सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

समजूत आपली

 

मागे - पुढे




गेल्या भागात तुम्ही वाचलंत की ... असं सांगण्यापेक्षा सरळ 14.09.2020 रोजी सकाळी पडलेले स्वप्नंच सांगतो. ते असं होतं. पुढच्या बाजुला माझ्या घरासमोरील प-यात ईशान्य दिशेला काही लोक बांधकाम करायला उतरलेयत. काही जण वरच्या बाजुच्या शिरधनकरांच्या बागेत उभे आहेत. प-यातला एकजण मला त्याच्यापुढयात बोट दाखवून विचारतो की तिथे चि-याची एक लाईन वरपर्यंत उठवूया काय ? का कोण जाणे, पण मला ती जिवंत माणसे वाटत नाहीत. ती भूते असावीत असं त्यांच्या देहबोलीवरून वाटतं. तरीही मी त्यांना सांगतो , लगतचा हिस्सेदार बोंब मारील त्यामुळे तिथे काय करता येणार नाही. एवढयात बागेतला एकजण माझ्या अंगणात येऊन विचारतो की मग इथून लाईन टाकूया का ? मी सांगतो , हे आमचं आहे , इथे तर काहीच करता येणार नाही . स्वप्नं इथेच संपलं. आता हे तर स्वप्नंच होतं. पण ते विचित्रच होतं. सकाळपासूनच माझ्या मनात काय होईल काय नाही याचेच विचार येत होते.... आणि शेवटी ... शेवटी कसलं सकाळी दहा वाजताच पेटलं की राव ! अगदी जोरदार ! वणवा लागला ! आग भडकली ! कुठे म्हणता ? अहो, शेजारीच . उर्मीच्या नव्याने बांधल्या जात असलेल्या घरात ! आगीचा बंब नका आणू मध्ये. ती आग वेगळी . ती काडीने लावावी लागते. ही काडी लावल्याने लागलेली आग नाही. फार तर ती काडी केल्याने लागलेली आग म्हणता येईल. कोणी केली माहीत नाही , पण उर्मी आणि तिच्या जाऊबाईत कोणी तरी काडी केली. आग लावली. जोरदार भांडण पेटलं. आख्खा दिवस त्यातच गेला. अर्थात, बाहेरचा कोणीच मध्ये पडला नाही. कारण एक तर घर बांधण्यापूर्वी पुढे काय वाद होतील हे जाणून आपसात पुरेशी बोलणी केलेली नसावीत आणि त्यासाठी बाहेरच्या कोणाला चर्चेत सहभागीही करून घेण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे कसलीच माहिती बाहेरच्या कोणाला नव्हती. मग कसे कोण मध्ये पडणार ? तरीही आम्ही जाणार होतो पण सायंकाळी चार वाजता एकदाचं ते भांडण मिटलं. आम्ही निश्वास सोडला. शेवटी हे सगळे आपलेच ! 


      त्यानंतर तिस-याच दिवशी म्हणजे दि. 17 रोजी आम्हां दोघांना दोन स्वप्नं पडली. तिच्या स्वप्नात माझी आई आणि माझ्या स्वप्नात माझे वडील आले ! माझी आई कोणती तरी दोन ठिकाणं बघण्यासाठी कार आणायला सांगत होती तर माझे वडील घाबरलेले दिसत होते. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्यांनी मला खुणा करीत पुढच्या बाजुला रस्त्याच्या दिशेने बोट दाखवलं. मी तिकडे बघितलं तर अगदी बंदूसारखाच दिसणारा , त्याच्यासारखीच सफेद पँट व फिकट गुलाबी रंगाचा हाफ शर्ट घातलेला व पांढरी टोपी घातलेला माणूस देवळाच्या कोप-यावर मोटरसायकल चालवत येतांना दिसला ! स्वप्नं तिथेच संपलं. आज सर्वपित्री अमावास्या ! आजच माझे आई बाबा आमच्या दोघांच्या स्वप्नात का बरे आले असतील ?.....


गेले दोन तीन दिवस रात्री धुव्वाधार पाऊस पडतोय. विशेषत: पहाटे ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत प्रचंड पाऊस पडतोय. त्यानंतर नेमके पंधरा मिनिटांनी नळाला पाणी येतं. मागे जाऊन ते भरावं लागतं.  तेव्हा एक तर पायातून पाणी शोषले जाते आणि त्याचवेळी हवेतला पावसाळी गारवा बाधीत करीत असतो. त्यातच आसपास कोरोनाचा विळखा वाढतोय. कोरोनापेक्षा कोरोनाची पसरलेली भीतीच जास्त भयानक आहे. तसं 18 तारीखच्या संध्याकाळपर्यंत सगळंं ठीक होतं. पण रात्री दहा वाजता अंगणात फिरून पाय मोकळे करावेत , असा विचार अचानकच मनात आला. पाऊसही नव्हता. अंगण सुके दिसत होते. पाच दहा मिनिटे फिरलो असेन , अचानक कमरेत लटका पडतोय की काय असे दोनदा वाटले ! म्हटले बघुया परत काय तसे जाणवते काय , म्हणून पुन्हा फिरू लागलो. पण तसे काही जाणवले नाही. अर्धा तास फिरलो आणि मग मात्र पाठीचा कणा दुखू लागला. तसा मी घरात आलो. रात्री हिने कण्याला बाम लावला. थोडं बरं वाटलं. पण सकाळी पाठ आणि डोकंही दुखू लागलं. 19 तारीख उजाडली आणि त्रास वाढलाच. घसा खवखऊ लागला. डोळयातून गरम पाणी आले. त्यातच मेहुण्याच्या कामासाठी मायलेक स्टेट बँकेत गेलेली. शेजारच्या निलेशला माझ्या सोबतीला ठेवून गेलेले. मी त्याच्याशी तीन तास गप्पा मारीत बसलो. तो बिचारा बसून राहिला. जेवायलाही घरी जाईना. तेवढयात संत्या झोपून राहिलाय असा फोन त्याच्या घरातून आला. तो बघून आला तर संत्यालाही माझ्यासारखाच त्रास होत होता. मग निलेश म्हणाला मी डाॅक्टरकडे जातोय. काकाचा नंबर लावतो. तुमचा पण लाऊ का ? मी म्हटलं संत्याबरोबरच आमचा दोघांचाही लाव. तो बिचारा नंबर लावायला गावातल्या डाॅक्टरकडे गेला. तेवढयात ही लोकं आलीत. ही आली ती थेट घरात गेली. मी तिला डाॅक्टरकडे जायचंय म्हणून सांगितलं , तशी ती जेवणाची घाई करू लागली. तेवढयात तिला पिवळया पिशवीची आठवण झाली तशी ती एकदम टेंशनवर आली. सैरावरा होऊन पिशवी शोधू लागली. पिशवीत चार बँक पासबूक्स , हिचा फोन व मुलाचे पाकीटही होते. मी हिच्या नंबरवर फोन लावला. पण तो कोरोनाची कँसेट लागून बंद व्हायला लागला. इकडे निल्याचा डाॅक्टरकडून फोन आला की दहावा नंबर आत गेेलाय. तुम्ही या.  ही रडकुंडीस आलेली. मुलगा गाडी काढीत असलेला आणि मी दोघांच्यामध्ये साकटलेला ! ती पिशवी बाजारातच विसरली हे नक्की झाले तसा मी हिला धीर दिला आणि मुलगा आम्हांला डाॅक्टरकडे सोडून पिशवी शोधायला पुढे जाईल असे सांगितले. मुलाने तसे केले. मला डाॅक्टरनी तपासले , दोन इंजेक्शन्स दिली , गोळ्या लिहून दिल्या. ऑक्सीजन लेव्हल चेक केली व आणखी तीन दिवस ती लेव्हल चेक करायला या म्हणून सांगितले. सगळे टेंशनच आहे , पण टेंशन घेऊन उपयोगाचेही नाही. मी बाहेर येऊन बसलो. तेवढयात मुलगा आला . तो म्हणाला पिशवी सापडली नाही. मी म्हटले मग पोलीसांत तक्रार करावी लागेल. तो म्हणाला ती पण करून आलोय. तेवढयात ही बाहेर आली. हिलाही मुलाने तसेच सांगितले. आम्ही तिघंही घरी आलो तसा मुलगा खिडकीकडे बोट दाखवून हिला म्हणाला , रडू नकोस, ती बघ खिडकीला पिशवी लावलीय ! कधी गंमत करायची हे अजूनही मुलाला कळत नाही. जाऊ दे. त्याने न जेेवता धावपळ केली , हेही कमी नव्हे.  मग माझ्या गोळया सुरू झाल्या. दुस-याच दिवशी म्हणजे 20 तारीखला दुपारपासून मला बरे वाटू लागलेय. 


20 तारीखला दुपारी अंकीत माईणचा मेसेज आला. मग बोलणे सुरू झाले. अंकीतला मी प्रथम क्वोरावर भेटलो. तिथून  मराठी ब्लागर्सचा ग्रूप बनवायचा का या त्याच्या प्रश्नाला मी चटकन हो कळवले होते. मग त्यांने अनुदिनीसंवाद हा ग्रूप फेसबूकवर बनवला. मी आँनलाईन पसारा खूप वाढवला. पण मी सगळं चाचपडत शिकता शिकता केलंय. कुठला कोर्स , पुस्तके , कोणाचं मार्गदर्शन हे मला लाभलं नाही. मी रत्नागिरीत शोध घेतला नाही असंही नाही. पण ते सगळं शक्य झालं नाही. अपुरी साधनसामग्री , कौटुंबिक खर्च व विशेषत: नाउमेद करणारं घरातलंच वादग्रस्त वादळी वातावरण यातून सर्च सुरू ठेवून शिकता शिकता नऊ ब्लाग केले. त्यावर प्रचंड व चांगलंही लेखन केलं. पण मी पडलो कारकून . क्लेरिकल बाजूवाला. माझी टेक्नीकल बाजू लंगडीच. कित्येक तांत्रिक गोष्टी डोक्यावरून जातात. माझं इंग्रजी चांगलं असलं तरी शेवटीे अमेरिकन इंग्रजीतल्या तांत्रिक बाबी समजायला मला कठीण जातात. अशा अवस्थेत एक मराठी आणि आठ इंग्रजी ब्लाग उभे केले खरे, पण व्यावसायिक बाजूकडे लक्ष देणे शक्य झाले नाही. तेव्हा तर नोकरी होती. जबाबदारी  होती. रिटायर्ड होऊनही निवांतपणा लाभला नाहीच. घरातलं वातावरण पूर्वीपेक्षा अधिक सतत तणावग्रस्तच राहिलेलं. त्यातून वेळ काढीत काढीत मन लावण्याचा प्रयत्न करतो आहे. अंकीतला मी याची थोडक्यात कल्पना दिली आहे. अंकीत रत्नागिरीतलाच असून आमचा विद्यार्थीच निघाला.  त्याने मला मदत करतो म्हणून सांगितले आहे. अंकीतशी बोलतानाच माझ्या लक्षात आले की डाॅक्टरकडे चेकींगसाठी जायचे आहे. त्यामुळे मला बोलणे थांबवावे लागले.  मी त्याला साँरी म्हणालो . मी डाॅक्टरकडे जाऊन आलो. त्यांनी ऑक्सीजन लेव्हल चेक केली. तीही खूपच चांगली आहे. म्हणजे सत्त्याण्णव वर बराच काळ स्थिर होती. मग 98 झाली. मी मुलाच्या गाडीवरून घरी आलो.  त्याच संध्याकाळी मला जनावर चावता चावता वाचलो ! ही खालच्या बागेत गेली तेव्हा मीही मागच्या बाजूला जास्वंदीचे कळे काढत होतो. हिला जास्त पुढे जाऊ नको म्हणून दोनदा सांगितले. पायाखाली बघून चाल, रान वाढले आहे असेही सांगितले. पण बायकोच ती , ती काय मला भीक घालतेय ! ती पुढेच गेली. मी स्वत:शीच पुटपुटत आमच्या घराच्या मागे गेलो . कंपाऊंडच्या भिंतीवर चढणा-या जनावराचा करडा रंग बेमालूमपणे पावसामुळे हिरवट झालेल्या भिंतीत मिसळून गेलेला असल्याने मला ते जनावर सुरूवातीला जाणवलेच नाही. मला बघून त्याने हालचाल केली तसे ते माझ्या पायाजवळच पडले. तेव्हा कुठे लक्षात येऊन मी पाय मागे घेतले आणि चार पावलं मागे आलो. नशीब तिथे दोन दगड होते . त्याच्याखाली ते शिरले. मी ते कुठे जात नाही ना याची खात्री पुन्हा एकदा त्याच्या जवळ जाऊन केली. पण ते दगड आणि कंपाऊंड यांच्यामधल्या छोटयाश्या जागेत ते वळवळत होते. मी संत्याच्या घराकडे पाहिले तर त्याच्याकडे सत्त्या उभा दिसला. मी त्याला आधी संत्याला बरे वाटले का ते विचारले. तो होय म्हणाला. तेवढयात संत्याच दारात आला. मी त्यालाही विचारून खात्री केली. मग त्याला काठी आणायला सांगितली. जनावराचे वर्णन सांगितले. तसा तो काठी घेऊन आला. तोपर्यंत ते ऐकून ही धावत आली. पुन्हा स्वभावानुसार पँनिक होऊन चौकशी करू लागली. मी तिला विचारले मग देऊया का सोडून त्याला ? तशी ती म्हणाली नको. मारूदे. मग संत्याने त्याला त्या दगडाच्या कपारीतही अचूक टिपलं आणि मारून वरच्या बागेत जाळलंही.  माझ्या हातात त्याने काठी देऊन ठेवली होती. पण मला ती चालवावी लागलीच नाही . इतक्या शिताफीने त्याने काम तमाम केलं. आमच्याकडे कधीही जनावर आलं तर मी त्यालाच बोलवतो. मला त्या जनावराचं वाईट वाटलं पण पुढे ते कुणाच्याही जिवावर बेतू शकलं असतं , हेही खरेच ! An hectic day  हा हायस्कूलमधला धडा मला आज आठवला ! खरंच आजचा दिवस तसा दगदगीचा आणि धावपळीचा गेला. दुपारी पिशवी भेटली आणि रात्री मला जवळजवळ बरे वाटू लागले , हेच विशेष समाधान ! 


21.09.2020 

पण काल रात्री पहाटेपर्यंत दोघांनाही झोप आली नाही. साडेतीननंतर मात्र मी झोपलो. सकाळी साडेआठला जाग आली ! तरी झोप डोळयांवर होतीच. आज अनेक दिवसांनी पूर्वीच्या वेळेवर म्हणजे साडेआठला शौचाची जाणीव झाली. जाऊन आलो. शवासन केले. सकाळपासून डावी नाकपुडी चोंदलेली होती. घामही येत होता. नाश्ता केला. गोळया घेतल्या. घरातला कचरा काढला. तसे जरा हलके वाटले. चोंदलेली नाकपुडी सैल झाली. नुकताच आलेला दै. सकाळ (daily Sakal) वाचायला सुरूवात केली. तेवढयात सतिश आला. सतिश ही उर्मीची देणगी आहे. सतिश उर्मीच्या घराचं सद्याचं काम पाहतोय. मी त्याला माझ्या घराच्या गेली सहा वर्षे या ना त्या कारणाने पडून राहिलेल्या नुतनीकरणासाठी बोलावलंय. आम्ही चर्चा सुरू केली तेवढयात विलास भाटकरची आई आली. विलासने तो रिटायर होत असल्याने खालीलप्रमाणे मला व्हॉट्सॲपला मेसेज पाठवला होता. तो मेसेज त्याच्या आईला का दाखवलास नाही म्हणून त्याने मला काल फोन करून विचारले होते व त्याची आई माझ्याकडे येईल म्हणून सांगितले होते. मीही तिला फोन करून बोलावले होते. इतके सगळे झाल्यावर ती आली तशी मी तिला तो मेसेज दाखवला . तिने पाहिला आणि काही न बोलता फोन माझ्याकडे दिला. ती विलासजवळ काय ते बोलणार असेल अशी समजूत करीत मी पुन्हा सतिशबरोबर चर्चा सुरू केली. त्याच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. काही त्याला समजावून सांगितल्या. 



(क्रमश:)

                          ....................



 पुढे


गेल्या भागात तुम्ही वाचलंत की ... असं सांगण्यापेक्षा सरळ 14.09.2020 रोजी सकाळी पडलेले स्वप्नंच सांगतो. ते असं होतं. पुढच्या बाजुला माझ्या घरासमोरील प-यात ईशान्य दिशेला काही लोक बांधकाम करायला उतरलेयत. काही जण वरच्या बाजुच्या शिरधनकरांच्या बागेत उभे आहेत. प-यातला एकजण मला त्याच्यापुढयात बोट दाखवून विचारतो की तिथे चि-याची एक लाईन वरपर्यंत उठवूया काय ? का कोण जाणे, पण मला ती जिवंत माणसे वाटत नाहीत. ती भूते असावीत असं त्यांच्या देहबोलीवरून वाटतं. तरीही मी त्यांना सांगतो , लगतचा हिस्सेदार बोंब मारील त्यामुळे तिथे काय करता येणार नाही. एवढयात बागेतला एकजण माझ्या अंगणात येऊन विचारतो की मग इथून लाईन टाकूया का ? मी सांगतो , हे आमचं आहे , इथे तर काहीच करता येणार नाही . स्वप्नं इथेच संपलं. आता हे तर स्वप्नंच होतं. पण ते विचित्रच होतं. सकाळपासूनच माझ्या मनात काय होईल काय नाही याचेच विचार येत होते.... आणि शेवटी ... शेवटी कसलं सकाळी दहा वाजताच पेटलं की राव ! अगदी जोरदार ! वणवा लागला ! आग भडकली ! कुठे म्हणता ? अहो, शेजारीच . उर्मीच्या नव्याने बांधल्या जात असलेल्या घरात ! आगीचा बंब नका आणू मध्ये. ती आग वेगळी . ती काडीने लावावी लागते. ही काडी लावल्याने लागलेली आग नाही. फार तर ती काडी केल्याने लागलेली आग म्हणता येईल. कोणी केली माहीत नाही , पण उर्मी आणि तिच्या जाऊबाईत कोणी तरी काडी केली. आग लावली. जोरदार भांडण पेटलं. आख्खा दिवस त्यातच गेला. अर्थात, बाहेरचा कोणीच मध्ये पडला नाही. कारण एक तर घर बांधण्यापूर्वी पुढे काय वाद होतील हे जाणून आपसात पुरेशी बोलणी केलेली नसावीत आणि त्यासाठी बाहेरच्या कोणाला चर्चेत सहभागीही करून घेण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे कसलीच माहिती बाहेरच्या कोणाला नव्हती. मग कसे कोण मध्ये पडणार ? तरीही आम्ही जाणार होतो पण सायंकाळी चार वाजता एकदाचं ते भांडण मिटलं. आम्ही निश्वास सोडला. शेवटी हे सगळे आपलेच ! 


      त्यानंतर तिस-याच दिवशी म्हणजे दि. 17 रोजी आम्हां दोघांना दोन स्वप्नं पडली. तिच्या स्वप्नात माझी आई आणि माझ्या स्वप्नात माझे वडील आले ! माझी आई कोणती तरी दोन ठिकाणं बघण्यासाठी कार आणायला सांगत होती तर माझे वडील घाबरलेले दिसत होते. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्यांनी मला खुणा करीत पुढच्या बाजुला रस्त्याच्या दिशेने बोट दाखवलं. मी तिकडे बघितलं तर अगदी बंदूसारखाच दिसणारा , त्याच्यासारखीच सफेद पँट व फिकट गुलाबी रंगाचा हाफ शर्ट घातलेला व पांढरी टोपी घातलेला माणूस देवळाच्या कोप-यावर मोटरसायकल चालवत येतांना दिसला ! स्वप्नं तिथेच संपलं. आज सर्वपित्री अमावास्या ! आजच माझे आई बाबा आमच्या दोघांच्या स्वप्नात का बरे आले असतील ?.....


गेले दोन तीन दिवस रात्री धुव्वाधार पाऊस पडतोय. विशेषत: पहाटे ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत प्रचंड पाऊस पडतोय. त्यानंतर नेमके पंधरा मिनिटांनी नळाला पाणी येतं. मागे जाऊन ते भरावं लागतं.  तेव्हा एक तर पायातून पाणी शोषले जाते आणि त्याचवेळी हवेतला पावसाळी गारवा बाधीत करीत असतो. त्यातच आसपास कोरोनाचा विळखा वाढतोय. कोरोनापेक्षा कोरोनाची पसरलेली भीतीच जास्त भयानक आहे. तसं 18 तारीखच्या संध्याकाळपर्यंत सगळंं ठीक होतं. पण रात्री दहा वाजता अंगणात फिरून पाय मोकळे करावेत , असा विचार अचानकच मनात आला. पाऊसही नव्हता. अंगण सुके दिसत होते. पाच दहा मिनिटे फिरलो असेन , अचानक कमरेत लटका पडतोय की काय असे दोनदा वाटले ! म्हटले बघुया परत काय तसे जाणवते काय , म्हणून पुन्हा फिरू लागलो. पण तसे काही जाणवले नाही. अर्धा तास फिरलो आणि मग मात्र पाठीचा कणा दुखू लागला. तसा मी घरात आलो. रात्री हिने कण्याला बाम लावला. थोडं बरं वाटलं. पण सकाळी पाठ आणि डोकंही दुखू लागलं. 19 तारीख उजाडली आणि त्रास वाढलाच. घसा खवखऊ लागला. डोळयातून गरम पाणी आले. त्यातच मेहुण्याच्या कामासाठी मायलेक स्टेट बँकेत गेलेली. शेजारच्या निलेशला माझ्या सोबतीला ठेवून गेलेले. मी त्याच्याशी तीन तास गप्पा मारीत बसलो. तो बिचारा बसून राहिला. जेवायलाही घरी जाईना. तेवढयात संत्या झोपून राहिलाय असा फोन त्याच्या घरातून आला. तो बघून आला तर संत्यालाही माझ्यासारखाच त्रास होत होता. मग निलेश म्हणाला मी डाॅक्टरकडे जातोय. काकाचा नंबर लावतो. तुमचा पण लाऊ का ? मी म्हटलं संत्याबरोबरच आमचा दोघांचाही लाव. तो बिचारा नंबर लावायला गावातल्या डाॅक्टरकडे गेला. तेवढयात ही लोकं आलीत. ही आली ती थेट घरात गेली. मी तिला डाॅक्टरकडे जायचंय म्हणून सांगितलं , तशी ती जेवणाची घाई करू लागली. तेवढयात तिला पिवळया पिशवीची आठवण झाली तशी ती एकदम टेंशनवर आली. सैरावरा होऊन पिशवी शोधू लागली. पिशवीत चार बँक पासबूक्स , हिचा फोन व मुलाचे पाकीटही होते. मी हिच्या नंबरवर फोन लावला. पण तो कोरोनाची कँसेट लागून बंद व्हायला लागला. इकडे निल्याचा डाॅक्टरकडून फोन आला की दहावा नंबर आत गेेलाय. तुम्ही या.  ही रडकुंडीस आलेली. मुलगा गाडी काढीत असलेला आणि मी दोघांच्यामध्ये साकटलेला ! ती पिशवी बाजारातच विसरली हे नक्की झाले तसा मी हिला धीर दिला आणि मुलगा आम्हांला डाॅक्टरकडे सोडून पिशवी शोधायला पुढे जाईल असे सांगितले. मुलाने तसे केले. मला डाॅक्टरनी तपासले , दोन इंजेक्शन्स दिली , गोळ्या लिहून दिल्या. ऑक्सीजन लेव्हल चेक केली व आणखी तीन दिवस ती लेव्हल चेक करायला या म्हणून सांगितले. सगळे टेंशनच आहे , पण टेंशन घेऊन उपयोगाचेही नाही. मी बाहेर येऊन बसलो. तेवढयात मुलगा आला . तो म्हणाला पिशवी सापडली नाही. मी म्हटले मग पोलीसांत तक्रार करावी लागेल. तो म्हणाला ती पण करून आलोय. तेवढयात ही बाहेर आली. हिलाही मुलाने तसेच सांगितले. आम्ही तिघंही घरी आलो तसा मुलगा खिडकीकडे बोट दाखवून हिला म्हणाला , रडू नकोस, ती बघ खिडकीला पिशवी लावलीय ! कधी गंमत करायची हे अजूनही मुलाला कळत नाही. जाऊ दे. त्याने न जेेवता धावपळ केली , हेही कमी नव्हे.  मग माझ्या गोळया सुरू झाल्या. दुस-याच दिवशी म्हणजे 20 तारीखला दुपारपासून मला बरे वाटू लागलेय. 


20 तारीखला दुपारी अंकीत माईणचा मेसेज आला. मग बोलणे सुरू झाले. अंकीतला मी प्रथम क्वोरावर भेटलो. तिथून  मराठी ब्लागर्सचा ग्रूप बनवायचा का या त्याच्या प्रश्नाला मी चटकन हो कळवले होते. मग त्यांने अनुदिनीसंवाद हा ग्रूप फेसबूकवर बनवला. मी आँनलाईन पसारा खूप वाढवला. पण मी सगळं चाचपडत शिकता शिकता केलंय. कुठला कोर्स , पुस्तके , कोणाचं मार्गदर्शन हे मला लाभलं नाही. मी रत्नागिरीत शोध घेतला नाही असंही नाही. पण ते सगळं शक्य झालं नाही. अपुरी साधनसामग्री , कौटुंबिक खर्च व विशेषत: नाउमेद करणारं घरातलंच वादग्रस्त वादळी वातावरण यातून सर्च सुरू ठेवून शिकता शिकता नऊ ब्लाग केले. त्यावर प्रचंड व चांगलंही लेखन केलं. पण मी पडलो कारकून . क्लेरिकल बाजूवाला. माझी टेक्नीकल बाजू लंगडीच. कित्येक तांत्रिक गोष्टी डोक्यावरून जातात. माझं इंग्रजी चांगलं असलं तरी शेवटीे अमेरिकन इंग्रजीतल्या तांत्रिक बाबी समजायला मला कठीण जातात. अशा अवस्थेत एक मराठी आणि आठ इंग्रजी ब्लाग उभे केले खरे, पण व्यावसायिक बाजूकडे लक्ष देणे शक्य झाले नाही. तेव्हा तर नोकरी होती. जबाबदारी  होती. रिटायर्ड होऊनही निवांतपणा लाभला नाहीच. घरातलं वातावरण पूर्वीपेक्षा अधिक सतत तणावग्रस्तच राहिलेलं. त्यातून वेळ काढीत काढीत मन लावण्याचा प्रयत्न करतो आहे. अंकीतला मी याची थोडक्यात कल्पना दिली आहे. अंकीत रत्नागिरीतलाच असून आमचा विद्यार्थीच निघाला.  त्याने मला मदत करतो म्हणून सांगितले आहे. अंकीतशी बोलतानाच माझ्या लक्षात आले की डाॅक्टरकडे चेकींगसाठी जायचे आहे. त्यामुळे मला बोलणे थांबवावे लागले.  मी त्याला साँरी म्हणालो . मी डाॅक्टरकडे जाऊन आलो. त्यांनी ऑक्सीजन लेव्हल चेक केली. तीही खूपच चांगली आहे. म्हणजे सत्त्याण्णव वर बराच काळ स्थिर होती. मग 98 झाली. मी मुलाच्या गाडीवरून घरी आलो.  त्याच संध्याकाळी मला जनावर चावता चावता वाचलो ! ही खालच्या बागेत गेली तेव्हा मीही मागच्या बाजूला जास्वंदीचे कळे काढत होतो. हिला जास्त पुढे जाऊ नको म्हणून दोनदा सांगितले. पायाखाली बघून चाल, रान वाढले आहे असेही सांगितले. पण बायकोच ती , ती काय मला भीक घालतेय ! ती पुढेच गेली. मी स्वत:शीच पुटपुटत आमच्या घराच्या मागे गेलो . कंपाऊंडच्या भिंतीवर चढणा-या जनावराचा करडा रंग बेमालूमपणे पावसामुळे हिरवट झालेल्या भिंतीत मिसळून गेलेला असल्याने मला ते जनावर सुरूवातीला जाणवलेच नाही. मला बघून त्याने हालचाल केली तसे ते माझ्या पायाजवळच पडले. तेव्हा कुठे लक्षात येऊन मी पाय मागे घेतले आणि चार पावलं मागे आलो. नशीब तिथे दोन दगड होते . त्याच्याखाली ते शिरले. मी ते कुठे जात नाही ना याची खात्री पुन्हा एकदा त्याच्या जवळ जाऊन केली. पण ते दगड आणि कंपाऊंड यांच्यामधल्या छोटयाश्या जागेत ते वळवळत होते. मी संत्याच्या घराकडे पाहिले तर त्याच्याकडे सत्त्या उभा दिसला. मी त्याला आधी संत्याला बरे वाटले का ते विचारले. तो होय म्हणाला. तेवढयात संत्याच दारात आला. मी त्यालाही विचारून खात्री केली. मग त्याला काठी आणायला सांगितली. जनावराचे वर्णन सांगितले. तसा तो काठी घेऊन आला. तोपर्यंत ते ऐकून ही धावत आली. पुन्हा स्वभावानुसार पँनिक होऊन चौकशी करू लागली. मी तिला विचारले मग देऊया का सोडून त्याला ? तशी ती म्हणाली नको. मारूदे. मग संत्याने त्याला त्या दगडाच्या कपारीतही अचूक टिपलं आणि मारून वरच्या बागेत जाळलंही.  माझ्या हातात त्याने काठी देऊन ठेवली होती. पण मला ती चालवावी लागलीच नाही . इतक्या शिताफीने त्याने काम तमाम केलं. आमच्याकडे कधीही जनावर आलं तर मी त्यालाच बोलवतो. मला त्या जनावराचं वाईट वाटलं पण पुढे ते कुणाच्याही जिवावर बेतू शकलं असतं , हेही खरेच ! An hectic day  हा हायस्कूलमधला धडा मला आज आठवला ! खरंच आजचा दिवस तसा दगदगीचा आणि धावपळीचा गेला. दुपारी पिशवी भेटली आणि रात्री मला जवळजवळ बरे वाटू लागले , हेच विशेष समाधान ! 


21.09.2020 

पण काल रात्री पहाटेपर्यंत दोघांनाही झोप आली नाही. साडेतीननंतर मात्र मी झोपलो. सकाळी साडेआठला जाग आली ! तरी झोप डोळयांवर होतीच. आज अनेक दिवसांनी पूर्वीच्या वेळेवर म्हणजे साडेआठला शौचाची जाणीव झाली. जाऊन आलो. शवासन केले. सकाळपासून डावी नाकपुडी चोंदलेली होती. घामही येत होता. नाश्ता केला. गोळया घेतल्या. घरातला कचरा काढला. तसे जरा हलके वाटले. चोंदलेली नाकपुडी सैल झाली. नुकताच आलेला दै. सकाळ (daily Sakal) वाचायला सुरूवात केली. तेवढयात सतिश आला. सतिश ही उर्मीची देणगी आहे. सतिश उर्मीच्या घराचं सद्याचं काम पाहतोय. मी त्याला माझ्या घराच्या गेली सहा वर्षे या ना त्या कारणाने पडून राहिलेल्या नुतनीकरणासाठी बोलावलंय. आम्ही चर्चा सुरू केली तेवढयात विलास भाटकरची आई आली. विलासने तो रिटायर होत असल्याने खालीलप्रमाणे मला व्हॉट्सॲपला मेसेज पाठवला होता. तो मेसेज त्याच्या आईला का दाखवलास नाही म्हणून त्याने मला काल फोन करून विचारले होते व त्याची आई माझ्याकडे येईल म्हणून सांगितले होते. मीही तिला फोन करून बोलावले होते. इतके सगळे झाल्यावर ती आली तशी मी तिला तो मेसेज दाखवला . तिने पाहिला आणि काही न बोलता फोन माझ्याकडे दिला. ती विलासजवळ काय ते बोलणार असेल अशी समजूत करीत मी पुन्हा सतिशबरोबर चर्चा सुरू केली. त्याच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. काही त्याला समजावून सांगितल्या. 



(क्रमश:)

                          ....................



मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

विचित्र स्वप्ने 2

 आज पुन्हा एकदा पडलेल्या विचित्र स्वप्नांना भेटू. कुणाला अशी स्वप्नें पडत असतील तर त्यांना पडलेल्या स्वप्नांशी काही साधर्म्य आहे का, तेही पाहता येईल. कुणाला हया स्वप्नांचा अर्थ अनुभवास आला आहे का ? हेही पाहता येईल.  



फारच विचित्र आणि भयानक असं पहिलंच स्वप्नं सांगतो. 

06.08.2020

 हाँलमध्ये जिथे पूर्वी देवघर होते , त्या ठिकाणी पूर्व पश्चिम असा लाकडाचा माच असतो. मी त्यावर दक्षिणेकडे तोंड करून बसलेला असतो. अचानक मला लाकडात हालचाल जाणवते. मी लाकडांकडे बघतो  तर त्यांचा रंग काळपट हिरवट दिसतो. माझ्या उजव्या पायापासून केवळ सहा इंचावर मला ती हालचाल वाढल्याचे आणि उष्ण हवेची धग मला जाणवू लागते . तो सर्प असल्याचे माझ्या लक्षात येते. अजून तो लाकडांतून वर येऊन मला चावलेला नाहीय. पण तो माझ्या दिशेने सरकतोय आणि मी स्वत:ला पळ , पळ म्हणून सांगतोय. पण मला उठता येत नाहीय , सरकताही येत नाहीय आणि पळताही येत नाहीय. मी त्या लाकडांनाच चिकटून बसलोय ही जीवघेणी जाणीव होत असतांनाच डोळे उघडले. 

......

09.08.2020

आज दोन स्वप्नें पडली. 


पहिल्यात मी माझ्या पूर्वीच्या कार्यालयात दिसतो. दोन खोल्या दिसतात. एकीत दोन तीन प्रोफेसर्स व दुसरीत कार्यालय . प्रोफेसरांच्या समोर मी उभा असतो. एक जण मला एक आदेश टाईप करून तो मला देतो. हे रजिष्ट्रार मँडमना दाखवू नका , असं एक जण मला सांगतो तर दुसरा हसत हसत म्हणतो की दाखवलात तरी तिला काही कळणार नाही ! डोक्यावरून जाईल तिच्या. तो आदेश म्हणजे मला कुठेतरी स्पर्धेत भाग घेण्याबाबत प्राचार्यांनी केलेली शिफारस असते. तो कागद घेऊन मी हसत हसत बाहेर पडतो आणि तेवढयात मला जाग आली. 


दुस-या स्वप्नात आमच्या जुन्या घरात मी आईसमोर बसलेला दिसतो. वेळ दुपारची असते. मी आईला विचारतो की मी जाड दिसतो की बारीक दिसतो ? आई काही तरी उत्तर देणार असते एवढयाच मला जाग येते . 

........

10.08.2020 

म्हणजे 09.08.2020 ची रात्र. वेळ 12.30 ची. पुन्हा एकदा मला आमचे जुने घर दिसते. मी व पत्नी ओटीवर उभे असतो. इतक्यात मागच्या बाजुचा सीन मला दिसू लागतो. सकाळची वेळ असते.  रमेश हा लहान भाऊ कार घेऊन बाहेर जायला निघतो. त्यांच्या अंगणात त्याचा मोठा भाऊ नरेश त्याची वाट बघत थांबलेला असतो. तो रमेशला काही तरी बोलतो ज्याने रमेश चिडतो व नरेशच्या अंगावर धावून जातो. नरेश जणू याचीच वाट बघत असतो. तो चाकू काढतो व रमेशच्या पोटावर वार करतो. त्यांची आई समोरच असते. आता ती पोलीसांना फोन करा म्हणून आमच्याकडे येईल , आपण तिला तूच तक्रार कर म्हणून सांगूया, असे मी पत्नीला सांगतो आणि इतक्यातच मला जाग येते. 

........

12.08.2020

मी शेजारच्या घरात जातो. वेळ रात्रीची असते. मी प्रवेश करतो तोच टेबलावरून एक कुत्रा शेपटी हलवत खाली उतरतो व माझ्या गळयाला आपली मान मायेने घासतो. मी त्याच्या मानेवरून प्रेमाने हात फिरवतो . तितक्यात माझे लक्ष त्याच्या गळयाकडे जाते . गळयात लोखंडी साखळदंड असतोे. त्याचा हूक काढून मी त्याला बंधनातून मोकळा करतो. असे ते स्वप्नं होते. 


       या स्वप्नातून जाग आली तेव्हा रात्रीचे बरोब्बर अडीच वाजले होते. पुण्यावरून आल्याने माझा मुलगा शेजारच्या घरात क्वारंटाईन आहे व तिथून तो एकटाच त्याच्या कंपनीचे वर्क फ्राँम होम करीत असतो. त्या स्वप्नामुळे मला मुलाची काळजी वाटू लागली. मी पत्नीकडे पाहिले तर ती झोपली होती. मी हळूच उठलो व शेजारच्या अंगणात गेलो इतक्यात आमचा दरवाजा अर्धवट उघडी राहिल्याने वा-यामुळे आपटून आवाज येऊ लागला. त्या आवाजाने पत्नी घाबरेल म्हणून मी धावत घरात आलो. एवढयात पत्नीला जागच आली. मग तिला मुलाला पाहुया म्हणून सांगितले. ती दारावर थांबली. मी पाय-या उतरून शेजारी गेलो. लाईटस् चालूच होते. मी खिडकीवर टकटक केली. हाका मारल्या तरी त्याचा प्रतिसाद मिळेना. शेवटी काचेवर मी जोरात थाप मारली त्या आवाजाला मात्र त्याने प्रतिसाद दिला ! त्याचं काम रात्री तीन चार वाजेपर्यंत चालू असते . पण आज दीड वाजताच संपले होते. लाँग आऊट होऊन तो आतल्या रूममध्ये झोपला होता. पण बाहेरच्या रूममध्ये लाईटस् चालूच राहिल्या होत्या. मी मुलाला सांगितले कालच तुझा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. आपल्या घरात झोप चल. तसा तोही आला व मग आम्ही बोलत राहिलो. चार वाजले तसा मुलगा झोप येत नाही,  ए.सी.तच जाऊन असं म्हणून पुन्हा शेजारच्या घरात झोपला !

..........

16.08.2020

गेले दोन दिवस स्वप्नंच पडले नव्हते. आज पडले.  मी नेहमी सकाळी सहाला उठतो. आज जोरदार पावसामुळे मला सहाला जागच आली नाही. मी पावणेसातला उठलो. उठलो तोच स्वप्नातून जागा होत. स्वप्नात , माझी पत्नी व मुलगा मागच्या अंगणात दक्षिण दिशेला तोंड करून उभे होते. मी व चक्क विलासराव देशमुख दोघे नवीन सफेद लेंग्या सद-यात लगतच्याच घराच्या मागच्या अंगणात एक खताची पिशवी पूर्वेकडून पश्चिमेकडे नेतो. पश्चिमेला दक्षिणोत्तर हिरव्या पानांच्या वनस्पतीच्या एक दोन फुटांच्या रोपांची शेती आहे , तिथपर्यंत ती पिशवी आम्ही दोघे ओढत नेतो. मी पत्नी व मुलाकडे बघून काही तरी बोलतो. विलासराव त्यांचे हुकमी हास्य फेकतात आणि इथेच स्वप्नं संपले !

............

25.08.2020

गेला आठवडाभर एक तर स्वप्नें पडली नाहीत वा आठवणीत राहिली नाहीत. हा आठवडा अगदीच खराब गेला आहे. जीवनाने अक्षरश: रडवलं आहे. पत्नी व मुलगा यांचा तणाव एकाच वेळी हैराण करतो आहे. रात्रीच नव्हे तर दिवसाही झोप नाही. त्यात स्वप्नं कुठलं पडायला आणि पडलं तरी कुठलं आठवायला !

         काल रात्री तणाव थोडा कमी झाला. झोपही बरी लागली. बहुतेक दोन स्वप्नं पडली. दोन्हीही माझ्या माजी सरकारी कार्यालयाशी संबंधित. पण दोन ठिकाणच्या. एक मी मुंबईत रजेवर आहे . मला रत्नागिरीच्या कार्यालयात जाऊन हजर होणे शक्य नाही. तर मुंबईच्या कार्यालयात मला हजर करून घेण्याचा आदेश त्या कार्यालयात संगणकावर लिपिक टाईप करीत असतांना मला दिसतो.  इथे स्वप्नं संपते. 


        दुसरे स्वप्नं रत्नागिरीत मी एका रस्त्यावर चालतो आहे. कार्यालयातील सहकारी श्री. शालिकराम चव्हाण यांच्या घरी मी जात असतो. विशेष म्हणजे ते पूर्वेकडे राहतात , पण मी पश्चिमेकडे जात असतो ! ही उलटी दिशा का तेच समजत नाही.  मी अस्वस्थ मन:स्थितीत आहे. माझे कपडे थोडे अस्ताव्यस्त आहेत. इन केलेले पिवळे शर्ट उजवीकडे पँटमधून थोडेे बाहेर आल्याचे चालता चालता माझ्या लक्षात येते. तेवढयातच अकरा वाजल्याचेही लक्षात येते.  तेव्हा जाणवते की चव्हाण आता ऑफिसला गेले असणार , आता त्यांच्या घरी जाऊन काही उपयोग नाही. त्यांना आधी फोन करूया , असा विचार करतो आणि मला जाग येते. तेव्हा पहाटेचे पाच वाजलेले होते. 

......................

01.09.2020

आज आमच्या जुन्या आँफीसात नार्वेकर बाई तिच्या पूर्वीच्याच खुर्चीत बसलेली आहे. बाजुला विभुते बाई आहे. समोर काटकोनात बादल आहे. मी त्याने दिलेले जीपीएफचे बील तपासत असतो. माझ्या लक्षात येते की, ते बील जीपीएफ बिलाच्या नमुन्याऐवजी आकस्मिक खर्चाच्या बिलांच्या नमुना क्र. 31 मध्ये केलेले आहे . मी बादलला हे सांगायचे ठरवतो , पण त्यापूर्वी जीपीएफ बिलांची फाईल घेऊनच बादलला दाखवावे , असा विचार करतो.  इथेच स्वप्नं संपते ! 


        हे स्वप्नं विचित्र म्हणजे अनेक वर्षे न आलेली नार्वेकर बाई आँफीसात बसून आरामात गप्पा मारतांना दिसते. ती व विभुते त्यांच्याच पूर्वीच्या आस्थापना विभागात तर मी व बादल आमच्याच पूर्वीच्या लेखा विभागात बसलेलो दिसतो.  मी दीड वर्षापूर्वीच रिटायर्ड झालो तरीही मी तिथे कार्यरत व सहकारी बादलला मार्गदर्शन करतांना दिसतो. 


       या स्वप्नाची प्रचिती लगेच आली ! या स्वप्नात संपूर्ण कार्यालयात फक्त चारच माणसे दिसली ! लक्षात घ्या . चार खांदे ! सकाळी 09.15 ला माजी विद्यार्थी व शेजारच्या पेडणेकरांचा जावई निखील शेटये याचा माजी अधिव्याख्याता जयंत शशिकर नांदेडकर यांचे काल रात्री 11.00 वा. निधन झाल्याचा संदेश आला. दुसरा झटका बसला तो माझ्या मेहुण्याचे सासरे वारल्याचा फोन आला तेव्हा. 


           चार खांदे म्हणजे बहुतेक कुणाच्या तरी मरणाच्या बातम्यांचा दिवस दिसतोय ! आतापर्यंत दोन पुरूषांच्या निधनाच्या बातम्या आल्या आहेत. स्वप्नात दोन पुरूष व दोन महिला दिसल्या होत्या. म्हणजे अजून दोन महिलांच्या बातम्या तर येणार नाहीत ना ?


.......................

02.09.2020

काल मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्याने विचित्रच स्वप्नं पडले. आमच्या शेजारी मंदिर आहे . त्याच्या समोरच पिंपळपार आहे. मंदिर परिसर आमच्या अंगणातून स्पष्ट दिसतो. स्वप्नात मी कशाला तरी आमच्या अंगणात येतो. समोर पिंपळाकडे लक्ष जातो. पाहतो तर पिंपळपार ते मंदिराचे कंपाऊंड यादरम्यान आमच्या घराच्या दिशेने असलेल्या कोप-यात मंदिराकडे पाठ करून वीसपंचवीस तरूण दाटीवाटीने पायावर बसलेले होते. ते एकमेकांना डावीउजवीकडे ताकदीने ढकलत होते. सगळेच चिरडले जात होते. गुदमरत होते , पण साखळी तुटत नव्हती. त्यातच माझा मुलगा साधारण उठू पहात होता व त्याची मान थोडी उंच दिसत होती. त्याच्या मानेच्या शिरा टरटरलेल्या एवढया लांबूनही मला दिसल्या. केस पिंजारलेले दिसले. त्यातच मंदिराच्या कोप-यावर आणखी काही मुले हया घाणेरडया प्रकाराला मोठमोठयाने चिअर करत होती. तिकडे त्या मुलांचा जीव जात आला होता तर दहा फुटावरून इकडची मुले मोठमोठयाने हसत होती. त्यांचा सामूहिक आवाज घुमत होता. विचित्र हास्यलहरी निर्माण होत होत्या. हे ऐकून मी मोठयाने ओरडत तिकडे धाव घेतो. मला बघून त्यांचा आवाज अचानक बंदच होतो. ते एकाएकी गायबच होतात. दुसरीकडे एकमेकांना ढकलणारी ती मुलेही त्याच क्षणी गायब होतात. मी मंदिर परिसरात एकटाच उभा असतो , इतक्यात प्रचंड आवाजासह पावसाची सर येते. माझ्यासमोर पिंपळासमोरचा  दक्षिणेच्या कठडयापर्यंतचा मोठा भूभाग धापकन खाली त्याच्यावर काही तरी आपटल्याता आवाज होऊन कलून खचतो ! जमिनीवर कशाचा आघात झाला ते मला कळत नाही. ते भू:स्खलन मी अवाक होऊन बघत राहतो . त्याच वेळी मला जाग आली. मी घडयाळात पाहिले तर दोन वाजत आले होते ! 

...............

05.09.2020

दोन स्वप्ने पडली. एकात मी व आबा शिवलकर मेश्राम साहेबांच्या केबीनमध्ये त्यांच्या टेबलासमोर उभे. पलीकडे साहेबही उभेच असतात. त्यांच्या टेबलावर आमच्या बाजुने दोन वेगवेगळी कागदपत्रे पूर्वपश्चिम खालोखाल ठेवलेली असतात. त्यातील साहेबांच्या बाजुची आबांची कागदपत्रे साहेब बघत असतात. माझी कागदपत्रे त्यांनी पाहिलीत की नंतर पाहणार हे समजत नसते. पण आबांच्या कागदपत्रांपैकी आणखी दोन पेपर्स टेबलवरच असतात. आबा ते हातात घेवून , हे पण साहेबांना दाखवायचे का ? म्हणून मला हळूच विचारतात. मी ते बघतो तर ते आबांचे आधारकार्ड व रेशनकार्ड असते. मी ते दाखवू नका म्हणून सांगतो. त्कडे साहेब उभे राहून आबांची कागदपत्रे पहातच असतात हे मी डोळयांच्या कोप-यातून पाहतो व स्वप्नं तिथेच संपते. 


       दुसरे स्वप्नं मात्र भयानक होते. जयस्तंभावर कलेक्टर ऑफिसच्या आवारात कोविड सेंटर असते. मधला रस्ता ओलांडून समोरील पेट्रोल पंपाच्या आवारात बाकडी असतात. एका बाकडयांवर दोघे तिघे पोलीस तर त्यांच्यासमोरच्या बाकडयावर मी व  माझा चुलत भाऊ नाना भाटकर बसलेलो असतो. ते पोलीस आम्हांला पलीकडे जाऊन कोविड तपासणी करून यायला सांगतात. आम्ही जायला उठतो तर तिथे एका बाजुला माझी पत्नीही बसलेली दिसते. आम्ही दोघे रस्त्यावर येतो पण रस्ता ओलांडून पलिकडे जाण्याऐवजी आम्ही आमच्या गावात आलेलो दिसतो. तिथून आम्ही पुन्हा जयस्तंभावर पोलीसांच्यासमोर जसे काही आम्ही पलीकडील कोविड सेंटरमधून तपासणी करून आलो आहोत अशा आविर्भावात जाऊन बसतो. पोलीस काहीच बोलत नाहीत. इथेच मला नेमकी जाग येते. 

..........

10.09.2020 

आज फारच विचित्र स्वप्नं पडले. स्वप्नात फक्त एक भावाबहिणीची जोडी दिसली. दोघांच्या अंगात गुलाबी रंगाचे कपडे होते. बाकी काहीही बोलणे झाले नाही. मी त्यांना बघितले आणि स्वप्नं संपले. 

       या स्वप्नाची प्रचिती संध्याकाळीच आली. त्या दोघांशी अगदी घट्ट संबंध असलेल्या एकाच्या बायकोला कोरोना झाल्याची बातमी स्वप्नातल्या बहिणीनेच फोनवरून माझ्या पत्नीला सांगितली. 

......


     


शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

झोलर बंटी बबली

 

मागे - पुढे 



गेल्या भागात तुम्ही वाचलंत की ...


..... तरी पण मी कुठेतरी मार्ग काढायचा प्रयत्न तर केला आहे. पण त्या समाधानातही आम्ही समाधानी नाहीयत...कोणीच ! पुढे काळ काय करतो ते पाहू....


.... आणि आता इथून पुढे....


12.09.2020


काल रात्री दोन स्वप्ने पडली. तीही दोनअडीचच्या दरम्याने. एकात इंग्लंडमध्ये क्रिकेटची मॅच चालू असते. एक चेंडू चक्क आमच्या खिडकीवर आपटून परत जातो ( आम्ही भारतात ! )  . नशीब तो आत येऊन आम्हांला लागत नाही. दुसरे स्वप्नं मजेशीर होते. मी व माझी पत्नी एका रस्त्याच्या कडेला इमारतीजवळ उभे असतो. मला इमारतीच्या प्रांगणात दोन एकसारख्या दिसणा-या पांढ-या रंगाच्या कार दिसतात. मी पत्नीला विचारतो की त्यांची किंमत किती असेल ? तर ती चक्क प्रत्येकी दोन हजार रूपये सांगते ! इथेच मला जाग येते ! तेव्हा अडीच वाजले होते. वर्क फ्राँम होम करीत असलेल्या मुलाला भूक लागली म्हणून त्याने भावाच्या घरातून चहा तयार ठेवायला फोन केला. त्याच्या रींगनेच मला त्या स्वप्नातून जाग आली. नाही तर मी नक्कीच त्या दोन्ही गाडया निदान स्वप्नात तरी खरेदी केल्याच असत्या 😀😀😀😀 . 


गेल्या आठवडाभरात बरेच काही घडून गेले आहे. मागे पुढे म्हणता म्हणता आपण मध्येच घरात जास्त लक्ष घातलं होतं. पण एक दोन दिवस वगळता घरच्या आघाडीवर सद्यातरी समाधानकारक शांतता आहे ! म्हणून आपल्या सवयीनुसार परत जरा मागे पुढे पाहू 😀😀😀😀😀. मागे बंदूच्या बायकोने पोष्टाच्या आर.डी. खात्यांचा केलेला घोळ घाबरत घाबरत त्याच्या कानावर घातला गेला खरा ; पण फार मोठा धक्का बसून बंदूलाच काही तरी होंईल ही अनेकांची अपेक्षा फोल ठरली . उलट , त्याने लाखभर रूपयांची परतफेड केली ! बायको सहीसलामत सुटली. बायको नव-याला तिच्यापुढे  किती हतबल बनवते , नव-याचा नाईलाज करून सोडते ते इथे दिसते. नवरा केवळ बायकोच्या मुठीत नसतो , तर ती त्याला पुरता असहाय्य बनवते, हेच हे उदाहरण दर्शवते. बरं तिची अशी अवस्था का झाली ? तर तिच्या नव-याच्या सकाळच मित्रमंडळी दाराघरात जमवण्याची सवय. आता यातला कोणी ना कोणी तरी संख्याशास्त्राचा उर्फ आकडेलावणेशास्त्राचा तज्ञ असतोच. शिवाय या बाईचे एका सर्वगूणसंपन्न मैत्रिणीकडेही जाणे येणे, फोनसुखसंवाद वगैरे वाढले होतेच. त्या मैत्रीणीकडे रोज चिठ्या न्यायला फंटर येतोच. या आकडेशास्त्राचा अभ्यास करण्यात ही बाई एवढी गुंतली की नव-याला आणि मुलाला वेळेवर जेवण मिळेनासे झाले ! अभ्यास वाढला तसा खर्च वाढला. उत्पन्न शून्याच्या खाली गेलं व शेवटी शून्यावस्था आली. तणावाने बाई दोनदा दवाखान्याची वारी करून आली. पण बाई निगरगट्टच ! पुन्हा आकडे लावण्यासाठी आर. डी. चे पैसे वापरायला तिने सुरूवात केली ! नव-याला बायको जेलमध्ये जाण्याची वेळ आली, लोक दाराशी आले , तेव्हा कळलं ! पण शेवटी इज्जत का फालुदा होऊ नये म्हणून बिचारा अजून पैसे परत करतो आहे !   अशीच दुसरी एक जोडी जवळच आहे. त्यातली बायको ही गळेपडू बाई आहे. माझा वाढदिवस तुमच्या लक्षात नाही का , तुम्ही जेवण छान बनवता , मग आम्हांला जेवायला कधी बोलवताय ते शाळेची फी थकलीय , खोलीभाडं थकलंय , पंधरा हजार द्या, वीस हजार द्या अशी मागणी करीत ही बाई दारोदार फिरते. कोणत्याही पुरूषाकडे बिनदिक्कत पैसे मागण्याचे  कौशल्य तिच्याकडे आहे. हयालाही स्कील इंडिया वुमन म्हणायचं काय ? की स्मार्टसिटीवुमन ? एक रूपया फेडू न शकणा-या हया बाईने एकीजवळ चक्क पन्नास हजाराची मागणी केली ! काय धाडस आहे पहा !  म्हणजे काहीही कामधंदा न करता जगाने हयांना पोसावं आणि तेही मेहरबानी नव्हे तर हयांचा हक्क म्हणून ! आहे की नाही जगावरच मेहरबांनी ! आम्ही दयेपोटी ती सांगेल त्या कहाणीवर विश्वास ठेवून दहापंधरा हजाराची मदत करूनही हया बाईची हाव वाढतच गेली . तिने आणखी पंधरा हजार द्या म्हणून माझ्या बायकोला आतल्या रूममध्ये नेवून माझ्या नाकावर टिच्चून बोलणी केली ! नवरा माझ्याबरोबर बिनदिक्कतपणे हवापाण्याच्या गप्पा मारत बसलेला.  तेव्हा मी काही बोललो नाही. पण दुस-या दिवशी येऊन ती तोंड उघडायच्या आतच मी तिला सणकावले. ती तशीच निघून गेली.  माझी बायको ( बायकोच ती ! ) मला म्हणाली, उगाच बोललात तिला एवढं . मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे ? मी बोललो,  होय , पण मेलेल्याला वाटतंय काय मेलो आहो असं ? हयांच्या सवयी गेल्या आहेत का ? आणि हयांची मग्रूमीही संपलेली नाही ! हे बाकी बायकोला पटलं ( नशिब ! ) .  गेली दहा वर्षे ही जोडी अशी जगतेय. एका ठिकाणी कर्जाचे हप्ते , भाडे, शाळेचे शुल्क थकले की दुसरीकडे पळायचं . तिकडे पुन्हा तेच उद्योग सुरू करायचे. वाट्टेल ती जीवघेणी कारणं पुढे  करायची , पैसे उकळायचे आणि काही काळ मजेत जगायचं. ही झोलर बंटीबबलीची जोडी आहे ! तुमच्याही गळयात पडेल म्हणून सावध करतो आहे. ही जोडी दहा वर्षे त्याच त्या चुका काहीही बोध न घेता करते आहे व वर जगाने मदत केलीच पाहिजे ही जगावर मेहरबानी आहेच ! हया जोडीचं असं का झालं ? कोरोना आता आला. पण त्यापूर्वी दहा वर्षापासूनच समस्वभावी जोडप्यांचा व मित्रमैत्रिणींचा गट बनत गेला. याची सुरूवात मुंबईला झाली. मग ही जोडी जाईल तिथे असले गट जोडत राहिली. गटातल्या हुशार मंडळींनी हयांना धूतलं आणि आता हयांना कोणीच विचारीत नाही. फुकटचंबूखावबांचं हे असंच असतं. ते खाऊन गेले पण शेवटी हे परिस्थितीत अडकले ! एकाकी पडले. पण त्यातून ते काही शिकतील ही सुतराम शक्यता नाहीच ! देव त्यांचं भलं करो ! दुसरीही एक जोडी आहे. तिच्यात बाई दिवसभर जगात फिरत असते . रात्रीही दुस-यांकडे जाऊन झोपते . नवरा घरात दारू पिवून फीस. गेली उडत म्हणत शिव्या देत बसतो. आता ही जोडी पार म्हातारी झाली. पण गूण तेच आहेत !  हया तीघांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे, तीन्ही बायकांना झाल्या प्रकारांचं काहीही वाटत नाही ! काही घडलेच नाही असे वागत असतात. बिनधास्त हसत असतात. काही केल्या आपले गूण सोडत नाहीत ! अश्या अनेक वैशिष्टयपूर्ण जोडया आमच्या मागे पुढे आहेत. पुन्हा त्याबद्दल कधीतरी नक्कीच बोलू. काय ?


(क्रमश:)

                          ....................






शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

कोविड टेस्ट

 

व्हॉट्सॲप संदेश 

संदेश पाठवणार : श्री.  उदय मयेकर , रत्नागिरी

संदेश : 



----------------

कोविड आजाराचा सध्या सगळीकडेच समुहसंसर्ग ( Community spread ) झाला आहे. सध्या सरकारी व खाजगी लॅबमध्ये कोरोनाच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. कधी कोणती तपासणी करावी ? कोणती तपासणी अधिक खात्रीशीर आहे ? कोणत्या तपासणीला अधिक खर्च येतो ? कोणत्या तपासणीला किती वेळ लागतो ? HRCT व त्याचा score म्हणजे काय ? Rapid antigen test आणि RT--PCR  यांच्यात फरक काय ? या सर्व गोष्टी आपण या चवथ्या कोरोणा लेखात पाहणार आहोत.


कोरोनाच्या मुख्यत: २ प्रकारच्या तपासण्या असतात

1) Viral Test

2) Antibody Test


कोरोनाचे निदान होण्यासाठी Antibody Test चा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही.


कोरोना निदानासाठी Viral Test  चाच मुख्यतः वापर होतो. त्याशिवाय रोगाचा शरीरातील प्रादुर्भाव वाढल्यास HRCT चा निदानासाठी तसेच न्युमोनियाची तीव्रता व फुफ्फुसांची कार्यक्षमता  समजण्यासाठी उपयोग होतो.


Viral Test या मुख्यत्वेकरुन ३ प्रकारच्या असतात.

1. Rapid Antigen test

2. RT--PCR

3. True Nat Test


तपासण्यांचा खाजगी लॅबमध्ये येणारा खर्च

-----------------------------------------------------

1) Rapid Antigen test -- 450 रु

2) RT--PCR-- 2500 रु

3) True Nat Test -- 1200 रु

4) HRCT -- 6000 -- 8000 रु


तपासण्यांसाठी लागणारा वेळ

--------------------------------------

1) Rapid Antigen test -- अर्धा तास

2) RT--PCR-- 24 ते 48 तास

3) True Nat Test -- अर्धा तास

4) HRCT -- अर्धा ते एक तास


कोणती तपासणी कधी करावी

--------------------------------------

यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.


# Antigen Test

a.) ज्या रुग्णांना त्वरीत उपचाराची गरज आहे त्यांच्यामध्ये


# RT--PCR

a.) ज्यांची Antigen Test ही निगेटिव्ह आली आहे पण लक्षणे असणारे पेशंट.

b.) कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या contact मधील लोक.

c.) परदेशातून येणारे लोक.


# True Nat Test

a.) Brought Dead व्यक्ती

b.) बाळंतपणासाठी आलेल्या माता

c.) Emergency Operation चे रुग्ण


( जर True Nat चाचणी उपलब्ध नसेल तर Antigen Test करावी. ) 


महाराष्ट्र शासनाने HRCT ला कोविडच्या निदानासाठी परवानगी दिलेली नाही. ही तपासणी कोविड निदानासाठी शासनातर्फे ग्राह्य मानली जात नाही.


आता सर्व तपासण्यांची विस्तारीत माहिती पाहुयात.


Rapid Antigen Test

--------------------------------


१) यामध्ये विषाणूंच्या surface spike मधील antigen protein तपासले जाते.


२) यासाठी नाक व घसा येथून स्वॅब घेतला जातो.


३) या चाचणीचा रिपोर्ट आपल्याला अर्ध्या तासात समजू शकतो.


४) ही तपासणी RT--PCR तपासणी पेक्षा स्वस्त व लवकर होणारी आहे.


५) या तपासणी साठी प्रशिक्षित व्यक्तीची ( Well Trainer ) ची गरज लागत नाही.


६) तपासणी तील दोष

a. कोरोना सदृशच लक्षणे असणाऱ्या फ्लू सारख्या  आजारात या तपासणीची sensitivity ही केवळ ३४ ते ८० टक्के असते. 

याच तर्काने अर्धे किंवा त्याहून अधिक कोविड पॉझिटिव्ह पेशंट मध्ये ही तपासणी निगेटिव्ह येवू शकते.


b. बऱ्याच Asymptomatic ( लक्षणे नसलेल्या ) पेशंट मध्ये  नाकातून व घशातून योग्य प्रमाणात विषाणू मिळत नसल्याने ही तपासणी निगेटिव्ह येवू शकते

कारण या तपासणीत antigen चे amplification केले जात नाही.


७) मग ही तपासणी का केली जाते ??

a.) ज्यावेळी viral load जादा असतो त्यावेळी ही तपासणी highly sensitive असते. त्यामुळे बाधित पेशंटचे विलगीकरण करणे सोपे जाते.


b.) ही तपासणी RT--PCR पेक्षा स्वस्थ व पटकन होणारी आहे.


c.) सर्व पेशंटची RT--PCR तपासणी करणे शक्य नसते अशावेळी RT--PCR चाचण्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी.


d.) समुह संसर्ग ( Community spread ) होत असताना जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या करुन त्यानुसार पॉझिटिव्ह पेशंटचे विलगीकरण ( Isolation ) करणे व त्याअनुषंगाने रोगाचा प्रसार टाळण्यासाठी.


e.) Antigen test निगेटिव्ह येवूनही ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आहेत अशा रुग्णांची नंतर RT--PCR तपासणी केली जाते.


f.) Antigen मशिन हे Treu Nat मशिनच्या तुलनेत स्वस्त असते व या मशिनवर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तपासण्या करणे शक्य असते.


RT--PCR

--------------

Reverse Transcriptase Polymerase Chain Reaction


१) यामध्ये ठराविक रसायनांद्वारे विषाणूच्या थोड्या RNA पासूनही हजार पटीने DNA तयार केले जातात जे तपासणीसाठी योग्य मात्रेत उपलब्ध होतात ( जरी स्वॅबमध्ये कमी प्रमाणात विषाणू असतील तरीही ).


२) यामुळे कोविड निदानासाठी ही सर्वात खात्रीशीर व अचूक तपासणी आहे.


३) पण ही तपासणी बरीच वेळखाऊ आहे. याचा रिपोर्ट यायला २४ ते ४८ तास इतका वेळ लागू शकतो.


४) यासाठी नाकातून व घशातून swab घेतला जातो. किंवा थुंकीही तपासायला घेतली जावू शकते.


५) या तपासणीसाठी योग्य प्रशिक्षित व्यक्तीची गरज लागते.

जी इतर दोन तपासण्या करिता इतकी गरजेची नसते.


६) कोरोना विषाणू हा प्रामुख्याने पहिल्या आठवड्यात घश्यामध्ये वाढत असतो त्यानंतर तो फुफ्फुसांत वाढायला सुरु होतो. याचाच अर्थ घशातील स्वॅब हा जंतूसंसर्ग झाल्यानंतर एक आठवडा एवढ्याच कालावधी साठी पॉझिटिव्ह येतो. नंतर Throat swab हा False Negative येण्याची शक्यता दाट असते. त्यासाठी जंतूसंसर्गाच्या दुसऱ्या आठवड्यात श्वासनलिकेतील स्वॅब अथवा कफयुक्त थुंकी तपासणे गरजेचे असते.


बरेच असे video बघण्यात आले की आपण RT--PCR चा रिपोर्ट ज्यावेळी मागून घेतो त्यावेळी त्यातील CT value ( Cyclic Threshold ) ही विचारुन घ्या. ती जर २४ पेक्षा जादा असेल तर त्या व्यक्तीमध्ये viral load हा कमी असतो म्हणजेच त्या व्यक्तीद्वारे इतरांना संक्रमण ही कमी प्रमाणात होते व जर CT value ही २४ पेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीमध्ये viral load हा जादा असतो म्हणजेच हे लोक इतरांमध्ये जादा संक्रमण पसरवतात.


हे जरी खरे असले तरी बऱ्याचदा असे पाहायला मिळते की अनेकदा viral load जादा असूनही त्यांच्यामध्ये लक्षणे ही अल्प किंवा मध्यम स्वरुपात बघायला मिळतात. जसे की लहान मुले ज्यांच्यामध्ये क्वचितच लक्षणे तीव्र स्वरुपाची असतात पण त्यांच्याद्वारे जंतूसंसर्ग मोठ्या प्रमाणात पसरवला जातो.


याउलट वयस्कर लोकांमध्ये viral load कमी असूनही तीव्र स्वरुपाची लक्षणे दिसतात.


हा खरं तर विरोधाभास आहे.


व त्याचे कारण हे आहे की कोविड मध्ये होणारी complications ही केवळ शरीरात जाणाऱ्या विषाणू मुळे होत नसतात. तर ती प्रामुख्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीने ( Immune system ने ) त्या virus ला किती व कशा प्रकारे प्रतिसाद दिला व त्यामुळे आपल्या शरीरात होणाऱ्या Inflammatory changes मुळे होत असतात. Immune system च्या प्रतिक्रिया व त्यामुळे होणाऱ्या Inflammatory changes या प्रत्येक पेशंट नुसार वेगवेगळ्या असतात. व त्यामुळे कोणाकोणामध्ये काहीच लक्षणे दिसत नाहीत तर कोणामध्ये खूपच Complications निर्माण होवू शकतात.


CT value ही प्रामुख्याने viral load किती आहे ते सांगते. कोविड किती घातक ठरु शकतो हे नाही. त्यामुळे ICMR ने RT--PCR च्या रिपोर्ट मध्ये CT value देण्यास परवानगी दिलेली नाही.


 TrueNAT test

----------------------

१) हे मशिन गोव्यातील Malbio Diagnostic या कंपनीद्वारे बनवले आहे.


२) हे मशिन पूर्वी TB ची टेस्ट करण्यासाठी वापरले जात होते. अलिकडेच ICMR ने COVID 19 टेस्ट करण्यासाठी या मशिनला परवानगी दिली आहे.


३) हे मशिन छोट्या आकाराचे असून ब्रिफकेस मधून कोठेही घेवून जाता येवू शकते.


४) हे मशिन बॅटरीवर चालते एकदा बॅटरी चार्ज केली की १० तासांपर्यंत चालू शकते.


५) या मशिन मध्ये एका वेळी एकच टेस्ट करता येते. मशिन जर ४ स्लॉटचे असेल तर जास्तीत जास्त ४ टेस्ट एका वेळी करता येवू शकतात. ८ तासाच्या शिफ्टमध्ये जास्तीत जास्त ४५ टेस्ट होवू शकतात.


६) दुर्गम भागात जिथे मोठ्या लॅबची संख्या कमी आहे व जेथून स्वॅब घेवून RT--PCR साठी मोठ्या लॅबमध्ये पाठवणे हेदेखील मुश्किल असते अशा ठिकाणी प्रामुख्याने हे मशिन वापरले जाते.


७) या तपासणी मध्येही RT--PCR प्रमाणे विषाणूचा Genome हा Amplify केला जातो. त्यामुळे यामध्येही स्वॅबमधील विषाणूंचे प्रमाण कमी असले तरी टेस्ट रिपोर्ट अचूक येतो.


८) या तपासणीत मुख्यत: कोरोना विषाणूचा E Gene व विषाणूच्या RNA मध्ये असणारे RdRp हे Enzyme शोधले जाते.


९) ही तपासणी RT--PCR पेक्षा बऱ्याच जलद होते ( अर्धा ते एक तासात ) तसेच या तपासणीसाठी लागणारा खर्चही कमी असतो. (१२०० ते १३०० रुपये) तसेच ही  तपासणी करायला सोपी आहे व त्यासाठी खास प्रशिक्षित व्यक्तीची गरज लागत नाही.


१०) असे असले तरी या मशिनची किंमत जादा असल्याने (६.५ ते १२ लाख ) व पुरवठा कमी असल्याने हे मशिन अजून सगळीकडे उपलब्ध नाही आहे.


Antibody Test

-----------------------

१) शरीरात एखादा Antigen ( बाहेरचा कोणताही सजीव घटक जसे bacteria, virus इत्यादी ) गेल्यावर त्यांच्याशी लढण्यासाठी जे घटक शरीरामार्फत तयार केले जातात त्यांना Antibody म्हणतात.


२) Antibody Test ही मुख्यतः पूर्वी होऊन गेलेल्या आजाराची माहिती सांगते.


३) Infection झाल्यानंतर शरीरात Antibodies तयार व्हायला साधारण १ ते २ आठवडे इतका कालावधी लागतो. त्यामुळे कोविड निदानासाठी या तपासणीचा कोणताही उपयोग होत नाही.


४) सर्वच लोकांना कोविडमध्ये लक्षणे निर्माण होतील असे नाही. अशावेळी किती लोकांना हा आजार होवून गेला हे लक्षात येण्यासाठी व त्यावरुन या आजाराचा मृत्यूदर निश्चित करण्यासाठी प्रामुख्याने या तपासणीचा उपयोग होतो.


HRCT

----------

१) ही चाचणी म्हणजे छातीचा CT scan असतो. 


२) ही चाचणी कोविड निदानासाठी शासनातर्फे जरी ग्राह्य धरली जात नाही.


३) तरीही लक्षणे सुरु होवून ४ ते ५ दिवसांनंतर रोगाचा शरीरातील प्रादुर्भाव वाढल्यास  रोगनिदानासाठी तसेच न्युमोनियाची तीव्रता व फुफ्फुसांची कार्यक्षमता  समजण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो.


४) RT--PCR च्या तुलनेत याचा रिपोर्ट लगेच मिळत असल्याने तसेच न्युमोनियाची तीव्रता लक्षात येत असल्याने याचा कोविड उपचारासाठी चांगला उपयोग होतो.


५) RT--PCR प्रमाणे याचा रिपोर्ट ही अधिक खात्रीशीर व अचूक असतो. तसेच यावरुन पेशंटच्या शरीरात सुधारणा होवू शकते की पेशंटची स्थिती आणखी बिघडू शकते याचेही याचेही अचूक निदान करता येते.


६) लक्षणे दिसायला लागल्यानंतर पहिल्या ४ दिवसांत HRCT हा इतकी sensitive नसते त्यामुळे ५०% कोविड पॉझिटिव्ह पेशंट मध्ये HRCT चा रिपोर्ट नॉर्मल येण्याची शक्यता असते. पण त्यानंतर HRCT ही Highly sensitive म्हणजेच एकदम अचूक असते. 


७) HRCT च्या रिपोर्टमध्ये खालीलप्रमाणे लक्षणे दिसू शकतात


a.) सुरवातीला ( कोविड लक्षणे सुरु झाल्यानंतर ७ दिवसांमध्ये ) -- Ground Glass Opacity (GGO)


b.) ७ दिवसानंतर न्युमोनिया वाढल्यास ---

1. GGO वाढणे

2. Crazy paving pattern

3. Consolidation

4. Fibrosis


८) HRCT Score

------------------------

a.) न्युमोनिया हा फुफ्फुसांमध्ये किती प्रमाणात वाढला आहे हे समजण्यासाठी HRCT मध्ये Score दिला जातो.


b.) हा स्कोर 0 ते 25 या दरम्यान असतो. 0 स्कोर याचा अर्थ फुफ्फुसांत न्यूमोनिया अजिबात पसरलेला नाही असा होतो तर 25 स्कोर म्हणजे न्यूमोनिया फुफ्फुसांत सर्वत्र पसरलेला आहे असा अर्थ होतो. 


c.) 25 पैकी स्कोर असताना 


1) कमी प्रमाणातील न्यूमोनिया -- 12 पेक्षा कमी स्कोर असणे.


2) मध्यम न्यूमोनिया -- 12 ते 18 स्कोर असणे.


3) तीव्र स्वरुपाचा न्यूमोनिया -- 18 पेक्षा जास्त स्कोर असणे.


d.) फुफ्फुसे किती टक्के बाधित झाली आहेत हे कळण्यासाठी HRCT Score ला ४ ने गुणले जाते. पण ते दरवेळी बरोबर येईलच असे सांगता येत नाही.


e.) बऱ्याच रिपोर्ट मध्ये HRCT Score हा ४० पैकी दिला जातो त्यावेळी वरील दोन्ही नियम लागू पडत नाहीत.


९) पेशंटची न्यूमोनिया आणखी वाढू शकतो की कमी होवू शकतो हे कळण्यासाठी HRCT सोबतच C Reactive Protein,

 serum ferritin, lymphocytes या तपासण्या करणेही गरजेचे असते.


१०) X रे मध्ये कोविड ची सुरवातीची GGO सारखी लक्षणे दिसत नाहीत त्यामुळे X रे चा कोविड निदानासाठी हवा तितका उपयोग होत नाही.


कोविड टाईम लाईन

-------------------------

कोविड मध्ये कोणत्या दिवशी साधारण कोणत्या गोष्टी होतात हे आता पाहू.


दिवस ० -- जंतूसंसर्ग


दिवस ५ -- लक्षणे दिसण्यास सुरुवात


दिवस १ ते २८ -- RNA व Antigen पॉझिटिव्ह


दिवस २८ -- RNA व Antigen निगेटिव्ह


दिवस ० ते ७ -- फक्त RT--PCR टेस्ट पॉझिटिव्ह


दिवस ९ -- HRCT मध्ये लक्षणे दिसतात


दिवस ७ -- IgM Antibody पॉझिटिव्ह


दिवस १४ -- IgG Antibody पॉझिटिव्ह


दिवस २१ -- IgM Antibody निगेटिव्ह


दिवस १४ ते २१ -- रोगाचा लक्षणे कमी होण्याचा टप्पा पण तरीही इतरांना जंतूसंसर्ग करु शकतो.


दिवस २१ ते २८ -- RT--PCR

कधी कधी पॉझिटिव्ह येवू शकते पण इतरांना जंतूसंसर्ग होत नाही.

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

अत्यंत खराब कालावधी

 

मागे - पुढे




गेल्या भागात तुम्ही वाचलात की ...


......मग मात्र विकीला गाडी घेऊन मुलाला आणलं पाहिजे. मी कालच विकीशी बोललोय.  काल रात्री मी मुलाशी हे बोललो . तोही समजुतीने बोलला. तो यायला तयार आहे म्हटल्यावर आम्ही अनेक महिन्यांनी आनंदीत झालो ......


.... आणि आता इथून पुढे....


01.08.2020 रात्रौ 11.00 वाजता विकी गाडी घेऊन पुण्याला रवाना झाला. त्यापूर्वी मुलाचा ई पास मी काढला आणि विकीचा ई पास उर्मीच्या मुलीने काढला. दुस-या दिवशी सकाळी सात वाजता विकी पुण्यात मांजरी बुद्रूकमधल्या मुलाच्या रूमवर गेला. तिकडे  मारूती निवासच्या कांबळे कुटुंबाने व राऊत कुटुंबाने खूप सहकार्य केले. त्यामुळे दि. 02.08.2020 रोजी दुपारी साडेबारा वाजता विकी व मुलगा तिकडून निघाले ते रात्री नऊ वाजता रत्नागिरीत दामले हायस्कूलला आले. तिथे मुलाला होम क्वारंटाईनचा शिक्का मारून ते दोघे दहा वाजता घरी आले. दोघांनी सामान उतरलं . भावाच्या घरात मुलानेच ते नेलं व तिथेच तो होम क्वारंटाईन झाला. आता प्रश्न असा आला आहे की 03.08.2020 पासून आमच्या भागात जोरदार पाऊस जोरदार पाऊस , वारा यामुळे वारंवार खंडीत होणारी वीज व इंटरनेटची कमी स्पीड यामुळे तो आणि आम्ही दोघंही त्रस्त आहोत ! आज 05.08.2020 आहे व पुढील 48 तास खूपच वादळी असणार आहेत , असं म्हणतात. समुद्राचे पाणी बंधारा फोडतेय . उंच लाटा उसळतायत. लोक जीव मुठीत घेऊन जगतायत . राम राम करतायत ! गेली साठ वर्षे दर पावसाळयात हीच कहाणी आहे ! आमच्या वरच्या बाजुला उत्तर दिशेला जंगलात काल रात्री झाडांच्या फांदया मोडल्याचे आवाज येत होते. रात्री साडेबारा वाजता मागे पुढे पाहण्याचा प्रयत्न केला पण काळोखात काही दिसेचना ! आवाज मात्र आले ! वारा, पाऊस यामुळे वीज जाते . मुलाचे काम ठप्प होते. आज मिल्याला इनव्हर्टरची चौकशी करायला सांगितली. त्याने भर पावसात शहरात जाऊन ती लगेच केलीही . किमान चाळीस हजार खर्च येईल. परत एक दोन महिन्यांनी मुलगा पुण्याला जाणार आणि मुंबईहून भाऊ वर्षातून एक दोन महिने रहायला इकडे येणार , बाकीचा वेळ इनव्हर्टर पडूनच राहणार ! काय करावे याचा विचार करीतच मागे पुढे फिरतोय... शेवटी इनव्हर्टरचा विषय मागेच पडला . 

इंटरनेटची मुलाची समस्या थोडी कमी झाली तरी गेले काही दिवस खूप त्रासाचे जात आहेत. पत्नीला दररोज काही ना काही बारीकसारीक आजार होत आहेत. गेली सव्वीस वर्षे सुरू असलेला खाज व रँशेश उठण्याचा आजार तर वाढला आहेच , पण शरीराच्या उजव्या बाजुला कमरेपासून ते पायापर्यंत कधीही फूट लागते आहे. परत मानेचा व मणक्याचा जुना आजार आहेच. हे कमी म्हणून की काय नवा आजार  काफल टनेल सिंड्रोम सुरू झाला आहे ! तिच्या हाताचे दोन्ही पंजे कधीही बधीर होतायत. मुंग्या येतायत. दिवसरात्र कधीही हे प्रकार सुरू असतात. गणपती आल्यादिवसापासून तर हया आजारांना जोरच चढलेला आहे. कित्येक रात्री झोप नाहीय. दिवसाही विश्रांती नाहीय. गणपतीविसर्जनही होऊन गेले पण अनेकदा साकडे घालूनही तसूभर परिस्थितीत फरक पडलेला नाही ! 


आज दि. 30.08.2020 रोजी दुपारी मुलगा तुम्हांला एक विषय बोलायचा आहे म्हणून सांगून शहरात गेला . दुपारनंतर आला तो भावाच्या घरात जाऊन झोपला. सहा वाजता उठला, पोट बरोबर नाही व नंतर बोलूया म्हणाला आणि परत झोपला. रात्री जेवायला आला तर त्याने काही विषयच काढला नाही. जिवाची घालमेल होत असतांनाही उभी रात्र पुढे असल्यामुळे मीही विचारण्याचे टाळले. मध्यरात्री माझी बेचैनी वाढली. नको ते विचार मनात येऊ लागले. त्यातच पत्नीचे आजारपण . तीन चारच्या सुमारास कधी तरी डोळा लागला. 


31.08.2020 : पहाटे  विचित्र स्वप्नं पडले. आज आमच्या जुन्या आँफीसात नार्वेकर बाई तिच्या पूर्वीच्याच खुर्चीत बसलेली आहे. बाजुला विभुते बाई आहे. समोर काटकोनात बादल आहे. मी त्याने दिलेले जीपीएफचे बील तपासत असतो. माझ्या लक्षात येते की, ते बील जीपीएफ बिलाच्या नमुन्याऐवजी आकस्मिक खर्चाच्या बिलांच्या नमुना क्र. 31 मध्ये केलेले आहे . मी बादलला हे सांगायचे ठरवतो , पण त्यापूर्वी जीपीएफ बिलांची फाईल घेऊनच बादलला दाखवावे , असा विचार करतो.  इथेच स्वप्नं संपते ! 


        हे स्वप्नं विचित्र म्हणजे अनेक वर्षे न आलेली नार्वेकर बाई आँफीसात बसून आरामात गप्पा मारतांना दिसते. ती व विभुते त्यांच्याच पूर्वीच्या आस्थापना विभागात तर मी व बादल आमच्याच पूर्वीच्या लेखा विभागात बसलेलो दिसतो.  मी दीड वर्षापूर्वीच रिटायर्ड झालो तरीही मी तिथे कार्यरत व सहकारी बादलला मार्गदर्शन करतांना दिसतो. 


       या स्वप्नाची प्रचिती लगेच आली ! या स्वप्नात संपूर्ण कार्यालयात फक्त चारच माणसे दिसली ! लक्षात घ्या . चार खांदे ! सकाळी 09.15 ला माजी विद्यार्थी व शेजारच्या पेडणेकरांचा जावई निखील शेटये याचा माजी अधिव्याख्याता जयंत शशिकर नांदेडकर यांचे काल रात्री 11.00 वा. निधन झाल्याचा संदेश आला. दुसरा झटका बसला तो माझ्या मेहुण्याचे सासरे वारल्याचा फोन आला तेव्हा. 


           चार खांदे म्हणजे बहुतेक कुणाच्या तरी मरणाच्या बातम्यांचा दिवस दिसतोय ! आतापर्यंत दोन पुरूषांच्या निधनाच्या बातम्या आल्या आहेत. स्वप्नात दोन पुरूष व दोन महिला दिसल्या होत्या. म्हणजे अजून दोन महिलांच्या बातम्या तर येणार नाहीत ना ?

सकाळी सहा वाजता जाग आलीच नाही. पावणेसात वाजता उठलो. आज सोमवार. नळाला आज पाणी येणार नसल्याने विहीरीवरून पाणी आणले. सकाळपासूनच पत्नीच्या अंगाला खाज येत होती. हे पित्त, शितपित्त , आम्लपित्त की आणखी काय ? तेच कळत नाही. तिची नेहमीची गोळीही परिणाम करीत नव्हती. संध्याकाळी हिने राजूला फोन करून त्याच्याकडची गोळी पाठवायला सांगितली. आजू ती घेऊन आला. पाठोपाठच राजूवहिनी व मुलगी धावत आलीत. तोपर्यंत ही अंग खाजवून रडकुंडीस आली होती. मग हिने गोळी घेतली. राजूवहिनीने हिच्या डोक्यावर तेल घातलं. अंगाला लावलं . तासाभरात हिला जरा बरं वाटलं, तश्या त्या दोघी घरी गेल्या. ही अंथरूणावर लवंडली . मी दूध गरम करायला गेलो. दूध तापून वर येतच होते तोच ही आँक आँक करीत बाथरूमकडे धावली आणि मी गँस बंद करून तिचे डोके दाबून धरायला धावलो. वांती काही नीट झालीच नाही. ही मात्र घुसमटली. कशीबशी तिला सावरली , उभी केली आणि बेडवर झोपवली. लगेच मागचा दरवाजा उघडला तो बीनाच अंगणात पाछमोरी उभी होती. मी तिला तिच्या आईला पटकन घेऊन ये म्हणून सांगितले. काकीला बरं नाहीय का म्हणून तिने विचारले. मी होय म्हणताच ती पळत तिच्या आईला बोलवायला गेली. दोनच मिनिटात मायलेकी आल्या. संत्या पण आला. मग ती तासभर बसलीत . जरा बरं वाटलं. मध्येच मुलगा येऊन जेवून त्याच्या कामाला गेला. काय वाटले तर बोलवा म्हणाला. मग पेडणेकर कंपनीही गेली. उरलो पुन्हा आम्ही दोघेच. त्यातही ही आजारी आणि शुश्रूषा करणारा मी एकटाच ! तिची शुश्रुषा करता करता रात्री तीन वाजले तेव्हा कुठे ती झोपली . मग मीही लवंडलो तो सहा वाजता उठलोच !


( क्रमश: )

...........


कोरोनाबाबत कोणती काळजी घ्याल ?

 

व्हॉट्सॲप फाँरवर्डेड मेसेज

ग्रूप : बिलव्हड् फँमिली, सावंतवाडी , जि. सिंधूदुर्ग


मेसेज बाय : श्री. राजेंद्र सदानंद नाईक , सावंतवाडी


अतिशय सुंदर संदेश :


कोरोनाशी लढा



*किमान सहा महिने हे पाळाच.*


🔴


∆ *नातेवाईक कितीही जवळचा असला तरी तूर्तास माया मोह टाळा.*

∆ *जवळचेच कोरोनाला जवळ आणून सोडतील. तेंव्हा राग आला तरी चालेल पण  भेटण्यास येवू नका असे स्पष्टपणे कळवा.*

∆ *अती गरजेचे असल्याशिवाय आपण स्वत:हून कोणाकडे जाऊ नका.*

 ∆ *कोरोना कुणाच्या मदतीने घरात येईल हे सांगता येत नाही.*

∆ *कोरोनाग्रस्त रूग्णांपासून शारिरीक बाजूने दुर व्हा, मनाने मात्र जवळच रहा, त्यांना आधार द्या. आम्ही तुमच्या सोबतच आहोत याची ग्वाही द्या.*

∆ *ज्यांच्या घरात लहान मुले व ६० वर्षावरील व्यक्ती आहेत यांनी विशेष काळजी घ्यावीच.*

∆ *अती व फाजील आत्मविश्वास बाळगू नका.*

∆ *'कसला कोरोना होतोय' अशी बेजबाबदार भाषा अलीकडे दिसू लागली आहे. अशा लोकांना आवरा, त्यांना टाळा किंवा समजवा.*

∆ *हात देणे अलिंगन देणे. गळ्यात पडुन रडणे, लहान मुलांचा पापा घेणे देणे बंद करा.* 

∆ *जिथे गोतावळा तेथे रमतो कोरोना.*

∆ *जर कुणी अकारण आपल्या घरी येणे जाणे करत असेल तर प्रेमाने महत्व समजून सांगा.*

∆ *भिडस्तपणा अंगाशी येण्याचीच शक्यता जास्त आहे.*

∆ *कमी सदस्य असलेली घरे सुरक्षित आहेत.*


∆ *वरील सर्व कठीण आहे पण सर्वांसाठी ते आवश्यक आहे.*


∆ *पोलिसांनी, डाॅक्टरांनी, नर्सेसनी आपले जीवन धोक्यात घालून आपणास वाचवले आहे, वाचवत आहेत तेंव्हा आपण स्वत:हून आपली काळजी घ्या.*

∆ *प्रतिकार शक्ती वाढेल असेच अन्न सेवन करा. जीभेचे चोचले थांबवा*

∆ *जगाल तरच जगवाल** लढा


*किमान सहा महिने हे पाळाच.*


🔴


...........................................