा करणार. समिती जन्माला घालणार, भिजत घोंगडे ठेवणार आणि त्यांना सोईच्या वेळेला ते वरही काढणार . म्हणून भटसाहेबांनी त्यांना बेगुमान म्हटलेलं आहे. आपण काय म्हणायचे ते ठरवा आणि म्हणा पण !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१४.०१.२०२१

...............


२४.०१.२०२१ रविवार एका फाॅर्मसाठी निलेश पाटील ने माळनाक्यावर आहार रेस्टाॅरंटमध्ये बोलावले. दादा व मी सह्या करून आलो. 


२६.०१.२०२१ सुट्टी


२७.०१.२०२१ निलेश पाटील ना अॅक्सिस बॅंकेत जाऊन बावादादासह भेटलो. आवश्यक त्या अंतिम दुरूस्त्या करून दिलेल्या.निलेश पाटील म्हणाले, आता फक्त एक फाॅर्म ६०चं एक अॅप्रूव्हल राहिले आहे. एक आठवड्यात ते मिळेल. मग अकाऊंट ओपन होईल. तेव्हा तिथे शेजारचा  हर्षद हेमंत सावंत (अॅक्सिस बॅंक कर्मचारी ) आला. त्यालाही ही गोष्ट बोललो. तो म्हणाला मी बघतो. एका बॅंकेत खाते उघडायला महिना लागतो ही डिजीटल युगाची शोकांतिका आहे. 

२८.०१.२०२१ सकाळी बावादादा मुंबईला रवाना. सौ. व मी बावनदीला डाॅ. बनेंकडे आजपासून जायला सुरुवात केली.

........

०७.०२.२०२१

आज बावनदीला जाण्याचा शेवटचा दिवस. घराजवळच रिक्षा भेटली. रिक्शावाला ओळखीचा निघाला. थोडं पुढे गेल्यावर त्याने रिक्शा थांबवली. सरपंचपदी निवड जवळजवळ निश्र्चित झालेल्या उमेदवाराचे त्याने अभिनंदन केले. मग आम्हीही केले. पुढे रहाटाघरातून पांगरीमार्गे देवरूख बसने नेहमीप्रमाणे बावनदीला गेलो. अडीच वाजता घरी आलो तर मुलगा शहरात निघालेला. नीटसं जेवलाही नव्हता. नीट बोललाही नाही. मी लवकर ये म्हटलं. तो हा म्हणाला. त्याचा मूड कालपासूनच ठीक नव्हता. काळजी वाटत होतीच. साडेपाच वाजले तरी तो आला नाही. म्हणून फोन करीत असतांनाच एक बाई पाटीलवाडीत सुनील पाटीलने आत्महत्या केल्याचं सांगत आली. आमच्या काळजात धस्स झालं. मुलाला फोन करीतच होतो, पण रिंग होऊनही तो उचलत नव्हता. आमचं टेंशन वाढतच होतं. आम्ही फोन करीतच होतो. शेवटी साडेसहाला त्याने फोन उचलला. घरी येतोय म्हणाला. आम्ही पुन्हा पुन्हा फोन करीत राहिलो. तो येतो म्हणत राहिला. शेवटी तो रात्री आठ वाजता आला तेव्हा आम्ही सुटकेचा श्वास सोडला. रात्री आमच्याजवळ झोपवला. आता उद्या काय होईल या विचारात झोप नीट लागलीच नाही.‌

............

१०.०२.२०२१

पहाटे पाच वाजता मला स्वप्नं पडलं. पुढच्या अंगणात दक्षिण दिशेला दादा उभा असतो. त्याच्या डाव्या हाताला माझा मुलगा बहुतेक खाली बसलेला आहे. ते दोघे काही तरी शोधतायत. मी उत्तरेकडे उभा राहून काय शोधतायत ते विचारतो. दादा सांगतो की ते आमचा जुना खुणेचा दगड शोधतायत. माझ्या हातातल्या काठीने मी वायव्य आग्नेय अशी खूण करून तो दगड या पट्ट्यात कुठे तरी जमिनीत गाडला गेला आहे, असे सांगतो. इथे स्वप्नं संपलं. खरं तर तो दगड दादाच्याच अंगणात आमच्या शेवटच्या पायरीपासून दीडेएक फुटांवर पूर्वापार होता.  दादाने जुने घर पाडून नवे घर बांधले तेव्हा तो उभा दगड अंगणात घातलेल्या नवीन लादीखाली गेला. तो आम्हां तिघांनाही माहीत होता. मग दादा तो आताच का शोधत होता आणि मी छेद द्यावा तशी काठीने माझ्याच अंगणात रेषा आखून का दाखवतो ? काही तरी तिरकस घडणार या विचाराने मी दिवसभर अस्वस्थ होतो. तो छेद मनातून जात नव्हता. गेले काही दिवस मुलगाही विचित्र वागत होता. नीटसं जेवतही नव्हता. कुठलेच उत्तर सरळ आणि सहजतेने देत नव्हता. संध्याकाळी घाईघाईने शहरात गेला. परत आला तो चिडलेलाच होता. रात्री तो जेवलाच नाही. भूक नाही म्हणाला. आम्ही दोघंही टेंशनवरच होतो. काय झालंय तेही सांगेना.  रात्री अकरा वाजले तरी तो जेवायला तयार होईना.  आमचा जीव राहिना. अखेर मी जिन्याने वर जाऊन पुन्हा विचारले तर तो भडकलाच. मला एकट्याला राहुद्या म्हणाला. मी निराश होऊन खाली आलो. साडेअकरा वाजता त्याला वरती गारठा असल्याने खाली ये म्हणून हिने त्याला सांगितले. खूप मिनतवारीनंतर तो दणदणत खाली आला. शेजारी झोपला. पण रडू लागला. ही समजवायला गेली तर त्याने हिला झिडकारलंच. मी पण आमच्या दोघांच्या आजारपणांना आणि मुलांच्या ह्या विचित्र वागण्याला कंटाळलो होतो. मी माझ्या दुर्दैवाबद्दल काही तरी बोललो. त्यावर हिने मला दुजोरा दिला. त्यामुळे भडकून मुलगा हिला काही तरी बोलला ‌ झाले, मायलेकांचे भांडणं सुरू झाले. ही हायपर झाली. त्या उद्रेकामुळे हिच्या अंगाला खाज सुटली. हिचे दुखणे पुन्हा सुरू झाले. श्र्वास कोंडून ही तडफडू लागली. तसा तो माझ्या मदतीला आला. 

..............

१३.०२.२०२१ रात्रीच्या बसने मुलगा पुण्याला गेला. मित्राचे लग्नं आहे.

...............

१९.०२.२०२१ मित्राचे लग्न काल झाले. काल रात्री पुण्याहून निघून मुलगा आज सकाळी घरी आला. 

............................................................


शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

Happpy Navratrotsav

 

Happpy Navratrostav  !




सर्वात प्रथम तुम्हांला आजपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो ! गेल्या भागात तुम्ही वाचलंत की ... अशी समजूत करीत मी पुन्हा सतिशबरोबर चर्चा सुरू केली. त्याच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. काही त्याला समजावून सांगितल्या.... अशी समजुतीची समजूत करीत पुढील भागात प्रवेश करू... चला तर ' मागे पुढे ' मध्ये पुढे काय घडतेय ते पाहू....


        माझ्या आयुष्यातील हा आतापर्यंतचा सर्वात खडतर कालखंड.... मुलाचे वर्क फ्राँम होम सुरू होऊन महिना होत आला. सुरूवातीला तो पुण्याहून यायलाच तयार नव्हता,  अखेर आम्ही तिकडे यायला निघतोय असं सांगितल्यावर पाठवलेल्या कारने तो घरी आला , हे तुम्हांला आठवत असेलच. आला तेव्हा स्वारी घुश्श्यातच होती. आमच्याकडे बघायलाही तयार नव्हती. विशेषत: त्याच्या आईवर त्याचा जास्त राग दिसत होता. शेजारच्या चुलत भावाच्या घरात तो 14 दिवस होम क्वारंटाईन होता. ते दिवसही खडतर गेले. सुरूवातीला इकडे नेटवर्क मिळणारच नाही , मला उगाच बोलावलंत , असा त्याने लावलेला सूरही हळूहळू निवळू लागला. घडी जरा कुठे बसतेय असे वाटते तोच कालचक्र फिरले. 1995-96 पासून डिसेंबर ते जुलै महिन्यात दुर्दैवाचे फटके बसायचे. नंतर काही वर्षांनी हेच कालचक्र बदलून 01 सप्टेंबर ते फेब्रुवारी मध्यापर्यंत वाईट कालखंड यायचा. यंदा फेब्रुवारी बरा गेला , पण 06 मार्च पासून पुन्हा आमचे दिवस फिरले. याच दिवशी आम्ही मुुलाला पुण्यात एकटे सोडून आमच्या गावी आलो . गुढी पाडवा झाला की दोनच दिवसांनी पुन्हा मुलाकडे जाऊ असा विचार आम्ही केला होता, पण कोरोना लाटेने आम्हांला गावातच बंदिस्त केले. मुलगा घरी आला हा आनंद बराचसा क्षणिकच ठरला. मायलेकांचे बोलीभाषण जसे वाढले तसे त्यांच्यात उडणारे खटकेही वाढू लागले. कोणीच कोणाला समजून घेईनासे झाले. कोण कोणाला हुकसवतोय आणि कोण कोणाची पाठ घेतोय हे सांगणे कठीण होऊ लागले. आयुष्यभर ज्या कुटुंबासाठी मी जीव टाकला , नोकरीतही खुळयासारखा वरिष्ठांशी भांडलो, तेच कुटुंब फुटणार हे आता उघड होऊ लागले. माझे ऐकण्याच्या मन:स्थितीत कोणीच नव्हते. तरी अजून कश्यातच काही नव्हते , मुलाचे लग्नं झाले नाही तर ही परिस्थिती होती. पुढे काय होणार ? कुटुंबाच्या काळजीने मी हैराण होत होतो.  खरे तर , मला कोणी खिजगणतीतच धरत नव्हते. ज्यांच्यासाठी प्रत्येक क्षण जगलो त्यांना एकमेकांशी भांडतांना मी दिसतच नव्हतो ! इतकी वर्ष किमान ज्याचे अस्तित्व ज्यांच्या सतत अवतीभवती होते , ते अस्तित्वच विसरून , माझ्याकडे ढुंकूनही न बघता , दोघेही आपलेच मुद्दे रेटू लागले. मी प्रचंड व्यथित झालो. कधी नव्हे ती हरल्याची भावना मनात येऊ लागली ! अनेक वादळे एकटयाने झेलली, पण हे वादळ मला आडवे करून गेले. परिणामत: सकाळी पाणी भरतांना पावसात भिजल्याचे निमित्त होऊन मी आजारी पडलो. दोन दिवस सर्दी , ताप यांनी त्रास दिला. कोरोनाच्या कालावधीत डाँक्टरकडे जायचीच चोरी होती. पण न जाऊनही चालणारे नव्हते. अखेर 19 सप्टेंबरला दोन इंजेक्शन्स घेतली. दोन तीन दिवस गोळया घेतल्या. आँक्सीजन लेव्हल रोज चेक करून घेतली. साठ वर्षात अनेक आजारपणं पाहिली पण कधी कोणत्याही डाँक्टरने आँक्सीजन लेव्हल हया प्रकाराचा उपयोग वा प्रयोग केला नव्हता ! माझी लेव्हल उत्तम होती म्हणून बरे,  नाही तर मला तो आजार नसतांनाही कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले असते. कोरोनाची हकीगत ही अशी आहे ! ही हकीगत मरो , पुढे काय हाल झाले ते पहा. मी ब-यापैकी बरा झालो नाही तोच पत्नी आजारी पडली. तिला सुरूवातीला कोहाळयाचा रस नडला. 23 सप्टेंबरला तिला डाँक्टरकडे नेले. डाँक्टरने मला दिलेल्याच गोळया तिलाही दिल्या. त्यातली एक गोळी घेतली की तिची फक्त कपाळपट्टी तापायची . कानशिलापासून पायापर्यंतचं अंग गार असायचं. पहिल्या रात्री तर मी व मुलगा मिठाच्या पाण्याच्या घडया तिच्या कपाळावर ठेवीत राहिलो. तेवढेच नव्हते , तर त्याचवेळी तिला प्रचंड अंगदुखी व्हायची. त्यामुळे तिला काय होतंय हेच तिला समजेनासं झालं. ती ग्लानीत विचित्र बडबडू लागली.  असे दोन दिवस , दोेन रात्री गेल्या. त्या गोळीमुळेच तिला हायपर अँसिडीटी होत होती , त्या गोळीचे साईड इफेक्टस होत होते , हे नेटवर सर्च करायला तिनेच सांगितलं तेव्हा लक्षात आलं. लगेच ती गोळी बंद केली. लगेच पन्नास टक्के उतार पडला. पण त्यातच तिला खूपच अशक्तपणा आला. हे आजारपण पंधरा दिवस चालले. पाच-सहा तारखेला तिला प्रथमच थोडा आराम पडला. तरी एक दोनदा त्रास झाला. पण आता त्रास कमी कमी होतोय. मुलगाही आता ब-यापैकी बरा बोलतोय. खडतर काळ थोडा सुसहय होतोय. 


           बीना हल्ली पुन्हा विचित्र वागू लागली आहे. तिच्या आईचा तर तिने छळ मांडलाय. घराच्या मालकिणीलाच घर सोडून कुठेतरी दूर निघून जावे असे वाटते आहे, यावरून लक्षात येईलच. बीनाला लग्न हवे आहे. पण लग्नानंतर ती सासरी पण राडे करू लागेल , ही सार्थ भीती पाहता तिची आईसुध्दा पुढे पाऊल टाकायला कचरणे स्वाभाविक आहे. तेवढयात परवा म्हणजे 07.10.2020 रोजी तिचे काका वारले. वायंगणकर काका. खूप चांगला माणूस. अनेकांना उमेद दिलेले काका स्वत:च्या जीवनाच्या एका टप्प्यावर मात्र खचून गेले. अखेर ते गेलेच. अर्थात, बीनाला आईच्या दु:खाचे काहीच वाटत नसल्याचे व ती स्वत:च्याच कोषात असल्याचे सतत निष्पन्न होते आहे. ती सरडयासारखे रंग बदलते आहे. मूड बदलते आहे. तिचे वागणे अनाकलनीय होत चालले आहे.  आहे. व्यक्ती अशा का होतात ? अशा विचित्र का वागतात ? व्यक्तीनिहाय किंवा कुटुंबनिहाय असा कालखंड किती वर्षे राहतो ? शनीची साडेसातीवगैरे हल्ली कोण फारसे बोलत नाही. कारण , दुर्दैवाचा कालखंड साडेसात वर्षांपेक्षाही कितीतरी अधिक होत चाललाय. मग आता याला काय म्हणायचे, हा प्रश्न मला पडू लागला आहे. काळाच्या मनात आहे तरी काय ? माझ्या आजीपासून पाहतोय. न संपणारी दु:खाची वर्षे म्हणजे माझ्या आजीचे आयुष्य.  मी यू टयूबवरील माझ्या Devidas Patil या चँनेलवर " आयुष्याकडे बघतांना  " या प्लेलिस्टमध्ये " आज्जीची गोष्ट " सांगितली आहेच. आपण ती आवर्जून ऐका. अर्थात त्या दहा मिनिटात आजीचे आयुष्य मांडता येणे शक्यच नव्हते. तरी पण तिच्या जीवनावर मी नेमके भाष्य मात्र तिथे केले आहे. आजीची गोष्ट तशी. वडिलांचीही गोष्ट फार वेगळी नाहीच. त्यांचेही आयुष्य खडतरच गेले. अखेरच्या काही दिवसांत तर ते बोलूही शकले नाहीत. " आयुष्याकडे बघतांना " या प्लेलिस्ट मध्ये शेवटी शेवटी मी माझ्या जन्मरहस्याबद्दल भाष्य करणार आहे. मधल्या भागांमध्ये मी सूचक शब्द वा प्रसंग ( क्लूज ) पेरणार आहे. माझेही जीवन फारसे सुखावह नव्हते. पण माझ्या आताच्या जीवनात तरी मी काहीसा सुस्थितीत आहे असे म्हणता येईल. निदान नोकरीतल्या कटकटी नाहीत आणि पैसे कमवण्यासाठी वयाच्या साठीत कुठे जावे लागण्याचे कारण नाही . पण एक पाहतो आहे की अनेकांच्या जीवनात प्रत्येक वर्षातला काही काळ सलग सुखाचा तर काही काळ सलग दु:खाचा तसेच काही काळ सलग सुखदु:खाच्या मिश्रणाचा येतो. माझ्या जीवनात हे मी अनेकदा अनुभवले आहे. हे विचित्र काळचक्र का फिरत असते ? त्या त्या काळात काही विशिष्ट घटना घडतात , काही सूचक स्वप्नेंही पडतात. असे का होते ? यामागे कोण आहे ? गेली काही वर्षे मी याच्याच मागे आहे. मध्यंतरीचे पुराणातले ग्रंथवाचून उत्तरे शोधण्याचा तो विचारही आता मागे पडला आहे. भाऊ ग्रंथालय करणार होता तेही लांबले आहे. आता घटनांचे विश्लेषण करण्याशी काळाचे वागणे जोडून काही हाती लागते का ते पहावयाचा विचार आहे. बाकी आता आँनलाईन लेखनाचा कंटाळा येऊ लागला आहे.  LinkedIn, Rediffmail, Facebook,  Twitter,  YouTube, Instagram , Quora यात आता फारसे मन गुंतत नाही. माझ्या मनाचा हा मुख्य प्रश्न आहे. मला सतत काही काळानंतर त्याच त्या गोष्टी करण्यात स्वारस्य वाटेनासे होते. त्यामुळे Blogging चाही मला आता कंटाळा येऊ लागला आहे. मी हल्ली कविताही करीत नाही . पत्नीला गंभीर आजारपणातून बाहेर काढण्यासाठी व पत्नीला आणि मलाही विषयांतर हवे झाले म्हणून सहा वर्षे रखडलेले घराचे करायचे राहिलेले कामही हाती घेतले. तेही आता संपत आले आहे. पण अजून एक मुख्य प्रश्न सुटला नाहीय. तो सुटल्याशिवाय पत्नी , मी व मुलगा यांच्या जिवाला निश्चिंतता लाभणार नाही. बघू कसे होते ते पुढे. 




(क्रमश:)

                          ....................

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

समजूत आपली

 

मागे - पुढे




गेल्या भागात तुम्ही वाचलंत की ... असं सांगण्यापेक्षा सरळ 14.09.2020 रोजी सकाळी पडलेले स्वप्नंच सांगतो. ते असं होतं. पुढच्या बाजुला माझ्या घरासमोरील प-यात ईशान्य दिशेला काही लोक बांधकाम करायला उतरलेयत. काही जण वरच्या बाजुच्या शिरधनकरांच्या बागेत उभे आहेत. प-यातला एकजण मला त्याच्यापुढयात बोट दाखवून विचारतो की तिथे चि-याची एक लाईन वरपर्यंत उठवूया काय ? का कोण जाणे, पण मला ती जिवंत माणसे वाटत नाहीत. ती भूते असावीत असं त्यांच्या देहबोलीवरून वाटतं. तरीही मी त्यांना सांगतो , लगतचा हिस्सेदार बोंब मारील त्यामुळे तिथे काय करता येणार नाही. एवढयात बागेतला एकजण माझ्या अंगणात येऊन विचारतो की मग इथून लाईन टाकूया का ? मी सांगतो , हे आमचं आहे , इथे तर काहीच करता येणार नाही . स्वप्नं इथेच संपलं. आता हे तर स्वप्नंच होतं. पण ते विचित्रच होतं. सकाळपासूनच माझ्या मनात काय होईल काय नाही याचेच विचार येत होते.... आणि शेवटी ... शेवटी कसलं सकाळी दहा वाजताच पेटलं की राव ! अगदी जोरदार ! वणवा लागला ! आग भडकली ! कुठे म्हणता ? अहो, शेजारीच . उर्मीच्या नव्याने बांधल्या जात असलेल्या घरात ! आगीचा बंब नका आणू मध्ये. ती आग वेगळी . ती काडीने लावावी लागते. ही काडी लावल्याने लागलेली आग नाही. फार तर ती काडी केल्याने लागलेली आग म्हणता येईल. कोणी केली माहीत नाही , पण उर्मी आणि तिच्या जाऊबाईत कोणी तरी काडी केली. आग लावली. जोरदार भांडण पेटलं. आख्खा दिवस त्यातच गेला. अर्थात, बाहेरचा कोणीच मध्ये पडला नाही. कारण एक तर घर बांधण्यापूर्वी पुढे काय वाद होतील हे जाणून आपसात पुरेशी बोलणी केलेली नसावीत आणि त्यासाठी बाहेरच्या कोणाला चर्चेत सहभागीही करून घेण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे कसलीच माहिती बाहेरच्या कोणाला नव्हती. मग कसे कोण मध्ये पडणार ? तरीही आम्ही जाणार होतो पण सायंकाळी चार वाजता एकदाचं ते भांडण मिटलं. आम्ही निश्वास सोडला. शेवटी हे सगळे आपलेच ! 


      त्यानंतर तिस-याच दिवशी म्हणजे दि. 17 रोजी आम्हां दोघांना दोन स्वप्नं पडली. तिच्या स्वप्नात माझी आई आणि माझ्या स्वप्नात माझे वडील आले ! माझी आई कोणती तरी दोन ठिकाणं बघण्यासाठी कार आणायला सांगत होती तर माझे वडील घाबरलेले दिसत होते. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्यांनी मला खुणा करीत पुढच्या बाजुला रस्त्याच्या दिशेने बोट दाखवलं. मी तिकडे बघितलं तर अगदी बंदूसारखाच दिसणारा , त्याच्यासारखीच सफेद पँट व फिकट गुलाबी रंगाचा हाफ शर्ट घातलेला व पांढरी टोपी घातलेला माणूस देवळाच्या कोप-यावर मोटरसायकल चालवत येतांना दिसला ! स्वप्नं तिथेच संपलं. आज सर्वपित्री अमावास्या ! आजच माझे आई बाबा आमच्या दोघांच्या स्वप्नात का बरे आले असतील ?.....


गेले दोन तीन दिवस रात्री धुव्वाधार पाऊस पडतोय. विशेषत: पहाटे ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत प्रचंड पाऊस पडतोय. त्यानंतर नेमके पंधरा मिनिटांनी नळाला पाणी येतं. मागे जाऊन ते भरावं लागतं.  तेव्हा एक तर पायातून पाणी शोषले जाते आणि त्याचवेळी हवेतला पावसाळी गारवा बाधीत करीत असतो. त्यातच आसपास कोरोनाचा विळखा वाढतोय. कोरोनापेक्षा कोरोनाची पसरलेली भीतीच जास्त भयानक आहे. तसं 18 तारीखच्या संध्याकाळपर्यंत सगळंं ठीक होतं. पण रात्री दहा वाजता अंगणात फिरून पाय मोकळे करावेत , असा विचार अचानकच मनात आला. पाऊसही नव्हता. अंगण सुके दिसत होते. पाच दहा मिनिटे फिरलो असेन , अचानक कमरेत लटका पडतोय की काय असे दोनदा वाटले ! म्हटले बघुया परत काय तसे जाणवते काय , म्हणून पुन्हा फिरू लागलो. पण तसे काही जाणवले नाही. अर्धा तास फिरलो आणि मग मात्र पाठीचा कणा दुखू लागला. तसा मी घरात आलो. रात्री हिने कण्याला बाम लावला. थोडं बरं वाटलं. पण सकाळी पाठ आणि डोकंही दुखू लागलं. 19 तारीख उजाडली आणि त्रास वाढलाच. घसा खवखऊ लागला. डोळयातून गरम पाणी आले. त्यातच मेहुण्याच्या कामासाठी मायलेक स्टेट बँकेत गेलेली. शेजारच्या निलेशला माझ्या सोबतीला ठेवून गेलेले. मी त्याच्याशी तीन तास गप्पा मारीत बसलो. तो बिचारा बसून राहिला. जेवायलाही घरी जाईना. तेवढयात संत्या झोपून राहिलाय असा फोन त्याच्या घरातून आला. तो बघून आला तर संत्यालाही माझ्यासारखाच त्रास होत होता. मग निलेश म्हणाला मी डाॅक्टरकडे जातोय. काकाचा नंबर लावतो. तुमचा पण लाऊ का ? मी म्हटलं संत्याबरोबरच आमचा दोघांचाही लाव. तो बिचारा नंबर लावायला गावातल्या डाॅक्टरकडे गेला. तेवढयात ही लोकं आलीत. ही आली ती थेट घरात गेली. मी तिला डाॅक्टरकडे जायचंय म्हणून सांगितलं , तशी ती जेवणाची घाई करू लागली. तेवढयात तिला पिवळया पिशवीची आठवण झाली तशी ती एकदम टेंशनवर आली. सैरावरा होऊन पिशवी शोधू लागली. पिशवीत चार बँक पासबूक्स , हिचा फोन व मुलाचे पाकीटही होते. मी हिच्या नंबरवर फोन लावला. पण तो कोरोनाची कँसेट लागून बंद व्हायला लागला. इकडे निल्याचा डाॅक्टरकडून फोन आला की दहावा नंबर आत गेेलाय. तुम्ही या.  ही रडकुंडीस आलेली. मुलगा गाडी काढीत असलेला आणि मी दोघांच्यामध्ये साकटलेला ! ती पिशवी बाजारातच विसरली हे नक्की झाले तसा मी हिला धीर दिला आणि मुलगा आम्हांला डाॅक्टरकडे सोडून पिशवी शोधायला पुढे जाईल असे सांगितले. मुलाने तसे केले. मला डाॅक्टरनी तपासले , दोन इंजेक्शन्स दिली , गोळ्या लिहून दिल्या. ऑक्सीजन लेव्हल चेक केली व आणखी तीन दिवस ती लेव्हल चेक करायला या म्हणून सांगितले. सगळे टेंशनच आहे , पण टेंशन घेऊन उपयोगाचेही नाही. मी बाहेर येऊन बसलो. तेवढयात मुलगा आला . तो म्हणाला पिशवी सापडली नाही. मी म्हटले मग पोलीसांत तक्रार करावी लागेल. तो म्हणाला ती पण करून आलोय. तेवढयात ही बाहेर आली. हिलाही मुलाने तसेच सांगितले. आम्ही तिघंही घरी आलो तसा मुलगा खिडकीकडे बोट दाखवून हिला म्हणाला , रडू नकोस, ती बघ खिडकीला पिशवी लावलीय ! कधी गंमत करायची हे अजूनही मुलाला कळत नाही. जाऊ दे. त्याने न जेेवता धावपळ केली , हेही कमी नव्हे.  मग माझ्या गोळया सुरू झाल्या. दुस-याच दिवशी म्हणजे 20 तारीखला दुपारपासून मला बरे वाटू लागलेय. 


20 तारीखला दुपारी अंकीत माईणचा मेसेज आला. मग बोलणे सुरू झाले. अंकीतला मी प्रथम क्वोरावर भेटलो. तिथून  मराठी ब्लागर्सचा ग्रूप बनवायचा का या त्याच्या प्रश्नाला मी चटकन हो कळवले होते. मग त्यांने अनुदिनीसंवाद हा ग्रूप फेसबूकवर बनवला. मी आँनलाईन पसारा खूप वाढवला. पण मी सगळं चाचपडत शिकता शिकता केलंय. कुठला कोर्स , पुस्तके , कोणाचं मार्गदर्शन हे मला लाभलं नाही. मी रत्नागिरीत शोध घेतला नाही असंही नाही. पण ते सगळं शक्य झालं नाही. अपुरी साधनसामग्री , कौटुंबिक खर्च व विशेषत: नाउमेद करणारं घरातलंच वादग्रस्त वादळी वातावरण यातून सर्च सुरू ठेवून शिकता शिकता नऊ ब्लाग केले. त्यावर प्रचंड व चांगलंही लेखन केलं. पण मी पडलो कारकून . क्लेरिकल बाजूवाला. माझी टेक्नीकल बाजू लंगडीच. कित्येक तांत्रिक गोष्टी डोक्यावरून जातात. माझं इंग्रजी चांगलं असलं तरी शेवटीे अमेरिकन इंग्रजीतल्या तांत्रिक बाबी समजायला मला कठीण जातात. अशा अवस्थेत एक मराठी आणि आठ इंग्रजी ब्लाग उभे केले खरे, पण व्यावसायिक बाजूकडे लक्ष देणे शक्य झाले नाही. तेव्हा तर नोकरी होती. जबाबदारी  होती. रिटायर्ड होऊनही निवांतपणा लाभला नाहीच. घरातलं वातावरण पूर्वीपेक्षा अधिक सतत तणावग्रस्तच राहिलेलं. त्यातून वेळ काढीत काढीत मन लावण्याचा प्रयत्न करतो आहे. अंकीतला मी याची थोडक्यात कल्पना दिली आहे. अंकीत रत्नागिरीतलाच असून आमचा विद्यार्थीच निघाला.  त्याने मला मदत करतो म्हणून सांगितले आहे. अंकीतशी बोलतानाच माझ्या लक्षात आले की डाॅक्टरकडे चेकींगसाठी जायचे आहे. त्यामुळे मला बोलणे थांबवावे लागले.  मी त्याला साँरी म्हणालो . मी डाॅक्टरकडे जाऊन आलो. त्यांनी ऑक्सीजन लेव्हल चेक केली. तीही खूपच चांगली आहे. म्हणजे सत्त्याण्णव वर बराच काळ स्थिर होती. मग 98 झाली. मी मुलाच्या गाडीवरून घरी आलो.  त्याच संध्याकाळी मला जनावर चावता चावता वाचलो ! ही खालच्या बागेत गेली तेव्हा मीही मागच्या बाजूला जास्वंदीचे कळे काढत होतो. हिला जास्त पुढे जाऊ नको म्हणून दोनदा सांगितले. पायाखाली बघून चाल, रान वाढले आहे असेही सांगितले. पण बायकोच ती , ती काय मला भीक घालतेय ! ती पुढेच गेली. मी स्वत:शीच पुटपुटत आमच्या घराच्या मागे गेलो . कंपाऊंडच्या भिंतीवर चढणा-या जनावराचा करडा रंग बेमालूमपणे पावसामुळे हिरवट झालेल्या भिंतीत मिसळून गेलेला असल्याने मला ते जनावर सुरूवातीला जाणवलेच नाही. मला बघून त्याने हालचाल केली तसे ते माझ्या पायाजवळच पडले. तेव्हा कुठे लक्षात येऊन मी पाय मागे घेतले आणि चार पावलं मागे आलो. नशीब तिथे दोन दगड होते . त्याच्याखाली ते शिरले. मी ते कुठे जात नाही ना याची खात्री पुन्हा एकदा त्याच्या जवळ जाऊन केली. पण ते दगड आणि कंपाऊंड यांच्यामधल्या छोटयाश्या जागेत ते वळवळत होते. मी संत्याच्या घराकडे पाहिले तर त्याच्याकडे सत्त्या उभा दिसला. मी त्याला आधी संत्याला बरे वाटले का ते विचारले. तो होय म्हणाला. तेवढयात संत्याच दारात आला. मी त्यालाही विचारून खात्री केली. मग त्याला काठी आणायला सांगितली. जनावराचे वर्णन सांगितले. तसा तो काठी घेऊन आला. तोपर्यंत ते ऐकून ही धावत आली. पुन्हा स्वभावानुसार पँनिक होऊन चौकशी करू लागली. मी तिला विचारले मग देऊया का सोडून त्याला ? तशी ती म्हणाली नको. मारूदे. मग संत्याने त्याला त्या दगडाच्या कपारीतही अचूक टिपलं आणि मारून वरच्या बागेत जाळलंही.  माझ्या हातात त्याने काठी देऊन ठेवली होती. पण मला ती चालवावी लागलीच नाही . इतक्या शिताफीने त्याने काम तमाम केलं. आमच्याकडे कधीही जनावर आलं तर मी त्यालाच बोलवतो. मला त्या जनावराचं वाईट वाटलं पण पुढे ते कुणाच्याही जिवावर बेतू शकलं असतं , हेही खरेच ! An hectic day  हा हायस्कूलमधला धडा मला आज आठवला ! खरंच आजचा दिवस तसा दगदगीचा आणि धावपळीचा गेला. दुपारी पिशवी भेटली आणि रात्री मला जवळजवळ बरे वाटू लागले , हेच विशेष समाधान ! 


21.09.2020 

पण काल रात्री पहाटेपर्यंत दोघांनाही झोप आली नाही. साडेतीननंतर मात्र मी झोपलो. सकाळी साडेआठला जाग आली ! तरी झोप डोळयांवर होतीच. आज अनेक दिवसांनी पूर्वीच्या वेळेवर म्हणजे साडेआठला शौचाची जाणीव झाली. जाऊन आलो. शवासन केले. सकाळपासून डावी नाकपुडी चोंदलेली होती. घामही येत होता. नाश्ता केला. गोळया घेतल्या. घरातला कचरा काढला. तसे जरा हलके वाटले. चोंदलेली नाकपुडी सैल झाली. नुकताच आलेला दै. सकाळ (daily Sakal) वाचायला सुरूवात केली. तेवढयात सतिश आला. सतिश ही उर्मीची देणगी आहे. सतिश उर्मीच्या घराचं सद्याचं काम पाहतोय. मी त्याला माझ्या घराच्या गेली सहा वर्षे या ना त्या कारणाने पडून राहिलेल्या नुतनीकरणासाठी बोलावलंय. आम्ही चर्चा सुरू केली तेवढयात विलास भाटकरची आई आली. विलासने तो रिटायर होत असल्याने खालीलप्रमाणे मला व्हॉट्सॲपला मेसेज पाठवला होता. तो मेसेज त्याच्या आईला का दाखवलास नाही म्हणून त्याने मला काल फोन करून विचारले होते व त्याची आई माझ्याकडे येईल म्हणून सांगितले होते. मीही तिला फोन करून बोलावले होते. इतके सगळे झाल्यावर ती आली तशी मी तिला तो मेसेज दाखवला . तिने पाहिला आणि काही न बोलता फोन माझ्याकडे दिला. ती विलासजवळ काय ते बोलणार असेल अशी समजूत करीत मी पुन्हा सतिशबरोबर चर्चा सुरू केली. त्याच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. काही त्याला समजावून सांगितल्या. 



(क्रमश:)

                          ....................



 पुढे


गेल्या भागात तुम्ही वाचलंत की ... असं सांगण्यापेक्षा सरळ 14.09.2020 रोजी सकाळी पडलेले स्वप्नंच सांगतो. ते असं होतं. पुढच्या बाजुला माझ्या घरासमोरील प-यात ईशान्य दिशेला काही लोक बांधकाम करायला उतरलेयत. काही जण वरच्या बाजुच्या शिरधनकरांच्या बागेत उभे आहेत. प-यातला एकजण मला त्याच्यापुढयात बोट दाखवून विचारतो की तिथे चि-याची एक लाईन वरपर्यंत उठवूया काय ? का कोण जाणे, पण मला ती जिवंत माणसे वाटत नाहीत. ती भूते असावीत असं त्यांच्या देहबोलीवरून वाटतं. तरीही मी त्यांना सांगतो , लगतचा हिस्सेदार बोंब मारील त्यामुळे तिथे काय करता येणार नाही. एवढयात बागेतला एकजण माझ्या अंगणात येऊन विचारतो की मग इथून लाईन टाकूया का ? मी सांगतो , हे आमचं आहे , इथे तर काहीच करता येणार नाही . स्वप्नं इथेच संपलं. आता हे तर स्वप्नंच होतं. पण ते विचित्रच होतं. सकाळपासूनच माझ्या मनात काय होईल काय नाही याचेच विचार येत होते.... आणि शेवटी ... शेवटी कसलं सकाळी दहा वाजताच पेटलं की राव ! अगदी जोरदार ! वणवा लागला ! आग भडकली ! कुठे म्हणता ? अहो, शेजारीच . उर्मीच्या नव्याने बांधल्या जात असलेल्या घरात ! आगीचा बंब नका आणू मध्ये. ती आग वेगळी . ती काडीने लावावी लागते. ही काडी लावल्याने लागलेली आग नाही. फार तर ती काडी केल्याने लागलेली आग म्हणता येईल. कोणी केली माहीत नाही , पण उर्मी आणि तिच्या जाऊबाईत कोणी तरी काडी केली. आग लावली. जोरदार भांडण पेटलं. आख्खा दिवस त्यातच गेला. अर्थात, बाहेरचा कोणीच मध्ये पडला नाही. कारण एक तर घर बांधण्यापूर्वी पुढे काय वाद होतील हे जाणून आपसात पुरेशी बोलणी केलेली नसावीत आणि त्यासाठी बाहेरच्या कोणाला चर्चेत सहभागीही करून घेण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे कसलीच माहिती बाहेरच्या कोणाला नव्हती. मग कसे कोण मध्ये पडणार ? तरीही आम्ही जाणार होतो पण सायंकाळी चार वाजता एकदाचं ते भांडण मिटलं. आम्ही निश्वास सोडला. शेवटी हे सगळे आपलेच ! 


      त्यानंतर तिस-याच दिवशी म्हणजे दि. 17 रोजी आम्हां दोघांना दोन स्वप्नं पडली. तिच्या स्वप्नात माझी आई आणि माझ्या स्वप्नात माझे वडील आले ! माझी आई कोणती तरी दोन ठिकाणं बघण्यासाठी कार आणायला सांगत होती तर माझे वडील घाबरलेले दिसत होते. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्यांनी मला खुणा करीत पुढच्या बाजुला रस्त्याच्या दिशेने बोट दाखवलं. मी तिकडे बघितलं तर अगदी बंदूसारखाच दिसणारा , त्याच्यासारखीच सफेद पँट व फिकट गुलाबी रंगाचा हाफ शर्ट घातलेला व पांढरी टोपी घातलेला माणूस देवळाच्या कोप-यावर मोटरसायकल चालवत येतांना दिसला ! स्वप्नं तिथेच संपलं. आज सर्वपित्री अमावास्या ! आजच माझे आई बाबा आमच्या दोघांच्या स्वप्नात का बरे आले असतील ?.....


गेले दोन तीन दिवस रात्री धुव्वाधार पाऊस पडतोय. विशेषत: पहाटे ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत प्रचंड पाऊस पडतोय. त्यानंतर नेमके पंधरा मिनिटांनी नळाला पाणी येतं. मागे जाऊन ते भरावं लागतं.  तेव्हा एक तर पायातून पाणी शोषले जाते आणि त्याचवेळी हवेतला पावसाळी गारवा बाधीत करीत असतो. त्यातच आसपास कोरोनाचा विळखा वाढतोय. कोरोनापेक्षा कोरोनाची पसरलेली भीतीच जास्त भयानक आहे. तसं 18 तारीखच्या संध्याकाळपर्यंत सगळंं ठीक होतं. पण रात्री दहा वाजता अंगणात फिरून पाय मोकळे करावेत , असा विचार अचानकच मनात आला. पाऊसही नव्हता. अंगण सुके दिसत होते. पाच दहा मिनिटे फिरलो असेन , अचानक कमरेत लटका पडतोय की काय असे दोनदा वाटले ! म्हटले बघुया परत काय तसे जाणवते काय , म्हणून पुन्हा फिरू लागलो. पण तसे काही जाणवले नाही. अर्धा तास फिरलो आणि मग मात्र पाठीचा कणा दुखू लागला. तसा मी घरात आलो. रात्री हिने कण्याला बाम लावला. थोडं बरं वाटलं. पण सकाळी पाठ आणि डोकंही दुखू लागलं. 19 तारीख उजाडली आणि त्रास वाढलाच. घसा खवखऊ लागला. डोळयातून गरम पाणी आले. त्यातच मेहुण्याच्या कामासाठी मायलेक स्टेट बँकेत गेलेली. शेजारच्या निलेशला माझ्या सोबतीला ठेवून गेलेले. मी त्याच्याशी तीन तास गप्पा मारीत बसलो. तो बिचारा बसून राहिला. जेवायलाही घरी जाईना. तेवढयात संत्या झोपून राहिलाय असा फोन त्याच्या घरातून आला. तो बघून आला तर संत्यालाही माझ्यासारखाच त्रास होत होता. मग निलेश म्हणाला मी डाॅक्टरकडे जातोय. काकाचा नंबर लावतो. तुमचा पण लाऊ का ? मी म्हटलं संत्याबरोबरच आमचा दोघांचाही लाव. तो बिचारा नंबर लावायला गावातल्या डाॅक्टरकडे गेला. तेवढयात ही लोकं आलीत. ही आली ती थेट घरात गेली. मी तिला डाॅक्टरकडे जायचंय म्हणून सांगितलं , तशी ती जेवणाची घाई करू लागली. तेवढयात तिला पिवळया पिशवीची आठवण झाली तशी ती एकदम टेंशनवर आली. सैरावरा होऊन पिशवी शोधू लागली. पिशवीत चार बँक पासबूक्स , हिचा फोन व मुलाचे पाकीटही होते. मी हिच्या नंबरवर फोन लावला. पण तो कोरोनाची कँसेट लागून बंद व्हायला लागला. इकडे निल्याचा डाॅक्टरकडून फोन आला की दहावा नंबर आत गेेलाय. तुम्ही या.  ही रडकुंडीस आलेली. मुलगा गाडी काढीत असलेला आणि मी दोघांच्यामध्ये साकटलेला ! ती पिशवी बाजारातच विसरली हे नक्की झाले तसा मी हिला धीर दिला आणि मुलगा आम्हांला डाॅक्टरकडे सोडून पिशवी शोधायला पुढे जाईल असे सांगितले. मुलाने तसे केले. मला डाॅक्टरनी तपासले , दोन इंजेक्शन्स दिली , गोळ्या लिहून दिल्या. ऑक्सीजन लेव्हल चेक केली व आणखी तीन दिवस ती लेव्हल चेक करायला या म्हणून सांगितले. सगळे टेंशनच आहे , पण टेंशन घेऊन उपयोगाचेही नाही. मी बाहेर येऊन बसलो. तेवढयात मुलगा आला . तो म्हणाला पिशवी सापडली नाही. मी म्हटले मग पोलीसांत तक्रार करावी लागेल. तो म्हणाला ती पण करून आलोय. तेवढयात ही बाहेर आली. हिलाही मुलाने तसेच सांगितले. आम्ही तिघंही घरी आलो तसा मुलगा खिडकीकडे बोट दाखवून हिला म्हणाला , रडू नकोस, ती बघ खिडकीला पिशवी लावलीय ! कधी गंमत करायची हे अजूनही मुलाला कळत नाही. जाऊ दे. त्याने न जेेवता धावपळ केली , हेही कमी नव्हे.  मग माझ्या गोळया सुरू झाल्या. दुस-याच दिवशी म्हणजे 20 तारीखला दुपारपासून मला बरे वाटू लागलेय. 


20 तारीखला दुपारी अंकीत माईणचा मेसेज आला. मग बोलणे सुरू झाले. अंकीतला मी प्रथम क्वोरावर भेटलो. तिथून  मराठी ब्लागर्सचा ग्रूप बनवायचा का या त्याच्या प्रश्नाला मी चटकन हो कळवले होते. मग त्यांने अनुदिनीसंवाद हा ग्रूप फेसबूकवर बनवला. मी आँनलाईन पसारा खूप वाढवला. पण मी सगळं चाचपडत शिकता शिकता केलंय. कुठला कोर्स , पुस्तके , कोणाचं मार्गदर्शन हे मला लाभलं नाही. मी रत्नागिरीत शोध घेतला नाही असंही नाही. पण ते सगळं शक्य झालं नाही. अपुरी साधनसामग्री , कौटुंबिक खर्च व विशेषत: नाउमेद करणारं घरातलंच वादग्रस्त वादळी वातावरण यातून सर्च सुरू ठेवून शिकता शिकता नऊ ब्लाग केले. त्यावर प्रचंड व चांगलंही लेखन केलं. पण मी पडलो कारकून . क्लेरिकल बाजूवाला. माझी टेक्नीकल बाजू लंगडीच. कित्येक तांत्रिक गोष्टी डोक्यावरून जातात. माझं इंग्रजी चांगलं असलं तरी शेवटीे अमेरिकन इंग्रजीतल्या तांत्रिक बाबी समजायला मला कठीण जातात. अशा अवस्थेत एक मराठी आणि आठ इंग्रजी ब्लाग उभे केले खरे, पण व्यावसायिक बाजूकडे लक्ष देणे शक्य झाले नाही. तेव्हा तर नोकरी होती. जबाबदारी  होती. रिटायर्ड होऊनही निवांतपणा लाभला नाहीच. घरातलं वातावरण पूर्वीपेक्षा अधिक सतत तणावग्रस्तच राहिलेलं. त्यातून वेळ काढीत काढीत मन लावण्याचा प्रयत्न करतो आहे. अंकीतला मी याची थोडक्यात कल्पना दिली आहे. अंकीत रत्नागिरीतलाच असून आमचा विद्यार्थीच निघाला.  त्याने मला मदत करतो म्हणून सांगितले आहे. अंकीतशी बोलतानाच माझ्या लक्षात आले की डाॅक्टरकडे चेकींगसाठी जायचे आहे. त्यामुळे मला बोलणे थांबवावे लागले.  मी त्याला साँरी म्हणालो . मी डाॅक्टरकडे जाऊन आलो. त्यांनी ऑक्सीजन लेव्हल चेक केली. तीही खूपच चांगली आहे. म्हणजे सत्त्याण्णव वर बराच काळ स्थिर होती. मग 98 झाली. मी मुलाच्या गाडीवरून घरी आलो.  त्याच संध्याकाळी मला जनावर चावता चावता वाचलो ! ही खालच्या बागेत गेली तेव्हा मीही मागच्या बाजूला जास्वंदीचे कळे काढत होतो. हिला जास्त पुढे जाऊ नको म्हणून दोनदा सांगितले. पायाखाली बघून चाल, रान वाढले आहे असेही सांगितले. पण बायकोच ती , ती काय मला भीक घालतेय ! ती पुढेच गेली. मी स्वत:शीच पुटपुटत आमच्या घराच्या मागे गेलो . कंपाऊंडच्या भिंतीवर चढणा-या जनावराचा करडा रंग बेमालूमपणे पावसामुळे हिरवट झालेल्या भिंतीत मिसळून गेलेला असल्याने मला ते जनावर सुरूवातीला जाणवलेच नाही. मला बघून त्याने हालचाल केली तसे ते माझ्या पायाजवळच पडले. तेव्हा कुठे लक्षात येऊन मी पाय मागे घेतले आणि चार पावलं मागे आलो. नशीब तिथे दोन दगड होते . त्याच्याखाली ते शिरले. मी ते कुठे जात नाही ना याची खात्री पुन्हा एकदा त्याच्या जवळ जाऊन केली. पण ते दगड आणि कंपाऊंड यांच्यामधल्या छोटयाश्या जागेत ते वळवळत होते. मी संत्याच्या घराकडे पाहिले तर त्याच्याकडे सत्त्या उभा दिसला. मी त्याला आधी संत्याला बरे वाटले का ते विचारले. तो होय म्हणाला. तेवढयात संत्याच दारात आला. मी त्यालाही विचारून खात्री केली. मग त्याला काठी आणायला सांगितली. जनावराचे वर्णन सांगितले. तसा तो काठी घेऊन आला. तोपर्यंत ते ऐकून ही धावत आली. पुन्हा स्वभावानुसार पँनिक होऊन चौकशी करू लागली. मी तिला विचारले मग देऊया का सोडून त्याला ? तशी ती म्हणाली नको. मारूदे. मग संत्याने त्याला त्या दगडाच्या कपारीतही अचूक टिपलं आणि मारून वरच्या बागेत जाळलंही.  माझ्या हातात त्याने काठी देऊन ठेवली होती. पण मला ती चालवावी लागलीच नाही . इतक्या शिताफीने त्याने काम तमाम केलं. आमच्याकडे कधीही जनावर आलं तर मी त्यालाच बोलवतो. मला त्या जनावराचं वाईट वाटलं पण पुढे ते कुणाच्याही जिवावर बेतू शकलं असतं , हेही खरेच ! An hectic day  हा हायस्कूलमधला धडा मला आज आठवला ! खरंच आजचा दिवस तसा दगदगीचा आणि धावपळीचा गेला. दुपारी पिशवी भेटली आणि रात्री मला जवळजवळ बरे वाटू लागले , हेच विशेष समाधान ! 


21.09.2020 

पण काल रात्री पहाटेपर्यंत दोघांनाही झोप आली नाही. साडेतीननंतर मात्र मी झोपलो. सकाळी साडेआठला जाग आली ! तरी झोप डोळयांवर होतीच. आज अनेक दिवसांनी पूर्वीच्या वेळेवर म्हणजे साडेआठला शौचाची जाणीव झाली. जाऊन आलो. शवासन केले. सकाळपासून डावी नाकपुडी चोंदलेली होती. घामही येत होता. नाश्ता केला. गोळया घेतल्या. घरातला कचरा काढला. तसे जरा हलके वाटले. चोंदलेली नाकपुडी सैल झाली. नुकताच आलेला दै. सकाळ (daily Sakal) वाचायला सुरूवात केली. तेवढयात सतिश आला. सतिश ही उर्मीची देणगी आहे. सतिश उर्मीच्या घराचं सद्याचं काम पाहतोय. मी त्याला माझ्या घराच्या गेली सहा वर्षे या ना त्या कारणाने पडून राहिलेल्या नुतनीकरणासाठी बोलावलंय. आम्ही चर्चा सुरू केली तेवढयात विलास भाटकरची आई आली. विलासने तो रिटायर होत असल्याने खालीलप्रमाणे मला व्हॉट्सॲपला मेसेज पाठवला होता. तो मेसेज त्याच्या आईला का दाखवलास नाही म्हणून त्याने मला काल फोन करून विचारले होते व त्याची आई माझ्याकडे येईल म्हणून सांगितले होते. मीही तिला फोन करून बोलावले होते. इतके सगळे झाल्यावर ती आली तशी मी तिला तो मेसेज दाखवला . तिने पाहिला आणि काही न बोलता फोन माझ्याकडे दिला. ती विलासजवळ काय ते बोलणार असेल अशी समजूत करीत मी पुन्हा सतिशबरोबर चर्चा सुरू केली. त्याच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. काही त्याला समजावून सांगितल्या. 



(क्रमश:)

                          ....................



शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

झोलर बंटी बबली

 

मागे - पुढे 



गेल्या भागात तुम्ही वाचलंत की ...


..... तरी पण मी कुठेतरी मार्ग काढायचा प्रयत्न तर केला आहे. पण त्या समाधानातही आम्ही समाधानी नाहीयत...कोणीच ! पुढे काळ काय करतो ते पाहू....


.... आणि आता इथून पुढे....


12.09.2020


काल रात्री दोन स्वप्ने पडली. तीही दोनअडीचच्या दरम्याने. एकात इंग्लंडमध्ये क्रिकेटची मॅच चालू असते. एक चेंडू चक्क आमच्या खिडकीवर आपटून परत जातो ( आम्ही भारतात ! )  . नशीब तो आत येऊन आम्हांला लागत नाही. दुसरे स्वप्नं मजेशीर होते. मी व माझी पत्नी एका रस्त्याच्या कडेला इमारतीजवळ उभे असतो. मला इमारतीच्या प्रांगणात दोन एकसारख्या दिसणा-या पांढ-या रंगाच्या कार दिसतात. मी पत्नीला विचारतो की त्यांची किंमत किती असेल ? तर ती चक्क प्रत्येकी दोन हजार रूपये सांगते ! इथेच मला जाग येते ! तेव्हा अडीच वाजले होते. वर्क फ्राँम होम करीत असलेल्या मुलाला भूक लागली म्हणून त्याने भावाच्या घरातून चहा तयार ठेवायला फोन केला. त्याच्या रींगनेच मला त्या स्वप्नातून जाग आली. नाही तर मी नक्कीच त्या दोन्ही गाडया निदान स्वप्नात तरी खरेदी केल्याच असत्या 😀😀😀😀 . 


गेल्या आठवडाभरात बरेच काही घडून गेले आहे. मागे पुढे म्हणता म्हणता आपण मध्येच घरात जास्त लक्ष घातलं होतं. पण एक दोन दिवस वगळता घरच्या आघाडीवर सद्यातरी समाधानकारक शांतता आहे ! म्हणून आपल्या सवयीनुसार परत जरा मागे पुढे पाहू 😀😀😀😀😀. मागे बंदूच्या बायकोने पोष्टाच्या आर.डी. खात्यांचा केलेला घोळ घाबरत घाबरत त्याच्या कानावर घातला गेला खरा ; पण फार मोठा धक्का बसून बंदूलाच काही तरी होंईल ही अनेकांची अपेक्षा फोल ठरली . उलट , त्याने लाखभर रूपयांची परतफेड केली ! बायको सहीसलामत सुटली. बायको नव-याला तिच्यापुढे  किती हतबल बनवते , नव-याचा नाईलाज करून सोडते ते इथे दिसते. नवरा केवळ बायकोच्या मुठीत नसतो , तर ती त्याला पुरता असहाय्य बनवते, हेच हे उदाहरण दर्शवते. बरं तिची अशी अवस्था का झाली ? तर तिच्या नव-याच्या सकाळच मित्रमंडळी दाराघरात जमवण्याची सवय. आता यातला कोणी ना कोणी तरी संख्याशास्त्राचा उर्फ आकडेलावणेशास्त्राचा तज्ञ असतोच. शिवाय या बाईचे एका सर्वगूणसंपन्न मैत्रिणीकडेही जाणे येणे, फोनसुखसंवाद वगैरे वाढले होतेच. त्या मैत्रीणीकडे रोज चिठ्या न्यायला फंटर येतोच. या आकडेशास्त्राचा अभ्यास करण्यात ही बाई एवढी गुंतली की नव-याला आणि मुलाला वेळेवर जेवण मिळेनासे झाले ! अभ्यास वाढला तसा खर्च वाढला. उत्पन्न शून्याच्या खाली गेलं व शेवटी शून्यावस्था आली. तणावाने बाई दोनदा दवाखान्याची वारी करून आली. पण बाई निगरगट्टच ! पुन्हा आकडे लावण्यासाठी आर. डी. चे पैसे वापरायला तिने सुरूवात केली ! नव-याला बायको जेलमध्ये जाण्याची वेळ आली, लोक दाराशी आले , तेव्हा कळलं ! पण शेवटी इज्जत का फालुदा होऊ नये म्हणून बिचारा अजून पैसे परत करतो आहे !   अशीच दुसरी एक जोडी जवळच आहे. त्यातली बायको ही गळेपडू बाई आहे. माझा वाढदिवस तुमच्या लक्षात नाही का , तुम्ही जेवण छान बनवता , मग आम्हांला जेवायला कधी बोलवताय ते शाळेची फी थकलीय , खोलीभाडं थकलंय , पंधरा हजार द्या, वीस हजार द्या अशी मागणी करीत ही बाई दारोदार फिरते. कोणत्याही पुरूषाकडे बिनदिक्कत पैसे मागण्याचे  कौशल्य तिच्याकडे आहे. हयालाही स्कील इंडिया वुमन म्हणायचं काय ? की स्मार्टसिटीवुमन ? एक रूपया फेडू न शकणा-या हया बाईने एकीजवळ चक्क पन्नास हजाराची मागणी केली ! काय धाडस आहे पहा !  म्हणजे काहीही कामधंदा न करता जगाने हयांना पोसावं आणि तेही मेहरबानी नव्हे तर हयांचा हक्क म्हणून ! आहे की नाही जगावरच मेहरबांनी ! आम्ही दयेपोटी ती सांगेल त्या कहाणीवर विश्वास ठेवून दहापंधरा हजाराची मदत करूनही हया बाईची हाव वाढतच गेली . तिने आणखी पंधरा हजार द्या म्हणून माझ्या बायकोला आतल्या रूममध्ये नेवून माझ्या नाकावर टिच्चून बोलणी केली ! नवरा माझ्याबरोबर बिनदिक्कतपणे हवापाण्याच्या गप्पा मारत बसलेला.  तेव्हा मी काही बोललो नाही. पण दुस-या दिवशी येऊन ती तोंड उघडायच्या आतच मी तिला सणकावले. ती तशीच निघून गेली.  माझी बायको ( बायकोच ती ! ) मला म्हणाली, उगाच बोललात तिला एवढं . मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे ? मी बोललो,  होय , पण मेलेल्याला वाटतंय काय मेलो आहो असं ? हयांच्या सवयी गेल्या आहेत का ? आणि हयांची मग्रूमीही संपलेली नाही ! हे बाकी बायकोला पटलं ( नशिब ! ) .  गेली दहा वर्षे ही जोडी अशी जगतेय. एका ठिकाणी कर्जाचे हप्ते , भाडे, शाळेचे शुल्क थकले की दुसरीकडे पळायचं . तिकडे पुन्हा तेच उद्योग सुरू करायचे. वाट्टेल ती जीवघेणी कारणं पुढे  करायची , पैसे उकळायचे आणि काही काळ मजेत जगायचं. ही झोलर बंटीबबलीची जोडी आहे ! तुमच्याही गळयात पडेल म्हणून सावध करतो आहे. ही जोडी दहा वर्षे त्याच त्या चुका काहीही बोध न घेता करते आहे व वर जगाने मदत केलीच पाहिजे ही जगावर मेहरबानी आहेच ! हया जोडीचं असं का झालं ? कोरोना आता आला. पण त्यापूर्वी दहा वर्षापासूनच समस्वभावी जोडप्यांचा व मित्रमैत्रिणींचा गट बनत गेला. याची सुरूवात मुंबईला झाली. मग ही जोडी जाईल तिथे असले गट जोडत राहिली. गटातल्या हुशार मंडळींनी हयांना धूतलं आणि आता हयांना कोणीच विचारीत नाही. फुकटचंबूखावबांचं हे असंच असतं. ते खाऊन गेले पण शेवटी हे परिस्थितीत अडकले ! एकाकी पडले. पण त्यातून ते काही शिकतील ही सुतराम शक्यता नाहीच ! देव त्यांचं भलं करो ! दुसरीही एक जोडी आहे. तिच्यात बाई दिवसभर जगात फिरत असते . रात्रीही दुस-यांकडे जाऊन झोपते . नवरा घरात दारू पिवून फीस. गेली उडत म्हणत शिव्या देत बसतो. आता ही जोडी पार म्हातारी झाली. पण गूण तेच आहेत !  हया तीघांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे, तीन्ही बायकांना झाल्या प्रकारांचं काहीही वाटत नाही ! काही घडलेच नाही असे वागत असतात. बिनधास्त हसत असतात. काही केल्या आपले गूण सोडत नाहीत ! अश्या अनेक वैशिष्टयपूर्ण जोडया आमच्या मागे पुढे आहेत. पुन्हा त्याबद्दल कधीतरी नक्कीच बोलू. काय ?


(क्रमश:)

                          ....................






मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

अत्यंत खराब कालावधी

 

मागे - पुढे




गेल्या भागात तुम्ही वाचलात की ...


......मग मात्र विकीला गाडी घेऊन मुलाला आणलं पाहिजे. मी कालच विकीशी बोललोय.  काल रात्री मी मुलाशी हे बोललो . तोही समजुतीने बोलला. तो यायला तयार आहे म्हटल्यावर आम्ही अनेक महिन्यांनी आनंदीत झालो ......


.... आणि आता इथून पुढे....


01.08.2020 रात्रौ 11.00 वाजता विकी गाडी घेऊन पुण्याला रवाना झाला. त्यापूर्वी मुलाचा ई पास मी काढला आणि विकीचा ई पास उर्मीच्या मुलीने काढला. दुस-या दिवशी सकाळी सात वाजता विकी पुण्यात मांजरी बुद्रूकमधल्या मुलाच्या रूमवर गेला. तिकडे  मारूती निवासच्या कांबळे कुटुंबाने व राऊत कुटुंबाने खूप सहकार्य केले. त्यामुळे दि. 02.08.2020 रोजी दुपारी साडेबारा वाजता विकी व मुलगा तिकडून निघाले ते रात्री नऊ वाजता रत्नागिरीत दामले हायस्कूलला आले. तिथे मुलाला होम क्वारंटाईनचा शिक्का मारून ते दोघे दहा वाजता घरी आले. दोघांनी सामान उतरलं . भावाच्या घरात मुलानेच ते नेलं व तिथेच तो होम क्वारंटाईन झाला. आता प्रश्न असा आला आहे की 03.08.2020 पासून आमच्या भागात जोरदार पाऊस जोरदार पाऊस , वारा यामुळे वारंवार खंडीत होणारी वीज व इंटरनेटची कमी स्पीड यामुळे तो आणि आम्ही दोघंही त्रस्त आहोत ! आज 05.08.2020 आहे व पुढील 48 तास खूपच वादळी असणार आहेत , असं म्हणतात. समुद्राचे पाणी बंधारा फोडतेय . उंच लाटा उसळतायत. लोक जीव मुठीत घेऊन जगतायत . राम राम करतायत ! गेली साठ वर्षे दर पावसाळयात हीच कहाणी आहे ! आमच्या वरच्या बाजुला उत्तर दिशेला जंगलात काल रात्री झाडांच्या फांदया मोडल्याचे आवाज येत होते. रात्री साडेबारा वाजता मागे पुढे पाहण्याचा प्रयत्न केला पण काळोखात काही दिसेचना ! आवाज मात्र आले ! वारा, पाऊस यामुळे वीज जाते . मुलाचे काम ठप्प होते. आज मिल्याला इनव्हर्टरची चौकशी करायला सांगितली. त्याने भर पावसात शहरात जाऊन ती लगेच केलीही . किमान चाळीस हजार खर्च येईल. परत एक दोन महिन्यांनी मुलगा पुण्याला जाणार आणि मुंबईहून भाऊ वर्षातून एक दोन महिने रहायला इकडे येणार , बाकीचा वेळ इनव्हर्टर पडूनच राहणार ! काय करावे याचा विचार करीतच मागे पुढे फिरतोय... शेवटी इनव्हर्टरचा विषय मागेच पडला . 

इंटरनेटची मुलाची समस्या थोडी कमी झाली तरी गेले काही दिवस खूप त्रासाचे जात आहेत. पत्नीला दररोज काही ना काही बारीकसारीक आजार होत आहेत. गेली सव्वीस वर्षे सुरू असलेला खाज व रँशेश उठण्याचा आजार तर वाढला आहेच , पण शरीराच्या उजव्या बाजुला कमरेपासून ते पायापर्यंत कधीही फूट लागते आहे. परत मानेचा व मणक्याचा जुना आजार आहेच. हे कमी म्हणून की काय नवा आजार  काफल टनेल सिंड्रोम सुरू झाला आहे ! तिच्या हाताचे दोन्ही पंजे कधीही बधीर होतायत. मुंग्या येतायत. दिवसरात्र कधीही हे प्रकार सुरू असतात. गणपती आल्यादिवसापासून तर हया आजारांना जोरच चढलेला आहे. कित्येक रात्री झोप नाहीय. दिवसाही विश्रांती नाहीय. गणपतीविसर्जनही होऊन गेले पण अनेकदा साकडे घालूनही तसूभर परिस्थितीत फरक पडलेला नाही ! 


आज दि. 30.08.2020 रोजी दुपारी मुलगा तुम्हांला एक विषय बोलायचा आहे म्हणून सांगून शहरात गेला . दुपारनंतर आला तो भावाच्या घरात जाऊन झोपला. सहा वाजता उठला, पोट बरोबर नाही व नंतर बोलूया म्हणाला आणि परत झोपला. रात्री जेवायला आला तर त्याने काही विषयच काढला नाही. जिवाची घालमेल होत असतांनाही उभी रात्र पुढे असल्यामुळे मीही विचारण्याचे टाळले. मध्यरात्री माझी बेचैनी वाढली. नको ते विचार मनात येऊ लागले. त्यातच पत्नीचे आजारपण . तीन चारच्या सुमारास कधी तरी डोळा लागला. 


31.08.2020 : पहाटे  विचित्र स्वप्नं पडले. आज आमच्या जुन्या आँफीसात नार्वेकर बाई तिच्या पूर्वीच्याच खुर्चीत बसलेली आहे. बाजुला विभुते बाई आहे. समोर काटकोनात बादल आहे. मी त्याने दिलेले जीपीएफचे बील तपासत असतो. माझ्या लक्षात येते की, ते बील जीपीएफ बिलाच्या नमुन्याऐवजी आकस्मिक खर्चाच्या बिलांच्या नमुना क्र. 31 मध्ये केलेले आहे . मी बादलला हे सांगायचे ठरवतो , पण त्यापूर्वी जीपीएफ बिलांची फाईल घेऊनच बादलला दाखवावे , असा विचार करतो.  इथेच स्वप्नं संपते ! 

हे स्वप्नं विचित्र म्हणजे अनेक वर्षे न आलेली नार्वेकर बाई आँफीसात बसून आरामात गप्पा मारतांना दिसते. ती व विभुते त्यांच्याच पूर्वीच्या आस्थापना विभागात तर मी व बादल आमच्याच पूर्वीच्या लेखा विभागात बसलेलो दिसतो.  मी दीड वर्षापूर्वीच रिटायर्ड झालो तरीही मी तिथे कार्यरत व सहकारी बादलला मार्गदर्शन करतांना दिसतो. 

या स्वप्नाची प्रचिती लगेच आली ! या स्वप्नात संपूर्ण कार्यालयात फक्त चारच माणसे दिसली ! लक्षात घ्या . चार खांदे ! सकाळी 09.15 ला माजी विद्यार्थी व शेजारच्या पेडणेकरांचा जावई निखील शेटये याचा माजी अधिव्याख्याता जयंत नांदेडकर यांचे काल रात्री 11.00 वा. निधन झाल्याचा संदेश आला. दुसरा झटका बसला तो माझ्या मेहुण्याचे सासरे वारल्याचा फोन आला तेव्हा. 

चार खांदे म्हणजे बहुतेक कुणाच्या तरी मरणाच्या बातम्यांचा दिवस दिसतोय ! आतापर्यंत दोन पुरूषांच्या निधनाच्या बातम्या आल्या आहेत. स्वप्नात दोन पुरूष व दोन महिला दिसल्या होत्या. म्हणजे अजून दोन महिलांच्या बातम्या तर येणार नाहीत ना ?

सकाळी सहा वाजता जाग आलीच नाही. पावणेसात वाजता उठलो. आज सोमवार. नळाला आज पाणी येणार नसल्याने विहीरीवरून पाणी आणले. सकाळपासूनच पत्नीच्या अंगाला खाज येत होती. हे पित्त, शितपित्त , आम्लपित्त की आणखी काय ? तेच कळत नाही. तिची नेहमीची गोळीही परिणाम करीत नव्हती. संध्याकाळी हिने राजूला फोन करून त्याच्याकडची गोळी पाठवायला सांगितली. आजू ती घेऊन आला. पाठोपाठच राजूवहिनी व मुलगी धावत आलीत. तोपर्यंत ही अंग खाजवून रडकुंडीस आली होती. मग हिने गोळी घेतली. राजूवहिनीने हिच्या डोक्यावर तेल घातलं. अंगाला लावलं . तासाभरात हिला जरा बरं वाटलं, तश्या त्या दोघी घरी गेल्या. ही अंथरूणावर लवंडली . मी दूध गरम करायला गेलो. दूध तापून वर येतच होते तोच ही आँक आँक करीत बाथरूमकडे धावली आणि मी गँस बंद करून तिचे डोके दाबून धरायला धावलो. वांती काही नीट झालीच नाही. ही मात्र घुसमटली. कशीबशी तिला सावरली , उभी केली आणि बेडवर झोपवली. लगेच मागचा दरवाजा उघडला तो बीनाच अंगणात पाठमोरी उभी होती. मी तिला तिच्या आईला पटकन घेऊन ये म्हणून सांगितले. काकीला बरं नाहीय का म्हणून तिने विचारले. मी होय म्हणताच ती पळत तिच्या आईला बोलवायला गेली. दोनच मिनिटात मायलेकी आल्या. संत्या पण आला. मग ती तासभर बसलीत . जरा बरं वाटलं. मध्येच मुलगा येऊन जेवून त्याच्या कामाला गेला. काय वाटले तर बोलवा म्हणाला. मग पेडणेकर कंपनीही गेली. उरलो पुन्हा आम्ही दोघेच. त्यातही ही आजारी आणि शुश्रूषा करणारा मी एकटाच ! तिची शुश्रुषा करता करता रात्री तीन वाजले तेव्हा कुठे ती झोपली . मग मीही लवंडलो . नंतर कधी तरी मला झोप लागली  !


( क्रमश: )

...........


सोमवार, २७ जुलै, २०२०

बापाचं मन

 
मागे - पुढे

12.07.2020

गेल्या भागात आपण सुरूवातीलाच आमचा मुलगा आणि आम्ही लॉक डाऊनमुळे दोन ठिकाणी अडकल्याचे वाचले आहेच. कुठे लॉक डाऊन तर कुठे अनलॉक , कुठे लॉक डाऊन 7,8,9... तर कुठे अनलॉक 1,2,3.... खरे तर हे सगळे प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्याचेच प्रयत्न ! आतापर्यंत मुलगा ब-याच अंशी सुरक्षित राहून वर्क फ्राँम होम करीत होता. पण तो राहतो तिथून अवघ्या पाचशे मीटरवर पंधरावीस कोरोनाबाधित सापडल्याने तो एरिया सील करण्यात आला आहे . तिथे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. आता त्याला इथे आणण्याशिवाय पर्याय राहिला नाही. गेले दोन तीन दिवस हयाच कामात मग्न आहे. तिथला लॉक डाऊन उठल्याशिवाय काहीच करता येणार नाही. मग मात्र विकीला गाडी घेऊन मुलाला आणलं पाहिजे. मी कालच विकीशी बोललोय. 

         काल रात्री मी मुलाशी हे बोललो . तोही समजुतीने बोलला. तो यायला तयार आहे म्हटल्यावर आम्ही अनेक महिन्यांनी आनंदीत झालो . पण हा आनंदही क्षणिकच ठरला. रात्री साडेबारा वाजता बेबीचा हिला फोन आला. ती रडूच लागली. मला काही समजेचना ! शेवटी हिने समजूत घालून काय झाले ते विचारले तर तिचा जावई दवाखान्यात असल्याचे समजले. तिच्या मुलीचं लग्नात आम्ही प्रमुख भूमिका निभावली होती. लग्नं झाल्यानंतर उद्भवलेल्या काही अडचणींवर मात करण्यात मी स्वत: यशस्वी झालो होतो. त्यानंतर मात्र त्यांचा संसार सुखाने सुरू झाला होता... आणि आता हे अचानक .... आम्हांला धक्काच बसला ! हिच्याबरोबर बेबी अर्धा तास बोलली तेव्हा कुठे जरा तिचं मन मोकळं झालं .  पण आमचं मन ? आमच्या आयुष्यात आनंद उपभेगायचं सुख नाहीच का ? असा विचार करीत करीतच आम्ही रात्री दीड वाजता अंथरूणावर पडलो. 

        13.07.2020 च्या रात्री पुन्हा बेबीला फोन केला तर  तिचा जावयाची तब्ब्येत खूपच खालावली होतीे. 48 तासाचा अवधी फार महत्वाचा आहे. हे ऐकून आम्हांला काही सुचेनासेच झाले . त्याही परिस्थितीत आम्ही बेबीला धीर दिला. कोरोनामुळे पुण्याला जाताही येत नाही. काय काळ आला आहे माणसांच्या ताटातुटीचा ! माणसाला माणसाकडे सीधे जाता येत नाही, भेटता येत नाही !

13.07.2020 ला सकाळी 11.15 वा. बेबीचाच फोन आला
. लो झालेला बी.पी. नाँर्मल झालाय. हात पाय हलवतोय. तेवढेच समाधान वाटले. 
14.07.2020 .... अखेर घडायचे ते घडलेच ! बेबीचा जावई गेलाच ! आज रत्नागिरीतील संजीव साळवीही गेल्याची बातमी आली... दोन्हीही चटका लावून गेले...
.......
15.07.2020 आत्महत्या केलेल्या तरूण वकिलीच्या घरी बंदूसोबत सकाळी साडेनऊला हाक मारून आलो. 

बेबी , तिचा मुलगा व उर्मि उद्या पुण्याला जाणार आहेत. ड्रायव्हर बंटी.
..............
21.07.2020
गेले काही दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये श्रावणातील नामसप्ताह , एक्के इ. कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी मिळणार का , याबाबत बैठका होत होत्या. यामध्ये आमच्या शेजारच्या नवलाई पावणाई मंदिरातील नामसप्ताहाचाही अंतर्भाव होता. अखेर , कोरोनासंदर्भातील सर्व प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करून फक्त मंदिरातील धार्मिक विधीं करायच्या हे ठरले . त्यानुसार , सालाबादप्रमाणे आज श्रावणातील पहिल्या दिवशी आमच्या गावात विविध मंदिरात नामसप्ताह सुरू झाले. 
..........
24.05.2020
गेला आठवडाभर काही ना काही घडतंच आहे ! मागे उर्मीच्या घराचा स्लँब होऊन गेला आहे. बंदू त्याच्या बायकोच्या काहीलआर्थिक उचापतींमुळे त्रस्त आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमच्या अगदी शेजारीच असलेल्या नवलाई पावणाई मंदिरात खबरदारी घेत घेत नामसप्ताह सुरू आहे आणि तिकडे रत्नागिरीतली कोरोनाची संख्या वाढते आहे.
दुकानदार , डाँक्टर्स यांना लागण झाली आहे. 
.......
25.07.2020
मुलगा यायला तयार आहे , पण कंपनीच्या कामाकरिता आवश्यक ती इंटरनेटची स्पीड आमच्याकडे मिळत नाहीय. कालपर्यंत विविध पर्याय शोधत होतो. काल रात्री राऊटर वापरून जरा जवळपासची स्पीड मिळालीय. आता मुलगा कंपनीला बोलून फायनल करतो म्हणाला. 

26.07.2020
तिकडे दूरवर फेसबूकवर मराठी गझलकारांमध्ये कुलकर्णी - पाटील वाद सुरू झालाय. प्रश्न दस्तूरखुद्द मराठी गझलच्या बापाचा म्हणजे सुरेश भटांचा आहे . पोर बापालाच आव्हान देत असल्याने व बाप मला सदैव वंदनीय असल्याने मीही दोन शेर फेसबूकवर टाकलेच. 



27.07.2020
शेजारच्या नवलाई पावणाई मंदिरात कोरोनाचे नियम पाळून  नामसप्ताहातील धार्मिक कार्ये सुरू आहेत. उद्या नामसप्ताह समाप्ती आहे. 

बाकी मागे पुढे सगळे ठीक आहे. घरातच समस्या आहे. सौ. मुलाच्या विषयामुळे त्रस्त आहे. एकच विषय डोक्यात सतत ठेवल्याने काय होणार ! समजावूनही तिची समजूत पटत नाहीय. शेवटी ती आई आहे. पण आईपणाचा अतिरेक झाला की बबडेच तयार होतात. बापालाही मन असते, भावना असतात , व्यथा असतात, वेदना असतात , त्याने आपले दु:खं  कुणाला सांगायचे ? त्याला कोण समजावणार ? आयुष्य फार विचित्र होऊन बसले आहे, हेच खरे !
........

( क्रमश: )
...........











     








मंगळवार, ७ जुलै, २०२०

A question about life



07.07.2020 

     दि. 24.06.2020  नंतर इथे लिहीलंच नाही. याचा अर्थ इतके दिवस मागे-पुढे काही घडलंच नाही असं नाही. तसं ते घडतच राहतं . सृष्टीच्या प्रारंभापासूनच घटनाचक्र फिरते आहे. खरे तर त्यापूर्वीपासूनच ते फिरत असावे.  सृष्टीचा जन्म हीसुध्दा त्या घटनाचक्रातली घटना आहे. अधिक माहितीसाठी  घटनाक्रमाबाबत मी लिहिलेल्या इंग्रजी लेखाच्या हया लिंकला टच करा. अशीच एक घटना होती 28 वर्षापूर्वी घडलेली. तारीख 07-07 च होती. वार वेगळा होता. पण ती घटना माझ्या वैवाहिक जीवनात पुढे घडणा-या सर्व घटनांची जन्मदात्री होती. तर 07-07 रोजी मी माझ्या तत्कालीन भावी पत्नीला बघायला गेलो होतो , जी हे लिहीत असतांना आताही माझ्या शेजारी तिच्या मोबाईलमध्ये तिचे अस्वस्थ मन रमवण्याची कसरत करते आहे. याचे कारण मार्च 2020 पासून आम्ही दोघेही आमच्या मुलाच्या काळजीने हैराण आहोत. आमचा मुलगा पुण्यात नोकरीला आहे. तो तिथे फ्लॅटमध्ये एकटाच राहतो. होळी पौर्णिमेला आम्ही गावी आलो होतो व गुढी पाडव्यानंतर लगेच पुण्याला जाणार होतो. तितक्यात कोरोनाचा प्रकोप झाला . तोे तिकडे अडकला आणि आम्ही इकडे ! त्याच्या काळजीने आम्हांला काही सुचेनासे झाले आहे.  तर आज 07-07. त्यामुळे सकाळीच हिच्या वहिनीचा मला मेसेज आला. 
    [7/7, 10:34] Vibha 1: Chaha, nashta zala?
[7/7, 10:35] Vibha 1: Aaj kay special breakfast?
        काय सांगणार होतो ? सांगितलं जे घडतंय....
कालपासून हिची मन:स्थिती ठीक नाही. त्यातच काल रात्री सव्वा बाराच्या दरम्याने हिला भयंकर स्वप्नं पडलं. काही तरी भयंकर घडतंय हे बघून ही स्वप्नातच मुलाला हाका मारून उठवत होती . हाका मारतामारता तिची बोबडीच वळते आणि जीभ दाताखाली मिळते . ती झोपेतच उ उ करायला लागली म्हणून मी तिला उठवलं. तर ही घाबरलेली. मी पाणी दिलं ते पिऊन ती थोडी भानावर आली.  म्हणाली मला कोणाच्या तरी मानेवर दोरीचा निळा वळ दिसला स्वप्नात. त्यानंतर  आज सकाळी सात वा. मेघाचा फोन आला. आम्ही ज्यांच्या विहीरीवरून पाणी आणतो त्या समोरच्या घरातल्या मुलाने मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली ! म्हणजे तिकडे ते घडत असतांनाच बहुधा हिला हेे स्वप्नं पडत असावं. तो वकील होता. रत्नागिरीत बायको व मुलीसह रहात होता.  केवळ 34 वर्षांचा ! आम्हांला मुलासारखाच ! फार धक्का बसला. आता आमची दोघांचीही मन:स्थिती बिघडली आहे. पाऊसही सकाळपासूच धुव्वाधार कोसळतोय. अशा पावसात तिकडे जाताही येत नाहीय. आम्ही दोघंच घरात आहोत. एकमेकांना खचलो आहोत हे दाखवण्याचे टाळून धीर देत आहोत. 

              परवाच आमच्या मागच्या बाजुच्या दोन घरे सोडून तिस-या घरातली वनिता पायरीवरून तिच्या दारात पडली. तिचा डावा हात प्लँस्टरमध्ये आहे. गेल्या वर्षी ती बसला लटकत फरफटत गेली होती. नशिबाने वाचली.   तिच्या अलिकडच्या व आमच्या अगदी मागच्या घरातील संत्याचा भाऊ संज्याची तब्ब्येतही तितकीशी चांगली दिसत नाहीय. परवा कलू आते आमच्याकडे राहून गेली. संध्याकाळी आली आणि दुस-या दिवशी सकाळी चहा नाश्ता खाऊन ती आपल्या घरी गेली. संध्याकाळ झाली की एवढं मोठं घर आम्हां दोन म्हाता-या माणसांना कसं खायला येत असेल , ते कलू आतेला जाणवलं . कलू आतेने निग्रहाने लग्नं केलेलं नाहीय. ही स्टोरी कधी तरी नंतर सांगेन. तिची हकीगत आता सांगण्याच्या मन:स्थितीतही मी नाहीय. एवढं खरं की कधी कधी वाटतं की आयुष्य ही आपणच आपली घातलेली एक समजूत तर नसावी ना ? 


( क्रमश: )
...........