सुंदर संदेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुंदर संदेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

The man who brought first rikshaw in Ratnagiri

 31 जानेवारी - 


कोकणात पर्यायाने रत्नागिरी शहरात पहिली पॅसेंजर रिक्षा आणणारे विष्णू लक्ष्मण गोगटे यांचा वाढदिवस / जयंती - 


जन्म -  31 जानेवारी, 1937 .
मृत्यू - 17 डिसेंबर, 2020 .


विष्णू यांचा जन्म 31 जानेवारी, 1937 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे व माध्यमिक  शालेय शिक्षण रत्नागिरी येथे झाले. फाटक हायस्कूल, रत्नागिरी येथून 1956 साली ते एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या वडिलांचे रत्नागिरी शहरातील गोखले नाका येथे ल. V. Gogate & Sons नावाने दुकान होते.  घरच्या व्यवसायात सन 1956 ते 1970 या काळात जात असत.  


त्याकाळची रत्नागिरीतील प्रवासी वाहतूक

त्याकाळी रत्नागिरीतील प्रवासी वाहतूक बैलांची सारवट, सायकल किंवा टॅक्सी मधून होत असे. 1970 च्या सुमारास वाघधरे  यांच्या गलबतातून त्यांना कालिकत येथे जाण्याची संधी मिळाली होती. कालिकत हे शहर रत्नागिरी शहरासारखेच. त्या परिसरात त्यावेळी रिक्षा व्यवसाय सुरू झाला होता. तिथूनच त्यांना त्यांच्या मनात असलेला रिक्षा व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा मिळाली  व त्यांनी पॅसेंजर ऑटो रिक्षा परमिट असलेली आणण्याचे ठरवले. 


रिक्षा परमिट मिळवण्यासाठी

त्यांनी रिक्षा परमिट मिळवण्यासाठी अर्ज केला परंतु परमिट मिळवण्यासाठी त्यांना 2 - वर्षे सतत पाठपुरावा करावा लागला होता. याकामी राजाभाऊ लिमये यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 


शहरात पहिली परमिट ऑटो रिक्षा आणण्याचा मान

बजाज कंपनीची रिक्षा बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेऊन त्यांनी आणली होती. रत्नागिरी शहरात पहिली परमिट ऑटो रिक्षा आणण्याचा मान त्यांचाच. " वैशाली "हे त्यांच्या रिक्षाचे नाव. 7 फेब्रुवारी, 1972 रोजी लोकनेते शामराव पेजे यांच्या हस्ते उदघाटन करून त्यांनी रिक्षा व्यवसायाला प्रारंभ केला. शंकरराव पटवर्धन हे त्यांचे पहिले प्रवासी होत. 

रिक्षा व्यवसाय हे त्यांचे उपजीविकेचे साधन होते. सन 1998 पर्यंत ते रिक्षा व्यवसायात कार्यरत होते. रत्नागिरी रिक्षा संघटनेचे अनेक वर्षे ते पदाधिकारी होते.


25 वर्षे विना अपघात रिक्षा चालवल्याबद्दल सत्कार

त्यानंतर तिलक नगर परिसरात गोगटे कम्युनिकेशन अँड जनरल स्टोअर्स नावाने काही वर्षे व्यवसाय केला होता. सन 2012 सालच्या मे महिन्यात 25 वर्षे विना अपघात रिक्षा चालवल्याबद्दल त्यांचा रत्नागिरी जिल्हा रस्ते सुरक्षा समिती व सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी यांच्यावतीने तत्कालिन मा. जिल्हा न्यायाधीश विजय मुन्शी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. शालेय जीवनात पोहण्याची त्यांना विशेष आवड होती. याव्यतिरिक्त बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, खो -खो , कबड्डी इत्यादि मैदानी खेळातही त्यांचा सहभाग असायचा. 


उत्तम बॅडमिंटनपटू

रिक्षा व्यवसाय होताच असे असले तरी ते उत्तम बॅडमिंटन खेळाडूही होते. बरीच वर्षे ते बॅडमिंटन स्वतः जरी खेळत होते तरीही ते कोच म्हणूनही प्रसिद्ध होते. रत्नागिरी शहरातील अनेक बॅडमिंटनपटू त्यांनी तयार केले. अनेक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता व अनेक बक्षीसेही मिळवली होती.  

रत्नागिरी बॅडमिंटनमध्ये रत्नागिरीतील आणखीन एक बॅडमिंटनपटू कै. डॉ. मु. न. पानवलकर यांच्यासोबत बॅडमिंटन डबल्सच्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. रत्नागिरी शहरातील ही बॅडमिंटनमधली अभेद्य जोडी मानली जात होती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर 45 वर्षांवरील वयोगटातील डबल्सचे उपविजेतेपद या जोडीने मिळवले होते. 

याव्यतिरिक्त अहमदनगर व  पुणे येथे सन 1982, 1984,1987,1992,1997 मध्ये खेळल्या गेलेल्या ओल्ड मॉंक्स व्हेट्रन बॅडमिंटन स्पर्धेत पाच वेळा ही जोडी विजयी ठरली होती.

1 ऑगस्ट, 2019 रोजी सर्वंकष विद्यामंदीरच्या बॅडमिंटन कोर्टचे उदघाटन गोगटे- पानवलकर या जोडीच्या हस्ते झाले होते. 


17 डिसेंबर, 2020 रोजी वृद्धापकाळाने त्यांना देवाज्ञा झाली. 


अशा या विविधांगी  व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन . 


माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी. 

माहिती नावासह Like & Share करण्यास हरकत नाही.

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

History in Konkan Railway

  *कोकण रेल्वे मार्गांवर आज धावली पहिली विजेवरील दिवा - रत्नागिरी पॅसेंजर* 


*रत्नागिरीच्या सुपुत्रांनी केले पहिल्या गाडीचे सारथ्य!* 


 *रत्नागिरी-* कोकण रेल्वे मार्गावर अखेर प्रदूषणमुक्त प्रवासाचे पर्व सुरु झाले आहे. विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडी काल गुरुवारी धावली. पूर्वीची दादर -रत्नागिरी आणि आताची दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीने विद्युत इंजिनसह धावण्याचा गुरुवारी पहिला मान मिळवला.


*पहिल्या गाडीचे सारथ्य यांनी केले*


*लोको पायलट- शैलेश पवार

सहाय्यक लोको पायलट- सचिन पाडळकर

गार्ड -प्रणय तांबे.


गेल्या वर्षी रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून रत्नागिरीपर्यंत केवळ मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात होत्या.


*कोकण रेल्वे मार्गावर प्रदूषणमुक्त प्रवासाचे पर्व सुरु*


कोकण रेल्वे मार्गावर अखेर प्रदूषणमुक्त प्रवासाचं पर्व सुरु झाले आहे. विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडी गुरुवारी धावली. पूर्वीची दादर -रत्नागिरी आणि आताची दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीने विद्युत इंजिनसह धावण्याचा गुरुवारी पहिला मान मिळवला.


गेल्यावर्षी रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून रत्नागिरीपर्यंत केवळ मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात होत्या. गुरुवारी दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनसह धावली. रात्री पहिली ईलेक्ट्रीक लोकोसह धावणारी पहिली गाडी रत्नागिरी स्थानकावर येणार आहे.


विजेवर धावणाऱ्या पहिल्या पॅसेंजर गाडीचे कोकण रेल्वेच्या हद्दीत कोकण रेल्वेकडून स्वागत करण्यात आले. 

विशेष म्हणजे विद्युत इंजिनवर चालणारी पहिली गाडी चालवण्याचा पहिला मान रत्नागिरीतील सुपुत्रांना मिळाला गाडीचा लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट तसेच गार्ड हे तिघेही रत्नागिरीचे सुपुत्र आहेत. दरम्यान दिवा ते रत्नागिरी धावणारी गाडी आता रोज इलेक्ट्रिक लोकोसह धावणार आहे.

काल गुरुवारी दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी पॅसेंजर रेल्वे विद्युत इंजिनसह धावली. पहिली ईलेक्ट्रीक लोकोसह धावणारी पहिली गाडी रात्री रत्नागिरी स्थानकावर येणार आहे. विजेवर धावणाऱ्या पहिल्या पॅसेंजर गाडीचे कोकण रेल्वेच्या हद्दीत कोकण रेल्वेकडून स्वागत करण्यात आले. 

यावेळी रेल्वे युनियनचे विलास खेडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे विद्युत इंजिनवर चालणारी पहिली गाडी चालवण्याचा पहिला मान रत्नागिरीतील सुपुत्रांना मिळाला. गाडीचा लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट तसेच गार्ड हे तिघेही रत्नागिरीचे सुपुत्र आहेत. दरम्यान दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी ही गाडी आता रोज इलेक्ट्रिक इंजिनसह धावणार आहे.

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

Useful messages

  आपल्याला कोविड-19 बरोबरच राहायचं आहे, चला घाबरू नका किंवा नाकारू नका: 




डॉ. फहीम यांगनस, 

संसर्गजन्य रोग क्लिनिकचे प्रमुख, मेरीलँड विद्यापीठ,

यूएसए (अमेरिका):


  1. आपल्याला कोविड-19 (COVID-19) बरोबर कदाचित काही महिने किंवा वर्षे जगावे लागेल. घाबरू नका किंवा नाकारू नका, आपले जीवन निरुपयोगी करू नका. चला या वास्तवासह जगायला शिकू या!


  2. अधिकाधिक लिटर गरम पाणी पिऊन, पेशीमध्ये  घुसलेल्या/शिरकाव केलेल्या कोविड-19 (COVID-19) विषाणूचा नाश तुम्ही करू शकत नाही - तुम्हाला फक्त अधिक वेळा बाथरूम/वॉशरूमला जावे लागेल.


  3. आपले हात नियमित धुणे आणि दोन मीटरचे शारीरिक अंतर राखणे ही आपल्या संरक्षणाचा उत्तम मार्ग आहे.


 4. आपल्या घरात कोविड-19 (COVID-19) रुग्ण नसल्यास, आपले घर निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता नाही.


  5. किराणा साहित्य/सामान, पिशव्या/प्लास्टिक, गॅस सिलेंडर, शॉपिंग कार्ड्स आणि एटीएममुळे हा संसर्ग पसरत नाही.

 आपले हात वारंवार धुवा, नेहमीप्रमाणे आपले आयुष्य जगा.


  6. कोविड-19 (COVID-19) हा अन्नातून संसर्ग होत नाही. हा फ्लू सदृश्य संक्रमण लहानशा थेंबांशी/थुंकीशी संबंधित आहे. बाहेरील अन्न/खाद्यपदार्थ  मागवून मागणी कोविड-19 (COVID-19) संक्रमित झाल्याचा कोणताही धोका आढळून आलेला नाही.


7. अँलर्जी प्रतिरोध आणि हवेतील संसर्ग/प्रादुर्भाव (व्हायरल इन्फेक्शनमुळे) यामुळे ‘नाक’ या ज्ञानेद्रियाचा (वास, गंध इ.) याची उपजत क्षमता कमकुवत होऊ शकते. ही केवळ कोविड-19 (COVID-19) ची अनियमित/असाधारण लक्षणे आहेत. 


  8. एकदा आपण घरी आल्यावर आपल्याला त्वरित कपडे बदलण्याची आणि अंघोळ करण्याची आवश्यकता नाही.

 ‘स्वच्छता हा एक सद्गुण आहे, परंतु भोळेपणा नाही’.


  9. कोविड-19 (COVID-19) व्हायरस हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रादुर्भाव/संक्रमण होत नाही किंवा उडू शकत नाही. हे श्वसनमार्गातून होणारा संक्रमण/संसर्ग आहे ज्यात नजीकचा संपर्क आवश्यक आहे.


  १०. हवा स्वच्छ आहे, आपण उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी फिरायला जाण्यास काहीही हरकत नाही. (फक्त आपले शारीरिक संरक्षणाचे अंतर ठेवा)


  ११. कोविड-19 (COVID-19) विरुद्धच्या लढयात फक्त नियमित साबण वापरा, जीवाणू प्रतिरोधक (अँटी-बॅक्टेरियल) साबणाची गरज नाही. हे विषाणू (व्हायरस) आहेत, जीवाणू (बॅक्टेरिया) नाहीत.


  12. आपण दिलेल्या अन्न/खाद्यपदार्थाच्या ऑर्डरबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु, आपल्याला गरज वाटल्यास मायक्रोओव्हनमध्ये सर्व अन्न/खाद्यपदार्थ गरम करू घेऊ शकता.


  13. आपल्या बूट/शूजमध्ये कोविड-19 चा संसर्ग/ प्रादुर्भाव घरी होण्याची शक्यता म्हणजे दिवसातून दोनदा विजेचे दिवे लावण्यासारखे आहे. मी 20 वर्षांपासून व्हायरस विरूद्ध कार्यरत आहे - ड्रॉप इन्फेक्शन (लहानश्या थेंबांशी/थुंकीशी संबंधित संसर्ग) असे पसरत नाही. 


  14. व्हिनेगर, उसाचा रस आणि आले खाऊन तुम्हाला व्हायरसपासून वाचविता येणार नाही. हे फक्त रोग प्रतिकारशक्तीसाठी आहे, औषध नाही.


  15. बराच काळ मुखपट्टी (मास्क) परिधान केल्याने आपल्या श्वासोच्छवासामध्ये आणि ऑक्सिजनच्या पातळीत व्यत्यय/अडथळा येतो. केवळ गर्दीत परिधान करणे आवश्यक आहे.


  16. हातमोजे घालणे देखील एक चांगली कल्पना नाही; व्हायरस ग्लोव्हजमध्ये जमा होऊ शकतो आणि आपण आपल्या तोंडाला स्पर्श केल्यास ते सहजतेने संक्रमित होऊ शकतो. फक्त नियमितपणे आपले हात धुणे आवश्यक आहे.


  17. नेहमीच निर्जंतुकीकरण वातावरणात राहिल्याने प्रतिकारशक्ती खालावते, कमकुवत होते. जरी आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी पूरक आहार / औषधे घेत असलो तरी, त्यामुळे कृपया पार्क, समुद्रकाठ किंवा तत्सम सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे फिरायला जाणे आवश्यक आहे. घरी बसून तळलेले, मसालेदार, गोड पदार्थ आणि शीतपेये (फिझी ड्रिंक्स) सेवन करून, खावून/पिऊन नव्हे! तात्पर्य, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी रोगजन्य परिस्थितीत देखील घराबाहेर पडणे उचित  ठरते.

मूळ लेख: https://theazb.com/we-will-live-with-covid19-for-months-lets-not-deny-it-or-panic- 

डॉ. फहीम यांगनस,

संसर्गजन्य रोग क्लिनिकचे प्रमुख, मेरीलँड विद्यापीठ,

यूएसए (अमेरिका)


खूप चांगला लेख ..... सर्वांनी अवश्य वाचलाच पाहिजे असा.....

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

Lovely Messages 8

 

दिन विशेष

Whatsapp Messages fwd. By Mr. Anil Anant Shivalkar,  Ratnagiri 

        श्री. अनिल अनंत शिवलकर , रत्नागिरी 
                 




 


[8/15, 14:09] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष*


▪️१९४७: भारत देश स्वतंत्र झाला.


▪️१९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.


▪️१९४७: पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.


▪️१९४८: दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.


▪️१९६०: कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.


▪️१९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.


▪️१८६५: रेकी चे निर्माते मिकाओ उस्ईई यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९२६)


▪️१८६७: रंगभूमी अभिनेते गणपतराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९२२)


▪️१८७२: क्रांतिकारक, तत्त्वचिंतक योगी अरविंद घोष यांचा जन्म.


▪️१८७२: भारतीय गुरु, कवी आणि तत्वज्ञ श्री अरबिंदो यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५०)


▪️१८७३: भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार रामप्रसाद चंदा यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४२)


▪️१९०४: मोटार व्हीलचेअर चे शोधक जॉर्ज क्लाईन यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९२२)


▪️१९१२: इंदौर घराण्याचे संस्थापक उस्ताद अमीर खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९७४)


▪️१९१३: लेखक कवी भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ बी. रघुनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९५३)


▪️१९१५: ऊर्दू कथा, पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९९१)


▪️१९१७: लेखिका अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर २००१)


▪️१९२२: लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म.


▪️१९२९: साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक उमाकांत ठोमरे यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९९९)


▪️१९४५: बांगला देशच्या पंतप्रधान बेगम खालेदा झिया यांचा जन्म.


▪️१९४७: चित्रपट अभिनेत्री राखी गुलझार यांचा जन्म.


▪️१९५८: अभिनेत्री आणि वेशभूषाकार सिंपल कपाडिया यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर २००९)


▪️१९६१: भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक सुहासिनी मणिरत्नम यांचा जन्म.


▪️१९६४: बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन च्या सह-संस्थापिका आणि बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांचा जन्म.


▪️१९७१: भारतीय गायक आणि संगीतकार अदनान सामी यांचा जन्म.


▪️१९७५: भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक विजय भारद्वाज यांचा जन्म.


▪️१९९२: भारतीय बुद्धिबळपटू भास्करन आडहान यांचा जन्म.


▪️१९४२: स्वातंत्र्य सेनानी, म. गांधींचे स्वीस सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८९२)


▪️१९७४: स्वामी स्वरुपानंद यांनी समाधी घेतली (जन्म: १५ डिसेंबर १९०३)


▪️१९७५: बांगला देशचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९२०)


▪️२००४: गुजरातचे मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९४१)


▪️२००५: भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२७)


▪️१९७१: बहरैन देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.


▪️१९७५: बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.


▪️१९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.


▪️१९८८: मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.

..............

[8/16, 14:44] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *रविवार दि. १६ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️१९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.


▪️१९४६  कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.


▪️२०१०: जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.


▪️१८७९: संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९५५)


▪️१९०४: हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९४८)


▪️१९४८: भारतीय-डच रॉक संगीतकार बेरी हे यांचा जन्म.


▪️१९५०: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांचा जन्म.


▪️१९५२: गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जन्म.


▪️१९५४: पार्श्वगायिका हेमलता यांचा जन्म.


▪️१९५७: भारतीय वकील व राजकारणी आर. आर. पाटील यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)


▪️१९५८: अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका मॅडोना यांचा जन्म.


▪️१९६८: भारतीय राजकारणी आणि दिल्लीचे ७वे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जन्म.


▪️१९७०: नेपाळी-भारतीय अभिनेत्री मनीषा कोईराला यांचा जन्म.


▪️१९७०: अभिनेता सैफ अली खान यांचा जन्म.


▪️१९९७: अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन.


▪️१९९७: कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९४८)


▪️२०००: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९५२ - नवी दिल्ली)


▪️२००३: युगांडाचा हुकुमशहा इदी अमीन यांचे निधन.


▪️२०१०: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९२६)


▪️२०१८: भारताचे १०वे पंतप्रधान व कवी अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन (जन्म:२५ डिसेंबर १९२४)


....................


[8/17, 15:49] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *सोमवार दि. १७ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️१६६६: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.


▪️१९८२: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.


▪️१९९९: तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.


▪️२००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.


▪️१८८८: श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणेचे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म.


▪️१८९३: हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका मे वेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९८०)


▪️१९०५: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६४)


▪️१९१६: ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५)


▪️१९२६: चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव जिआंग झिमिन यांचा जन्म.


▪️१९३२: नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक व्ही. एस. नायपॉल यांचा जन्म.


▪️१९४९: इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा जन्म.


▪️१९७०: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरिअर यांचा जन्म.


▪️१३०४: जपानी सम्राट गोफुकाकुसा यांचे निधन.


▪️१८५०: पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान मार्टिन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८)


▪️१९०९: क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांनी न्यायलयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली असून त्यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)


▪️१९२४: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल यांचे निधन.

.............


[8/18, 18:54] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *मंगळवार दि. १८ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️१८४१: जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.


▪️१९२०: अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार.


▪️२००५: जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटी लोक अंधारात.


▪️२००८: हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.


▪️१७००: मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १७४०)


▪️१७३४: रघुनाथराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १७८३)


▪️१७९२: युनायटेड किंगडमचे पंतप्रधान जॉन रसेल यांचा जन्म.


▪️१८७२: संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९३१)


▪️१८८६: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९)


▪️१९००: राजदूत, मुत्सद्दी राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९९०)


▪️१९२३: लेगस्पिनर गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जून १९५५)


▪️१९३४: गीतकार, कवी, लेखक दिग्दर्शक गुलजार यांचा जन्म.


▪️१९३६: हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी रॉबर्ट रेडफोर्ड यांचा जन्म.


▪️१९५६: भारतीय फलंदाज संदीप पाटील यांचा जन्म.


▪️१९६७: पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदी यांचा जन्म.


▪️१९८०: अभिनेत्री प्रीती जंघियानी यांचा जन्म.


▪️१९७९: भारतीय राजकारणी वसंतराव नाईक यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९१३)


▪️१९९८: अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९४८)


▪️२००८: रहस्यकथाकार नारायण धारप यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)


▪️२००९: दक्षिण कोरियाचे ८वे राष्ट्राध्यक्ष किम दे-जुंग यांचे निधन.


▪️२०१२: भारतीय पत्रकार आणि लेखक रा. की. रंगराजन यांचे निधन.


.................


[8/19, 13:58] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *बुधवार दि. १९ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष*


▪️जागतिक छायाचित्रण दिन


▪️२९५ ख्रिस्त पूर्व: प्रेम, सौंदर्य आणि प्रजनन यांची रोमन देवी व्हीनसचे पहिले मंदिर पूर्ण झाले.


▪️१९१९: अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.


▪️१८७१: विल्बर राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राइट यांचा जन्म.  


▪️१८८६: स्वातंत्र्यसैनिक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९३५)


▪️१८८७: भारतीय वकील आणि राजकारणी एस. सत्यमूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४३)


▪️१९०३: लेखक चरित्रकार गंगाधरदेवराव खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२)


▪️१९०७: केंद्रीय मंत्री सरदारस्वर्ण सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९४)


▪️१९०७: भारतीय इतिहासकार, लेखक, आणि विद्वान हजारी प्रसाद द्विवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९७९)


▪️१९१३: भारतीय-इंग्लिश सैनिक व लेखक पीटर केम्प यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९३)


▪️१९१८: भारताचे ९वे राष्ट्रपती आणि ८वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९९९)


▪️१९४७: अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मास्टर विनायक यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९०६)


▪️१९७५: शिक्षणतज्ञ, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक विश्वनाथ तथा अप्पासाहेब पेंडसे यांचे निधन.  


▪️१९९०: पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक रा. के. लेले यांचे निधन.

▪️

१९९३: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९२९)


▪️१९९३: निर्भिड पत्रकार य. द. लोकुरकर यांचे निधन.


▪️१९९४: रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे, दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेते लिनसकार्ल पॉलिंग यांचे निधन. 


▪️२०००: भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक बिनेंश्वर ब्रह्मा यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४८)


▪️२०१५: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सनत मेहता यांचे निधन.


...............


[8/20, 14:12] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *गुरुवार दि. २० ऑगस्ट २०२०* 


🧷  *दिनविशेष* 


▪️१८२८: राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.


▪️१८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.


▪️२००८: कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.


▪️१८९६: भारतीय फुटबॉल खेळाडू गोस्त पाल यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७६)


▪️१९४०: भारतीय- ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रेक्स सेलर्स यांचा जन्म.


▪️१९४१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच सर्बिया यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च २००६)


▪️१९४४: भारताचे ६वे व सर्वात कमी वयाचे पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २१ मे १९९१)


▪️१९४६: इन्फोसिस चे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांचा जन्म.


▪️२००१: प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष एम. आर. यार्दी यांचे निधन.


▪️२०११: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९१९)


▪️२०१३: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे निधन.


▪️२०१३: ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक जयंत साळगावकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२९)


▪️२०१४: भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते बी. के. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)


..............

[8/24, 14:22] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *सोमवार दि. २४ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन


▪️१६९०: कोलकाता शहराची स्थापना.


▪️१६०८: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत ला दाखल.


▪️१८७५: कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.


▪️१८३३: गुजराथी लेखक समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६)


▪️१८७२: केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदेमंडळाचे सभासद न. चिं. केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४७)


▪️१८८०: निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५१)


▪️१८८८: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९५७)


▪️१८८८: मार्टिन बेकर एरिक कंपनी चे सहसंस्थापक वेलेंटाइन बेकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९४२)


▪️१९०८: क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)


▪️१९१७: किराणा घराण्याचे गायक पं. बसवराज राजगुरू यांचा जन्म.


▪️१९१८: केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)


▪️१९२७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्कोवित्झ यांचा जन्म.


▪️१९२७: भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या अंजली देवी यांचा जन्म.


▪️१९२९: नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाइनचे नेते यासर अराफत यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)


▪️१९९३: क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू दि. ब. देवधर यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८९२)


▪️२०००: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचे निधन. (जन्म: ३० जून १९२८)


▪️२००८: चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार वै वै यांचे निधन.


▪️२०१९: भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९५२)


...................


[8/26, 14:26] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *बुधवार दि. २६ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️१९४४: दुसरे महायुद्ध – चार्ल्स गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.


▪️१९७२: जर्मनीतील म्युनिच येथे २०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.


▪️१९१०: भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म. 


▪️१९२२: समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ग. प्र. प्रधान यांचा जन्म. 


▪️१९२७: प्रख्यात वास्तुविशारद बी. व्ही. दोशी यांचा जन्म.


▪️१९२८: हिरो साइकिलचे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचा जन्म.  


▪️१९४४: लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म.


▪️१९४८: नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर यांचे निधन.  


▪️१९५५: मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव यांचे निधन.


▪️१९५५: मल्याळी चित्रपट अभिनेते बालन के. नायर यांचे निधन.


▪️१९९९: डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ यांचे निधन.


▪️२०१२: चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचे निधन. 


...................


[8/29, 14:00] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️भारतीय क्रीडा दिन 


▪️१९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.


▪️१९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.


▪️१९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.


▪️१९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.


▪️१९०१: सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचा जन्म.  


▪️१९०५: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म. 


▪️१९१५: स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचा जन्म.  


▪️१९२३: भारतीय क्रिकेट खेळाडू हिरालाल गायकवाड यांचा जन्म.


▪️१९२३: इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा जन्म.


▪️१९५८: अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार मायकेल जॅक्सन यांचा जन्म.  


▪️१९५९: दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता अक्किनेनी नागार्जुन यांचा जन्म.


▪️१९७६: इस्लाम क्रांतिकारक बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचे निधन. 


▪️१९८२: स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचे निधन.  


▪️१९८६: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचे निधन.  


▪️२००७: स्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसीदास गुप्ता यांचे निधन.  


▪️२००८: मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन.  

..............


[8/30, 12:41] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *रविवार दि. ३० ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️१५७४: गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले.


▪️१८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.


▪️१८३५: अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना झाली.


▪️१९४५: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.


▪️१८१३: बालसाहित्यिक ना. धों. ताम्हनकर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९६१)


▪️१९३०: संगीतकार दशरथ पुजारी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल २००८ – डोंबिवली, मुंबई)


▪️१९३०: अमेरिकन उद्योगपती वॉरन बफे यांचा जन्म.


▪️१९३४: लेग स्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००५)


▪️१९३७: मॅक्लारेन रेसिंग टीम चे संस्थापक ब्रुस मॅक्लारेन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९७०)


▪️१९५४: बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष अलेक्झांडर लुकासेंको यांचा जन्म.


▪️१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी रवीशंकर प्रसाद यांचा जन्म.


▪️१९४७: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन. (जन्म: १ जून १८७२)


▪️१९८१: शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक जे. पी. नाईक यांचे निधन.  


▪️१९९४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी शं. गो. तुळपुळे यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)


▪️१९९८: स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार नरुभाऊ लिमये यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)


▪️२००३: अमेरिकन अभिनेता चार्ल्स ब्रॉन्सन यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)


................


▪️२०१४: भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचे निधन. (जन्म: २७ मे १९२८)


▪️२०१५: भारतीय विद्वान लेखक एम. एम. कळबुर्गी यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १९३८)

................................

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

Lovely messages 7

 नमस्कार मित्र हो , 


काही मित्र आपल्याला दररोज शुभ संदेश पाठवतात. कोरोनामुळे तर हे फार अावश्यक झाले आहे. संदेश अनेक जण पाठवतात. पण काही जण एका विशिष्ट प्रकारचे संदेश पाठवतात. अशा संदेशांमुळे आपल्याला आयुष्यात दिशा मिळते. कधी कधी तर मन उदास झाले तर असे संदेश मनाला नवी उर्जा देतात. विशेष म्हणजे असे सुंदर व उपयुक्त संदेश पाठवणा-या व्यक्ती ते गोळा करण्यासाठी व इतरांना पाठवण्यासाठी अपार मेहनत घेत असतात. त्यांच्या या चांगल्या उपक्रमाची माहिती या पानातून देण्याचा हा प्रयत्न आहे. ही कल्पना ज्यांच्या नियमितपणे उत्तम संदेश पाठविण्यामुळे सुचली ते म्हणजे 


          श्री. संतोष रामचंद साळगांवकर

 या , आपण त्यांचे संदेश वाचू व अशा चांगल्या गोष्टींचा प्रसार करू.
...........
नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्याहीपेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते......
   🌹 *Good Day* 🌹
..........

*विरोधक तयार  करण्यासाठी*
*मारामारी करावी लागत नाही*
*तुम्ही चांगले कार्य करु लागला की*
*आपोआप विरोधक तयार होतात कारण*
*कर्तृत्ववान व्यक्तीचे कार्य बघितले जात नाही* ,
*परंतु  तो कोठे अडकतोय* 
*याकडे सर्वांचे मात्र लक्ष असते ...!*
       🌹 *सुप्रभात*  🌹
..........
*जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय*
*नवीन वाटांचा शोध लागत नाही*..

  *🌹शुभ सकाळ🌹*
..........
*जेंव्हा एखादी व्यक्ती त्यांची समस्या आपल्या समोर मांडते, तेंव्हा ती आपल्यावर साक्षात देवासारखा विश्‍वास ठेवते*
         🌹सु प्रभात🌹
.........
वेळ , मित्र आणि नाती
 ह्या अशा तीन गोष्टी आहेत की,
 त्यांना किंमतीचे लेबल नसते.
 पण" ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते 
     🌹 *शुभ सकाळ* 🌹
...........
*गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच हितचिंतक नसतो.* *मिठासारखे खारट ज्ञान देणाराच खरा मित्र असतो.*
    🌹शुभ सकाळ🌹
..........
_*चांगला रस्ता पाहिजे असेल तर* 
*गतीरोधक सहन करा*, 
*आणि चांगला माणूस बनायचं असेल तर* 
*विरोधक सहन करा.*_

*🌹 शुभ सकाळ🌹*
.......
*पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो,*
*मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो.*
     
       *🌹 शुभ सकाळ* 🌹
.......
*चूक नसतानासुध्दा निव्वळ वाद टाळण्याकरिता मागितलेली माफी,जीवनातील संयमाचं एक मोठं उदाहरण ठरतं.!!* 
*जीवनात संयम राखला तर आपले अस्तिव कुणीच संपवू शकत नाही.!!*

         🌹*शुभ सकाळ *🌹
.......
जगण्यातले सगळ्यात कणखर आव्हान म्हणजे ? मनाला लावून न घेणे व येणारया संकटाला धैर्याने सामोरे जाणे यालाच जीवन म्हणतात.
     🌹सु प्रभात🌹
......... 
*एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी ज्ञानाची गरज लागते, पण तिची जाणीव होण्यासाठी अनुभवाची गरज असते.*

🌹 *शुभ सकाळ* 🌹
.......
*लोकांना आपण का खटकतो...*

*आपण वाईट वागतो म्हणून नाही*,
*तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून...*

*शब्द फिरवणारे लाख मिळतील*
*पण... शब्द पाळणारा एखादाच मिळेल ..*

          *💐 शुभ सकाळ 💐*
.........
*चैत्रातील झळ सहन केल्याशिवाय मृगातील रिमझिमचा आनंद द्विगुणीत हाेत नाही.*
*तसेच,*
*जीवनात संकटांची वादळे झेलल्या शिवाय सुखाची चव कळत नाही.*
 
*🌹शुभ सकाळ🌹*
.......
*आयुष्य हि फार अवघड शाळा आहे.इथे कॉपी करता येत नाही.*

*कारण इथे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.*

        🌹 *शुभ सकाळ* 🌹
..........
*जीवन जगण्याची कला त्यांनाच माहित असते जे स्वतः सोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करतात...*

  🌹*शुभ सकाळ*🌹
.......
घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात तेव्हा
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात....!

           🌹 सुप्रभात 🌹
........
*आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य..."*
*जिंकलो तर स्वतःला आवरायचं*
 *आणि हरलो तर ईतरांना सावरायचं..."*
         
       *🌹सुप्रभात🌹*
.........
*घराचा प्रमुख होणे सोपे नाही, त्याची स्थिती पत्र्याच्या शेड सारखी असते. जो ऊन, पाऊस, वारा, वादळ आदी सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो, परंतु त्या खाली राहणारे नेहमी म्हणतात की, ‘हा खुप आवाज करतो’.*

           🌹   *सुप्रभात*   🌹
.......

सोमवार, २० जुलै, २०२०

Lovely messages 6


Messages fwd. By Mr. Anil Anant Shivalkar,  Ratnagiri 

        श्री. अनिल अनंत शिवलकर , रत्नागिरी 
                 

[5/31, 15:21] A A. Shivalkar: ✖➕➖➗*🌻

Today is National Mathematics Day 

(Birth Day of Ramanujam),


See this Absolutely amazing Mathematics given by great Mathematician *रामानुजम*


1 x 8 + 1 = 9

12 x 8 + 2 = 98

123 x 8 + 3 = 987

1234 x 8 + 4 = 9876

12345 x 8 + 5 = 98765

123456 x 8 + 6 = 987654

1234567 x 8 + 7 = 9876543

12345678 x 8 + 8 = 98765432

123456789 x 8 + 9 = 987654321


1 x 9 + 2 = 11

12 x 9 + 3 = 111

123 x 9 + 4 = 1111

1234 x 9 + 5 = 11111

12345 x 9 + 6 = 111111

123456 x 9 + 7 = 1111111

1234567 x 9 + 8 = 11111111

12345678 x 9 + 9 = 111111111

123456789 x 9 +10= 1111111111

9 x 9 + 7 = 88

98 x 9 + 6 = 888

987 x 9 + 5 = 8888

9876 x 9 + 4 = 88888

98765 x 9 + 3 = 888888

987654 x 9 + 2 = 8888888

9876543 x 9 + 1 = 88888888

98765432 x 9 + 0 = 888888888



And look at this symmetry :

1 x 1 = 1

11 x 11 = 121

111 x 111 = 12321

1111 x 1111 = 1234321

11111 x 11111 = 123454321

111111 x 111111 = 12345654321

1111111 x 1111111 = 1234567654321

11111111 x 11111111 = 123456787654321

111111111 x 111111111 = 12345678987654321


Brilliant isn't it?



Please Share This Wonderful Number Game 
[6/25, 11:31] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *गुरुवार दि. २५ जून २०२०*

▪️ १९१८: कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.

▪️ १९३४: महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.

▪️ १९७५: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.

▪️ १९८३: भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.

▪️ १८६४: नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेर्न्स्ट यांचा जन्म.

▪️ १८६९: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांचा जन्म.

▪️ १९७४: हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा जन्म.

▪️ १९७८: हिंदी चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी यांचा जन्म

▪️ १९८६: अभिनेत्री सई ताम्हनकर यांचा जन्म.

▪️ १९२२: बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन.

▪️ १९७९: मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब यांचे निधन.

▪️ १९९७: फ्रेंच संशोधक जॅक-इवेसकुस्तू यांचे निधन.

▪️ २०००: मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे यांचे निधन.

▪️ २००९: अमेरिकन गायक मायकेल जॅक्सन यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)
[6/27, 14:08] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖 *शनिवार दि. २७ जून २०२०*

▪️ १९९१: युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.

▪️ १९९६: अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.

▪️ १८६४: काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे याचं जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)

▪️ १८७५: दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १८९९)

▪️ १९६२: भारतीय-कॅनडातील उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा  जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४)

▪️ १७०८: मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव यांचे निधन.

▪️ २०००: शिक्षणतज्ञ व चरित्रकार द. न. गोखले यांचे निधन.

▪️ २००२: भारतीय उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन.
[6/28, 16:03] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *रविवार दि. २८ जून २०२०*

▪️ १८३८: इंग्लंडची राणी व्हिक्टोरि यांचा राज्याभिषेक झाला.

▪️ १९७२: दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ झाला.

▪️ १९९८: संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍काविषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली.

▪️ १४९१: इंग्लंडचा राजा हेन्‍री (आठवा) यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १५४७)

▪️ १९२१: भारताचे ९वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योगमंत्री नरसिम्हा राव यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००४)

▪️ १९२८: चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक बाबूराव सडवेलकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००)

▪️ १९३४: कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज रॉय गिलख्रिस्ट यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै २००१)

▪️ १९३७: साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक डॉ.गंगाधर पानतावणे यांचा जन्म.

▪️ १९८७: व्हायोलियनवादक, गायक, संगीतज्ञ पं. गजाननबुवा जोशी यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९११)

▪️ १९९०: कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचे निधन.
[6/29, 10:44] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *सोमवार दि. २९ जून २०२०*

▪️ १९८६: आर्जेन्टिना ने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.

▪️ २००१: पं.हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.

▪️ २००७: ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.

▪️ १८६४: शिक्षणतज्ज्ञ व वकिल आशुतोष मुखर्जी यांचा जन्म.

▪️ १८७१: मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९३४)

▪️ १८९१: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९७८)

▪️ १९८१: मराठी साहित्यिक दि.बा. मोकाशी यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९१५)

▪️ २०००: ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १९११)

▪️ २०१०: विचारवंत, वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९२७)
[7/2, 09:17] A A. Shivalkar:   ।। नमस्कार मंडळी।।
         🌞 दिन विशेष🌖
प्रदोष
मास : आषाढ
तिथी : शु. द्वादशी
०२ जुलै २०२०
वार : गुरुवार
चंद्र राशी: वृश्चिक
नक्षत्र: अनुराधा
सूर्य राशी : मिथुन
सूर्य नक्षत्र: आर्द्रा: वाहन घोडा
शालिवाहन शक: शार्वरी १९४२
विक्रम संवत : प्रमादी २०७७
वैदिक ऋतु : ग्रीष्म
दृक ऋतु : वर्षा

🚩।। दास-वाणी ।।🚩
          ||श्रीराम ||
          नामरुप
 *प्रत्यय विवरण*
भूत म्हणिजे जितुकें जालें| 
जालें तितुके निमालें |
चंचळ आलें आणी गेलें| 
ऐसें जाणावें ||५||
अविद्या जड आत्मा चंचळ| 
जड कर्पूर आत्मा अनळ |
दोनी जळोन तत्काळ| 
विझोन जाती ||६||
ब्रह्म आकाश निश्चळ जाती| 
आत्मा वायो चंचळ जाती |
परीक्षवंत परीक्षिती| 
खरें किं खोटें ||७||
जड अनेक आत्मा येक| 
ऐसा आत्मानात्मविवेक |
जगा वर्तविता जगन्नायेक| 
तयास म्हणावें ||८||

जे निर्माण झाले ते नष्ट होते, पंचमहाभूते निर्माण झाली व ती नष्ट होतील म्हणून ती जड तरीही चंचल आहेत. पंचमहाभूते जड (अनात्मा) कापरा सारखी तर परब्रम्हाचे प्रतिबिंब म्हणजे चंचल आत्मा हा अग्नी रूप मानले तर दोनीही एकदिवस जळून लगेच विझून शांत होतील. परब्रम्ह व आकाश निश्चल आहेत तर आत्मा व वायू चंचल आहेत असे परिक्षावंत सांगतात. परब्रम्हाचे प्रतिबिंब स्वरुप आत्मा एकमेव सर्वव्याप्त परन्तु जडसृष्टी अनेक ह्या विचारला आत्मानात्मविवेक असे म्हणतात. म्हणून आत्मा जगाचा नियंता आहे.   

- प्रत्यय विवरण -
 ।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध  : १३/०७
[7/3, 08:53] A A. Shivalkar:   ।। नमस्कार मंडळी।।
         🌞 दिन विशेष🌖
मास : आषाढ
तिथी : शु. त्रयोदशी
०३ जुलै २०२०
वार : शुक्रवार
चंद्र राशी: वृश्चिक
नक्षत्र: ज्येष्ठा
सूर्य राशी : मिथुन
सूर्य नक्षत्र: आर्द्रा: वाहन घोडा
शालिवाहन शक: शार्वरी १९४२
विक्रम संवत : प्रमादी २०७७
वैदिक ऋतु : ग्रीष्म
दृक ऋतु : वर्षा

🚩।। दास-वाणी ।।🚩
          ||श्रीराम ||
          नामरुप
 *प्रत्यय विवरण*
जड अनात्मा चेतवी आत्मा| 
सर्वीं वर्ते सर्वात्मा |
अवघा मिळोन चंचळात्मा| 
निश्चळ नव्हे ||९||
निश्चळ तें परब्रह्म| 
जेथें नाहीं दृश्यभ्रम |
विमळ ब्रह्म तें निभ्रम| 
जैसें तैसें ||१०||
आधी आत्मानात्माविवेक थोर| 
मग सारासारविचार |
सारासारविचारें संव्हार| 
प्रकृतीचा ||११||
विचारें प्रकृती संव्हारे| 
दृश्य अस्तांच वोसरे |
अंतरात्मा निर्गुणीं संचरे| 
अध्यात्मश्रवणें ||१२||

जड दृश्यसृष्टीला असणारे चेतनत्व आत्मा देतो व त्याचे अस्तित्व कणाकणात वसते. जडाला चेतनत्व देण्यासाठी परब्रम्हाचे प्रतिबिंब असलेला आत्मा चंचल स्वरूप असतो. परंतु परब्रम्ह विमळ, निश्चल असून त्यास दृष्टीभ्रम लागू होत नसल्याने मानवी डोळ्यांना दिसत नाही. आधी सृष्टीचा आत्मा कोण व कसा आहे हा आत्मानात्मविवेक जाणून मग सारासार विचार समजुन घ्यावा (परब्रम्ह सार, दृष्य सृष्टी असार). अध्यात्म श्रवणाने सारासार विचार समजल्याने दृश्यसृष्टी नष्ट होण्या आधीच वस्तूंचा मोह कमी झाल्याने अंतरात्मा निर्गुण स्वरूप घेतो.     
- प्रत्यय विवरण -
 ।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध  : १३/०७
[7/4, 08:44] A A. Shivalkar:   ।। नमस्कार मंडळी।।
         🌞 दिन विशेष🌖
मास : आषाढ
तिथी : शु. चतुर्दशी
०४ जुलै २०२०
वार : शनिवार
चंद्र राशी: धनु
नक्षत्र: मूळ
सूर्य राशी : मिथुन
सूर्य नक्षत्र: आर्द्रा: वाहन घोडा
शालिवाहन शक: शार्वरी १९४२
विक्रम संवत : प्रमादी २०७७
वैदिक ऋतु : ग्रीष्म
दृक ऋतु : वर्षा

🚩।। दास-वाणी ।।🚩
          ||श्रीराम ||
          नामरुप
 *प्रत्यय विवरण*
चढता अर्थ लागला| 
तरी अंतरात्मा चढतचि गेला |
उतरल्या अर्थें उतरला| 
भूमंडळीं ||१३||
अर्थासारिखा आत्मा होतो| 
जिकडे नेला तिकडे जातो |
अनुमानें संदेहीं पडतो| 
कांहींयेक ||१४||
निसंदेह अर्थ चालिला| 
तरी आत्मा निसंदेहचि जाला |
अनुमान-अर्थें जाला| 
अनुमानरूपी ||१५||
नवरसिक अर्थ चाले| 
श्रोते तद्रूपचि जाले |
चाटपणें होऊन गेले| 
चाटचि अवघे ||१६||
जैसा जैसा घडे संग| 
तैसे गुह्यराचे रंग |
याकारणें उत्तम मार्ग| 
पाहोन धरावा ||१७||
         
अंतरात्मा कसा आहे याचा जेव्हढा वरचा गूढ विचार कराल तेवढा तो गूढ भासू लागेल. म्हणून निर्गुण निराकार परब्रम्हाचे प्रतिबिंब असलेला अंतरात्मा असा साधा अर्थ लावला तर त्याचे अस्तित्व तुमच्या आमच्यात या पृथीवरच जाणवू लागेल. अंतरात्मा चंचल सर्वव्यापी असल्याने त्याची शब्दात व्याख्या करणे कठीण आहे. त्यामुळे शब्दांच्या जंगलात अडकून पडलो तर अंतरात्मा कसा ते उमगण्या ऐवजी नुसता अंदाज बांधत बसून गोंधळ होईल. नव-रसपूर्ण कथा ऐकताना श्रोते तल्लीन होऊन जातात. मनाला उद्यपीत करणारी कथा सांगितली तर श्रोते उत्तानपणे वागू लगतात! सरडा ज्या रंगाच्या झाडावर चढतो तसा रंग त्याला प्राप्त होतो. याच नियमाने आपण सत्संग केला तर गुणी होऊ व कुसंग केला तर दुर्गुणी.

- प्रत्यय विवरण -
 ।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध  : १३/०७
[7/4, 11:24] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *शनिवार दि. ४ जुलै २०२०*

▪️ १७७६: अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासून स्वतंत्र्य घोषित केले.

▪️१९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासास प्रारंभ झाला.

▪️१९३६: अमरज्योती हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

▪️१९९७: नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.

▪️१९१४: जनकवी भावगीत लेखक पी. सावळाराम यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९९७)

▪️१९२६: विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ तथा वि. आ. बुवा यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २०११)

▪️१७२९: मराठा आरमारप्रमुख (सेना सरखेल) कान्होजी आंग्रे यांचे निधन.

▪️१९६३: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८७६)

▪️१९८०: रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १८९६)
[7/5, 09:48] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *रविवार दि. ५ जुलै २०२०*

▪️ आज गुरूपौर्णिमा 

▪️ १९१३: बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.

▪️ १९९६: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि एन. पंत यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.

▪️ १९४६: केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार रामविलास पासवान यांचा जन्म.

▪️ १९५४: न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जॉन राइट यांचा जन्म.

▪️ १८३३: जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे निओपे यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७६५)

▪️ २००५: लेगस्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)

▪️ २००६: भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२४)
[7/6, 10:12] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *सोमवार दि. ६ जुलै २०२०*

▪️ साईबाबा उत्सव समाप्ती, शिर्डी 

▪️ १७३५: मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.

▪️१८९२: ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली.

▪️१९८२: पुणे – मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.

▪️१८३७: प्राच्यविद्या संशोधक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५)

▪️१८६२: मानववंशशास्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)

▪️१९२०: अर्थतज्ञ डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९५)

▪️१९२७: लेखक, चित्रकार, पटकथाकार आणि शिकारी व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१)

▪️१९९७: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक चेतन आनंद यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९२१)

▪️१९९९: कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९३९)

▪️२००२: भारतीय उद्योगपती धीरुभाई अंबानी यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९३२)
[7/7, 09:01] A A. Shivalkar:   ।। नमस्कार मंडळी।।
         🌞 दिन विशेष🌖

मास : आषाढ
तिथी : कृ. द्वितीया/ तृतीया
०७ जुलै २०२०
वार : मंगळवार
चंद्र राशी: मकर
नक्षत्र: श्रवण
सूर्य राशी : मिथुन
सूर्य नक्षत्र: पुनर्वसु: वाहन उंदीर
शालिवाहन शक: शार्वरी १९४२
विक्रम संवत : प्रमादी २०७७
वैदिक ऋतु : ग्रीष्म
दृक ऋतु : वर्षा

🚩।। दास-वाणी ।।🚩
          ||श्रीराम ||
          नामरुप
 *प्रत्यय विवरण*
मुख्य देवचि ठाईं पडिला| 
मग काये उणें तयाला |
लोक वेडे विवेकाला| 
सांडून जाती ||२७||
विवेकाचें फळ तें सुख| 
अविवेकाचें फळ तें दुःख |
यांत मानेल तें अवश्यक| 
केलें पाहिजे ||२८||
कर्तयासी वोळखावें| 
यास विवेक म्हणावें| 
विवेक सांडितां व्हावें| 
परम दुःखी ||२९||
आतां असो हें बोलणें| 
कर्त्यास वोळखणें |
आपलें हित विचक्षणें| 
चुकों नये ||३०||

देवाचे अस्तित्व ज्याला उमगले त्याला मग कसली कमतरता भासेल? पण प्रपंचात गुरफटलेला माणूस हा विवेक विसरतो. सारासार विवेकाचे फळ सुख असते तर अविवेकाचे फळ फक्त दुःख. हे लक्षात ठेऊन कर्माचे फळ मिळवताना सगळ्याचा मुख्य कर्ता परब्रम्ह आहे हे कायम ध्यानात ठेवले तर दुःख कधीच होणार नाही.

- प्रत्यय विवरण -
 ।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध  : १३/०७
[7/7, 10:20] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *मंगळवार दि.७ जुलै २०२०*

▪️१९१०: पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना.

▪️१९८५: विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.

▪️१९९८: इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील १७ शतकांची बरोबरी केली. तसेच एकदिवसीय सामन्यातील ७००० धावांचा टप्पा पार केला.

▪️१९७३: भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक कैलाश खेर यांचा जन्म.

▪️१९८१: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म.

▪️१३०७: इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला यांचे निधन. (जन्म: १७ जून १२३९)

▪️१९९९: भारतीय क्रिकेट खेळाडू एम. एल. जयसिंहा यांचे निधन.
[7/8, 10:16] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *बुधवार दि.८ जुलै २०२०*

 🌝  आज संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रात्री १०. ०३

▪️ २००८: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन.

▪️२००६: मुख्यनिवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

▪️ २०११: रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.) असलेली नाणी चलनात आली.

▪️ १९१४: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१०)

▪️ १९१६: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९९८)

▪️ १९७२: भारताचे क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्म.

▪️ १९८४: पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी ‘बाकीबाब’ उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )

▪️ २००७: भारताचे ८वे पंतप्रधान चंद्रा शेखर यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९२७)
[7/9, 10:13] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *गुरुवार दि. ९ जुलै २०२०*

▪️ १९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.

▪️१९६९: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.

▪️१९२१: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९८२)

▪️१९३८: चित्रसृष्टीतील कसदार अभिनेता हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५)

▪️१९६८: सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८९६)

▪️१९९३: संगीतकार जोडीतील सोनिक यांचे निधन.

▪️२००५: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री डॉ. रफिक झकारिया यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)
[7/9, 10:19] A A. Shivalkar:   ।। नमस्कार मंडळी।।
         🌞 दिन विशेष🌖
मास : आषाढ
तिथी : कृ. चतुर्थी/ पंचमी
०९ जुलै २०२०
वार : गुरुवार
चंद्र राशी: कुंभ
नक्षत्र: शततारका
सूर्य राशी : मिथुन
सूर्य नक्षत्र: पुनर्वसु: वाहन उंदीर
शालिवाहन शक: शार्वरी १९४२
विक्रम संवत : प्रमादी २०७७
वैदिक ऋतु : ग्रीष्म
दृक ऋतु : वर्षा

🚩।। दास-वाणी ।।🚩
          ||श्रीराम ||
          नामरुप
 *कर्ता निरूपण*
जें जें कर्तयानें केलें| 
तें तें त्याउपरी जालें |
कर्त्यापूर्वीं आडळलें| 
न पाहिजे कीं ||२६||
केलें तें पंचभूतिक| 
आणि पंचभूतिक ब्रह्मादिक |
तरी भूतांशें पंचभूतिक| 
केलें तें घडेना ||२७||
पंचभूतांस वेगळें करावें| 
मग कर्त्यास वोळखावें |
पंचभूतिक तें स्वभावें| 
कर्त्यांस आलें ||२८||
पंचभूतांवेगळें निर्गुण| 
तेथें नाहीं कर्तेपण |
निर्विकारास विकार कोण|
लावू शके ||२९||
निर्गुणास कर्तव्य न घडे| 
सगुण जाल्यांत सांपडे |
आतां कर्तव्यता कोणेकडे| 
बरें पाहा ||३०||

एखादी वस्तू एखाद्याने बनवली असे म्हणले तर ती वस्तू बनवणाऱ्याच्या जन्मा आधी अस्तित्वात असणे शक्य आहे का? दृष्यसृष्टि म्हणजे पंचमहाभूते ब्रम्हदेवाने बनवली असे म्हणावे तर ब्रम्हदेव स्वतः सगुण असल्याने पंचमहाभूताचा अंश आहे. म्हणून पंचमहाभूते स्वतःच्या अंशातून जन्मली हे तर घडू शकत नाही! (स्वतःच स्वतःला जन्म देणे शक्य नाही) दृष्यसृष्टि मधून पंचमहाभूताना वगळले तर जे शिल्लक राहील तो मग एकमेव कर्ता ठरतो. कारण जन्मदात्याचा अंश मुलात स्वाभाविकपणे दिसणारच.  परब्रम्ह पंचमहाभूतापेक्षा निर्गुण असल्याने वेगळं आहे. परंतु मग प्रश्न असा पडतो कि कर्ता निर्गुणी कसा असेल किंवा निर्विकाराला विकार कसा होईल? परब्रम्ह निर्गुण असल्याने त्याला क्रिया किंवा कर्म नाही. सगुण (पंचमहाभूते) तर आधीच जन्मले आहे. मग या सगुणाचा (पंचमहाभूते) कर्ता कोण या प्रश्नाचे उत्तर सूक्ष्म विचार केला तरच सापडेल.

- कर्ता निरूपण -
 ।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध  : १३/०८
[7/9, 10:19] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *गुरुवार दि. ९ जुलै २०२०*

▪️ १९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.

▪️१९६९: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.

▪️१९२१: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९८२)

▪️१९३८: चित्रसृष्टीतील कसदार अभिनेता हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५)

▪️१९६८: सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८९६)

▪️१९९३: संगीतकार जोडीतील सोनिक यांचे निधन.

▪️२००५: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री डॉ. रफिक झकारिया यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)
[7/10, 12:48] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *शुक्रवार दि. १० जुलै २०२०*

▪️ २०००: मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.

१९०३: साहित्यिक रा. भि. जोशी यांचा जन्म.

१९१३: कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९९८)

१९१४: सुपरमॅन हिरो चे सहनिर्माते जो शस्टर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९२)

१९२३: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९८७)

१९४९: क्रिकेटपटू समालोचक सुनील गावसकर यांचा जन्म.

२००५: पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९३१)

१५५९: फ्रान्सचा राजा हेन्‍री (दुसरा) यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५१९)

१९६९: इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन. (जन्म: ३० मे १८९४)
[7/11, 09:27] A A. Shivalkar:   ।। नमस्कार मंडळी।।
         🌞 दिन विशेष🌖
मास : आषाढ
तिथी : कृ. षष्ठी
११ जुलै २०२०
वार : शनिवार
चंद्र राशी: मीन
नक्षत्र: उत्तरा भाद्रपदा
सूर्य राशी : मिथुन
सूर्य नक्षत्र: पुनर्वसु: वाहन उंदीर
शालिवाहन शक: शार्वरी १९४२
विक्रम संवत : प्रमादी २०७७
वैदिक ऋतु : ग्रीष्म
दृक ऋतु : वर्षा

🚩।। दास-वाणी ।।🚩
          ||श्रीराम ||
          नामरुप
 *कर्ता निरूपण*
केलें तें अवघेंच लटिकें| 
तरी कर्ता हें बोलणेंचि फिकें |
वक्ता म्हणे रे विवेकें| 
बरें पाहा ||३५||
बरें पाहाता प्रत्यये आला| 
तरी कां करावा गल्बला |
प्रचित आलियां आपणाला| 
अंतर्यामीं ||३६||
आतां असो हें बोलणें| 
विवेकी तोचि हें जाणे |
पूर्वपक्ष लागे उडवणें| 
येरवीं अनुर्वाच ||३७||
तंव श्रोता करी प्रस्न| 
देहीं सुखदुःखभोक्ता कोण |
पुढें हेंचि निरूपण| 
बोलिलें असे ||३८||

माणूस दृश्यसृष्टी/ पंचमहाभूते यांचे अस्तित्व खरे धरून याचा कर्ता कोण असा प्रश्न विचारतो परंतु ते मुळात मायिक, भ्रामक आहे म्हणून हा प्रश्न चुकीचा ठरतो. दृश्यसृष्टी/ पंचमहाभूते यांचा कर्ता कोण हा पूर्वपक्ष आहे तो समजण्यासाठी हे सर्व विवरण करावे लागते अन्यथा ते अनुर्वाच्य म्हणजे शब्दांच्या पलीकडचे आहे!  म्हणून जे भ्रमरूप आहे, क्षणिक आहे त्याचा लोभ धरू नये हा सिद्धांत विवेकी माणसाने कायम मनात घट्ट करावा. मग श्रोता विचारतो कि सृष्टी मायिक असल्याने तिला कर्ता नाही मग ज्याला आपण सुख किंवा दुःख म्हणतो ते नक्की काय व त्याचा भोक्ता कोण? पुढील समासात याचे निरूपण केले आहे.

- कर्ता निरूपण -
 ।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध  : १३/०८
[7/11, 10:04] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *शनिवार दि. ११ जुलै २०२०*

▪️ जागतिक लोकसंख्या दिन.

▪️ १९०८: लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली.

▪️१९५०: पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा (IMF) सदस्य बनला.

▪️१९७९: अमेरिकेची स्कायलॅब ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.

▪️१९९४: पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.

▪️२००६: मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.

▪️१८८९: कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायणहरी आपटे यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७१ – कोरेगाव, जिल्हा सातारा)

▪️१८९१: प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचा जन्म. (मृत्यू: २८ मे १९६१)

▪️१९२१: दलित साहित्यिक शंकरराव खरात यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००१)

▪️१९५३: केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म.

▪️१९९४: परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे बॉम्बे सॅपर्स चे अधिकारी मेजर रामराव राघोबा राणे यांचे निधन.

▪️२००३: कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक सुहास शिरवळकर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९४८)

▪️२००९: गीतकार शांताराम नांदगावकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९३६)
[7/12, 09:18] A A. Shivalkar:   ।। नमस्कार मंडळी।।
         🌞 दिन विशेष🌖
मास : आषाढ
तिथी : कृ. सप्तमी
१२ जुलै २०२०
वार : रविवार
चंद्र राशी: मीन
नक्षत्र: उत्तरा भाद्रपदा/ रेवती
सूर्य राशी : मिथुन
सूर्य नक्षत्र: पुनर्वसु: वाहन उंदीर
शालिवाहन शक: शार्वरी १९४२
विक्रम संवत : प्रमादी २०७७
वैदिक ऋतु : ग्रीष्म
दृक ऋतु : वर्षा

🚩।। दास-वाणी ।।🚩
          ||श्रीराम ||
          नामरुप
 *कर्ता निरूपण*
आत्मयास शेरीरयोगें| 
उद्वेग चिंता करणें लागे |
शरीरयोगें आत्मा जगे| 
हें तों पगटचि आहे ||१||
देह अन्नचि खायेना| 
तरी आत्मा कदापि जगेना |
अत्म्याविण चेतना| 
देहास कैंची ||२||
हें येकावेगळें येक| 
करूं जातां निरार्थक |
उभयेयोगें कोणीयेक| 
कार्य चाले ||३||
देहाला नाहीं चेतना| 
अत्म्यास पदार्थ उचलेना |
स्वप्नभोजनें भरेना| 
पोट कांहीं ||४||
आत्मा स्वप्नअवस्थेंत जातो| 
परंतु देहामध्यें हि असतो |
निदसुरेपणें खाजवितो| 
चमत्कार पाहा ||५||

माणसाच्या अवयवांना चेतना देण्याचे काम आत्मा करतो त्याच बरोबर हे शरीर आत्म्याला राहायचे ठिकाण देते. त्यामुळे शरीराच्या माध्यमातून आत्म्याला सुख दुःख पीडा होत असते. आपण जेवलो नाही तर त्या शरीरात आत्मा राहाणार नाही आणि आत्मा नसेल तर देहाला चेतना नाही. त्यामुळे आत्मा व शरीर दोघेही एकमेकांना पूरक आहेत. दोघांना वेगळे केले तर कोणताच हेतू साध्य होणार नाही. आत्म्या शिवाय देहाला हालचाल करण्याची शक्ती नाही आणि आत्मा स्वतः एकटा काडी देखील उचलू शकत नाही अस हे कोड आहे. स्वप्नात पक्वान्नांचे भरलेले ताट नुसते बघून पोट भरेल काय? शरीर निद्रिस्त असताना आत्मा स्वप्नावस्थेत असतो तरीही तो शरीरात असतो कारण शरीराच्या कोणत्याही अवयवाला कंड सुटली तरी झोपेत देखील आपण सहजपणे खाजवतो! हा चमत्कार नाही का?

- आत्माविवरण -

- आत्माविवरण -
 ।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध  : १३/०९
[7/12, 12:18] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖 *रविवार दि. १२ जुलै २०२०*

▪️ १६७४: शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.

▪️ १९२०: पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले.

▪️ १९९९: महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान.

▪️ ख्रिस्त पूर्व १००: रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांचा जन्म.

▪️ १८६४: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९२६)

▪️ १९६१: भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते शिव राजकुमार यांचा जन्म.

▪️ १९६५: क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा जन्म.

▪️ २०००: मराठी कवयित्री इंदिरा संत यांचे निधन.

▪️ २०१२: मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारासिंग यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८)
[7/13, 17:46] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *सोमवार दि. १३ जुलै २०२०*

▪️ १६६०: पावनखिंडीतील लढाई.

▪️१९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.

▪️२०११: मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत २६जण ठार, तर १३० जण जखमी.

▪️१९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म.

▪️१८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)

▪️१६६०: पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.

▪️२०००: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९१४)

▪️२००९: हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले यांचे निधन.
[7/14, 09:22] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *मंगळवार दि. १४ जुलै २०२०*

▪️ २००३: जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.

▪️२०१३: डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली.

▪️१८५६: थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा टेंभू कराड येथे जन्म. (मृत्यू: १७ जून १८९५)

▪️१९२०: केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)

▪️२००३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९२२)

▪️२००८: सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९२०)

▪️१९६३: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १८८७)

▪️१९७५: संगीतकार मदनमोहन यांचे निधन. (जन्म: २५ जून १९२४)

▪️१९९३: करवीर संस्थानच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणीसाहेब यांचे निधन.
[7/14, 09:27] A A. Shivalkar: *जागतिक गणित दिवसाच्या*
             *हार्दिक शुभेच्छा*🌹

आयुष्याचे *गणित* चुकले
असे कधीच म्हणू नये .
आयुष्याचे गणित 
कधीच चुकत नसते,

चुकतो तो *चिन्हांचा* वापर !

*बेरीज*
*वजाबाकी*,
*गुणाकार*,
*भागाकार*
हि चिन्हें योग्य पद्धतीने वापरली 
कि उत्तर मनासारखे येते.

आयुष्यात कुणाशी *बेरीज* करायची,
कुणाला केंव्हा 
*वजा* करायचे ,
कधी कुणाशी 
*गुणाकार* करायचा
आणि 
*भागाकार* करताना
स्वतः व्यतिरिक्त किती
लोकांना सोबत घ्यायचे 
हे समजले की 
*उत्तर* मनाजोगे येते..!

आणि मुख्य म्हणजे

जवळचे नातेवाईक,मित्र
आप्तेष्ट यांना 
*हातचा* समजू नये ,
त्यांना *कंसात* घ्यावे! (👨‍👨‍👦‍👦)

कंस सोडविण्याची 
हातोटी असली कि 
*गणित*
कधीच चुकत नाही ...!! 😊

आपल्याला शाळेत 
*त्रिकोण*,
*चौकोन*,
*लघुकोन*,
*काटकोन*,
*विशालकोन*
इत्यादी सर्व शिकवतात..
पण जो आयुष्यभर उपयोगी पडतो
तो कधीच शिकवला जात नाही.

तो म्हणजे  *दृष्टीकोन*

आयुष्याचे *calculation* 
खूप वेळा केले, पण 
'सुख दुःखाचे' *accounts*
 कधी जमलेच नाही...
जेंव्हा *total* झाली तेंव्हा समजले..की  
*आठवण* सोडून काहीच *balance* उरत नाही...

 💐  जागतीक *गणित* दिवसाच्या     
                     हार्दिक शुभेच्छा.💐
🎲➕➖➗✖✔📊📈📉❌
[7/15, 13:37] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *बुधवार दि. १५ जुलै २०२०*

▪️ १९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.

▪️ १९६२: ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा पुणे येथे प्रारंभ.

▪️ १९९६: पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

▪️ १९९७: पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

▪️ २००६: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.

▪️ १६११: जयपूरचे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७)

▪️ १९२७: विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०१०)

▪️ १९४९: दलित साहित्यिक माधव कोंडविलकर यांचा जन्म.

▪️ १९३२: विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)

▪️ १९६७: गायक व नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचे निधन. (जन्म: २६ जून १८८८)

▪️ १९९९: पर्यावरणवादी लेखक जगदीश गोडबोले यांचे निधन.

▪️ १९९९: सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई टिळक यांचे निधन.

▪️ २००४: कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक डॉ. बानू कोयाजी यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)
[7/15, 13:53] A A. Shivalkar: पुढील एक-दोन महिन्यात सर्वांना हवेहवेसे वाटणारे *सण* जवळ आले आहेत सहज आठवणीत रहावे म्हणून सारांश पाठवीत आहोत.

२० जुलै,  सोमवार *दीप पूजा अमावस्या* 
नंतर *श्रावण मास* आरंभ
२१ व २८ जुलै मंगळवार मंगलागौरी पूजन. 
२५ जुलै शनिवार *नाग पंचमी*.
२७ जुलै श्रावणी सोमवार पहिला.
३ ऑगस्ट सोमवार *नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन*.
४ ऑगस्ट मंगलागौरी पूजन तिसरा मंगळवार.
१० व १७ ऑगस्ट श्रावणी सोमवार.
११ ऑगस्ट मंगलागौरी पूजन आणि *श्रीकृष्ण जयंती*.
१२ ऑगस्ट बुधवार गोपालकाला.
१८ ऑगस्ट मंगळागौरी पूजन.
२१ ऑगस्ट शुक्रवार *हरितालिका पूजन*.
२२ ऑगस्ट शनिवार *श्री गणेश चतुर्थी*.
२३ ऑगस्ट ऋषी पंचमी.
२५,२६ व २७ ऑगस्ट मंगळवार  *ज्येष्ठागौर* आवाहन , बुधवार पूजन , गुरुवार विसर्जन.
१ सप्टेंबर मंगळवार *अनंत चतुर्दशी*.
१७ सप्टेंबर, गुरुवार सर्व दर्श अमावस्या.
१८ सप्टेंबर , शुक्रवार  *अधिक अश्विन मासारंभ*.
१७ ऑक्टोबर शनिवार, *घटस्थापना*. निज आश्विन मासारंभ.                               
 🙏 *सर्व हिन्दू बांधवांना विनंती*🙏
    *दीप (दिवे धुण्याची)* अमावस्येला काही लोक गटारी अमावस्या असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करत आहे ...
    मुळात गटारी असा कोणताही सण आपल्या धर्मात नाहीये ... 
     हे नामकरण कोणी दारुडयाने केले आहे व दारुच्या  व्यापारात ज्यांचे आर्थिक  हितसंबध  गुंतले  आहेत त्यानी त्याला हवा दिली आहे ...
     👍  या सणाला *घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते.* दिवे आपल्या  जीवनातील *अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात,* त्यांच्याविषयी🙏 *कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण*🙏... 
     त्यामुळे ह्या सणाला दीप (दिवे धुण्याची) *दिप अमावस्याच* म्हणावे अगदी चेष्टेने सूद्धा गटारी म्हणू नका. *कोणताही धर्म  ह्या दिवशी दारू प्यायला सांगत नाही,* उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात ... *या दिवशी* *घरी तसेच मंदिरात दीपपूजन करावे*...
     वेळीच सावध व्हावे, *उद्या महाराष्ट्रातील नवीन पिढीला  वाटेल की धर्मच आम्हाला गटारी साजरी करायला लावतो,* सांगतो की या दिवशी भरपूर दारू प्यावी. ...
     तेव्हा *हिंदू बांधवांनी* ह्या सणाविषयी लोकांमध्ये *जागृती* करून ह्या सणाला जे विकृत वळण लागले आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती ...
    तसेच आपल्या *हिंदू धर्माचा अभिमान राखून दीप अमावास्येला गटारी ना म्हणता *दीप अमावस्या* असेच म्हणावे व आपल्या *सणांचा व संस्कृतीचा मान राखावा.*
[7/16, 12:32] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🔖  *गुरुवार दि. १६ जुलै २०२०*

▪️१९९२ : भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड

▪️१९६९ : चंद्रावर पहिला मानव उतरवणार्‍या ’अपोलो-११’ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथुन प्रक्षेपण

▪️६२२ : प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. चंद्रावर आधारित असलेल्या इस्लामिक (हिजरी) कॅलेंडरची  सुरूवात

▪️१९१३: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ – अलाहाबाद, उत्तर प्रदेश)

▪️१९४३: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी २०१०)

▪️१९६८: भारतीय हॉकी पटू धनराज पिल्ले यांचा जन्म.

▪️१९६८: विकिपीडिया चे सहसंस्थापक लैरी सेन्जर यांचा जन्म.

▪️१९७३: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू शॉन पोलॉक यांचा जन्म.

▪️१९८४: हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ यांचा जन्म.

▪️१३४२: हंगेरीचा राजा चार्ल्स (पहिला) यांचे निधन.

▪️१८८२: अब्राहम लिंकन यांची पत्नी मेरीटॉड लिंकन यांचे निधन.

▪️१९८६: इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वा. सी. बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४)

▪️१९९३: रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक उ. निसार हुसेन खाँ यांचे निधन.

▪️१९९४: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर यांचे निधन.
[7/17, 11:48] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🧷 *शुक्रवार दि. १७ जुलै २०२०*

▪️१८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.

▪️१८४१: सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित.

▪️१९७६: कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

▪️१९९३: तेलुगू भाषेतील तेलुगू थल्ली हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान.

▪️१९९४: विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.

▪️१९१९: संगीतकार स्नेहल भाटकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे २००७)

▪️१९२३: कूपर कार कंपनी चे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर २०००)

▪️१९३०: दलित साहित्यिक बाबूराव बागूल यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च २००८)

▪️१९५४: जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मेर्केल यांचा जन्म.

▪️१९९२: अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे निधन.  (जन्म: १४ एप्रिल १९१४)

▪️१९९२: बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९१६)

▪️२०१२: समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे यांचे निधन. (जन्म: २४ जून १९२८)

▪️२०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५४)हे.
[7/19, 19:27] A A. Shivalkar: 🟣 *दिनविशेष* 

🧷  *रविवार दि. १९ जुलै २०२०*  

▪️१९६९: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

▪️१९६९: नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.

▪️१९७६: नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.

▪️१९८०: मॉस्को येथे २२व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

▪️१८२७: क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८५७)

▪️१८९९: भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८९)

▪️१९०२: कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४)

▪️१९०२: भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९६८)

१९०९: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर २००४)

▪️१९३८: सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.

▪️१९६१: भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले यांचा जन्म.

▪️१३०९: संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ झाले.

▪️१९६८: बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचे निधन. (जन्म: २९ जून १९०८)