बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

सहवास गझलांचा




मी न केला अती अभ्यास गझलांचा

अंतरी ठेवला मी ध्यास गझलांचा


मी न सांभाळली वृत्ते पुस्तकी ती

फक्त ' वृत्ती ' त होता श्वास गझलांचा


हात सोडून गेली माणसे होती

लाभला हात पण हमखास गझलांचा


ओळ सुचली तशी लिहिली गझल होती

गुणगुणत राहिलो मधुमास गझलांचा


मज दिली गझल बापाने गझलच्या अन् 

आवडू लागला सहवास गझलांचा


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील. 


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  



मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

अशी शिका मराठी गझल

 





मंगळवार , 03.11.2020


तुम्हां सर्वांना सस्नेह नमस्कार व तुम्हा सर्वांचे स्वागत ! 


तुम्ही सर्व गझलबाबत जाणून घ्यायला उत्सूक आहात  आणि माझ्या बडबडीने मी तुमचा रसभंग करावा हे ठीक नाही.


 पण गझलची सर्वात महत्त्वाची पार्श्वभूमी तेवढी सांगतो.


 तुम्ही गझल समजून घेऊ इच्छिता तशीच माणसेही समजून घेतल्यास गझल लिहिणे अधिक सोपे होते. कारण गझल बरीचशी मानवी प्रवृत्तींवर लिहिली जाते.


 सर्वात माणूस महत्त्वाचा. माणूसकी महत्त्वाची. आपुलकी महत्त्वाची. मनाचा मोठेपणा महत्त्वाचा. आपुलकी व मनाचा मोठेपणा ठेवून आपण गझल लिहूया. 


थोडीशी सुरूवात :


गझलच्या अंगभूत लयीमुळे गझलची ओढ निर्माण होते. आपली प्रत्येक रचना गझलच झाली पाहिजे असे गझलची ओढ मनात असल्याने वाटणे स्वाभाविक आहे. 


मात्र , आपण मूळचे कवी असल्याने , कोणती रचना गझल होईल आणि कोणती रचना इतर काव्यप्रकारात पुढे जाईल , हे आपण बहुतेक पहिल्याच ओळीत ओळखू शकतो. 


 रचनेची पहिली ओळ काव्यप्रकाराचे स्वरूप घेऊनच येते. 


   उरलेला भाग गझलेच्या रचनेचा आहे. खरे सांगायचे तर सुरेश भटांनी हे ओळखूनच गझलेची बाराखडी दिली आहे. 


मराठी गझल निर्माण करणाऱ्या सुरेश भटांच्या गझला वाचा. आपोआप गझलेची लय व बैठक पक्की होईल.


कल्पनेची कविता करायची, गीत करायचे , गझल करायची की मुक्त छंदात लिहायचे हा एक प्रश्न असतो व तोच प्रथम सोडवायचा असतो.  हे झाले की आपण बरेचसे मोकळे होतो.


एकदा  हे झाले की पुढे कल्पनेचे काय करायचे ते आपण ठरवू शकतो. 


      गझल होऊ शकेल अशी सुरूवातीची कल्पना किंवा ओळ असेल किंवा गझलच्या ओढीमुळे गझलच व्हावी, असे वाटले तर प्रथम रचनेची माहिती करून घ्यायला हवी. सुरेश भटांची गझलची बाराखडी वाचावी. त्यांच्या गझला वाचाव्यात. इतरांच्या प्रमाणित गझलाही वाचाव्यात. हया दोन गोष्टींचे काही काळ नीट मनापासून अवलोकन केले तर रचना कळतेच कळते. त्यात फार मोठे असे काही नाही. गझल ही वृत्तातच लिहावी . मात्र वृत्तांची भीती अजिबात बाळगू नका. असलीच तर मी ती समर्थपणे काढीन . पुढे याबाबत मी सविस्तर लिहीनच.


    गझलेबाबत सर्वात महत्वाचे म्हणजे आपली काव्यप्रतिभा आटेल, रचनेत क्लिष्टता येईल , इतका आटापिटा कधीच करू नये ! यासाठीच , गझल थोडी मोकळीही सोडली पाहिजे. म्हणजेच, अक्षरगणात लिहितांना ओळीच्या दोन भागात यतीभंग होणार नाही , हेच पहावे. त्यापेक्षा अधिक तुकडे ( खंड ) पाडण्याची अजिबात आवश्यकता नाही. इथेच गुंता वाढतो ! 


जे वृत्त दोन समान लगावल्यांनी बनलेले असते , त्या दोन समान लगावल्यांच्यामध्ये अक्षरे जोडल्यास वाचतांना खटकते. यालाच यतीभंग म्हणतात. हे टाळावे. मात्र, डावीकडील वा उजवीकडील भागात आपणांस कसेही शब्द जोडण्याचे स्वातंत्र्य आहे. ( तेवढे तरी हवेच , नाही का 😃😃😃)

 गझलेच्या नियमात पहिले येते ते वृत्त. विशेषत: अक्षरगणवृत्त. खरे तर त्यामुळेच गझलांना स्वत:ची सुंदर लय येते आणि आपली प्रतिभाही उंचावते.  


 गझला मात्रा वृत्तातही लिहितात.

-----------


शब्दांचे ओघवतेपण हे गझलेचे खरे सौंदर्य आहे.


एखादी कल्पना आपल्या मनात असते. तिची ओळ बनून आपसूक ओठावर येते तरी किंवा आपण तिचे काव्यात रूपांतर करायचा प्रयत्न तरी करतो. 


  

गझलमध्ये रचना , काव्य व चपखल बसणारे अर्थपूर्ण शब्द यांचे स्थान महत्त्वाचे आहे. 


गझलची रचना म्हणजे विशिष्ट नियमांनी बनलेला तिचा फाॅर्म किंवा स्वरूप होय. 


गझल शेरांनी बनते. शेर ही दोन ओळींची एक स्वतंत्र व संपूर्ण कविताच असते. पहिल्या ओळीत कवीला जे सांगायचे आहे त्याची प्रस्तावना असते तर दुसऱ्या ओळीत त्याचा समारोप असतो. मात्र या दोन्ही ओळींचा  परस्परांशी अर्थपूर्ण संबंध असणे अपरिहार्य आहे. गझल कमीत कमी ५ शेरांची असते.

गझलमध्ये शेरातील दोन्ही ओळींचा परस्परांशी संबंध असणे आवश्यक आहेच व तो संबंध वाचकांना किंवा श्रोत्यांना सहज कळेल असा असणेही आवश्यक आहे. थोडक्यात, तो संबंध ओढून ताणून आलेला नसावा , खूप दुरून आलेला नसावा. हा संबंध थेट असला तरी गझलकाराने मात्र तो सूचक शब्दांतून, प्रतिकांचा वापर करून व पुन्हा काव्यमयता जिवंत ठेऊन व्यक्त करावा , असे अभिप्रेत आहे. थोडक्यात, स्वतःच्या शेरांना स्वतःच एक उंची  प्राप्त करून देणे होय. या कसोट्यांवर आपण त्रयस्थपणे आपली गझल तपासून पहावी. बरेचदा आपले आपल्यालाच छान पर्यायी सुचून जाते . 


गझल यमक  ( काफिया ) व अंत्ययमक ( रदीफ ) असलेली  किंवा नुसत्याच यमकांची असते. 


अलामत हा यमकाचा भाग आहे. सर्व यमकात शेवटचे अक्षर समान असते. अलामत किंवा स्वरचिन्ह नेमके त्याच्याआधीच्या अक्षरात येते. 


.........

कोरा.काॅमवर मराठी गझलचा मंच 



........

अजून खूप आहे. पण आपल्याला कंटाळा न येता, अलगद आणि मजेत गझल पहायची आहे. टप्प्याने पण आत्मविश्वासाने पाहू.  दरम्यान शंका अवश्य विचारा.

.............. 

प्रथम जमेल तसे लिहाच. लिहिलेले गुणगुणून बघा. गाता आल्यास उत्तमच ! नियम आपोआप सवयीचे होतील. 

पाहिजे तर लिहिलेले मला स्वतंत्रपणे पाठवा.

गझलेच्या नियमात पहिले येते ते वृत्त. विशेषत: अक्षरगणवृत्त. खरे तर त्यामुळेच गझलांना स्वत:ची सुंदर लय येते आणि आपली प्रतिभाही उंचावते.  


 गझला मात्रा वृत्तातही लिहितात.


 वृत्तांचीच भीती अनेकांना जास्त वाटते. पण सरावाने सगळे जमते. तेव्हा तुम्ही चिंता करु नका. मी सतत सोबत आहेच.

 *गझलांमधे वापरली जाणारी काही वृत्ते*

१) वृत्त : आनंदकंद

लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा


२) वृत्त : चामर

लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा


३) वृत्त : वियदगंगा

लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा


४) वृत्त : हिरण्यकेशी

लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा


५) वृत्त : मनोरमा

लगावली : गालगागा गालगागा


६) वृत्त : कालगंगा

लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा


७) वृत्त : विद्युल्लता

लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा


८) वृत्त : कलिंदनंदिनी

लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा


९) वृत्त : मंजुघोषा

लगावली : गालगागा गालगागा गालगागा


१०) वृत्त : मंदाकिनी

लगावलीही : गागालगा गागालगा गागालगा गागालगा


११) वृत्त : लज्जिता

लगावली : गालगा गालगा लगागागा


१२) वृत्त : मृगाक्षी

लगावली : लगागागा लगागागा लगागा


१३) वृत्त : सती जलौघवेगा

लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा


१४) वृत्त : पादाकुलक

लगावली : गागागागा गागागागा


१५) वृत्त : श्येनिका

लगावली : गालगाल गालगाल गालगा


१६) वृत्त : मनोरमा

लगावली : गालगागा गालगागा


१७) वृत्त : भुजंगप्रयात

लगावली : लगागा लगागा लगागा लगागा


१८) वृत्त : सुमंदारमाला

लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा


१९) वृत्त : तोटक

लगावली : ललगा ललगा ललगा ललगा


२०) वृत्त : रंगराग

लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा


२१) वृत्त : वनहरिणी 

मात्रावृत्त : अष्ट मात्रिक ४ आवर्तने 


२२) वृत्त : राधा

लगावली : गालगागा गालगागा गालगागा गा


२३) वृत्त : मेनका

लगावली : गालगागा गालगागा गालगा


 २४) वृत्त : व्योमगंगा

लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा


२५) वृत्त : रसना ( विनोद  द्विरावृत्ता )

लगावली : गा गालगाल गा+ ,गा गालगाल गा+

( + म्हणजे निश्चित गुरू )

 

२६) मात्रावृत्त : विधाता 

लक्षणे : एकूण मात्रा २८ ( १४+१४ )


२७) वृत्त : देवराज

लगावली : गालगाल गालगाल गलगाल गालगा


२८) वृत्त : वरमंगला

लगावली : गालगा गालगा गालगा गालगा


२९) मात्रावृत्त : भूपति

लक्षणे : [ - l प l प l - + ] २२ मात्रा.

 प म्हणजे ८ मात्रा . + म्हणजे निश्चित गुरू . 


३०) वृत्त : पद्मावर्त

लक्षणे : गागागागा गागागागा गागा


३१) वृत्त : प्रेय

लगावली : गाललगा गालगा गाललगा गालगा


३२) मात्रावृत्त : मध्यरजनी

लक्षणे : गालगागा गालगागा गालगागा गालगा+ .

( + म्हणजे निश्चित गुरू )


३३) मात्रावृत्त : अनलज्वाला

लक्षणे : एकूण मात्रा २४ ( प + प  + प )  प म्हणजे ८ मात्रा.


३४) वृत्त : मानसभंजनी

लगावली : गाललगा लगालगा गाललगा लगालगा


३५) वृत्त : मातंगी

लक्षणे : गागागा ! गागागा

 

३६) वृत्त : भामिनी

लगावली : गालगा गालगा गलगा गा

 

३७) वृत्त : सुकामिनी द्विरावृत्ता

लगावली : गालगाल गालगा गालगाल गालगा


३८) वृत्त : वियतगंगा

दगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा


३९) वृत्त : रम्याकृति

लगावली : गागाल लगागाल लगागा

 

४०) वृत्त : जलोद्धतगती

गण : लगालललगा  लगालललगा


४१) वृत्त : मानसहंस

गण : ललगालगा ललगालगा ललगालगा

 

४२) वृत्त : प्रभाव

गण : लगालगा लगालगा लगालगा लगा 

 

४३) मात्रावृत्त : शुभगंगा

मात्रा २२ ( ८ + ८ + ६ )


४४) वृत्त : श्येनिका

गण : गालगाल गालगाल गालगा


४५) वृत्त : मयूरसारिणी

गण : गालगा लगालगा लगागा


४६) वृत्त : पाणिबंध

गण : गालगाल गाललगा गालगाल गाललगा

.................


 वृत्तांचीच भीती अनेकांना जास्त वाटते. पण सरावाने सगळे जमते. तेव्हा तुम्ही चिंता करु नका. मी सतत सोबत आहेच.

 अगदी सुरुवातीला कठीण वृत्तात लिहू नका. कठीण व अपरिचित शब्दही टाळा.सुरूवातीला आनंदकंद किंवा भुजंगप्रयात ह्या वा अशा सोप्या वृत्तात लिहा व मला पाठवा.

-----------------


अक्षरगणवृत्तात समजा गा गा ल गा .... हा अक्षरक्रम आहे. गा म्हणजे गुरु किंवा दीर्घ आणि  ल  म्हणजे लघु किंवा -हस्व . 


 हा  मात्रा क्रम नाही. इथे मात्रा मोजायच्याच नाहीत. 


पहिल्या ओळीतील गा गा ल गा...हा अक्षरक्रम शेवटच्या शेरापर्यंत सांभाळायचाय.‌ 


अक्षरगण वृतत व मात्रा वृत्त हे दोन्ही स्वतंत्र प्रकार आहेत. त्यांची कधीच गल्लत करायची नाही.

इथे मात्रा म्हणजे गुरूला २ व लघुला १ अशा प्रकारे काही मोजायचे वगैरे नाही. 


दोन्ही मिक्स करायचे नाहीत.

मनात अनेक सुटे शेर जन्मतात. पण अनेकदा संपूर्ण गझल होतेच असे नाही. त्यावेळी ते शेर तसेच राहू द्या. अट्टाहासाने, घाईघाईने, गझल पूर्ण करायला जाऊ नका. गझल कळी आहे, ती आपसूक उमलू द्या.


........................

अलामत हा यमकाचा भाग आहे. सर्व यमकात शेवटचे अक्षर समान असते. अलामत किंवा स्वरचिन्ह नेमके त्याच्याआधीच्या अक्षरात येते .


एका गझलची यमके पाहू. 


 लागायचा

    जायचा

 भेटायचा

गंधाळायचा

      यायचा

     गायचा

  वागायचा


      यांमध्ये ' यचा ' ही  यमकांतली न बदलणारी अक्षरे आहेत. 


      मात्र त्यांच्या लगत डावीकडील अक्षरे बदलती आहेत. काय बदल आहे त्यात ? तर केवळ ही अक्षरे जरूर बदलली आहेत, पण त्या अक्षरांच्या उच्चारातला स्वर बदलला आहे का ; तर नाही. या सर्व अक्षरांत ' आ ' हा स्वर कायम आहे. ती स्वरचिन्ह म्हणजेच अलामत आहे.

अती अभ्यास नको. मोजक्याच गोष्टी सांभाळा. 

वृत्तांची भीती अजिबात बाळगू नका. सवय होईपर्यंत पुस्तकातल्या वृत्त्तात लिहिण्याचा सराव करा.

सुरेश भटांची गझलची बाराखडी . सुरेश भटांनी स्पष्ट नियम दिले आहेत. गझल वृत्तात लिहायची आहे हेही स्पष्ट केलेले आहे. मात्र अनवट, क्लिष्ट व तुमच्या प्रतिभेला मारक ठरतील अशी वृत्ते वापरू नयेत. साधी सरळ व ओघवती वृत्ते वापरावीत. लगावलीत  यतीभंग होणार नाही , म्हणजेच डावीकडे व उजवीकडे समान क्रम असल्यास ते दोन भाग जोडले जाणार नाहीत, एवढेच पहावे. वृत्त हे लयीसाठी आहे. लय भिनली की वृत्ती बनते किंवा वृत्ती ही मूळातच असते. गझलची वृत्ती असणे सर्वात महत्त्वाचे.

..................एक सांगतो नियमांची काळजी करू नका. सरावाने सर्व सोपे होते. तुम्ही निश्र्चितच चांगले लिहाल.


 फक्त शेराच्या दोन ओळीतला  तुम्हांला अभिप्रेत असलेला परस्पर संबंध,  ज्याला गझल माहीत नाही त्यालाही शक्यतो सहजपणे कळेल , असे पहा. काही वेळा लिहिण्याच्या ओघात आपण लिहून जातो व आपल्या दृष्टीने ते बरोबरही वाटते, पण आपली लिहिण्यामागची भूमिका वाचकाला माहीत नसल्याने वाचकाला तो शेर समजून घ्यावा लागतो. अशा वेळी आपण आणि वाचक यात अंतर पडते.

.................

गालगागा   गालगागा  , गालगागा    गालगागा


स्वल्पविराम पाहिलात ? त्याच्या डावीकडील शेवटचे व उजवीकडील पहिले अक्षर जोडून  शब्द करू नयेत. त्यालाच यतीभंग  म्हणतात.

.....................


सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

Marathi Gazal

 

सहवास गझलांचा 


मी न केला अती अभ्यास गझलांचा

अंतरी ठेवला मी ध्यास गझलांचा


मी न सांभाळली वृत्ते पुस्तकी ती

फक्त ' वृत्ती ' त होता श्वास गझलांचा


हात सोडून गेली माणसे होती

लाभला हात पण हमखास गझलांचा


ओळ सुचली तशी लिहिली गझल होती

गुणगुणत राहिलो मधुमास गझलांचा


मज दिली गझल बापाने गझलच्या अन् 

आवडू लागला सहवास गझलांचा


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील. 


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  


मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

Useful messages

  आपल्याला कोविड-19 बरोबरच राहायचं आहे, चला घाबरू नका किंवा नाकारू नका: 




डॉ. फहीम यांगनस, 

संसर्गजन्य रोग क्लिनिकचे प्रमुख, मेरीलँड विद्यापीठ,

यूएसए (अमेरिका):


  1. आपल्याला कोविड-19 (COVID-19) बरोबर कदाचित काही महिने किंवा वर्षे जगावे लागेल. घाबरू नका किंवा नाकारू नका, आपले जीवन निरुपयोगी करू नका. चला या वास्तवासह जगायला शिकू या!


  2. अधिकाधिक लिटर गरम पाणी पिऊन, पेशीमध्ये  घुसलेल्या/शिरकाव केलेल्या कोविड-19 (COVID-19) विषाणूचा नाश तुम्ही करू शकत नाही - तुम्हाला फक्त अधिक वेळा बाथरूम/वॉशरूमला जावे लागेल.


  3. आपले हात नियमित धुणे आणि दोन मीटरचे शारीरिक अंतर राखणे ही आपल्या संरक्षणाचा उत्तम मार्ग आहे.


 4. आपल्या घरात कोविड-19 (COVID-19) रुग्ण नसल्यास, आपले घर निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता नाही.


  5. किराणा साहित्य/सामान, पिशव्या/प्लास्टिक, गॅस सिलेंडर, शॉपिंग कार्ड्स आणि एटीएममुळे हा संसर्ग पसरत नाही.

 आपले हात वारंवार धुवा, नेहमीप्रमाणे आपले आयुष्य जगा.


  6. कोविड-19 (COVID-19) हा अन्नातून संसर्ग होत नाही. हा फ्लू सदृश्य संक्रमण लहानशा थेंबांशी/थुंकीशी संबंधित आहे. बाहेरील अन्न/खाद्यपदार्थ  मागवून मागणी कोविड-19 (COVID-19) संक्रमित झाल्याचा कोणताही धोका आढळून आलेला नाही.


7. अँलर्जी प्रतिरोध आणि हवेतील संसर्ग/प्रादुर्भाव (व्हायरल इन्फेक्शनमुळे) यामुळे ‘नाक’ या ज्ञानेद्रियाचा (वास, गंध इ.) याची उपजत क्षमता कमकुवत होऊ शकते. ही केवळ कोविड-19 (COVID-19) ची अनियमित/असाधारण लक्षणे आहेत. 


  8. एकदा आपण घरी आल्यावर आपल्याला त्वरित कपडे बदलण्याची आणि अंघोळ करण्याची आवश्यकता नाही.

 ‘स्वच्छता हा एक सद्गुण आहे, परंतु भोळेपणा नाही’.


  9. कोविड-19 (COVID-19) व्हायरस हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रादुर्भाव/संक्रमण होत नाही किंवा उडू शकत नाही. हे श्वसनमार्गातून होणारा संक्रमण/संसर्ग आहे ज्यात नजीकचा संपर्क आवश्यक आहे.


  १०. हवा स्वच्छ आहे, आपण उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी फिरायला जाण्यास काहीही हरकत नाही. (फक्त आपले शारीरिक संरक्षणाचे अंतर ठेवा)


  ११. कोविड-19 (COVID-19) विरुद्धच्या लढयात फक्त नियमित साबण वापरा, जीवाणू प्रतिरोधक (अँटी-बॅक्टेरियल) साबणाची गरज नाही. हे विषाणू (व्हायरस) आहेत, जीवाणू (बॅक्टेरिया) नाहीत.


  12. आपण दिलेल्या अन्न/खाद्यपदार्थाच्या ऑर्डरबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु, आपल्याला गरज वाटल्यास मायक्रोओव्हनमध्ये सर्व अन्न/खाद्यपदार्थ गरम करू घेऊ शकता.


  13. आपल्या बूट/शूजमध्ये कोविड-19 चा संसर्ग/ प्रादुर्भाव घरी होण्याची शक्यता म्हणजे दिवसातून दोनदा विजेचे दिवे लावण्यासारखे आहे. मी 20 वर्षांपासून व्हायरस विरूद्ध कार्यरत आहे - ड्रॉप इन्फेक्शन (लहानश्या थेंबांशी/थुंकीशी संबंधित संसर्ग) असे पसरत नाही. 


  14. व्हिनेगर, उसाचा रस आणि आले खाऊन तुम्हाला व्हायरसपासून वाचविता येणार नाही. हे फक्त रोग प्रतिकारशक्तीसाठी आहे, औषध नाही.


  15. बराच काळ मुखपट्टी (मास्क) परिधान केल्याने आपल्या श्वासोच्छवासामध्ये आणि ऑक्सिजनच्या पातळीत व्यत्यय/अडथळा येतो. केवळ गर्दीत परिधान करणे आवश्यक आहे.


  16. हातमोजे घालणे देखील एक चांगली कल्पना नाही; व्हायरस ग्लोव्हजमध्ये जमा होऊ शकतो आणि आपण आपल्या तोंडाला स्पर्श केल्यास ते सहजतेने संक्रमित होऊ शकतो. फक्त नियमितपणे आपले हात धुणे आवश्यक आहे.


  17. नेहमीच निर्जंतुकीकरण वातावरणात राहिल्याने प्रतिकारशक्ती खालावते, कमकुवत होते. जरी आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी पूरक आहार / औषधे घेत असलो तरी, त्यामुळे कृपया पार्क, समुद्रकाठ किंवा तत्सम सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे फिरायला जाणे आवश्यक आहे. घरी बसून तळलेले, मसालेदार, गोड पदार्थ आणि शीतपेये (फिझी ड्रिंक्स) सेवन करून, खावून/पिऊन नव्हे! तात्पर्य, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी रोगजन्य परिस्थितीत देखील घराबाहेर पडणे उचित  ठरते.

मूळ लेख: https://theazb.com/we-will-live-with-covid19-for-months-lets-not-deny-it-or-panic- 

डॉ. फहीम यांगनस,

संसर्गजन्य रोग क्लिनिकचे प्रमुख, मेरीलँड विद्यापीठ,

यूएसए (अमेरिका)


खूप चांगला लेख ..... सर्वांनी अवश्य वाचलाच पाहिजे असा.....

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

Happpy Navratrotsav

 

Happpy Navratrostav  !




सर्वात प्रथम तुम्हांला आजपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो ! गेल्या भागात तुम्ही वाचलंत की ... अशी समजूत करीत मी पुन्हा सतिशबरोबर चर्चा सुरू केली. त्याच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. काही त्याला समजावून सांगितल्या.... अशी समजुतीची समजूत करीत पुढील भागात प्रवेश करू... चला तर ' मागे पुढे ' मध्ये पुढे काय घडतेय ते पाहू....


        माझ्या आयुष्यातील हा आतापर्यंतचा सर्वात खडतर कालखंड.... मुलाचे वर्क फ्राँम होम सुरू होऊन महिना होत आला. सुरूवातीला तो पुण्याहून यायलाच तयार नव्हता,  अखेर आम्ही तिकडे यायला निघतोय असं सांगितल्यावर पाठवलेल्या कारने तो घरी आला , हे तुम्हांला आठवत असेलच. आला तेव्हा स्वारी घुश्श्यातच होती. आमच्याकडे बघायलाही तयार नव्हती. विशेषत: त्याच्या आईवर त्याचा जास्त राग दिसत होता. शेजारच्या चुलत भावाच्या घरात तो 14 दिवस होम क्वारंटाईन होता. ते दिवसही खडतर गेले. सुरूवातीला इकडे नेटवर्क मिळणारच नाही , मला उगाच बोलावलंत , असा त्याने लावलेला सूरही हळूहळू निवळू लागला. घडी जरा कुठे बसतेय असे वाटते तोच कालचक्र फिरले. 1995-96 पासून डिसेंबर ते जुलै महिन्यात दुर्दैवाचे फटके बसायचे. नंतर काही वर्षांनी हेच कालचक्र बदलून 01 सप्टेंबर ते फेब्रुवारी मध्यापर्यंत वाईट कालखंड यायचा. यंदा फेब्रुवारी बरा गेला , पण 06 मार्च पासून पुन्हा आमचे दिवस फिरले. याच दिवशी आम्ही मुुलाला पुण्यात एकटे सोडून आमच्या गावी आलो . गुढी पाडवा झाला की दोनच दिवसांनी पुन्हा मुलाकडे जाऊ असा विचार आम्ही केला होता, पण कोरोना लाटेने आम्हांला गावातच बंदिस्त केले. मुलगा घरी आला हा आनंद बराचसा क्षणिकच ठरला. मायलेकांचे बोलीभाषण जसे वाढले तसे त्यांच्यात उडणारे खटकेही वाढू लागले. कोणीच कोणाला समजून घेईनासे झाले. कोण कोणाला हुकसवतोय आणि कोण कोणाची पाठ घेतोय हे सांगणे कठीण होऊ लागले. आयुष्यभर ज्या कुटुंबासाठी मी जीव टाकला , नोकरीतही खुळयासारखा वरिष्ठांशी भांडलो, तेच कुटुंब फुटणार हे आता उघड होऊ लागले. माझे ऐकण्याच्या मन:स्थितीत कोणीच नव्हते. तरी अजून कश्यातच काही नव्हते , मुलाचे लग्नं झाले नाही तर ही परिस्थिती होती. पुढे काय होणार ? कुटुंबाच्या काळजीने मी हैराण होत होतो.  खरे तर , मला कोणी खिजगणतीतच धरत नव्हते. ज्यांच्यासाठी प्रत्येक क्षण जगलो त्यांना एकमेकांशी भांडतांना मी दिसतच नव्हतो ! इतकी वर्ष किमान ज्याचे अस्तित्व ज्यांच्या सतत अवतीभवती होते , ते अस्तित्वच विसरून , माझ्याकडे ढुंकूनही न बघता , दोघेही आपलेच मुद्दे रेटू लागले. मी प्रचंड व्यथित झालो. कधी नव्हे ती हरल्याची भावना मनात येऊ लागली ! अनेक वादळे एकटयाने झेलली, पण हे वादळ मला आडवे करून गेले. परिणामत: सकाळी पाणी भरतांना पावसात भिजल्याचे निमित्त होऊन मी आजारी पडलो. दोन दिवस सर्दी , ताप यांनी त्रास दिला. कोरोनाच्या कालावधीत डाँक्टरकडे जायचीच चोरी होती. पण न जाऊनही चालणारे नव्हते. अखेर 19 सप्टेंबरला दोन इंजेक्शन्स घेतली. दोन तीन दिवस गोळया घेतल्या. आँक्सीजन लेव्हल रोज चेक करून घेतली. साठ वर्षात अनेक आजारपणं पाहिली पण कधी कोणत्याही डाँक्टरने आँक्सीजन लेव्हल हया प्रकाराचा उपयोग वा प्रयोग केला नव्हता ! माझी लेव्हल उत्तम होती म्हणून बरे,  नाही तर मला तो आजार नसतांनाही कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले असते. कोरोनाची हकीगत ही अशी आहे ! ही हकीगत मरो , पुढे काय हाल झाले ते पहा. मी ब-यापैकी बरा झालो नाही तोच पत्नी आजारी पडली. तिला सुरूवातीला कोहाळयाचा रस नडला. 23 सप्टेंबरला तिला डाँक्टरकडे नेले. डाँक्टरने मला दिलेल्याच गोळया तिलाही दिल्या. त्यातली एक गोळी घेतली की तिची फक्त कपाळपट्टी तापायची . कानशिलापासून पायापर्यंतचं अंग गार असायचं. पहिल्या रात्री तर मी व मुलगा मिठाच्या पाण्याच्या घडया तिच्या कपाळावर ठेवीत राहिलो. तेवढेच नव्हते , तर त्याचवेळी तिला प्रचंड अंगदुखी व्हायची. त्यामुळे तिला काय होतंय हेच तिला समजेनासं झालं. ती ग्लानीत विचित्र बडबडू लागली.  असे दोन दिवस , दोेन रात्री गेल्या. त्या गोळीमुळेच तिला हायपर अँसिडीटी होत होती , त्या गोळीचे साईड इफेक्टस होत होते , हे नेटवर सर्च करायला तिनेच सांगितलं तेव्हा लक्षात आलं. लगेच ती गोळी बंद केली. लगेच पन्नास टक्के उतार पडला. पण त्यातच तिला खूपच अशक्तपणा आला. हे आजारपण पंधरा दिवस चालले. पाच-सहा तारखेला तिला प्रथमच थोडा आराम पडला. तरी एक दोनदा त्रास झाला. पण आता त्रास कमी कमी होतोय. मुलगाही आता ब-यापैकी बरा बोलतोय. खडतर काळ थोडा सुसहय होतोय. 


           बीना हल्ली पुन्हा विचित्र वागू लागली आहे. तिच्या आईचा तर तिने छळ मांडलाय. घराच्या मालकिणीलाच घर सोडून कुठेतरी दूर निघून जावे असे वाटते आहे, यावरून लक्षात येईलच. बीनाला लग्न हवे आहे. पण लग्नानंतर ती सासरी पण राडे करू लागेल , ही सार्थ भीती पाहता तिची आईसुध्दा पुढे पाऊल टाकायला कचरणे स्वाभाविक आहे. तेवढयात परवा म्हणजे 07.10.2020 रोजी तिचे काका वारले. वायंगणकर काका. खूप चांगला माणूस. अनेकांना उमेद दिलेले काका स्वत:च्या जीवनाच्या एका टप्प्यावर मात्र खचून गेले. अखेर ते गेलेच. अर्थात, बीनाला आईच्या दु:खाचे काहीच वाटत नसल्याचे व ती स्वत:च्याच कोषात असल्याचे सतत निष्पन्न होते आहे. ती सरडयासारखे रंग बदलते आहे. मूड बदलते आहे. तिचे वागणे अनाकलनीय होत चालले आहे.  आहे. व्यक्ती अशा का होतात ? अशा विचित्र का वागतात ? व्यक्तीनिहाय किंवा कुटुंबनिहाय असा कालखंड किती वर्षे राहतो ? शनीची साडेसातीवगैरे हल्ली कोण फारसे बोलत नाही. कारण , दुर्दैवाचा कालखंड साडेसात वर्षांपेक्षाही कितीतरी अधिक होत चाललाय. मग आता याला काय म्हणायचे, हा प्रश्न मला पडू लागला आहे. काळाच्या मनात आहे तरी काय ? माझ्या आजीपासून पाहतोय. न संपणारी दु:खाची वर्षे म्हणजे माझ्या आजीचे आयुष्य.  मी यू टयूबवरील माझ्या Devidas Patil या चँनेलवर " आयुष्याकडे बघतांना  " या प्लेलिस्टमध्ये " आज्जीची गोष्ट " सांगितली आहेच. आपण ती आवर्जून ऐका. अर्थात त्या दहा मिनिटात आजीचे आयुष्य मांडता येणे शक्यच नव्हते. तरी पण तिच्या जीवनावर मी नेमके भाष्य मात्र तिथे केले आहे. आजीची गोष्ट तशी. वडिलांचीही गोष्ट फार वेगळी नाहीच. त्यांचेही आयुष्य खडतरच गेले. अखेरच्या काही दिवसांत तर ते बोलूही शकले नाहीत. " आयुष्याकडे बघतांना " या प्लेलिस्ट मध्ये शेवटी शेवटी मी माझ्या जन्मरहस्याबद्दल भाष्य करणार आहे. मधल्या भागांमध्ये मी सूचक शब्द वा प्रसंग ( क्लूज ) पेरणार आहे. माझेही जीवन फारसे सुखावह नव्हते. पण माझ्या आताच्या जीवनात तरी मी काहीसा सुस्थितीत आहे असे म्हणता येईल. निदान नोकरीतल्या कटकटी नाहीत आणि पैसे कमवण्यासाठी वयाच्या साठीत कुठे जावे लागण्याचे कारण नाही . पण एक पाहतो आहे की अनेकांच्या जीवनात प्रत्येक वर्षातला काही काळ सलग सुखाचा तर काही काळ सलग दु:खाचा तसेच काही काळ सलग सुखदु:खाच्या मिश्रणाचा येतो. माझ्या जीवनात हे मी अनेकदा अनुभवले आहे. हे विचित्र काळचक्र का फिरत असते ? त्या त्या काळात काही विशिष्ट घटना घडतात , काही सूचक स्वप्नेंही पडतात. असे का होते ? यामागे कोण आहे ? गेली काही वर्षे मी याच्याच मागे आहे. मध्यंतरीचे पुराणातले ग्रंथवाचून उत्तरे शोधण्याचा तो विचारही आता मागे पडला आहे. भाऊ ग्रंथालय करणार होता तेही लांबले आहे. आता घटनांचे विश्लेषण करण्याशी काळाचे वागणे जोडून काही हाती लागते का ते पहावयाचा विचार आहे. बाकी आता आँनलाईन लेखनाचा कंटाळा येऊ लागला आहे.  LinkedIn, Rediffmail, Facebook,  Twitter,  YouTube, Instagram , Quora यात आता फारसे मन गुंतत नाही. माझ्या मनाचा हा मुख्य प्रश्न आहे. मला सतत काही काळानंतर त्याच त्या गोष्टी करण्यात स्वारस्य वाटेनासे होते. त्यामुळे Blogging चाही मला आता कंटाळा येऊ लागला आहे. मी हल्ली कविताही करीत नाही . पत्नीला गंभीर आजारपणातून बाहेर काढण्यासाठी व पत्नीला आणि मलाही विषयांतर हवे झाले म्हणून सहा वर्षे रखडलेले घराचे करायचे राहिलेले कामही हाती घेतले. तेही आता संपत आले आहे. पण अजून एक मुख्य प्रश्न सुटला नाहीय. तो सुटल्याशिवाय पत्नी , मी व मुलगा यांच्या जिवाला निश्चिंतता लाभणार नाही. बघू कसे होते ते पुढे. 




(क्रमश:)

                          ....................

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

समजूत आपली

 

मागे - पुढे




गेल्या भागात तुम्ही वाचलंत की ... असं सांगण्यापेक्षा सरळ 14.09.2020 रोजी सकाळी पडलेले स्वप्नंच सांगतो. ते असं होतं. पुढच्या बाजुला माझ्या घरासमोरील प-यात ईशान्य दिशेला काही लोक बांधकाम करायला उतरलेयत. काही जण वरच्या बाजुच्या शिरधनकरांच्या बागेत उभे आहेत. प-यातला एकजण मला त्याच्यापुढयात बोट दाखवून विचारतो की तिथे चि-याची एक लाईन वरपर्यंत उठवूया काय ? का कोण जाणे, पण मला ती जिवंत माणसे वाटत नाहीत. ती भूते असावीत असं त्यांच्या देहबोलीवरून वाटतं. तरीही मी त्यांना सांगतो , लगतचा हिस्सेदार बोंब मारील त्यामुळे तिथे काय करता येणार नाही. एवढयात बागेतला एकजण माझ्या अंगणात येऊन विचारतो की मग इथून लाईन टाकूया का ? मी सांगतो , हे आमचं आहे , इथे तर काहीच करता येणार नाही . स्वप्नं इथेच संपलं. आता हे तर स्वप्नंच होतं. पण ते विचित्रच होतं. सकाळपासूनच माझ्या मनात काय होईल काय नाही याचेच विचार येत होते.... आणि शेवटी ... शेवटी कसलं सकाळी दहा वाजताच पेटलं की राव ! अगदी जोरदार ! वणवा लागला ! आग भडकली ! कुठे म्हणता ? अहो, शेजारीच . उर्मीच्या नव्याने बांधल्या जात असलेल्या घरात ! आगीचा बंब नका आणू मध्ये. ती आग वेगळी . ती काडीने लावावी लागते. ही काडी लावल्याने लागलेली आग नाही. फार तर ती काडी केल्याने लागलेली आग म्हणता येईल. कोणी केली माहीत नाही , पण उर्मी आणि तिच्या जाऊबाईत कोणी तरी काडी केली. आग लावली. जोरदार भांडण पेटलं. आख्खा दिवस त्यातच गेला. अर्थात, बाहेरचा कोणीच मध्ये पडला नाही. कारण एक तर घर बांधण्यापूर्वी पुढे काय वाद होतील हे जाणून आपसात पुरेशी बोलणी केलेली नसावीत आणि त्यासाठी बाहेरच्या कोणाला चर्चेत सहभागीही करून घेण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे कसलीच माहिती बाहेरच्या कोणाला नव्हती. मग कसे कोण मध्ये पडणार ? तरीही आम्ही जाणार होतो पण सायंकाळी चार वाजता एकदाचं ते भांडण मिटलं. आम्ही निश्वास सोडला. शेवटी हे सगळे आपलेच ! 


      त्यानंतर तिस-याच दिवशी म्हणजे दि. 17 रोजी आम्हां दोघांना दोन स्वप्नं पडली. तिच्या स्वप्नात माझी आई आणि माझ्या स्वप्नात माझे वडील आले ! माझी आई कोणती तरी दोन ठिकाणं बघण्यासाठी कार आणायला सांगत होती तर माझे वडील घाबरलेले दिसत होते. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्यांनी मला खुणा करीत पुढच्या बाजुला रस्त्याच्या दिशेने बोट दाखवलं. मी तिकडे बघितलं तर अगदी बंदूसारखाच दिसणारा , त्याच्यासारखीच सफेद पँट व फिकट गुलाबी रंगाचा हाफ शर्ट घातलेला व पांढरी टोपी घातलेला माणूस देवळाच्या कोप-यावर मोटरसायकल चालवत येतांना दिसला ! स्वप्नं तिथेच संपलं. आज सर्वपित्री अमावास्या ! आजच माझे आई बाबा आमच्या दोघांच्या स्वप्नात का बरे आले असतील ?.....


गेले दोन तीन दिवस रात्री धुव्वाधार पाऊस पडतोय. विशेषत: पहाटे ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत प्रचंड पाऊस पडतोय. त्यानंतर नेमके पंधरा मिनिटांनी नळाला पाणी येतं. मागे जाऊन ते भरावं लागतं.  तेव्हा एक तर पायातून पाणी शोषले जाते आणि त्याचवेळी हवेतला पावसाळी गारवा बाधीत करीत असतो. त्यातच आसपास कोरोनाचा विळखा वाढतोय. कोरोनापेक्षा कोरोनाची पसरलेली भीतीच जास्त भयानक आहे. तसं 18 तारीखच्या संध्याकाळपर्यंत सगळंं ठीक होतं. पण रात्री दहा वाजता अंगणात फिरून पाय मोकळे करावेत , असा विचार अचानकच मनात आला. पाऊसही नव्हता. अंगण सुके दिसत होते. पाच दहा मिनिटे फिरलो असेन , अचानक कमरेत लटका पडतोय की काय असे दोनदा वाटले ! म्हटले बघुया परत काय तसे जाणवते काय , म्हणून पुन्हा फिरू लागलो. पण तसे काही जाणवले नाही. अर्धा तास फिरलो आणि मग मात्र पाठीचा कणा दुखू लागला. तसा मी घरात आलो. रात्री हिने कण्याला बाम लावला. थोडं बरं वाटलं. पण सकाळी पाठ आणि डोकंही दुखू लागलं. 19 तारीख उजाडली आणि त्रास वाढलाच. घसा खवखऊ लागला. डोळयातून गरम पाणी आले. त्यातच मेहुण्याच्या कामासाठी मायलेक स्टेट बँकेत गेलेली. शेजारच्या निलेशला माझ्या सोबतीला ठेवून गेलेले. मी त्याच्याशी तीन तास गप्पा मारीत बसलो. तो बिचारा बसून राहिला. जेवायलाही घरी जाईना. तेवढयात संत्या झोपून राहिलाय असा फोन त्याच्या घरातून आला. तो बघून आला तर संत्यालाही माझ्यासारखाच त्रास होत होता. मग निलेश म्हणाला मी डाॅक्टरकडे जातोय. काकाचा नंबर लावतो. तुमचा पण लाऊ का ? मी म्हटलं संत्याबरोबरच आमचा दोघांचाही लाव. तो बिचारा नंबर लावायला गावातल्या डाॅक्टरकडे गेला. तेवढयात ही लोकं आलीत. ही आली ती थेट घरात गेली. मी तिला डाॅक्टरकडे जायचंय म्हणून सांगितलं , तशी ती जेवणाची घाई करू लागली. तेवढयात तिला पिवळया पिशवीची आठवण झाली तशी ती एकदम टेंशनवर आली. सैरावरा होऊन पिशवी शोधू लागली. पिशवीत चार बँक पासबूक्स , हिचा फोन व मुलाचे पाकीटही होते. मी हिच्या नंबरवर फोन लावला. पण तो कोरोनाची कँसेट लागून बंद व्हायला लागला. इकडे निल्याचा डाॅक्टरकडून फोन आला की दहावा नंबर आत गेेलाय. तुम्ही या.  ही रडकुंडीस आलेली. मुलगा गाडी काढीत असलेला आणि मी दोघांच्यामध्ये साकटलेला ! ती पिशवी बाजारातच विसरली हे नक्की झाले तसा मी हिला धीर दिला आणि मुलगा आम्हांला डाॅक्टरकडे सोडून पिशवी शोधायला पुढे जाईल असे सांगितले. मुलाने तसे केले. मला डाॅक्टरनी तपासले , दोन इंजेक्शन्स दिली , गोळ्या लिहून दिल्या. ऑक्सीजन लेव्हल चेक केली व आणखी तीन दिवस ती लेव्हल चेक करायला या म्हणून सांगितले. सगळे टेंशनच आहे , पण टेंशन घेऊन उपयोगाचेही नाही. मी बाहेर येऊन बसलो. तेवढयात मुलगा आला . तो म्हणाला पिशवी सापडली नाही. मी म्हटले मग पोलीसांत तक्रार करावी लागेल. तो म्हणाला ती पण करून आलोय. तेवढयात ही बाहेर आली. हिलाही मुलाने तसेच सांगितले. आम्ही तिघंही घरी आलो तसा मुलगा खिडकीकडे बोट दाखवून हिला म्हणाला , रडू नकोस, ती बघ खिडकीला पिशवी लावलीय ! कधी गंमत करायची हे अजूनही मुलाला कळत नाही. जाऊ दे. त्याने न जेेवता धावपळ केली , हेही कमी नव्हे.  मग माझ्या गोळया सुरू झाल्या. दुस-याच दिवशी म्हणजे 20 तारीखला दुपारपासून मला बरे वाटू लागलेय. 


20 तारीखला दुपारी अंकीत माईणचा मेसेज आला. मग बोलणे सुरू झाले. अंकीतला मी प्रथम क्वोरावर भेटलो. तिथून  मराठी ब्लागर्सचा ग्रूप बनवायचा का या त्याच्या प्रश्नाला मी चटकन हो कळवले होते. मग त्यांने अनुदिनीसंवाद हा ग्रूप फेसबूकवर बनवला. मी आँनलाईन पसारा खूप वाढवला. पण मी सगळं चाचपडत शिकता शिकता केलंय. कुठला कोर्स , पुस्तके , कोणाचं मार्गदर्शन हे मला लाभलं नाही. मी रत्नागिरीत शोध घेतला नाही असंही नाही. पण ते सगळं शक्य झालं नाही. अपुरी साधनसामग्री , कौटुंबिक खर्च व विशेषत: नाउमेद करणारं घरातलंच वादग्रस्त वादळी वातावरण यातून सर्च सुरू ठेवून शिकता शिकता नऊ ब्लाग केले. त्यावर प्रचंड व चांगलंही लेखन केलं. पण मी पडलो कारकून . क्लेरिकल बाजूवाला. माझी टेक्नीकल बाजू लंगडीच. कित्येक तांत्रिक गोष्टी डोक्यावरून जातात. माझं इंग्रजी चांगलं असलं तरी शेवटीे अमेरिकन इंग्रजीतल्या तांत्रिक बाबी समजायला मला कठीण जातात. अशा अवस्थेत एक मराठी आणि आठ इंग्रजी ब्लाग उभे केले खरे, पण व्यावसायिक बाजूकडे लक्ष देणे शक्य झाले नाही. तेव्हा तर नोकरी होती. जबाबदारी  होती. रिटायर्ड होऊनही निवांतपणा लाभला नाहीच. घरातलं वातावरण पूर्वीपेक्षा अधिक सतत तणावग्रस्तच राहिलेलं. त्यातून वेळ काढीत काढीत मन लावण्याचा प्रयत्न करतो आहे. अंकीतला मी याची थोडक्यात कल्पना दिली आहे. अंकीत रत्नागिरीतलाच असून आमचा विद्यार्थीच निघाला.  त्याने मला मदत करतो म्हणून सांगितले आहे. अंकीतशी बोलतानाच माझ्या लक्षात आले की डाॅक्टरकडे चेकींगसाठी जायचे आहे. त्यामुळे मला बोलणे थांबवावे लागले.  मी त्याला साँरी म्हणालो . मी डाॅक्टरकडे जाऊन आलो. त्यांनी ऑक्सीजन लेव्हल चेक केली. तीही खूपच चांगली आहे. म्हणजे सत्त्याण्णव वर बराच काळ स्थिर होती. मग 98 झाली. मी मुलाच्या गाडीवरून घरी आलो.  त्याच संध्याकाळी मला जनावर चावता चावता वाचलो ! ही खालच्या बागेत गेली तेव्हा मीही मागच्या बाजूला जास्वंदीचे कळे काढत होतो. हिला जास्त पुढे जाऊ नको म्हणून दोनदा सांगितले. पायाखाली बघून चाल, रान वाढले आहे असेही सांगितले. पण बायकोच ती , ती काय मला भीक घालतेय ! ती पुढेच गेली. मी स्वत:शीच पुटपुटत आमच्या घराच्या मागे गेलो . कंपाऊंडच्या भिंतीवर चढणा-या जनावराचा करडा रंग बेमालूमपणे पावसामुळे हिरवट झालेल्या भिंतीत मिसळून गेलेला असल्याने मला ते जनावर सुरूवातीला जाणवलेच नाही. मला बघून त्याने हालचाल केली तसे ते माझ्या पायाजवळच पडले. तेव्हा कुठे लक्षात येऊन मी पाय मागे घेतले आणि चार पावलं मागे आलो. नशीब तिथे दोन दगड होते . त्याच्याखाली ते शिरले. मी ते कुठे जात नाही ना याची खात्री पुन्हा एकदा त्याच्या जवळ जाऊन केली. पण ते दगड आणि कंपाऊंड यांच्यामधल्या छोटयाश्या जागेत ते वळवळत होते. मी संत्याच्या घराकडे पाहिले तर त्याच्याकडे सत्त्या उभा दिसला. मी त्याला आधी संत्याला बरे वाटले का ते विचारले. तो होय म्हणाला. तेवढयात संत्याच दारात आला. मी त्यालाही विचारून खात्री केली. मग त्याला काठी आणायला सांगितली. जनावराचे वर्णन सांगितले. तसा तो काठी घेऊन आला. तोपर्यंत ते ऐकून ही धावत आली. पुन्हा स्वभावानुसार पँनिक होऊन चौकशी करू लागली. मी तिला विचारले मग देऊया का सोडून त्याला ? तशी ती म्हणाली नको. मारूदे. मग संत्याने त्याला त्या दगडाच्या कपारीतही अचूक टिपलं आणि मारून वरच्या बागेत जाळलंही.  माझ्या हातात त्याने काठी देऊन ठेवली होती. पण मला ती चालवावी लागलीच नाही . इतक्या शिताफीने त्याने काम तमाम केलं. आमच्याकडे कधीही जनावर आलं तर मी त्यालाच बोलवतो. मला त्या जनावराचं वाईट वाटलं पण पुढे ते कुणाच्याही जिवावर बेतू शकलं असतं , हेही खरेच ! An hectic day  हा हायस्कूलमधला धडा मला आज आठवला ! खरंच आजचा दिवस तसा दगदगीचा आणि धावपळीचा गेला. दुपारी पिशवी भेटली आणि रात्री मला जवळजवळ बरे वाटू लागले , हेच विशेष समाधान ! 


21.09.2020 

पण काल रात्री पहाटेपर्यंत दोघांनाही झोप आली नाही. साडेतीननंतर मात्र मी झोपलो. सकाळी साडेआठला जाग आली ! तरी झोप डोळयांवर होतीच. आज अनेक दिवसांनी पूर्वीच्या वेळेवर म्हणजे साडेआठला शौचाची जाणीव झाली. जाऊन आलो. शवासन केले. सकाळपासून डावी नाकपुडी चोंदलेली होती. घामही येत होता. नाश्ता केला. गोळया घेतल्या. घरातला कचरा काढला. तसे जरा हलके वाटले. चोंदलेली नाकपुडी सैल झाली. नुकताच आलेला दै. सकाळ (daily Sakal) वाचायला सुरूवात केली. तेवढयात सतिश आला. सतिश ही उर्मीची देणगी आहे. सतिश उर्मीच्या घराचं सद्याचं काम पाहतोय. मी त्याला माझ्या घराच्या गेली सहा वर्षे या ना त्या कारणाने पडून राहिलेल्या नुतनीकरणासाठी बोलावलंय. आम्ही चर्चा सुरू केली तेवढयात विलास भाटकरची आई आली. विलासने तो रिटायर होत असल्याने खालीलप्रमाणे मला व्हॉट्सॲपला मेसेज पाठवला होता. तो मेसेज त्याच्या आईला का दाखवलास नाही म्हणून त्याने मला काल फोन करून विचारले होते व त्याची आई माझ्याकडे येईल म्हणून सांगितले होते. मीही तिला फोन करून बोलावले होते. इतके सगळे झाल्यावर ती आली तशी मी तिला तो मेसेज दाखवला . तिने पाहिला आणि काही न बोलता फोन माझ्याकडे दिला. ती विलासजवळ काय ते बोलणार असेल अशी समजूत करीत मी पुन्हा सतिशबरोबर चर्चा सुरू केली. त्याच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. काही त्याला समजावून सांगितल्या. 



(क्रमश:)

                          ....................



 पुढे


गेल्या भागात तुम्ही वाचलंत की ... असं सांगण्यापेक्षा सरळ 14.09.2020 रोजी सकाळी पडलेले स्वप्नंच सांगतो. ते असं होतं. पुढच्या बाजुला माझ्या घरासमोरील प-यात ईशान्य दिशेला काही लोक बांधकाम करायला उतरलेयत. काही जण वरच्या बाजुच्या शिरधनकरांच्या बागेत उभे आहेत. प-यातला एकजण मला त्याच्यापुढयात बोट दाखवून विचारतो की तिथे चि-याची एक लाईन वरपर्यंत उठवूया काय ? का कोण जाणे, पण मला ती जिवंत माणसे वाटत नाहीत. ती भूते असावीत असं त्यांच्या देहबोलीवरून वाटतं. तरीही मी त्यांना सांगतो , लगतचा हिस्सेदार बोंब मारील त्यामुळे तिथे काय करता येणार नाही. एवढयात बागेतला एकजण माझ्या अंगणात येऊन विचारतो की मग इथून लाईन टाकूया का ? मी सांगतो , हे आमचं आहे , इथे तर काहीच करता येणार नाही . स्वप्नं इथेच संपलं. आता हे तर स्वप्नंच होतं. पण ते विचित्रच होतं. सकाळपासूनच माझ्या मनात काय होईल काय नाही याचेच विचार येत होते.... आणि शेवटी ... शेवटी कसलं सकाळी दहा वाजताच पेटलं की राव ! अगदी जोरदार ! वणवा लागला ! आग भडकली ! कुठे म्हणता ? अहो, शेजारीच . उर्मीच्या नव्याने बांधल्या जात असलेल्या घरात ! आगीचा बंब नका आणू मध्ये. ती आग वेगळी . ती काडीने लावावी लागते. ही काडी लावल्याने लागलेली आग नाही. फार तर ती काडी केल्याने लागलेली आग म्हणता येईल. कोणी केली माहीत नाही , पण उर्मी आणि तिच्या जाऊबाईत कोणी तरी काडी केली. आग लावली. जोरदार भांडण पेटलं. आख्खा दिवस त्यातच गेला. अर्थात, बाहेरचा कोणीच मध्ये पडला नाही. कारण एक तर घर बांधण्यापूर्वी पुढे काय वाद होतील हे जाणून आपसात पुरेशी बोलणी केलेली नसावीत आणि त्यासाठी बाहेरच्या कोणाला चर्चेत सहभागीही करून घेण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे कसलीच माहिती बाहेरच्या कोणाला नव्हती. मग कसे कोण मध्ये पडणार ? तरीही आम्ही जाणार होतो पण सायंकाळी चार वाजता एकदाचं ते भांडण मिटलं. आम्ही निश्वास सोडला. शेवटी हे सगळे आपलेच ! 


      त्यानंतर तिस-याच दिवशी म्हणजे दि. 17 रोजी आम्हां दोघांना दोन स्वप्नं पडली. तिच्या स्वप्नात माझी आई आणि माझ्या स्वप्नात माझे वडील आले ! माझी आई कोणती तरी दोन ठिकाणं बघण्यासाठी कार आणायला सांगत होती तर माझे वडील घाबरलेले दिसत होते. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्यांनी मला खुणा करीत पुढच्या बाजुला रस्त्याच्या दिशेने बोट दाखवलं. मी तिकडे बघितलं तर अगदी बंदूसारखाच दिसणारा , त्याच्यासारखीच सफेद पँट व फिकट गुलाबी रंगाचा हाफ शर्ट घातलेला व पांढरी टोपी घातलेला माणूस देवळाच्या कोप-यावर मोटरसायकल चालवत येतांना दिसला ! स्वप्नं तिथेच संपलं. आज सर्वपित्री अमावास्या ! आजच माझे आई बाबा आमच्या दोघांच्या स्वप्नात का बरे आले असतील ?.....


गेले दोन तीन दिवस रात्री धुव्वाधार पाऊस पडतोय. विशेषत: पहाटे ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत प्रचंड पाऊस पडतोय. त्यानंतर नेमके पंधरा मिनिटांनी नळाला पाणी येतं. मागे जाऊन ते भरावं लागतं.  तेव्हा एक तर पायातून पाणी शोषले जाते आणि त्याचवेळी हवेतला पावसाळी गारवा बाधीत करीत असतो. त्यातच आसपास कोरोनाचा विळखा वाढतोय. कोरोनापेक्षा कोरोनाची पसरलेली भीतीच जास्त भयानक आहे. तसं 18 तारीखच्या संध्याकाळपर्यंत सगळंं ठीक होतं. पण रात्री दहा वाजता अंगणात फिरून पाय मोकळे करावेत , असा विचार अचानकच मनात आला. पाऊसही नव्हता. अंगण सुके दिसत होते. पाच दहा मिनिटे फिरलो असेन , अचानक कमरेत लटका पडतोय की काय असे दोनदा वाटले ! म्हटले बघुया परत काय तसे जाणवते काय , म्हणून पुन्हा फिरू लागलो. पण तसे काही जाणवले नाही. अर्धा तास फिरलो आणि मग मात्र पाठीचा कणा दुखू लागला. तसा मी घरात आलो. रात्री हिने कण्याला बाम लावला. थोडं बरं वाटलं. पण सकाळी पाठ आणि डोकंही दुखू लागलं. 19 तारीख उजाडली आणि त्रास वाढलाच. घसा खवखऊ लागला. डोळयातून गरम पाणी आले. त्यातच मेहुण्याच्या कामासाठी मायलेक स्टेट बँकेत गेलेली. शेजारच्या निलेशला माझ्या सोबतीला ठेवून गेलेले. मी त्याच्याशी तीन तास गप्पा मारीत बसलो. तो बिचारा बसून राहिला. जेवायलाही घरी जाईना. तेवढयात संत्या झोपून राहिलाय असा फोन त्याच्या घरातून आला. तो बघून आला तर संत्यालाही माझ्यासारखाच त्रास होत होता. मग निलेश म्हणाला मी डाॅक्टरकडे जातोय. काकाचा नंबर लावतो. तुमचा पण लाऊ का ? मी म्हटलं संत्याबरोबरच आमचा दोघांचाही लाव. तो बिचारा नंबर लावायला गावातल्या डाॅक्टरकडे गेला. तेवढयात ही लोकं आलीत. ही आली ती थेट घरात गेली. मी तिला डाॅक्टरकडे जायचंय म्हणून सांगितलं , तशी ती जेवणाची घाई करू लागली. तेवढयात तिला पिवळया पिशवीची आठवण झाली तशी ती एकदम टेंशनवर आली. सैरावरा होऊन पिशवी शोधू लागली. पिशवीत चार बँक पासबूक्स , हिचा फोन व मुलाचे पाकीटही होते. मी हिच्या नंबरवर फोन लावला. पण तो कोरोनाची कँसेट लागून बंद व्हायला लागला. इकडे निल्याचा डाॅक्टरकडून फोन आला की दहावा नंबर आत गेेलाय. तुम्ही या.  ही रडकुंडीस आलेली. मुलगा गाडी काढीत असलेला आणि मी दोघांच्यामध्ये साकटलेला ! ती पिशवी बाजारातच विसरली हे नक्की झाले तसा मी हिला धीर दिला आणि मुलगा आम्हांला डाॅक्टरकडे सोडून पिशवी शोधायला पुढे जाईल असे सांगितले. मुलाने तसे केले. मला डाॅक्टरनी तपासले , दोन इंजेक्शन्स दिली , गोळ्या लिहून दिल्या. ऑक्सीजन लेव्हल चेक केली व आणखी तीन दिवस ती लेव्हल चेक करायला या म्हणून सांगितले. सगळे टेंशनच आहे , पण टेंशन घेऊन उपयोगाचेही नाही. मी बाहेर येऊन बसलो. तेवढयात मुलगा आला . तो म्हणाला पिशवी सापडली नाही. मी म्हटले मग पोलीसांत तक्रार करावी लागेल. तो म्हणाला ती पण करून आलोय. तेवढयात ही बाहेर आली. हिलाही मुलाने तसेच सांगितले. आम्ही तिघंही घरी आलो तसा मुलगा खिडकीकडे बोट दाखवून हिला म्हणाला , रडू नकोस, ती बघ खिडकीला पिशवी लावलीय ! कधी गंमत करायची हे अजूनही मुलाला कळत नाही. जाऊ दे. त्याने न जेेवता धावपळ केली , हेही कमी नव्हे.  मग माझ्या गोळया सुरू झाल्या. दुस-याच दिवशी म्हणजे 20 तारीखला दुपारपासून मला बरे वाटू लागलेय. 


20 तारीखला दुपारी अंकीत माईणचा मेसेज आला. मग बोलणे सुरू झाले. अंकीतला मी प्रथम क्वोरावर भेटलो. तिथून  मराठी ब्लागर्सचा ग्रूप बनवायचा का या त्याच्या प्रश्नाला मी चटकन हो कळवले होते. मग त्यांने अनुदिनीसंवाद हा ग्रूप फेसबूकवर बनवला. मी आँनलाईन पसारा खूप वाढवला. पण मी सगळं चाचपडत शिकता शिकता केलंय. कुठला कोर्स , पुस्तके , कोणाचं मार्गदर्शन हे मला लाभलं नाही. मी रत्नागिरीत शोध घेतला नाही असंही नाही. पण ते सगळं शक्य झालं नाही. अपुरी साधनसामग्री , कौटुंबिक खर्च व विशेषत: नाउमेद करणारं घरातलंच वादग्रस्त वादळी वातावरण यातून सर्च सुरू ठेवून शिकता शिकता नऊ ब्लाग केले. त्यावर प्रचंड व चांगलंही लेखन केलं. पण मी पडलो कारकून . क्लेरिकल बाजूवाला. माझी टेक्नीकल बाजू लंगडीच. कित्येक तांत्रिक गोष्टी डोक्यावरून जातात. माझं इंग्रजी चांगलं असलं तरी शेवटीे अमेरिकन इंग्रजीतल्या तांत्रिक बाबी समजायला मला कठीण जातात. अशा अवस्थेत एक मराठी आणि आठ इंग्रजी ब्लाग उभे केले खरे, पण व्यावसायिक बाजूकडे लक्ष देणे शक्य झाले नाही. तेव्हा तर नोकरी होती. जबाबदारी  होती. रिटायर्ड होऊनही निवांतपणा लाभला नाहीच. घरातलं वातावरण पूर्वीपेक्षा अधिक सतत तणावग्रस्तच राहिलेलं. त्यातून वेळ काढीत काढीत मन लावण्याचा प्रयत्न करतो आहे. अंकीतला मी याची थोडक्यात कल्पना दिली आहे. अंकीत रत्नागिरीतलाच असून आमचा विद्यार्थीच निघाला.  त्याने मला मदत करतो म्हणून सांगितले आहे. अंकीतशी बोलतानाच माझ्या लक्षात आले की डाॅक्टरकडे चेकींगसाठी जायचे आहे. त्यामुळे मला बोलणे थांबवावे लागले.  मी त्याला साँरी म्हणालो . मी डाॅक्टरकडे जाऊन आलो. त्यांनी ऑक्सीजन लेव्हल चेक केली. तीही खूपच चांगली आहे. म्हणजे सत्त्याण्णव वर बराच काळ स्थिर होती. मग 98 झाली. मी मुलाच्या गाडीवरून घरी आलो.  त्याच संध्याकाळी मला जनावर चावता चावता वाचलो ! ही खालच्या बागेत गेली तेव्हा मीही मागच्या बाजूला जास्वंदीचे कळे काढत होतो. हिला जास्त पुढे जाऊ नको म्हणून दोनदा सांगितले. पायाखाली बघून चाल, रान वाढले आहे असेही सांगितले. पण बायकोच ती , ती काय मला भीक घालतेय ! ती पुढेच गेली. मी स्वत:शीच पुटपुटत आमच्या घराच्या मागे गेलो . कंपाऊंडच्या भिंतीवर चढणा-या जनावराचा करडा रंग बेमालूमपणे पावसामुळे हिरवट झालेल्या भिंतीत मिसळून गेलेला असल्याने मला ते जनावर सुरूवातीला जाणवलेच नाही. मला बघून त्याने हालचाल केली तसे ते माझ्या पायाजवळच पडले. तेव्हा कुठे लक्षात येऊन मी पाय मागे घेतले आणि चार पावलं मागे आलो. नशीब तिथे दोन दगड होते . त्याच्याखाली ते शिरले. मी ते कुठे जात नाही ना याची खात्री पुन्हा एकदा त्याच्या जवळ जाऊन केली. पण ते दगड आणि कंपाऊंड यांच्यामधल्या छोटयाश्या जागेत ते वळवळत होते. मी संत्याच्या घराकडे पाहिले तर त्याच्याकडे सत्त्या उभा दिसला. मी त्याला आधी संत्याला बरे वाटले का ते विचारले. तो होय म्हणाला. तेवढयात संत्याच दारात आला. मी त्यालाही विचारून खात्री केली. मग त्याला काठी आणायला सांगितली. जनावराचे वर्णन सांगितले. तसा तो काठी घेऊन आला. तोपर्यंत ते ऐकून ही धावत आली. पुन्हा स्वभावानुसार पँनिक होऊन चौकशी करू लागली. मी तिला विचारले मग देऊया का सोडून त्याला ? तशी ती म्हणाली नको. मारूदे. मग संत्याने त्याला त्या दगडाच्या कपारीतही अचूक टिपलं आणि मारून वरच्या बागेत जाळलंही.  माझ्या हातात त्याने काठी देऊन ठेवली होती. पण मला ती चालवावी लागलीच नाही . इतक्या शिताफीने त्याने काम तमाम केलं. आमच्याकडे कधीही जनावर आलं तर मी त्यालाच बोलवतो. मला त्या जनावराचं वाईट वाटलं पण पुढे ते कुणाच्याही जिवावर बेतू शकलं असतं , हेही खरेच ! An hectic day  हा हायस्कूलमधला धडा मला आज आठवला ! खरंच आजचा दिवस तसा दगदगीचा आणि धावपळीचा गेला. दुपारी पिशवी भेटली आणि रात्री मला जवळजवळ बरे वाटू लागले , हेच विशेष समाधान ! 


21.09.2020 

पण काल रात्री पहाटेपर्यंत दोघांनाही झोप आली नाही. साडेतीननंतर मात्र मी झोपलो. सकाळी साडेआठला जाग आली ! तरी झोप डोळयांवर होतीच. आज अनेक दिवसांनी पूर्वीच्या वेळेवर म्हणजे साडेआठला शौचाची जाणीव झाली. जाऊन आलो. शवासन केले. सकाळपासून डावी नाकपुडी चोंदलेली होती. घामही येत होता. नाश्ता केला. गोळया घेतल्या. घरातला कचरा काढला. तसे जरा हलके वाटले. चोंदलेली नाकपुडी सैल झाली. नुकताच आलेला दै. सकाळ (daily Sakal) वाचायला सुरूवात केली. तेवढयात सतिश आला. सतिश ही उर्मीची देणगी आहे. सतिश उर्मीच्या घराचं सद्याचं काम पाहतोय. मी त्याला माझ्या घराच्या गेली सहा वर्षे या ना त्या कारणाने पडून राहिलेल्या नुतनीकरणासाठी बोलावलंय. आम्ही चर्चा सुरू केली तेवढयात विलास भाटकरची आई आली. विलासने तो रिटायर होत असल्याने खालीलप्रमाणे मला व्हॉट्सॲपला मेसेज पाठवला होता. तो मेसेज त्याच्या आईला का दाखवलास नाही म्हणून त्याने मला काल फोन करून विचारले होते व त्याची आई माझ्याकडे येईल म्हणून सांगितले होते. मीही तिला फोन करून बोलावले होते. इतके सगळे झाल्यावर ती आली तशी मी तिला तो मेसेज दाखवला . तिने पाहिला आणि काही न बोलता फोन माझ्याकडे दिला. ती विलासजवळ काय ते बोलणार असेल अशी समजूत करीत मी पुन्हा सतिशबरोबर चर्चा सुरू केली. त्याच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. काही त्याला समजावून सांगितल्या. 



(क्रमश:)

                          ....................



मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

विचित्र स्वप्ने 2

 आज पुन्हा एकदा पडलेल्या विचित्र स्वप्नांना भेटू. कुणाला अशी स्वप्नें पडत असतील तर त्यांना पडलेल्या स्वप्नांशी काही साधर्म्य आहे का, तेही पाहता येईल. कुणाला हया स्वप्नांचा अर्थ अनुभवास आला आहे का ? हेही पाहता येईल.  



फारच विचित्र आणि भयानक असं पहिलंच स्वप्नं सांगतो. 

06.08.2020

 हाँलमध्ये जिथे पूर्वी देवघर होते , त्या ठिकाणी पूर्व पश्चिम असा लाकडाचा माच असतो. मी त्यावर दक्षिणेकडे तोंड करून बसलेला असतो. अचानक मला लाकडात हालचाल जाणवते. मी लाकडांकडे बघतो  तर त्यांचा रंग काळपट हिरवट दिसतो. माझ्या उजव्या पायापासून केवळ सहा इंचावर मला ती हालचाल वाढल्याचे आणि उष्ण हवेची धग मला जाणवू लागते . तो सर्प असल्याचे माझ्या लक्षात येते. अजून तो लाकडांतून वर येऊन मला चावलेला नाहीय. पण तो माझ्या दिशेने सरकतोय आणि मी स्वत:ला पळ , पळ म्हणून सांगतोय. पण मला उठता येत नाहीय , सरकताही येत नाहीय आणि पळताही येत नाहीय. मी त्या लाकडांनाच चिकटून बसलोय ही जीवघेणी जाणीव होत असतांनाच डोळे उघडले. 

......

09.08.2020

आज दोन स्वप्नें पडली. 


पहिल्यात मी माझ्या पूर्वीच्या कार्यालयात दिसतो. दोन खोल्या दिसतात. एकीत दोन तीन प्रोफेसर्स व दुसरीत कार्यालय . प्रोफेसरांच्या समोर मी उभा असतो. एक जण मला एक आदेश टाईप करून तो मला देतो. हे रजिष्ट्रार मँडमना दाखवू नका , असं एक जण मला सांगतो तर दुसरा हसत हसत म्हणतो की दाखवलात तरी तिला काही कळणार नाही ! डोक्यावरून जाईल तिच्या. तो आदेश म्हणजे मला कुठेतरी स्पर्धेत भाग घेण्याबाबत प्राचार्यांनी केलेली शिफारस असते. तो कागद घेऊन मी हसत हसत बाहेर पडतो आणि तेवढयात मला जाग आली. 


दुस-या स्वप्नात आमच्या जुन्या घरात मी आईसमोर बसलेला दिसतो. वेळ दुपारची असते. मी आईला विचारतो की मी जाड दिसतो की बारीक दिसतो ? आई काही तरी उत्तर देणार असते एवढयाच मला जाग येते . 

........

10.08.2020 

म्हणजे 09.08.2020 ची रात्र. वेळ 12.30 ची. पुन्हा एकदा मला आमचे जुने घर दिसते. मी व पत्नी ओटीवर उभे असतो. इतक्यात मागच्या बाजुचा सीन मला दिसू लागतो. सकाळची वेळ असते.  रमेश हा लहान भाऊ कार घेऊन बाहेर जायला निघतो. त्यांच्या अंगणात त्याचा मोठा भाऊ नरेश त्याची वाट बघत थांबलेला असतो. तो रमेशला काही तरी बोलतो ज्याने रमेश चिडतो व नरेशच्या अंगावर धावून जातो. नरेश जणू याचीच वाट बघत असतो. तो चाकू काढतो व रमेशच्या पोटावर वार करतो. त्यांची आई समोरच असते. आता ती पोलीसांना फोन करा म्हणून आमच्याकडे येईल , आपण तिला तूच तक्रार कर म्हणून सांगूया, असे मी पत्नीला सांगतो आणि इतक्यातच मला जाग येते. 

........

12.08.2020

मी शेजारच्या घरात जातो. वेळ रात्रीची असते. मी प्रवेश करतो तोच टेबलावरून एक कुत्रा शेपटी हलवत खाली उतरतो व माझ्या गळयाला आपली मान मायेने घासतो. मी त्याच्या मानेवरून प्रेमाने हात फिरवतो . तितक्यात माझे लक्ष त्याच्या गळयाकडे जाते . गळयात लोखंडी साखळदंड असतोे. त्याचा हूक काढून मी त्याला बंधनातून मोकळा करतो. असे ते स्वप्नं होते. 


       या स्वप्नातून जाग आली तेव्हा रात्रीचे बरोब्बर अडीच वाजले होते. पुण्यावरून आल्याने माझा मुलगा शेजारच्या घरात क्वारंटाईन आहे व तिथून तो एकटाच त्याच्या कंपनीचे वर्क फ्राँम होम करीत असतो. त्या स्वप्नामुळे मला मुलाची काळजी वाटू लागली. मी पत्नीकडे पाहिले तर ती झोपली होती. मी हळूच उठलो व शेजारच्या अंगणात गेलो इतक्यात आमचा दरवाजा अर्धवट उघडी राहिल्याने वा-यामुळे आपटून आवाज येऊ लागला. त्या आवाजाने पत्नी घाबरेल म्हणून मी धावत घरात आलो. एवढयात पत्नीला जागच आली. मग तिला मुलाला पाहुया म्हणून सांगितले. ती दारावर थांबली. मी पाय-या उतरून शेजारी गेलो. लाईटस् चालूच होते. मी खिडकीवर टकटक केली. हाका मारल्या तरी त्याचा प्रतिसाद मिळेना. शेवटी काचेवर मी जोरात थाप मारली त्या आवाजाला मात्र त्याने प्रतिसाद दिला ! त्याचं काम रात्री तीन चार वाजेपर्यंत चालू असते . पण आज दीड वाजताच संपले होते. लाँग आऊट होऊन तो आतल्या रूममध्ये झोपला होता. पण बाहेरच्या रूममध्ये लाईटस् चालूच राहिल्या होत्या. मी मुलाला सांगितले कालच तुझा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. आपल्या घरात झोप चल. तसा तोही आला व मग आम्ही बोलत राहिलो. चार वाजले तसा मुलगा झोप येत नाही,  ए.सी.तच जाऊन असं म्हणून पुन्हा शेजारच्या घरात झोपला !

..........

16.08.2020

गेले दोन दिवस स्वप्नंच पडले नव्हते. आज पडले.  मी नेहमी सकाळी सहाला उठतो. आज जोरदार पावसामुळे मला सहाला जागच आली नाही. मी पावणेसातला उठलो. उठलो तोच स्वप्नातून जागा होत. स्वप्नात , माझी पत्नी व मुलगा मागच्या अंगणात दक्षिण दिशेला तोंड करून उभे होते. मी व चक्क विलासराव देशमुख दोघे नवीन सफेद लेंग्या सद-यात लगतच्याच घराच्या मागच्या अंगणात एक खताची पिशवी पूर्वेकडून पश्चिमेकडे नेतो. पश्चिमेला दक्षिणोत्तर हिरव्या पानांच्या वनस्पतीच्या एक दोन फुटांच्या रोपांची शेती आहे , तिथपर्यंत ती पिशवी आम्ही दोघे ओढत नेतो. मी पत्नी व मुलाकडे बघून काही तरी बोलतो. विलासराव त्यांचे हुकमी हास्य फेकतात आणि इथेच स्वप्नं संपले !

............

25.08.2020

गेला आठवडाभर एक तर स्वप्नें पडली नाहीत वा आठवणीत राहिली नाहीत. हा आठवडा अगदीच खराब गेला आहे. जीवनाने अक्षरश: रडवलं आहे. पत्नी व मुलगा यांचा तणाव एकाच वेळी हैराण करतो आहे. रात्रीच नव्हे तर दिवसाही झोप नाही. त्यात स्वप्नं कुठलं पडायला आणि पडलं तरी कुठलं आठवायला !

         काल रात्री तणाव थोडा कमी झाला. झोपही बरी लागली. बहुतेक दोन स्वप्नं पडली. दोन्हीही माझ्या माजी सरकारी कार्यालयाशी संबंधित. पण दोन ठिकाणच्या. एक मी मुंबईत रजेवर आहे . मला रत्नागिरीच्या कार्यालयात जाऊन हजर होणे शक्य नाही. तर मुंबईच्या कार्यालयात मला हजर करून घेण्याचा आदेश त्या कार्यालयात संगणकावर लिपिक टाईप करीत असतांना मला दिसतो.  इथे स्वप्नं संपते. 


        दुसरे स्वप्नं रत्नागिरीत मी एका रस्त्यावर चालतो आहे. कार्यालयातील सहकारी श्री. शालिकराम चव्हाण यांच्या घरी मी जात असतो. विशेष म्हणजे ते पूर्वेकडे राहतात , पण मी पश्चिमेकडे जात असतो ! ही उलटी दिशा का तेच समजत नाही.  मी अस्वस्थ मन:स्थितीत आहे. माझे कपडे थोडे अस्ताव्यस्त आहेत. इन केलेले पिवळे शर्ट उजवीकडे पँटमधून थोडेे बाहेर आल्याचे चालता चालता माझ्या लक्षात येते. तेवढयातच अकरा वाजल्याचेही लक्षात येते.  तेव्हा जाणवते की चव्हाण आता ऑफिसला गेले असणार , आता त्यांच्या घरी जाऊन काही उपयोग नाही. त्यांना आधी फोन करूया , असा विचार करतो आणि मला जाग येते. तेव्हा पहाटेचे पाच वाजलेले होते. 

......................

01.09.2020

आज आमच्या जुन्या आँफीसात नार्वेकर बाई तिच्या पूर्वीच्याच खुर्चीत बसलेली आहे. बाजुला विभुते बाई आहे. समोर काटकोनात बादल आहे. मी त्याने दिलेले जीपीएफचे बील तपासत असतो. माझ्या लक्षात येते की, ते बील जीपीएफ बिलाच्या नमुन्याऐवजी आकस्मिक खर्चाच्या बिलांच्या नमुना क्र. 31 मध्ये केलेले आहे . मी बादलला हे सांगायचे ठरवतो , पण त्यापूर्वी जीपीएफ बिलांची फाईल घेऊनच बादलला दाखवावे , असा विचार करतो.  इथेच स्वप्नं संपते ! 


        हे स्वप्नं विचित्र म्हणजे अनेक वर्षे न आलेली नार्वेकर बाई आँफीसात बसून आरामात गप्पा मारतांना दिसते. ती व विभुते त्यांच्याच पूर्वीच्या आस्थापना विभागात तर मी व बादल आमच्याच पूर्वीच्या लेखा विभागात बसलेलो दिसतो.  मी दीड वर्षापूर्वीच रिटायर्ड झालो तरीही मी तिथे कार्यरत व सहकारी बादलला मार्गदर्शन करतांना दिसतो. 


       या स्वप्नाची प्रचिती लगेच आली ! या स्वप्नात संपूर्ण कार्यालयात फक्त चारच माणसे दिसली ! लक्षात घ्या . चार खांदे ! सकाळी 09.15 ला माजी विद्यार्थी व शेजारच्या पेडणेकरांचा जावई निखील शेटये याचा माजी अधिव्याख्याता जयंत शशिकर नांदेडकर यांचे काल रात्री 11.00 वा. निधन झाल्याचा संदेश आला. दुसरा झटका बसला तो माझ्या मेहुण्याचे सासरे वारल्याचा फोन आला तेव्हा. 


           चार खांदे म्हणजे बहुतेक कुणाच्या तरी मरणाच्या बातम्यांचा दिवस दिसतोय ! आतापर्यंत दोन पुरूषांच्या निधनाच्या बातम्या आल्या आहेत. स्वप्नात दोन पुरूष व दोन महिला दिसल्या होत्या. म्हणजे अजून दोन महिलांच्या बातम्या तर येणार नाहीत ना ?


.......................

02.09.2020

काल मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्याने विचित्रच स्वप्नं पडले. आमच्या शेजारी मंदिर आहे . त्याच्या समोरच पिंपळपार आहे. मंदिर परिसर आमच्या अंगणातून स्पष्ट दिसतो. स्वप्नात मी कशाला तरी आमच्या अंगणात येतो. समोर पिंपळाकडे लक्ष जातो. पाहतो तर पिंपळपार ते मंदिराचे कंपाऊंड यादरम्यान आमच्या घराच्या दिशेने असलेल्या कोप-यात मंदिराकडे पाठ करून वीसपंचवीस तरूण दाटीवाटीने पायावर बसलेले होते. ते एकमेकांना डावीउजवीकडे ताकदीने ढकलत होते. सगळेच चिरडले जात होते. गुदमरत होते , पण साखळी तुटत नव्हती. त्यातच माझा मुलगा साधारण उठू पहात होता व त्याची मान थोडी उंच दिसत होती. त्याच्या मानेच्या शिरा टरटरलेल्या एवढया लांबूनही मला दिसल्या. केस पिंजारलेले दिसले. त्यातच मंदिराच्या कोप-यावर आणखी काही मुले हया घाणेरडया प्रकाराला मोठमोठयाने चिअर करत होती. तिकडे त्या मुलांचा जीव जात आला होता तर दहा फुटावरून इकडची मुले मोठमोठयाने हसत होती. त्यांचा सामूहिक आवाज घुमत होता. विचित्र हास्यलहरी निर्माण होत होत्या. हे ऐकून मी मोठयाने ओरडत तिकडे धाव घेतो. मला बघून त्यांचा आवाज अचानक बंदच होतो. ते एकाएकी गायबच होतात. दुसरीकडे एकमेकांना ढकलणारी ती मुलेही त्याच क्षणी गायब होतात. मी मंदिर परिसरात एकटाच उभा असतो , इतक्यात प्रचंड आवाजासह पावसाची सर येते. माझ्यासमोर पिंपळासमोरचा  दक्षिणेच्या कठडयापर्यंतचा मोठा भूभाग धापकन खाली त्याच्यावर काही तरी आपटल्याता आवाज होऊन कलून खचतो ! जमिनीवर कशाचा आघात झाला ते मला कळत नाही. ते भू:स्खलन मी अवाक होऊन बघत राहतो . त्याच वेळी मला जाग आली. मी घडयाळात पाहिले तर दोन वाजत आले होते ! 

...............

05.09.2020

दोन स्वप्ने पडली. एकात मी व आबा शिवलकर मेश्राम साहेबांच्या केबीनमध्ये त्यांच्या टेबलासमोर उभे. पलीकडे साहेबही उभेच असतात. त्यांच्या टेबलावर आमच्या बाजुने दोन वेगवेगळी कागदपत्रे पूर्वपश्चिम खालोखाल ठेवलेली असतात. त्यातील साहेबांच्या बाजुची आबांची कागदपत्रे साहेब बघत असतात. माझी कागदपत्रे त्यांनी पाहिलीत की नंतर पाहणार हे समजत नसते. पण आबांच्या कागदपत्रांपैकी आणखी दोन पेपर्स टेबलवरच असतात. आबा ते हातात घेवून , हे पण साहेबांना दाखवायचे का ? म्हणून मला हळूच विचारतात. मी ते बघतो तर ते आबांचे आधारकार्ड व रेशनकार्ड असते. मी ते दाखवू नका म्हणून सांगतो. त्कडे साहेब उभे राहून आबांची कागदपत्रे पहातच असतात हे मी डोळयांच्या कोप-यातून पाहतो व स्वप्नं तिथेच संपते. 


       दुसरे स्वप्नं मात्र भयानक होते. जयस्तंभावर कलेक्टर ऑफिसच्या आवारात कोविड सेंटर असते. मधला रस्ता ओलांडून समोरील पेट्रोल पंपाच्या आवारात बाकडी असतात. एका बाकडयांवर दोघे तिघे पोलीस तर त्यांच्यासमोरच्या बाकडयावर मी व  माझा चुलत भाऊ नाना भाटकर बसलेलो असतो. ते पोलीस आम्हांला पलीकडे जाऊन कोविड तपासणी करून यायला सांगतात. आम्ही जायला उठतो तर तिथे एका बाजुला माझी पत्नीही बसलेली दिसते. आम्ही दोघे रस्त्यावर येतो पण रस्ता ओलांडून पलिकडे जाण्याऐवजी आम्ही आमच्या गावात आलेलो दिसतो. तिथून आम्ही पुन्हा जयस्तंभावर पोलीसांच्यासमोर जसे काही आम्ही पलीकडील कोविड सेंटरमधून तपासणी करून आलो आहोत अशा आविर्भावात जाऊन बसतो. पोलीस काहीच बोलत नाहीत. इथेच मला नेमकी जाग येते. 

..........

10.09.2020 

आज फारच विचित्र स्वप्नं पडले. स्वप्नात फक्त एक भावाबहिणीची जोडी दिसली. दोघांच्या अंगात गुलाबी रंगाचे कपडे होते. बाकी काहीही बोलणे झाले नाही. मी त्यांना बघितले आणि स्वप्नं संपले. 

       या स्वप्नाची प्रचिती संध्याकाळीच आली. त्या दोघांशी अगदी घट्ट संबंध असलेल्या एकाच्या बायकोला कोरोना झाल्याची बातमी स्वप्नातल्या बहिणीनेच फोनवरून माझ्या पत्नीला सांगितली. 

......


     


शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

झोलर बंटी बबली

 

मागे - पुढे 



गेल्या भागात तुम्ही वाचलंत की ...


..... तरी पण मी कुठेतरी मार्ग काढायचा प्रयत्न तर केला आहे. पण त्या समाधानातही आम्ही समाधानी नाहीयत...कोणीच ! पुढे काळ काय करतो ते पाहू....


.... आणि आता इथून पुढे....


12.09.2020


काल रात्री दोन स्वप्ने पडली. तीही दोनअडीचच्या दरम्याने. एकात इंग्लंडमध्ये क्रिकेटची मॅच चालू असते. एक चेंडू चक्क आमच्या खिडकीवर आपटून परत जातो ( आम्ही भारतात ! )  . नशीब तो आत येऊन आम्हांला लागत नाही. दुसरे स्वप्नं मजेशीर होते. मी व माझी पत्नी एका रस्त्याच्या कडेला इमारतीजवळ उभे असतो. मला इमारतीच्या प्रांगणात दोन एकसारख्या दिसणा-या पांढ-या रंगाच्या कार दिसतात. मी पत्नीला विचारतो की त्यांची किंमत किती असेल ? तर ती चक्क प्रत्येकी दोन हजार रूपये सांगते ! इथेच मला जाग येते ! तेव्हा अडीच वाजले होते. वर्क फ्राँम होम करीत असलेल्या मुलाला भूक लागली म्हणून त्याने भावाच्या घरातून चहा तयार ठेवायला फोन केला. त्याच्या रींगनेच मला त्या स्वप्नातून जाग आली. नाही तर मी नक्कीच त्या दोन्ही गाडया निदान स्वप्नात तरी खरेदी केल्याच असत्या 😀😀😀😀 . 


गेल्या आठवडाभरात बरेच काही घडून गेले आहे. मागे पुढे म्हणता म्हणता आपण मध्येच घरात जास्त लक्ष घातलं होतं. पण एक दोन दिवस वगळता घरच्या आघाडीवर सद्यातरी समाधानकारक शांतता आहे ! म्हणून आपल्या सवयीनुसार परत जरा मागे पुढे पाहू 😀😀😀😀😀. मागे बंदूच्या बायकोने पोष्टाच्या आर.डी. खात्यांचा केलेला घोळ घाबरत घाबरत त्याच्या कानावर घातला गेला खरा ; पण फार मोठा धक्का बसून बंदूलाच काही तरी होंईल ही अनेकांची अपेक्षा फोल ठरली . उलट , त्याने लाखभर रूपयांची परतफेड केली ! बायको सहीसलामत सुटली. बायको नव-याला तिच्यापुढे  किती हतबल बनवते , नव-याचा नाईलाज करून सोडते ते इथे दिसते. नवरा केवळ बायकोच्या मुठीत नसतो , तर ती त्याला पुरता असहाय्य बनवते, हेच हे उदाहरण दर्शवते. बरं तिची अशी अवस्था का झाली ? तर तिच्या नव-याच्या सकाळच मित्रमंडळी दाराघरात जमवण्याची सवय. आता यातला कोणी ना कोणी तरी संख्याशास्त्राचा उर्फ आकडेलावणेशास्त्राचा तज्ञ असतोच. शिवाय या बाईचे एका सर्वगूणसंपन्न मैत्रिणीकडेही जाणे येणे, फोनसुखसंवाद वगैरे वाढले होतेच. त्या मैत्रीणीकडे रोज चिठ्या न्यायला फंटर येतोच. या आकडेशास्त्राचा अभ्यास करण्यात ही बाई एवढी गुंतली की नव-याला आणि मुलाला वेळेवर जेवण मिळेनासे झाले ! अभ्यास वाढला तसा खर्च वाढला. उत्पन्न शून्याच्या खाली गेलं व शेवटी शून्यावस्था आली. तणावाने बाई दोनदा दवाखान्याची वारी करून आली. पण बाई निगरगट्टच ! पुन्हा आकडे लावण्यासाठी आर. डी. चे पैसे वापरायला तिने सुरूवात केली ! नव-याला बायको जेलमध्ये जाण्याची वेळ आली, लोक दाराशी आले , तेव्हा कळलं ! पण शेवटी इज्जत का फालुदा होऊ नये म्हणून बिचारा अजून पैसे परत करतो आहे !   अशीच दुसरी एक जोडी जवळच आहे. त्यातली बायको ही गळेपडू बाई आहे. माझा वाढदिवस तुमच्या लक्षात नाही का , तुम्ही जेवण छान बनवता , मग आम्हांला जेवायला कधी बोलवताय ते शाळेची फी थकलीय , खोलीभाडं थकलंय , पंधरा हजार द्या, वीस हजार द्या अशी मागणी करीत ही बाई दारोदार फिरते. कोणत्याही पुरूषाकडे बिनदिक्कत पैसे मागण्याचे  कौशल्य तिच्याकडे आहे. हयालाही स्कील इंडिया वुमन म्हणायचं काय ? की स्मार्टसिटीवुमन ? एक रूपया फेडू न शकणा-या हया बाईने एकीजवळ चक्क पन्नास हजाराची मागणी केली ! काय धाडस आहे पहा !  म्हणजे काहीही कामधंदा न करता जगाने हयांना पोसावं आणि तेही मेहरबानी नव्हे तर हयांचा हक्क म्हणून ! आहे की नाही जगावरच मेहरबांनी ! आम्ही दयेपोटी ती सांगेल त्या कहाणीवर विश्वास ठेवून दहापंधरा हजाराची मदत करूनही हया बाईची हाव वाढतच गेली . तिने आणखी पंधरा हजार द्या म्हणून माझ्या बायकोला आतल्या रूममध्ये नेवून माझ्या नाकावर टिच्चून बोलणी केली ! नवरा माझ्याबरोबर बिनदिक्कतपणे हवापाण्याच्या गप्पा मारत बसलेला.  तेव्हा मी काही बोललो नाही. पण दुस-या दिवशी येऊन ती तोंड उघडायच्या आतच मी तिला सणकावले. ती तशीच निघून गेली.  माझी बायको ( बायकोच ती ! ) मला म्हणाली, उगाच बोललात तिला एवढं . मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे ? मी बोललो,  होय , पण मेलेल्याला वाटतंय काय मेलो आहो असं ? हयांच्या सवयी गेल्या आहेत का ? आणि हयांची मग्रूमीही संपलेली नाही ! हे बाकी बायकोला पटलं ( नशिब ! ) .  गेली दहा वर्षे ही जोडी अशी जगतेय. एका ठिकाणी कर्जाचे हप्ते , भाडे, शाळेचे शुल्क थकले की दुसरीकडे पळायचं . तिकडे पुन्हा तेच उद्योग सुरू करायचे. वाट्टेल ती जीवघेणी कारणं पुढे  करायची , पैसे उकळायचे आणि काही काळ मजेत जगायचं. ही झोलर बंटीबबलीची जोडी आहे ! तुमच्याही गळयात पडेल म्हणून सावध करतो आहे. ही जोडी दहा वर्षे त्याच त्या चुका काहीही बोध न घेता करते आहे व वर जगाने मदत केलीच पाहिजे ही जगावर मेहरबानी आहेच ! हया जोडीचं असं का झालं ? कोरोना आता आला. पण त्यापूर्वी दहा वर्षापासूनच समस्वभावी जोडप्यांचा व मित्रमैत्रिणींचा गट बनत गेला. याची सुरूवात मुंबईला झाली. मग ही जोडी जाईल तिथे असले गट जोडत राहिली. गटातल्या हुशार मंडळींनी हयांना धूतलं आणि आता हयांना कोणीच विचारीत नाही. फुकटचंबूखावबांचं हे असंच असतं. ते खाऊन गेले पण शेवटी हे परिस्थितीत अडकले ! एकाकी पडले. पण त्यातून ते काही शिकतील ही सुतराम शक्यता नाहीच ! देव त्यांचं भलं करो ! दुसरीही एक जोडी आहे. तिच्यात बाई दिवसभर जगात फिरत असते . रात्रीही दुस-यांकडे जाऊन झोपते . नवरा घरात दारू पिवून फीस. गेली उडत म्हणत शिव्या देत बसतो. आता ही जोडी पार म्हातारी झाली. पण गूण तेच आहेत !  हया तीघांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे, तीन्ही बायकांना झाल्या प्रकारांचं काहीही वाटत नाही ! काही घडलेच नाही असे वागत असतात. बिनधास्त हसत असतात. काही केल्या आपले गूण सोडत नाहीत ! अश्या अनेक वैशिष्टयपूर्ण जोडया आमच्या मागे पुढे आहेत. पुन्हा त्याबद्दल कधीतरी नक्कीच बोलू. काय ?


(क्रमश:)

                          ....................






शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

कोविड टेस्ट

 

व्हॉट्सॲप संदेश 

संदेश पाठवणार : श्री.  उदय मयेकर , रत्नागिरी

संदेश : 



----------------

कोविड आजाराचा सध्या सगळीकडेच समुहसंसर्ग ( Community spread ) झाला आहे. सध्या सरकारी व खाजगी लॅबमध्ये कोरोनाच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. कधी कोणती तपासणी करावी ? कोणती तपासणी अधिक खात्रीशीर आहे ? कोणत्या तपासणीला अधिक खर्च येतो ? कोणत्या तपासणीला किती वेळ लागतो ? HRCT व त्याचा score म्हणजे काय ? Rapid antigen test आणि RT--PCR  यांच्यात फरक काय ? या सर्व गोष्टी आपण या चवथ्या कोरोणा लेखात पाहणार आहोत.


कोरोनाच्या मुख्यत: २ प्रकारच्या तपासण्या असतात

1) Viral Test

2) Antibody Test


कोरोनाचे निदान होण्यासाठी Antibody Test चा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही.


कोरोना निदानासाठी Viral Test  चाच मुख्यतः वापर होतो. त्याशिवाय रोगाचा शरीरातील प्रादुर्भाव वाढल्यास HRCT चा निदानासाठी तसेच न्युमोनियाची तीव्रता व फुफ्फुसांची कार्यक्षमता  समजण्यासाठी उपयोग होतो.


Viral Test या मुख्यत्वेकरुन ३ प्रकारच्या असतात.

1. Rapid Antigen test

2. RT--PCR

3. True Nat Test


तपासण्यांचा खाजगी लॅबमध्ये येणारा खर्च

-----------------------------------------------------

1) Rapid Antigen test -- 450 रु

2) RT--PCR-- 2500 रु

3) True Nat Test -- 1200 रु

4) HRCT -- 6000 -- 8000 रु


तपासण्यांसाठी लागणारा वेळ

--------------------------------------

1) Rapid Antigen test -- अर्धा तास

2) RT--PCR-- 24 ते 48 तास

3) True Nat Test -- अर्धा तास

4) HRCT -- अर्धा ते एक तास


कोणती तपासणी कधी करावी

--------------------------------------

यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.


# Antigen Test

a.) ज्या रुग्णांना त्वरीत उपचाराची गरज आहे त्यांच्यामध्ये


# RT--PCR

a.) ज्यांची Antigen Test ही निगेटिव्ह आली आहे पण लक्षणे असणारे पेशंट.

b.) कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या contact मधील लोक.

c.) परदेशातून येणारे लोक.


# True Nat Test

a.) Brought Dead व्यक्ती

b.) बाळंतपणासाठी आलेल्या माता

c.) Emergency Operation चे रुग्ण


( जर True Nat चाचणी उपलब्ध नसेल तर Antigen Test करावी. ) 


महाराष्ट्र शासनाने HRCT ला कोविडच्या निदानासाठी परवानगी दिलेली नाही. ही तपासणी कोविड निदानासाठी शासनातर्फे ग्राह्य मानली जात नाही.


आता सर्व तपासण्यांची विस्तारीत माहिती पाहुयात.


Rapid Antigen Test

--------------------------------


१) यामध्ये विषाणूंच्या surface spike मधील antigen protein तपासले जाते.


२) यासाठी नाक व घसा येथून स्वॅब घेतला जातो.


३) या चाचणीचा रिपोर्ट आपल्याला अर्ध्या तासात समजू शकतो.


४) ही तपासणी RT--PCR तपासणी पेक्षा स्वस्त व लवकर होणारी आहे.


५) या तपासणी साठी प्रशिक्षित व्यक्तीची ( Well Trainer ) ची गरज लागत नाही.


६) तपासणी तील दोष

a. कोरोना सदृशच लक्षणे असणाऱ्या फ्लू सारख्या  आजारात या तपासणीची sensitivity ही केवळ ३४ ते ८० टक्के असते. 

याच तर्काने अर्धे किंवा त्याहून अधिक कोविड पॉझिटिव्ह पेशंट मध्ये ही तपासणी निगेटिव्ह येवू शकते.


b. बऱ्याच Asymptomatic ( लक्षणे नसलेल्या ) पेशंट मध्ये  नाकातून व घशातून योग्य प्रमाणात विषाणू मिळत नसल्याने ही तपासणी निगेटिव्ह येवू शकते

कारण या तपासणीत antigen चे amplification केले जात नाही.


७) मग ही तपासणी का केली जाते ??

a.) ज्यावेळी viral load जादा असतो त्यावेळी ही तपासणी highly sensitive असते. त्यामुळे बाधित पेशंटचे विलगीकरण करणे सोपे जाते.


b.) ही तपासणी RT--PCR पेक्षा स्वस्थ व पटकन होणारी आहे.


c.) सर्व पेशंटची RT--PCR तपासणी करणे शक्य नसते अशावेळी RT--PCR चाचण्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी.


d.) समुह संसर्ग ( Community spread ) होत असताना जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या करुन त्यानुसार पॉझिटिव्ह पेशंटचे विलगीकरण ( Isolation ) करणे व त्याअनुषंगाने रोगाचा प्रसार टाळण्यासाठी.


e.) Antigen test निगेटिव्ह येवूनही ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आहेत अशा रुग्णांची नंतर RT--PCR तपासणी केली जाते.


f.) Antigen मशिन हे Treu Nat मशिनच्या तुलनेत स्वस्त असते व या मशिनवर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तपासण्या करणे शक्य असते.


RT--PCR

--------------

Reverse Transcriptase Polymerase Chain Reaction


१) यामध्ये ठराविक रसायनांद्वारे विषाणूच्या थोड्या RNA पासूनही हजार पटीने DNA तयार केले जातात जे तपासणीसाठी योग्य मात्रेत उपलब्ध होतात ( जरी स्वॅबमध्ये कमी प्रमाणात विषाणू असतील तरीही ).


२) यामुळे कोविड निदानासाठी ही सर्वात खात्रीशीर व अचूक तपासणी आहे.


३) पण ही तपासणी बरीच वेळखाऊ आहे. याचा रिपोर्ट यायला २४ ते ४८ तास इतका वेळ लागू शकतो.


४) यासाठी नाकातून व घशातून swab घेतला जातो. किंवा थुंकीही तपासायला घेतली जावू शकते.


५) या तपासणीसाठी योग्य प्रशिक्षित व्यक्तीची गरज लागते.

जी इतर दोन तपासण्या करिता इतकी गरजेची नसते.


६) कोरोना विषाणू हा प्रामुख्याने पहिल्या आठवड्यात घश्यामध्ये वाढत असतो त्यानंतर तो फुफ्फुसांत वाढायला सुरु होतो. याचाच अर्थ घशातील स्वॅब हा जंतूसंसर्ग झाल्यानंतर एक आठवडा एवढ्याच कालावधी साठी पॉझिटिव्ह येतो. नंतर Throat swab हा False Negative येण्याची शक्यता दाट असते. त्यासाठी जंतूसंसर्गाच्या दुसऱ्या आठवड्यात श्वासनलिकेतील स्वॅब अथवा कफयुक्त थुंकी तपासणे गरजेचे असते.


बरेच असे video बघण्यात आले की आपण RT--PCR चा रिपोर्ट ज्यावेळी मागून घेतो त्यावेळी त्यातील CT value ( Cyclic Threshold ) ही विचारुन घ्या. ती जर २४ पेक्षा जादा असेल तर त्या व्यक्तीमध्ये viral load हा कमी असतो म्हणजेच त्या व्यक्तीद्वारे इतरांना संक्रमण ही कमी प्रमाणात होते व जर CT value ही २४ पेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीमध्ये viral load हा जादा असतो म्हणजेच हे लोक इतरांमध्ये जादा संक्रमण पसरवतात.


हे जरी खरे असले तरी बऱ्याचदा असे पाहायला मिळते की अनेकदा viral load जादा असूनही त्यांच्यामध्ये लक्षणे ही अल्प किंवा मध्यम स्वरुपात बघायला मिळतात. जसे की लहान मुले ज्यांच्यामध्ये क्वचितच लक्षणे तीव्र स्वरुपाची असतात पण त्यांच्याद्वारे जंतूसंसर्ग मोठ्या प्रमाणात पसरवला जातो.


याउलट वयस्कर लोकांमध्ये viral load कमी असूनही तीव्र स्वरुपाची लक्षणे दिसतात.


हा खरं तर विरोधाभास आहे.


व त्याचे कारण हे आहे की कोविड मध्ये होणारी complications ही केवळ शरीरात जाणाऱ्या विषाणू मुळे होत नसतात. तर ती प्रामुख्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीने ( Immune system ने ) त्या virus ला किती व कशा प्रकारे प्रतिसाद दिला व त्यामुळे आपल्या शरीरात होणाऱ्या Inflammatory changes मुळे होत असतात. Immune system च्या प्रतिक्रिया व त्यामुळे होणाऱ्या Inflammatory changes या प्रत्येक पेशंट नुसार वेगवेगळ्या असतात. व त्यामुळे कोणाकोणामध्ये काहीच लक्षणे दिसत नाहीत तर कोणामध्ये खूपच Complications निर्माण होवू शकतात.


CT value ही प्रामुख्याने viral load किती आहे ते सांगते. कोविड किती घातक ठरु शकतो हे नाही. त्यामुळे ICMR ने RT--PCR च्या रिपोर्ट मध्ये CT value देण्यास परवानगी दिलेली नाही.


 TrueNAT test

----------------------

१) हे मशिन गोव्यातील Malbio Diagnostic या कंपनीद्वारे बनवले आहे.


२) हे मशिन पूर्वी TB ची टेस्ट करण्यासाठी वापरले जात होते. अलिकडेच ICMR ने COVID 19 टेस्ट करण्यासाठी या मशिनला परवानगी दिली आहे.


३) हे मशिन छोट्या आकाराचे असून ब्रिफकेस मधून कोठेही घेवून जाता येवू शकते.


४) हे मशिन बॅटरीवर चालते एकदा बॅटरी चार्ज केली की १० तासांपर्यंत चालू शकते.


५) या मशिन मध्ये एका वेळी एकच टेस्ट करता येते. मशिन जर ४ स्लॉटचे असेल तर जास्तीत जास्त ४ टेस्ट एका वेळी करता येवू शकतात. ८ तासाच्या शिफ्टमध्ये जास्तीत जास्त ४५ टेस्ट होवू शकतात.


६) दुर्गम भागात जिथे मोठ्या लॅबची संख्या कमी आहे व जेथून स्वॅब घेवून RT--PCR साठी मोठ्या लॅबमध्ये पाठवणे हेदेखील मुश्किल असते अशा ठिकाणी प्रामुख्याने हे मशिन वापरले जाते.


७) या तपासणी मध्येही RT--PCR प्रमाणे विषाणूचा Genome हा Amplify केला जातो. त्यामुळे यामध्येही स्वॅबमधील विषाणूंचे प्रमाण कमी असले तरी टेस्ट रिपोर्ट अचूक येतो.


८) या तपासणीत मुख्यत: कोरोना विषाणूचा E Gene व विषाणूच्या RNA मध्ये असणारे RdRp हे Enzyme शोधले जाते.


९) ही तपासणी RT--PCR पेक्षा बऱ्याच जलद होते ( अर्धा ते एक तासात ) तसेच या तपासणीसाठी लागणारा खर्चही कमी असतो. (१२०० ते १३०० रुपये) तसेच ही  तपासणी करायला सोपी आहे व त्यासाठी खास प्रशिक्षित व्यक्तीची गरज लागत नाही.


१०) असे असले तरी या मशिनची किंमत जादा असल्याने (६.५ ते १२ लाख ) व पुरवठा कमी असल्याने हे मशिन अजून सगळीकडे उपलब्ध नाही आहे.


Antibody Test

-----------------------

१) शरीरात एखादा Antigen ( बाहेरचा कोणताही सजीव घटक जसे bacteria, virus इत्यादी ) गेल्यावर त्यांच्याशी लढण्यासाठी जे घटक शरीरामार्फत तयार केले जातात त्यांना Antibody म्हणतात.


२) Antibody Test ही मुख्यतः पूर्वी होऊन गेलेल्या आजाराची माहिती सांगते.


३) Infection झाल्यानंतर शरीरात Antibodies तयार व्हायला साधारण १ ते २ आठवडे इतका कालावधी लागतो. त्यामुळे कोविड निदानासाठी या तपासणीचा कोणताही उपयोग होत नाही.


४) सर्वच लोकांना कोविडमध्ये लक्षणे निर्माण होतील असे नाही. अशावेळी किती लोकांना हा आजार होवून गेला हे लक्षात येण्यासाठी व त्यावरुन या आजाराचा मृत्यूदर निश्चित करण्यासाठी प्रामुख्याने या तपासणीचा उपयोग होतो.


HRCT

----------

१) ही चाचणी म्हणजे छातीचा CT scan असतो. 


२) ही चाचणी कोविड निदानासाठी शासनातर्फे जरी ग्राह्य धरली जात नाही.


३) तरीही लक्षणे सुरु होवून ४ ते ५ दिवसांनंतर रोगाचा शरीरातील प्रादुर्भाव वाढल्यास  रोगनिदानासाठी तसेच न्युमोनियाची तीव्रता व फुफ्फुसांची कार्यक्षमता  समजण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो.


४) RT--PCR च्या तुलनेत याचा रिपोर्ट लगेच मिळत असल्याने तसेच न्युमोनियाची तीव्रता लक्षात येत असल्याने याचा कोविड उपचारासाठी चांगला उपयोग होतो.


५) RT--PCR प्रमाणे याचा रिपोर्ट ही अधिक खात्रीशीर व अचूक असतो. तसेच यावरुन पेशंटच्या शरीरात सुधारणा होवू शकते की पेशंटची स्थिती आणखी बिघडू शकते याचेही याचेही अचूक निदान करता येते.


६) लक्षणे दिसायला लागल्यानंतर पहिल्या ४ दिवसांत HRCT हा इतकी sensitive नसते त्यामुळे ५०% कोविड पॉझिटिव्ह पेशंट मध्ये HRCT चा रिपोर्ट नॉर्मल येण्याची शक्यता असते. पण त्यानंतर HRCT ही Highly sensitive म्हणजेच एकदम अचूक असते. 


७) HRCT च्या रिपोर्टमध्ये खालीलप्रमाणे लक्षणे दिसू शकतात


a.) सुरवातीला ( कोविड लक्षणे सुरु झाल्यानंतर ७ दिवसांमध्ये ) -- Ground Glass Opacity (GGO)


b.) ७ दिवसानंतर न्युमोनिया वाढल्यास ---

1. GGO वाढणे

2. Crazy paving pattern

3. Consolidation

4. Fibrosis


८) HRCT Score

------------------------

a.) न्युमोनिया हा फुफ्फुसांमध्ये किती प्रमाणात वाढला आहे हे समजण्यासाठी HRCT मध्ये Score दिला जातो.


b.) हा स्कोर 0 ते 25 या दरम्यान असतो. 0 स्कोर याचा अर्थ फुफ्फुसांत न्यूमोनिया अजिबात पसरलेला नाही असा होतो तर 25 स्कोर म्हणजे न्यूमोनिया फुफ्फुसांत सर्वत्र पसरलेला आहे असा अर्थ होतो. 


c.) 25 पैकी स्कोर असताना 


1) कमी प्रमाणातील न्यूमोनिया -- 12 पेक्षा कमी स्कोर असणे.


2) मध्यम न्यूमोनिया -- 12 ते 18 स्कोर असणे.


3) तीव्र स्वरुपाचा न्यूमोनिया -- 18 पेक्षा जास्त स्कोर असणे.


d.) फुफ्फुसे किती टक्के बाधित झाली आहेत हे कळण्यासाठी HRCT Score ला ४ ने गुणले जाते. पण ते दरवेळी बरोबर येईलच असे सांगता येत नाही.


e.) बऱ्याच रिपोर्ट मध्ये HRCT Score हा ४० पैकी दिला जातो त्यावेळी वरील दोन्ही नियम लागू पडत नाहीत.


९) पेशंटची न्यूमोनिया आणखी वाढू शकतो की कमी होवू शकतो हे कळण्यासाठी HRCT सोबतच C Reactive Protein,

 serum ferritin, lymphocytes या तपासण्या करणेही गरजेचे असते.


१०) X रे मध्ये कोविड ची सुरवातीची GGO सारखी लक्षणे दिसत नाहीत त्यामुळे X रे चा कोविड निदानासाठी हवा तितका उपयोग होत नाही.


कोविड टाईम लाईन

-------------------------

कोविड मध्ये कोणत्या दिवशी साधारण कोणत्या गोष्टी होतात हे आता पाहू.


दिवस ० -- जंतूसंसर्ग


दिवस ५ -- लक्षणे दिसण्यास सुरुवात


दिवस १ ते २८ -- RNA व Antigen पॉझिटिव्ह


दिवस २८ -- RNA व Antigen निगेटिव्ह


दिवस ० ते ७ -- फक्त RT--PCR टेस्ट पॉझिटिव्ह


दिवस ९ -- HRCT मध्ये लक्षणे दिसतात


दिवस ७ -- IgM Antibody पॉझिटिव्ह


दिवस १४ -- IgG Antibody पॉझिटिव्ह


दिवस २१ -- IgM Antibody निगेटिव्ह


दिवस १४ ते २१ -- रोगाचा लक्षणे कमी होण्याचा टप्पा पण तरीही इतरांना जंतूसंसर्ग करु शकतो.


दिवस २१ ते २८ -- RT--PCR

कधी कधी पॉझिटिव्ह येवू शकते पण इतरांना जंतूसंसर्ग होत नाही.