Whatsapp लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Whatsapp लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

Devanandchya cinematil gaane

देवानंदच्या सिनेमातील गाणे 

Dev Anand and his film


#जुनी_गाणी कुणाला आवडत नाहीत ?

आजही गाण्यांच्या विविध स्पर्धांमध्ये जुनी गाणी अत्यंत तन्मयतेने म्हटली जातात.‌ त्यांना भरपूर प्रतिसादही मिळतो ! अगदी आजही ! ही जुनी गाणी पडद्यावरही खूप कलात्मक रीतीने सादर केली गेली होती. त्यातले नायक नायिकाही खूप छान वाटायचे.‌ विशेषतः देव आनंद सारखा रोमॅंटिक हिरो असला तर खूपच बहार यायची ! देव आनंद माझा खूप आवडता. मराठी शाळेत असतांनाच शेजारी राहणाऱ्या गंगाराम रेवाळेने मला एकदा रात्रीच्या पिक्चरला शहरातल्या टाॅकीजमध्ये नेलं. खरं तर , मी आदल्या दिवशीच पडलो होतो आणि माझं उजवं ढोपर ठणकत होतं. पण गंगाराम ऐकत नाही म्हटल्यावर माझाही नाईलाज झाला. त्याने माझ्या घरच्यांची परवानगीही मिळवली . मला तेव्हा फारसं काही कळत नव्हतंच. मी तेव्हा पाचवीत शिकत होतो ! हिंदी भाषेचा नुकताच कुठे परिचय होऊ लागला होता ! 

मी पाहिलेला देव आनंदचा पहिलाच चित्रपट : हरे रामा हरे कृष्णा . 

मी पाहिलेला तो देव आनंदचा पहिलाच आणि एकूणच माझा दुसरा चित्रपट होता ! सखू आली पंढरपुरा हा मराठी चित्रपट मी चौथीत असताना पाहिला होता. तो गुरवांच्या बेबल्याने मला दाखवला होता. मला बहीण नाही. तिला भाऊबीजेला मी ओवाळायचो.‌ मराठी शाळेत जायच्या आधीपासूनच मी गुरव मंडळीत जास्त असायचो. बेबल्याताई आज हयात नाही पण तिच्या स्मृती आहेत !

गंगारामने मला पिक्चरला नेलं तो पिक्चर होता हरे रामा हरे कृष्णा ! 

Dev Anand's cinema


देव आनंदचा चित्रपट ! पण मला मूळात तो चित्रपट पाहण्यापूर्वी देव आनंदच काय , कुठलाच हिरो माहीत नव्हता ! गंगारामचं याबाबतीतलं ज्ञान मात्र भारीच होतं. त्यानेच मला हा हिरो देव आनंद आहे म्हणून सांगितलं , तेव्हा कुठे मला कळलं की ह्या चिकण्या नटाला देव आनंद म्हणतात ! चित्रपटात छोटा देव आनंद  आणि त्याच्या बहिणींचं जे विदारक आयुष्य दाखवलं ते पाहून त्या छोट्या वयात मला रडू कोसळलं होतं. ते गाणं ऐकू या...





पण पुढे  नायिकेच्या मागे दुडक्या चालीत तिरका तिरका धावणारा देव आनंद पाहण्यातही मी रमून गेलो ! कोणाला त्याचं दिल तोडावेसे वाटेल...? बघा ना , कांची रे कांची रे ...म्हणत देव आनंद कसा धावतोय ते....



हा देव पाहण्यात मी इतका की माझ्या दुखावलेल्या ढोपरावरची जखम चिघळत जातेय याचंही मला भान राहिलं नव्हतं ! चित्रपट संपला तेव्हा मी खुर्चीतून उठायला गेलो तर माझा उजवा पाय आखडल्याचं जाणवलं. मला पाऊल पुढे टाकता येईना ! गंगारामने मला कसंबसं टाॅकीजच्या बाहेर आणलं , सायकलवर बसवलं आणि घरी आणलं. मी गुपचूप अंथरूणात शिरलो.‌ सकाळी मला उठवेना ! थंडी भरून ताप आला ! मग शाळा तीन चार दिवस  बुडालीच !  

तर...देव आनंदशी माझी ओळख ही अशी झाली


Dev sahab

Dev Anand the stylish hero



पुढे पुढे तो भेटतच गेला. प्रकर्षाने भेटत गेला ! त्याच्या विविधांगी व्यक्तिमत्वावर चे अनेक लेख वाचले.‌ त्याची खूप गाणीही मी पाहिली, ऐकली . 

देव आनंदच असंच एक जुनं गाणं... 

खणखणतं नाणं... मला खूप आवडतं... आवडेल तुम्हांलाही... कमेंट्स करालच...

ख्वाब हो तूम या ... कोई हकीगत....


तीन देविया या चित्रपटातील हे सुंदर गीत आहे.  

देवानंदचं गाणं

( फोटो सौजन्य : गुगल व यू ट्यूब .)

#देव_आनंद

#देवानंद

#cinema

#devanand

#picture

#gaana

#hindigeet


शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

कोविड टेस्ट

 

व्हॉट्सॲप संदेश 

संदेश पाठवणार : श्री.  उदय मयेकर , रत्नागिरी

संदेश : 



----------------

कोविड आजाराचा सध्या सगळीकडेच समुहसंसर्ग ( Community spread ) झाला आहे. सध्या सरकारी व खाजगी लॅबमध्ये कोरोनाच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात. कधी कोणती तपासणी करावी ? कोणती तपासणी अधिक खात्रीशीर आहे ? कोणत्या तपासणीला अधिक खर्च येतो ? कोणत्या तपासणीला किती वेळ लागतो ? HRCT व त्याचा score म्हणजे काय ? Rapid antigen test आणि RT--PCR  यांच्यात फरक काय ? या सर्व गोष्टी आपण या चवथ्या कोरोणा लेखात पाहणार आहोत.


कोरोनाच्या मुख्यत: २ प्रकारच्या तपासण्या असतात

1) Viral Test

2) Antibody Test


कोरोनाचे निदान होण्यासाठी Antibody Test चा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही.


कोरोना निदानासाठी Viral Test  चाच मुख्यतः वापर होतो. त्याशिवाय रोगाचा शरीरातील प्रादुर्भाव वाढल्यास HRCT चा निदानासाठी तसेच न्युमोनियाची तीव्रता व फुफ्फुसांची कार्यक्षमता  समजण्यासाठी उपयोग होतो.


Viral Test या मुख्यत्वेकरुन ३ प्रकारच्या असतात.

1. Rapid Antigen test

2. RT--PCR

3. True Nat Test


तपासण्यांचा खाजगी लॅबमध्ये येणारा खर्च

-----------------------------------------------------

1) Rapid Antigen test -- 450 रु

2) RT--PCR-- 2500 रु

3) True Nat Test -- 1200 रु

4) HRCT -- 6000 -- 8000 रु


तपासण्यांसाठी लागणारा वेळ

--------------------------------------

1) Rapid Antigen test -- अर्धा तास

2) RT--PCR-- 24 ते 48 तास

3) True Nat Test -- अर्धा तास

4) HRCT -- अर्धा ते एक तास


कोणती तपासणी कधी करावी

--------------------------------------

यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.


# Antigen Test

a.) ज्या रुग्णांना त्वरीत उपचाराची गरज आहे त्यांच्यामध्ये


# RT--PCR

a.) ज्यांची Antigen Test ही निगेटिव्ह आली आहे पण लक्षणे असणारे पेशंट.

b.) कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या contact मधील लोक.

c.) परदेशातून येणारे लोक.


# True Nat Test

a.) Brought Dead व्यक्ती

b.) बाळंतपणासाठी आलेल्या माता

c.) Emergency Operation चे रुग्ण


( जर True Nat चाचणी उपलब्ध नसेल तर Antigen Test करावी. ) 


महाराष्ट्र शासनाने HRCT ला कोविडच्या निदानासाठी परवानगी दिलेली नाही. ही तपासणी कोविड निदानासाठी शासनातर्फे ग्राह्य मानली जात नाही.


आता सर्व तपासण्यांची विस्तारीत माहिती पाहुयात.


Rapid Antigen Test

--------------------------------


१) यामध्ये विषाणूंच्या surface spike मधील antigen protein तपासले जाते.


२) यासाठी नाक व घसा येथून स्वॅब घेतला जातो.


३) या चाचणीचा रिपोर्ट आपल्याला अर्ध्या तासात समजू शकतो.


४) ही तपासणी RT--PCR तपासणी पेक्षा स्वस्त व लवकर होणारी आहे.


५) या तपासणी साठी प्रशिक्षित व्यक्तीची ( Well Trainer ) ची गरज लागत नाही.


६) तपासणी तील दोष

a. कोरोना सदृशच लक्षणे असणाऱ्या फ्लू सारख्या  आजारात या तपासणीची sensitivity ही केवळ ३४ ते ८० टक्के असते. 

याच तर्काने अर्धे किंवा त्याहून अधिक कोविड पॉझिटिव्ह पेशंट मध्ये ही तपासणी निगेटिव्ह येवू शकते.


b. बऱ्याच Asymptomatic ( लक्षणे नसलेल्या ) पेशंट मध्ये  नाकातून व घशातून योग्य प्रमाणात विषाणू मिळत नसल्याने ही तपासणी निगेटिव्ह येवू शकते

कारण या तपासणीत antigen चे amplification केले जात नाही.


७) मग ही तपासणी का केली जाते ??

a.) ज्यावेळी viral load जादा असतो त्यावेळी ही तपासणी highly sensitive असते. त्यामुळे बाधित पेशंटचे विलगीकरण करणे सोपे जाते.


b.) ही तपासणी RT--PCR पेक्षा स्वस्थ व पटकन होणारी आहे.


c.) सर्व पेशंटची RT--PCR तपासणी करणे शक्य नसते अशावेळी RT--PCR चाचण्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी.


d.) समुह संसर्ग ( Community spread ) होत असताना जास्तीत जास्त लोकांच्या तपासण्या करुन त्यानुसार पॉझिटिव्ह पेशंटचे विलगीकरण ( Isolation ) करणे व त्याअनुषंगाने रोगाचा प्रसार टाळण्यासाठी.


e.) Antigen test निगेटिव्ह येवूनही ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आहेत अशा रुग्णांची नंतर RT--PCR तपासणी केली जाते.


f.) Antigen मशिन हे Treu Nat मशिनच्या तुलनेत स्वस्त असते व या मशिनवर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तपासण्या करणे शक्य असते.


RT--PCR

--------------

Reverse Transcriptase Polymerase Chain Reaction


१) यामध्ये ठराविक रसायनांद्वारे विषाणूच्या थोड्या RNA पासूनही हजार पटीने DNA तयार केले जातात जे तपासणीसाठी योग्य मात्रेत उपलब्ध होतात ( जरी स्वॅबमध्ये कमी प्रमाणात विषाणू असतील तरीही ).


२) यामुळे कोविड निदानासाठी ही सर्वात खात्रीशीर व अचूक तपासणी आहे.


३) पण ही तपासणी बरीच वेळखाऊ आहे. याचा रिपोर्ट यायला २४ ते ४८ तास इतका वेळ लागू शकतो.


४) यासाठी नाकातून व घशातून swab घेतला जातो. किंवा थुंकीही तपासायला घेतली जावू शकते.


५) या तपासणीसाठी योग्य प्रशिक्षित व्यक्तीची गरज लागते.

जी इतर दोन तपासण्या करिता इतकी गरजेची नसते.


६) कोरोना विषाणू हा प्रामुख्याने पहिल्या आठवड्यात घश्यामध्ये वाढत असतो त्यानंतर तो फुफ्फुसांत वाढायला सुरु होतो. याचाच अर्थ घशातील स्वॅब हा जंतूसंसर्ग झाल्यानंतर एक आठवडा एवढ्याच कालावधी साठी पॉझिटिव्ह येतो. नंतर Throat swab हा False Negative येण्याची शक्यता दाट असते. त्यासाठी जंतूसंसर्गाच्या दुसऱ्या आठवड्यात श्वासनलिकेतील स्वॅब अथवा कफयुक्त थुंकी तपासणे गरजेचे असते.


बरेच असे video बघण्यात आले की आपण RT--PCR चा रिपोर्ट ज्यावेळी मागून घेतो त्यावेळी त्यातील CT value ( Cyclic Threshold ) ही विचारुन घ्या. ती जर २४ पेक्षा जादा असेल तर त्या व्यक्तीमध्ये viral load हा कमी असतो म्हणजेच त्या व्यक्तीद्वारे इतरांना संक्रमण ही कमी प्रमाणात होते व जर CT value ही २४ पेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीमध्ये viral load हा जादा असतो म्हणजेच हे लोक इतरांमध्ये जादा संक्रमण पसरवतात.


हे जरी खरे असले तरी बऱ्याचदा असे पाहायला मिळते की अनेकदा viral load जादा असूनही त्यांच्यामध्ये लक्षणे ही अल्प किंवा मध्यम स्वरुपात बघायला मिळतात. जसे की लहान मुले ज्यांच्यामध्ये क्वचितच लक्षणे तीव्र स्वरुपाची असतात पण त्यांच्याद्वारे जंतूसंसर्ग मोठ्या प्रमाणात पसरवला जातो.


याउलट वयस्कर लोकांमध्ये viral load कमी असूनही तीव्र स्वरुपाची लक्षणे दिसतात.


हा खरं तर विरोधाभास आहे.


व त्याचे कारण हे आहे की कोविड मध्ये होणारी complications ही केवळ शरीरात जाणाऱ्या विषाणू मुळे होत नसतात. तर ती प्रामुख्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीने ( Immune system ने ) त्या virus ला किती व कशा प्रकारे प्रतिसाद दिला व त्यामुळे आपल्या शरीरात होणाऱ्या Inflammatory changes मुळे होत असतात. Immune system च्या प्रतिक्रिया व त्यामुळे होणाऱ्या Inflammatory changes या प्रत्येक पेशंट नुसार वेगवेगळ्या असतात. व त्यामुळे कोणाकोणामध्ये काहीच लक्षणे दिसत नाहीत तर कोणामध्ये खूपच Complications निर्माण होवू शकतात.


CT value ही प्रामुख्याने viral load किती आहे ते सांगते. कोविड किती घातक ठरु शकतो हे नाही. त्यामुळे ICMR ने RT--PCR च्या रिपोर्ट मध्ये CT value देण्यास परवानगी दिलेली नाही.


 TrueNAT test

----------------------

१) हे मशिन गोव्यातील Malbio Diagnostic या कंपनीद्वारे बनवले आहे.


२) हे मशिन पूर्वी TB ची टेस्ट करण्यासाठी वापरले जात होते. अलिकडेच ICMR ने COVID 19 टेस्ट करण्यासाठी या मशिनला परवानगी दिली आहे.


३) हे मशिन छोट्या आकाराचे असून ब्रिफकेस मधून कोठेही घेवून जाता येवू शकते.


४) हे मशिन बॅटरीवर चालते एकदा बॅटरी चार्ज केली की १० तासांपर्यंत चालू शकते.


५) या मशिन मध्ये एका वेळी एकच टेस्ट करता येते. मशिन जर ४ स्लॉटचे असेल तर जास्तीत जास्त ४ टेस्ट एका वेळी करता येवू शकतात. ८ तासाच्या शिफ्टमध्ये जास्तीत जास्त ४५ टेस्ट होवू शकतात.


६) दुर्गम भागात जिथे मोठ्या लॅबची संख्या कमी आहे व जेथून स्वॅब घेवून RT--PCR साठी मोठ्या लॅबमध्ये पाठवणे हेदेखील मुश्किल असते अशा ठिकाणी प्रामुख्याने हे मशिन वापरले जाते.


७) या तपासणी मध्येही RT--PCR प्रमाणे विषाणूचा Genome हा Amplify केला जातो. त्यामुळे यामध्येही स्वॅबमधील विषाणूंचे प्रमाण कमी असले तरी टेस्ट रिपोर्ट अचूक येतो.


८) या तपासणीत मुख्यत: कोरोना विषाणूचा E Gene व विषाणूच्या RNA मध्ये असणारे RdRp हे Enzyme शोधले जाते.


९) ही तपासणी RT--PCR पेक्षा बऱ्याच जलद होते ( अर्धा ते एक तासात ) तसेच या तपासणीसाठी लागणारा खर्चही कमी असतो. (१२०० ते १३०० रुपये) तसेच ही  तपासणी करायला सोपी आहे व त्यासाठी खास प्रशिक्षित व्यक्तीची गरज लागत नाही.


१०) असे असले तरी या मशिनची किंमत जादा असल्याने (६.५ ते १२ लाख ) व पुरवठा कमी असल्याने हे मशिन अजून सगळीकडे उपलब्ध नाही आहे.


Antibody Test

-----------------------

१) शरीरात एखादा Antigen ( बाहेरचा कोणताही सजीव घटक जसे bacteria, virus इत्यादी ) गेल्यावर त्यांच्याशी लढण्यासाठी जे घटक शरीरामार्फत तयार केले जातात त्यांना Antibody म्हणतात.


२) Antibody Test ही मुख्यतः पूर्वी होऊन गेलेल्या आजाराची माहिती सांगते.


३) Infection झाल्यानंतर शरीरात Antibodies तयार व्हायला साधारण १ ते २ आठवडे इतका कालावधी लागतो. त्यामुळे कोविड निदानासाठी या तपासणीचा कोणताही उपयोग होत नाही.


४) सर्वच लोकांना कोविडमध्ये लक्षणे निर्माण होतील असे नाही. अशावेळी किती लोकांना हा आजार होवून गेला हे लक्षात येण्यासाठी व त्यावरुन या आजाराचा मृत्यूदर निश्चित करण्यासाठी प्रामुख्याने या तपासणीचा उपयोग होतो.


HRCT

----------

१) ही चाचणी म्हणजे छातीचा CT scan असतो. 


२) ही चाचणी कोविड निदानासाठी शासनातर्फे जरी ग्राह्य धरली जात नाही.


३) तरीही लक्षणे सुरु होवून ४ ते ५ दिवसांनंतर रोगाचा शरीरातील प्रादुर्भाव वाढल्यास  रोगनिदानासाठी तसेच न्युमोनियाची तीव्रता व फुफ्फुसांची कार्यक्षमता  समजण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो.


४) RT--PCR च्या तुलनेत याचा रिपोर्ट लगेच मिळत असल्याने तसेच न्युमोनियाची तीव्रता लक्षात येत असल्याने याचा कोविड उपचारासाठी चांगला उपयोग होतो.


५) RT--PCR प्रमाणे याचा रिपोर्ट ही अधिक खात्रीशीर व अचूक असतो. तसेच यावरुन पेशंटच्या शरीरात सुधारणा होवू शकते की पेशंटची स्थिती आणखी बिघडू शकते याचेही याचेही अचूक निदान करता येते.


६) लक्षणे दिसायला लागल्यानंतर पहिल्या ४ दिवसांत HRCT हा इतकी sensitive नसते त्यामुळे ५०% कोविड पॉझिटिव्ह पेशंट मध्ये HRCT चा रिपोर्ट नॉर्मल येण्याची शक्यता असते. पण त्यानंतर HRCT ही Highly sensitive म्हणजेच एकदम अचूक असते. 


७) HRCT च्या रिपोर्टमध्ये खालीलप्रमाणे लक्षणे दिसू शकतात


a.) सुरवातीला ( कोविड लक्षणे सुरु झाल्यानंतर ७ दिवसांमध्ये ) -- Ground Glass Opacity (GGO)


b.) ७ दिवसानंतर न्युमोनिया वाढल्यास ---

1. GGO वाढणे

2. Crazy paving pattern

3. Consolidation

4. Fibrosis


८) HRCT Score

------------------------

a.) न्युमोनिया हा फुफ्फुसांमध्ये किती प्रमाणात वाढला आहे हे समजण्यासाठी HRCT मध्ये Score दिला जातो.


b.) हा स्कोर 0 ते 25 या दरम्यान असतो. 0 स्कोर याचा अर्थ फुफ्फुसांत न्यूमोनिया अजिबात पसरलेला नाही असा होतो तर 25 स्कोर म्हणजे न्यूमोनिया फुफ्फुसांत सर्वत्र पसरलेला आहे असा अर्थ होतो. 


c.) 25 पैकी स्कोर असताना 


1) कमी प्रमाणातील न्यूमोनिया -- 12 पेक्षा कमी स्कोर असणे.


2) मध्यम न्यूमोनिया -- 12 ते 18 स्कोर असणे.


3) तीव्र स्वरुपाचा न्यूमोनिया -- 18 पेक्षा जास्त स्कोर असणे.


d.) फुफ्फुसे किती टक्के बाधित झाली आहेत हे कळण्यासाठी HRCT Score ला ४ ने गुणले जाते. पण ते दरवेळी बरोबर येईलच असे सांगता येत नाही.


e.) बऱ्याच रिपोर्ट मध्ये HRCT Score हा ४० पैकी दिला जातो त्यावेळी वरील दोन्ही नियम लागू पडत नाहीत.


९) पेशंटची न्यूमोनिया आणखी वाढू शकतो की कमी होवू शकतो हे कळण्यासाठी HRCT सोबतच C Reactive Protein,

 serum ferritin, lymphocytes या तपासण्या करणेही गरजेचे असते.


१०) X रे मध्ये कोविड ची सुरवातीची GGO सारखी लक्षणे दिसत नाहीत त्यामुळे X रे चा कोविड निदानासाठी हवा तितका उपयोग होत नाही.


कोविड टाईम लाईन

-------------------------

कोविड मध्ये कोणत्या दिवशी साधारण कोणत्या गोष्टी होतात हे आता पाहू.


दिवस ० -- जंतूसंसर्ग


दिवस ५ -- लक्षणे दिसण्यास सुरुवात


दिवस १ ते २८ -- RNA व Antigen पॉझिटिव्ह


दिवस २८ -- RNA व Antigen निगेटिव्ह


दिवस ० ते ७ -- फक्त RT--PCR टेस्ट पॉझिटिव्ह


दिवस ९ -- HRCT मध्ये लक्षणे दिसतात


दिवस ७ -- IgM Antibody पॉझिटिव्ह


दिवस १४ -- IgG Antibody पॉझिटिव्ह


दिवस २१ -- IgM Antibody निगेटिव्ह


दिवस १४ ते २१ -- रोगाचा लक्षणे कमी होण्याचा टप्पा पण तरीही इतरांना जंतूसंसर्ग करु शकतो.


दिवस २१ ते २८ -- RT--PCR

कधी कधी पॉझिटिव्ह येवू शकते पण इतरांना जंतूसंसर्ग होत नाही.

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

Lovely Messages 8

 

दिन विशेष

Whatsapp Messages fwd. By Mr. Anil Anant Shivalkar,  Ratnagiri 

        श्री. अनिल अनंत शिवलकर , रत्नागिरी 
                 




 


[8/15, 14:09] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष*


▪️१९४७: भारत देश स्वतंत्र झाला.


▪️१९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.


▪️१९४७: पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.


▪️१९४८: दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.


▪️१९६०: कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.


▪️१९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.


▪️१८६५: रेकी चे निर्माते मिकाओ उस्ईई यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९२६)


▪️१८६७: रंगभूमी अभिनेते गणपतराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९२२)


▪️१८७२: क्रांतिकारक, तत्त्वचिंतक योगी अरविंद घोष यांचा जन्म.


▪️१८७२: भारतीय गुरु, कवी आणि तत्वज्ञ श्री अरबिंदो यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५०)


▪️१८७३: भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार रामप्रसाद चंदा यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४२)


▪️१९०४: मोटार व्हीलचेअर चे शोधक जॉर्ज क्लाईन यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९२२)


▪️१९१२: इंदौर घराण्याचे संस्थापक उस्ताद अमीर खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९७४)


▪️१९१३: लेखक कवी भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ बी. रघुनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९५३)


▪️१९१५: ऊर्दू कथा, पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९९१)


▪️१९१७: लेखिका अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर २००१)


▪️१९२२: लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म.


▪️१९२९: साहित्यिक आणि वीणा मासिकाचे संपादक उमाकांत ठोमरे यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १९९९)


▪️१९४५: बांगला देशच्या पंतप्रधान बेगम खालेदा झिया यांचा जन्म.


▪️१९४७: चित्रपट अभिनेत्री राखी गुलझार यांचा जन्म.


▪️१९५८: अभिनेत्री आणि वेशभूषाकार सिंपल कपाडिया यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर २००९)


▪️१९६१: भारतीय अभिनेत्री आणि पटकथालेखक सुहासिनी मणिरत्नम यांचा जन्म.


▪️१९६४: बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन च्या सह-संस्थापिका आणि बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांचा जन्म.


▪️१९७१: भारतीय गायक आणि संगीतकार अदनान सामी यांचा जन्म.


▪️१९७५: भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक विजय भारद्वाज यांचा जन्म.


▪️१९९२: भारतीय बुद्धिबळपटू भास्करन आडहान यांचा जन्म.


▪️१९४२: स्वातंत्र्य सेनानी, म. गांधींचे स्वीस सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८९२)


▪️१९७४: स्वामी स्वरुपानंद यांनी समाधी घेतली (जन्म: १५ डिसेंबर १९०३)


▪️१९७५: बांगला देशचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९२०)


▪️२००४: गुजरातचे मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९४१)


▪️२००५: भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक बॅंडापुडी वेंकट सत्यनारायण यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२७)


▪️१९७१: बहरैन देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.


▪️१९७५: बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.


▪️१९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.


▪️१९८८: मिले सूर मेरा तुम्हारा दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित झाले.

..............

[8/16, 14:44] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *रविवार दि. १६ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️१९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.


▪️१९४६  कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.


▪️२०१०: जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.


▪️१८७९: संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९५५)


▪️१९०४: हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९४८)


▪️१९४८: भारतीय-डच रॉक संगीतकार बेरी हे यांचा जन्म.


▪️१९५०: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांचा जन्म.


▪️१९५२: गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जन्म.


▪️१९५४: पार्श्वगायिका हेमलता यांचा जन्म.


▪️१९५७: भारतीय वकील व राजकारणी आर. आर. पाटील यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)


▪️१९५८: अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका मॅडोना यांचा जन्म.


▪️१९६८: भारतीय राजकारणी आणि दिल्लीचे ७वे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जन्म.


▪️१९७०: नेपाळी-भारतीय अभिनेत्री मनीषा कोईराला यांचा जन्म.


▪️१९७०: अभिनेता सैफ अली खान यांचा जन्म.


▪️१९९७: अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन.


▪️१९९७: कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९४८)


▪️२०००: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९५२ - नवी दिल्ली)


▪️२००३: युगांडाचा हुकुमशहा इदी अमीन यांचे निधन.


▪️२०१०: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९२६)


▪️२०१८: भारताचे १०वे पंतप्रधान व कवी अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन (जन्म:२५ डिसेंबर १९२४)


....................


[8/17, 15:49] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *सोमवार दि. १७ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️१६६६: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.


▪️१९८२: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.


▪️१९९९: तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.


▪️२००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.


▪️१८८८: श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणेचे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म.


▪️१८९३: हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका मे वेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९८०)


▪️१९०५: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६४)


▪️१९१६: ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५)


▪️१९२६: चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव जिआंग झिमिन यांचा जन्म.


▪️१९३२: नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक व्ही. एस. नायपॉल यांचा जन्म.


▪️१९४९: इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा जन्म.


▪️१९७०: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरिअर यांचा जन्म.


▪️१३०४: जपानी सम्राट गोफुकाकुसा यांचे निधन.


▪️१८५०: पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान मार्टिन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८)


▪️१९०९: क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांनी न्यायलयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली असून त्यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)


▪️१९२४: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल यांचे निधन.

.............


[8/18, 18:54] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *मंगळवार दि. १८ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️१८४१: जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.


▪️१९२०: अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार.


▪️२००५: जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटी लोक अंधारात.


▪️२००८: हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.


▪️१७००: मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १७४०)


▪️१७३४: रघुनाथराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १७८३)


▪️१७९२: युनायटेड किंगडमचे पंतप्रधान जॉन रसेल यांचा जन्म.


▪️१८७२: संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९३१)


▪️१८८६: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९)


▪️१९००: राजदूत, मुत्सद्दी राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९९०)


▪️१९२३: लेगस्पिनर गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जून १९५५)


▪️१९३४: गीतकार, कवी, लेखक दिग्दर्शक गुलजार यांचा जन्म.


▪️१९३६: हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी रॉबर्ट रेडफोर्ड यांचा जन्म.


▪️१९५६: भारतीय फलंदाज संदीप पाटील यांचा जन्म.


▪️१९६७: पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदी यांचा जन्म.


▪️१९८०: अभिनेत्री प्रीती जंघियानी यांचा जन्म.


▪️१९७९: भारतीय राजकारणी वसंतराव नाईक यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९१३)


▪️१९९८: अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९४८)


▪️२००८: रहस्यकथाकार नारायण धारप यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)


▪️२००९: दक्षिण कोरियाचे ८वे राष्ट्राध्यक्ष किम दे-जुंग यांचे निधन.


▪️२०१२: भारतीय पत्रकार आणि लेखक रा. की. रंगराजन यांचे निधन.


.................


[8/19, 13:58] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *बुधवार दि. १९ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष*


▪️जागतिक छायाचित्रण दिन


▪️२९५ ख्रिस्त पूर्व: प्रेम, सौंदर्य आणि प्रजनन यांची रोमन देवी व्हीनसचे पहिले मंदिर पूर्ण झाले.


▪️१९१९: अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.


▪️१८७१: विल्बर राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राइट यांचा जन्म.  


▪️१८८६: स्वातंत्र्यसैनिक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९३५)


▪️१८८७: भारतीय वकील आणि राजकारणी एस. सत्यमूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४३)


▪️१९०३: लेखक चरित्रकार गंगाधरदेवराव खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२)


▪️१९०७: केंद्रीय मंत्री सरदारस्वर्ण सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९४)


▪️१९०७: भारतीय इतिहासकार, लेखक, आणि विद्वान हजारी प्रसाद द्विवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९७९)


▪️१९१३: भारतीय-इंग्लिश सैनिक व लेखक पीटर केम्प यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९३)


▪️१९१८: भारताचे ९वे राष्ट्रपती आणि ८वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९९९)


▪️१९४७: अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मास्टर विनायक यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९०६)


▪️१९७५: शिक्षणतज्ञ, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक विश्वनाथ तथा अप्पासाहेब पेंडसे यांचे निधन.  


▪️१९९०: पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक रा. के. लेले यांचे निधन.

▪️

१९९३: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १९२९)


▪️१९९३: निर्भिड पत्रकार य. द. लोकुरकर यांचे निधन.


▪️१९९४: रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे, दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेते लिनसकार्ल पॉलिंग यांचे निधन. 


▪️२०००: भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक बिनेंश्वर ब्रह्मा यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४८)


▪️२०१५: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सनत मेहता यांचे निधन.


...............


[8/20, 14:12] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *गुरुवार दि. २० ऑगस्ट २०२०* 


🧷  *दिनविशेष* 


▪️१८२८: राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.


▪️१८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.


▪️२००८: कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.


▪️१८९६: भारतीय फुटबॉल खेळाडू गोस्त पाल यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७६)


▪️१९४०: भारतीय- ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रेक्स सेलर्स यांचा जन्म.


▪️१९४१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच सर्बिया यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च २००६)


▪️१९४४: भारताचे ६वे व सर्वात कमी वयाचे पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २१ मे १९९१)


▪️१९४६: इन्फोसिस चे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांचा जन्म.


▪️२००१: प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष एम. आर. यार्दी यांचे निधन.


▪️२०११: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९१९)


▪️२०१३: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे निधन.


▪️२०१३: ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक जयंत साळगावकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२९)


▪️२०१४: भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते बी. के. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)


..............

[8/24, 14:22] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *सोमवार दि. २४ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन


▪️१६९०: कोलकाता शहराची स्थापना.


▪️१६०८: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत ला दाखल.


▪️१८७५: कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.


▪️१८३३: गुजराथी लेखक समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६)


▪️१८७२: केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदेमंडळाचे सभासद न. चिं. केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४७)


▪️१८८०: निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५१)


▪️१८८८: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९५७)


▪️१८८८: मार्टिन बेकर एरिक कंपनी चे सहसंस्थापक वेलेंटाइन बेकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९४२)


▪️१९०८: क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)


▪️१९१७: किराणा घराण्याचे गायक पं. बसवराज राजगुरू यांचा जन्म.


▪️१९१८: केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)


▪️१९२७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्कोवित्झ यांचा जन्म.


▪️१९२७: भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या अंजली देवी यांचा जन्म.


▪️१९२९: नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाइनचे नेते यासर अराफत यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४)


▪️१९९३: क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू दि. ब. देवधर यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८९२)


▪️२०००: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचे निधन. (जन्म: ३० जून १९२८)


▪️२००८: चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार वै वै यांचे निधन.


▪️२०१९: भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९५२)


...................


[8/26, 14:26] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *बुधवार दि. २६ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️१९४४: दुसरे महायुद्ध – चार्ल्स गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.


▪️१९७२: जर्मनीतील म्युनिच येथे २०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.


▪️१९१०: भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म. 


▪️१९२२: समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ग. प्र. प्रधान यांचा जन्म. 


▪️१९२७: प्रख्यात वास्तुविशारद बी. व्ही. दोशी यांचा जन्म.


▪️१९२८: हिरो साइकिलचे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचा जन्म.  


▪️१९४४: लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म.


▪️१९४८: नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर यांचे निधन.  


▪️१९५५: मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव यांचे निधन.


▪️१९५५: मल्याळी चित्रपट अभिनेते बालन के. नायर यांचे निधन.


▪️१९९९: डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ यांचे निधन.


▪️२०१२: चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचे निधन. 


...................


[8/29, 14:00] A. A. Shivalkar Gpr: 🟣  *शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️भारतीय क्रीडा दिन 


▪️१९१८: टिळकांनी मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन बोलावले.


▪️१९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.


▪️१९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.


▪️१९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.


▪️१९०१: सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचा जन्म.  


▪️१९०५: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म. 


▪️१९१५: स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचा जन्म.  


▪️१९२३: भारतीय क्रिकेट खेळाडू हिरालाल गायकवाड यांचा जन्म.


▪️१९२३: इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा जन्म.


▪️१९५८: अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार मायकेल जॅक्सन यांचा जन्म.  


▪️१९५९: दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता अक्किनेनी नागार्जुन यांचा जन्म.


▪️१९७६: इस्लाम क्रांतिकारक बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचे निधन. 


▪️१९८२: स्वीडीश अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन यांचे निधन.  


▪️१९८६: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचे निधन.  


▪️२००७: स्वातंत्र्यसैनिक आणि हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसीदास गुप्ता यांचे निधन.  


▪️२००८: मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन.  

..............


[8/30, 12:41] A. A. Shivalkar Gpr: 🟣 *रविवार दि. ३० ऑगस्ट २०२०*


🧷  *दिनविशेष* 


▪️१५७४: गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले.


▪️१८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.


▪️१८३५: अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना झाली.


▪️१९४५: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.


▪️१८१३: बालसाहित्यिक ना. धों. ताम्हनकर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९६१)


▪️१९३०: संगीतकार दशरथ पुजारी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल २००८ – डोंबिवली, मुंबई)


▪️१९३०: अमेरिकन उद्योगपती वॉरन बफे यांचा जन्म.


▪️१९३४: लेग स्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००५)


▪️१९३७: मॅक्लारेन रेसिंग टीम चे संस्थापक ब्रुस मॅक्लारेन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९७०)


▪️१९५४: बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष अलेक्झांडर लुकासेंको यांचा जन्म.


▪️१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी रवीशंकर प्रसाद यांचा जन्म.


▪️१९४७: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन. (जन्म: १ जून १८७२)


▪️१९८१: शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक जे. पी. नाईक यांचे निधन.  


▪️१९९४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी शं. गो. तुळपुळे यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)


▪️१९९८: स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार नरुभाऊ लिमये यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)


▪️२००३: अमेरिकन अभिनेता चार्ल्स ब्रॉन्सन यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)


................


▪️२०१४: भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचे निधन. (जन्म: २७ मे १९२८)


▪️२०१५: भारतीय विद्वान लेखक एम. एम. कळबुर्गी यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १९३८)

................................

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

Lovely messages 7

 नमस्कार मित्र हो , 


काही मित्र आपल्याला दररोज शुभ संदेश पाठवतात. कोरोनामुळे तर हे फार अावश्यक झाले आहे. संदेश अनेक जण पाठवतात. पण काही जण एका विशिष्ट प्रकारचे संदेश पाठवतात. अशा संदेशांमुळे आपल्याला आयुष्यात दिशा मिळते. कधी कधी तर मन उदास झाले तर असे संदेश मनाला नवी उर्जा देतात. विशेष म्हणजे असे सुंदर व उपयुक्त संदेश पाठवणा-या व्यक्ती ते गोळा करण्यासाठी व इतरांना पाठवण्यासाठी अपार मेहनत घेत असतात. त्यांच्या या चांगल्या उपक्रमाची माहिती या पानातून देण्याचा हा प्रयत्न आहे. ही कल्पना ज्यांच्या नियमितपणे उत्तम संदेश पाठविण्यामुळे सुचली ते म्हणजे 


          श्री. संतोष रामचंद साळगांवकर

 या , आपण त्यांचे संदेश वाचू व अशा चांगल्या गोष्टींचा प्रसार करू.
...........
नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्याहीपेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते......
   🌹 *Good Day* 🌹
..........

*विरोधक तयार  करण्यासाठी*
*मारामारी करावी लागत नाही*
*तुम्ही चांगले कार्य करु लागला की*
*आपोआप विरोधक तयार होतात कारण*
*कर्तृत्ववान व्यक्तीचे कार्य बघितले जात नाही* ,
*परंतु  तो कोठे अडकतोय* 
*याकडे सर्वांचे मात्र लक्ष असते ...!*
       🌹 *सुप्रभात*  🌹
..........
*जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय*
*नवीन वाटांचा शोध लागत नाही*..

  *🌹शुभ सकाळ🌹*
..........
*जेंव्हा एखादी व्यक्ती त्यांची समस्या आपल्या समोर मांडते, तेंव्हा ती आपल्यावर साक्षात देवासारखा विश्‍वास ठेवते*
         🌹सु प्रभात🌹
.........
वेळ , मित्र आणि नाती
 ह्या अशा तीन गोष्टी आहेत की,
 त्यांना किंमतीचे लेबल नसते.
 पण" ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते 
     🌹 *शुभ सकाळ* 🌹
...........
*गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच हितचिंतक नसतो.* *मिठासारखे खारट ज्ञान देणाराच खरा मित्र असतो.*
    🌹शुभ सकाळ🌹
..........
_*चांगला रस्ता पाहिजे असेल तर* 
*गतीरोधक सहन करा*, 
*आणि चांगला माणूस बनायचं असेल तर* 
*विरोधक सहन करा.*_

*🌹 शुभ सकाळ🌹*
.......
*पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो,*
*मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो.*
     
       *🌹 शुभ सकाळ* 🌹
.......
*चूक नसतानासुध्दा निव्वळ वाद टाळण्याकरिता मागितलेली माफी,जीवनातील संयमाचं एक मोठं उदाहरण ठरतं.!!* 
*जीवनात संयम राखला तर आपले अस्तिव कुणीच संपवू शकत नाही.!!*

         🌹*शुभ सकाळ *🌹
.......
जगण्यातले सगळ्यात कणखर आव्हान म्हणजे ? मनाला लावून न घेणे व येणारया संकटाला धैर्याने सामोरे जाणे यालाच जीवन म्हणतात.
     🌹सु प्रभात🌹
......... 
*एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी ज्ञानाची गरज लागते, पण तिची जाणीव होण्यासाठी अनुभवाची गरज असते.*

🌹 *शुभ सकाळ* 🌹
.......
*लोकांना आपण का खटकतो...*

*आपण वाईट वागतो म्हणून नाही*,
*तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून...*

*शब्द फिरवणारे लाख मिळतील*
*पण... शब्द पाळणारा एखादाच मिळेल ..*

          *💐 शुभ सकाळ 💐*
.........
*चैत्रातील झळ सहन केल्याशिवाय मृगातील रिमझिमचा आनंद द्विगुणीत हाेत नाही.*
*तसेच,*
*जीवनात संकटांची वादळे झेलल्या शिवाय सुखाची चव कळत नाही.*
 
*🌹शुभ सकाळ🌹*
.......
*आयुष्य हि फार अवघड शाळा आहे.इथे कॉपी करता येत नाही.*

*कारण इथे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.*

        🌹 *शुभ सकाळ* 🌹
..........
*जीवन जगण्याची कला त्यांनाच माहित असते जे स्वतः सोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करतात...*

  🌹*शुभ सकाळ*🌹
.......
घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात तेव्हा
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात....!

           🌹 सुप्रभात 🌹
........
*आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य..."*
*जिंकलो तर स्वतःला आवरायचं*
 *आणि हरलो तर ईतरांना सावरायचं..."*
         
       *🌹सुप्रभात🌹*
.........
*घराचा प्रमुख होणे सोपे नाही, त्याची स्थिती पत्र्याच्या शेड सारखी असते. जो ऊन, पाऊस, वारा, वादळ आदी सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो, परंतु त्या खाली राहणारे नेहमी म्हणतात की, ‘हा खुप आवाज करतो’.*

           🌹   *सुप्रभात*   🌹
.......

सोमवार, २० जुलै, २०२०

Lovely messages 5

05.  Onlydevidas.  Fwd msgs

मेसेज बाय श्री. संदीप रमेश पिळणकर

ग्रूप : भंडारी सम्राट

*!!जय भंडारी!!*


समाज बंधू-भगिनी
सस्नेह नमस्कार!
         आपल्या *भंडारी समाज संयुक्त समितीचा* *झूम अँप  हया नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वधू-वर परिचय मेळावा*  २ ऑगस्ट 20 रोजी आयोजित केला आहे. 
         तरी अधिक माहितीसाठी खालील व्यक्तीशी २५ जुलै २०२० पर्यंत संपर्क साधावा.
सुस्मिता तोडणकर-सचिव,
९३२४२९८३४८,
श्री. हेमंत जाधव-कोषाध्यक्ष
९३२४७८७९९८,
श्री बाळ गोलतकर
९६१९०३५४७३
सौ. नीलिमा सरमळकर,
९१५२८९८९३०,
श्री. राजेंद्र पेडणेकर,
८८९८३५९७७६,
श्री. गंगाराम पेडणेकर,
८७६७८६७२८४,
श्री. सखाराम शिरोडकर,
९९८७१२६६२४
श्री. संदीप पिळणकर,
९०८२०६०९९३
श्री. मनोज सुर्वे,
८६८९९८६८७०
श्री. मेश्राम सोनसुरकर
९८६९०२९३५०
श्री. प्रकाश कांबळी,
९३२२४६३२९१
..........

मेसेज बाय : श्री. अनिल अ. शिवलकर , रत्नागिरी

मेसेज : 
🟣 *दिनविशेष* 
🔖  *रविवार दि. ५ जुलै २०२०*
▪️ आज गुरूपौर्णिमा 
▪️ १९१३: बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
▪️ १९९६: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि एन. पंत यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.
▪️ १९४६: केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार रामविलास पासवान यांचा जन्म.

▪️ १९५४: न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जॉन राइट यांचा जन्म.
▪️ १८३३: जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे निओपे यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७६५)
▪️ २००५: लेगस्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)
▪️ २००६: भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२४)
.......


 व्हाॅटस्अप ग्रूप : जनसेवा ग्रंथालय , रत्नागिरी
मेसेज बाय : भाग्यश्री पटवर्धन 
मेसेज : 
*पुणेरी पाट्या लावण्याची परंपरा या भिडूने सुरू केली.* 

पुण्यनगरीला पाट्यांच शहर म्हणलं जातं. कमीतकमी शब्दात जास्तीतजास्त अपमान करून घेण्याची हमखास जागा म्हणजे सदाशिव पेठ पुणे.

आता ही पुणेरी पाट्यांची पद्धत कोणी सुरू केली या इतिहासाबद्दल अस्सल पुणेकर वाद बराच घालतील पण पहिली फेमस पाटी कोणी लावली त्या भिडूच नाव आम्ही तुम्हाला सांगू शकतो.

प्रभाकर बाळकृष्ण जोग म्हणजे प्र.बा.जोग
विद्वान माणूस विक्षिप्त असतो अस म्हणतात, पुणे तर विक्षिप्त लोकांनी भरलेलं शहर आहे. प्र बा जोग हे या सगळ्या विक्षिप्त पुणेकरांचे बादशहा होते.

ते मूळचे वकील. शिवाय क्रिकेट सामन्याचे अंपायर, पट्टीचे वक्ते आणि वर राजकारणी सुद्धा. पण त्यांचा सगळ्यात आवडता छंद भांडणे हा होता.

पेशाने ते वकील , त्यात सदाशिव पेठ त्यात भांडण्याची खुमखुमी असलेले . म्हणजे किती जालीम रसायन असेल याची कल्पना करा

भांडण्यासाठी त्यांना कोणतेही कारण पुरायचे. अगदी लाकडी जिन्यावरून चालताना आवाज झाला किंवा गवळ्याने चरवी जोरात आदळली या कारणाने देखील त्यांची भांडणे व्हायची. पण ही सगळी भांडणे मारामाऱ्या टाइप नसून तात्विक असायची.

गंमत म्हणजे यातूनच त्यांनी मी हा असा भांडतो नावाचं पुस्तक देखील लिहिलं होतं.
ही सारखी सारखी होणारी भांडणे टाळावी यासाठी त्यांनी घरात प्रवेश करतानाच काही पाट्या लिहून ठेवल्या होत्या.

माझ्यावर विश्वास असेल तर या, नाहीतर कायमचे कटा (गणगोतासह).

या वाक्याखाली दोन्ही दिशांना बाण दाखवून ‘कटण्याचा मार्ग’ही दाखवलेला! अशी पाटी पाहून आत जाण्याची कुणाची हिंमत झालीच, तर समोरच्याच बाजूला एक उंचच्या उंच फलक वाचायला मिळायचा. त्यात दहा सूचना लिहिलेल्या.

‘‘लग्न, मुंज, सत्यनारायण वगैरेंची बोलावणी करणेस दुपारी १२ ते ४ येऊ नये’’
‘इना, फिना, लक्स वगैरेचे विक्रेते, कर्ज मागणारे, नाटकाची तिकिटे खपविणारे, भीक मागणारे, मदत मागणारे, अमके कुठे राहतात, तमक्याचा लग्नाचा मुलगा कोठे राहतो वगैरे चौकशी करणारे, वर्गणी मागणारे यांनी बिलकुल येऊ नये.
तुमच्या सोयीच्या वेळी माझेकडे येऊ नका.
खासगी भेटी ७ ते ९, शनिवारी सुट्टी, दुपारी १२ ते ४ या वेळेत कोणीही येऊ नये,
अशा अनाहूत सूचनांचाही भडिमार करणाऱ्या या दहा सूचनांच्या खाली जी कडी केली आहे, ते वाक्य असे :

“वरील सूचना सर्वासाठी आहेत. गेली २४ वर्षे लोकांच्या अवेळी येण्याने त्रासलो, म्हणून या सूचना कराव्या लागल्या आहेत, क्षमस्व!” – प्र. बा. जोग

प्र. बा. जोग यांच्या या पाट्यांनी संपूर्ण पुणे शहरात धमाल उडवून दिली होती.
सगळेजण त्यांना घाबरायचे पण तरीही फक्त पाट्या वाचण्यासाठी अनेकजण त्यांच्या वाड्यात चक्कर मारून यायचे.

पुण्यात पाट्यांचा आद्य जनक म्हणून त्यांना ओळखलं गेलं.

त्यांचे तात्विक वाद अनेक ठिकाणी व्हायचे. पुण्यातल्या सुप्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेत त्याना बोलण्याची इच्छा असायची पण त्यांना बोलू दिलं जात नसे.

त्यामुळे चिडून त्यांनी त्यांनी आपल्या चारचाकीला (बहुतेक अँबॅसॅडर किंवा फियाट गाडी असावी!) टपावर लाकडी फळ्या ठोकून एक ‘चालता’ असा मंचच बनवून घेतला होता

आणि स्वतःची पसंत व्याख्यानमाला सुरू केली.
त्या मंचावर ते दोन खुर्च्या टाकत एकावर आपल्या छोट्या मुलाला व्याख्यानाचा अध्यक्ष म्हणून बसवत व शेजारी आपण उभे राहून भाषण ठोकत.

त्यांचे गंमतीदार भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होत असे.

स्वारगेट जवळच्या नेहरू स्टेडिअमवर रणजी ट्रॉफीचा सामना होता तिथे काही तरी राजकारण करून प्र.बा.जोग यांना अंपायरिंग करू दिल गेल नाही, एवढंच काय तर ते येऊन भांडतील म्हणून मैदानात सुद्धा प्रवेश करू दिला नाही.

यामुळे चिडलेल्या जोगांनी स्टेडियमच्या बाहेर प्रेक्षक गॅलरीपेक्षाही उंच असे मचाण बांधले.
आणि सामना सुरू होताच, त्या मचाणावर बसून लाऊडस्पीकरने त्या सामन्याचे प्रत्यक्ष वर्णन केले. जोगांच्या या धावत्या कॉमेंट्रीसाठीही पुणेकरांनी भरगच्च गर्दी केली होती.

त्यांच्या या भांडण्याच्या छंदामुळे त्यांची वकीली चांगली चालायची. मुंबई राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी यांनी दारुबंदी केली, आणि प्र.बा. जोगांची वकिली फळफळली.

‘दारुबंदीचा गुन्हा करा आणि माझ्याकडे या, मी तुम्हाला सोडवीन’

अशी जाहिरातच त्यांनी करायला सुरुवात केली. या दारुबंदीच्या खटल्यांमध्ये जोगांनी एवढा पैसा मिळवला, की

त्यांनी आपल्या घराला ‘मोरारजीकृपा’ असे नाव दिले.
त्यांनी विधानसभेच्या अनेक अपक्ष म्हणून अनेक निवडणुका लढवल्या आणि प्रत्येक वेळी हरले. पण नगरसेवक पदी मात्र ते हमखास निवडून येत. सलग दोन वेळा त्यांनी पुण्याचं उपमहापौर पद सांभाळलं.

पुढे त्यांच्या नावाने त्यांच्या मुलांनी शाळा व ज्युनिअर कॉलेज सुरू केले. पी जोग क्लासेस चे सुहास जोग अस्थिशल्यविशारद विलास जोग, बालरोगतज्ज्ञ प्रमोद जोग ही प्र.बा. जोग यांची मुले होत. बिग बॉस मुळे फेमस झालेला अभिनेता पुष्कर जोग हा सुहास जोगांचा मुलगा आणि प्र.बा.जोग यांचा नातू.

आजही जुन्या पुण्यात गेलं तर आचार्य अत्रेंच्या खालोखाल प्र.बा.जोग यांच्या बद्दल किस्से ऐकायला मिळतील. ते प्रचंड हुशार होते, त्यांच्या कडक शिस्तीचा, त्यांच्या फटकळ स्वभावाबद्दल पुण्यात एक आदरयुक्त दरारा होता.

त्यांनी लिहिलेल्या पाट्यांना कॉपी करून पुणेकरांनी हा विक्षिप्तपणा अजरामर करून ठेवला.
..............
व्हाॅटस्अप ग्रूप : बिलोव्हड फँमिली, सावंतवाडी , जि. सिंधुदूर्ग
मेसेज बाय : श्री. राजेंद्र सदानंद नाईक , सावंतवाडी
मेसेज : 

कर्नाटकातील एक दुर्गम खेडयातील या मुलाने काय साध्य केले ते पहा ..

हा प्रताप अवघा २१ वर्षांचा नवयुवक, आहे तो एका महिन्यात तब्बल २८ दिवस परदेशात प्रवास करतो. फ्रान्सने त्यांना त्यांच्या संस्थांमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यासाठी त्यांना मासिक पगार १ लक्ष रुपये, इतका गलेलठ्ठ २ बीएचके घर आणि २ कोटी किमतीची

कार दिली जाईल. पण त्याने नकार दिला.त्यांचा डीआरडीओने आमंत्रन देऊन गौरव केला आहे

कर्नाटकातील या मुलाने काय साध्य केले ते पाहू या.

त्यांचा जन्म कर्नाटकच्या म्हैसूरजवळच्या कडाईकुडी या दुर्गम गावात झाला. त्याच्या वडिलांनी शेतकरी म्हणून २००० रुपये मिळवले. प्रतापला लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक्समध्ये रस होता. प्लस २ चा अभ्यास करताना त्याने जवळच्या सायबर कॅफे येथून एव्हिएशन, स्पेस, रोल्स रॉयस कार, बोईंग ७ इत्यादी वेबसाइट्सशी स्वत: ची ओळख करून दिली. त्यांनी काम करण्याच्या त्याच्या स्वारस्याबद्दल परंतु व्यर्थ ठरल्याबद्दल जगभरातील शास्त्रज्ञांना आपल्या तोडक्या इंग्रजीत अनेक ईमेल पाठविले. त्याला इंजिनिअरमध्ये जायचे होते, परंतु आर्थिक अडचणीमुळे तो बीएससीमध्ये दाखल झाला. (भौतिकशास्त्र) पुन्हा ते पूर्ण करण्यात अक्षम. वसतिगृहाची फी न भरल्यामुळे त्याला वसतिगृहाबाहेर काढण्यात आले.

तो म्हैसूर बसस्थानकात झोपायचा आणि सार्वजनिक शौचालयात कपडे धुवायचा. त्याने स्वतः सी ++, जावा कोअर आणि पायथन सारख्या संगणकीय भाषा शिकल्या. ईवॅस्टद्वारे तो * ड्रोन * बद्दल शिकला. अथांग प्रयत्नांनंतर तो अशा प्रकारचे ड्रोन विकसित करण्यात यशस्वी झाला. तो ड्रोन मॉडेल स्पर्धेत भाग घेण्यासाठी एका अनारक्षित डब्यात असलेल्या चिंधीमध्ये आयआयटी, दिल्लीला गेला. त्याने द्वितीय पुरस्कार जिंकला.

त्याला जपानमधील एका स्पर्धेत भाग घेण्यास सांगण्यात आले. जपानला जाण्यासाठी चेन्नईच्या महाविद्यालयातील शैक्षणिक प्राध्यापकास त्यांचा प्रबंध मंजूर करावा लागतो. ते प्रथमच चेन्नईला गेले आणि मोठ्या अडचणीने प्रो.ने त्यांना लिहिण्यास पात्र नाही अशा काही टिप्पण्यांनी मान्यता दिली.

जपानला जाण्यासाठी प्रतापला १०००० डॉलर्सची आवश्यकता होती, म्हैसूर येथील परोपकारी व्यक्तीने त्यांचे आईचे मंगळसूत्र विकून उडवलेली फ्लाइट तिकीट आणि शिल्लक पैशांची प्रायोजित केली. सर्वप्रथम जपानच्या त्याच्या पहिल्या विमानात जाऊन तो टोकियो गाठला. जेव्हा तो तेथे आला तेव्हा त्याच्याकडे फक्त ₹ १४०० होते. त्यांनी बुलेट ट्रेन घेतली नाही कारण ती फारच महाग होती म्हणून त्याने शेवटच्या स्थानकात पोहोचण्यासाठी सामान घेऊन १६ वेगवेगळ्या स्थानकांवर गाड्या बदलून सामान्य ट्रेनने जात. तो आणखी ९ किमी चालला. त्याच्या सामानासह अंतिम गंतव्यस्थानावर पोहोचणे.

त्यांनी एका प्रदर्शनात भाग घेतला ज्यात १२७ देश सहभागी झाले होते. निकाल क्रमवारीत जाहीर करण्यात आला आणि शेवटी प्रथम पुरस्कार जाहीर झाला. ..

"कृपया भारतातील श्री. प्रताप सुवर्ण पदकाचे स्वागत करा".

तो आनंदाने ओरडत होता. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी यूएसए ध्वज खाली जात असल्याचे आणि भारतीय ध्वज चढताना पाहिले.

त्याला $ १०००० देण्यात आले आणि सर्वत्र उत्सव साजरे झाले. पंतप्रधान मोदी, कर्नाटकचे आमदार आणि खासदार यांनी त्यांना बोलावले आणि सर्वांनी त्यांचा सन्मान केला. फ्रान्सने त्याला अत्यंत उच्च ऑर्डरच्या सर्व परवानग्यांसह नोकरीची ऑफर दिली. त्यांनी फक्त नकार दिला आणि

त्यांचा डीआरडीओने आमंत्रन देऊन गौरव केला आहे

कोणी का म्हणावं कि नवी पिढी उथळ विचारांची आहे,

त्यांच्यात देशभक्तीची वानवा आहे...हे उदाहरणं खूप बोलके आहे...

मंगळवार, ७ जुलै, २०२०

Lovely Messages 4


*नीट लक्ष देऊन वाचा*आणि गाभिर्याने विचार करा

मित्र : अजून जागा आहेस ?
मी : हो रे भाई.  या टेन्शनमुळे जागरण वाढलं.
मित्र : हो ना. 
मी : तुझी तब्बेत कशी आहे ? रिकव्हरी ?
मित्र : हो. आज पाचवा दिवस ना. बऱ्यापैकी रिकव्हरी आहे.
मी : गुड. काळजी घे रे.
मित्र : हो रे. माझा निष्काळजीपणा नडला.
मी : चलता है. वेळेत निदान झालं, ते महत्वाचं.
मित्र : तेच तर.
मी : सहज मेसेज केलेला ना ?
मित्र : नाही. एक अनुभव शेअर करायचा होता.
मी : बोल ना.
मित्र : ५ दिवसांपूर्वी माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली, आणि तातडीने माझ्यावर उपचार सुरू झाले.
मी : हो.
मित्र : त्यापूर्वी मी रविवारी मित्राच्या लग्नाला जाऊन आलेलो. कलीग होता, म्हणून नाही टाळता आलं. नंतर समजलं की, लग्नाला उपस्थित राहिलेल्या इतरांनाही संसर्ग झालेला आहे.
मी : मग ?
मित्र : अरे मला मित्राचा मागच्या आठवड्यात कॉल आलेला. तुला यावच लागेल. मला बाकी काही माहीत नाही. नाही आलास तर बोलणार नाही. असा हट्ट केलेला त्याने.
मी : पुढे ?
मित्र : वास्तविक पाहता, मला लग्न टाळता आलं असतं. पण मी सध्याच्या परिस्थितीला सिरीयस घेतलं नव्हतं. कारण लग्नाचा एरिया ग्रीन झोन होता. 
मी : साहजिक आहे.
मित्र : तीच तर मोठी चूक झाली. नेमकं लग्नाला आलेल्या पाहुण्यांपैकी कुणीतरी संसर्गग्रस्त व्यक्ती माझ्या संपर्कात आली. त्यामुळे मला आणि इतर काही जणांनाही, लागण झाली.
मी : ओह.
मित्र : मी घरी आलो, त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मला त्रास सुरू झाला. तुला तर माहीत आहे की, आई-पप्पा गेल्याने घरी कुणीच मोठं नाही. दादाची फॅमिलीही लांब आहे.
मी : मग ?
मित्र : मी टेस्ट केली आणि माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्याचं टेन्शन डोक्यावर स्वार झालेलं असतानाच, बायकोलाही खोकला सुरू झाला. त्यादरम्यान मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने, तिची एकटीची धावपळ झाली. मात्र तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. कारण त्यानंतर आमच्या दोन्ही मुलांनाही, तातडीने टेस्ट करायला सांगण्यात आलं.
मी : अरे.
मित्र : सुदैवाने त्या दोघांची टेस्ट निगेटिव्ह आली आणि आमच्या दोघांचा जीव भांड्यात पडला. मात्र पुढे अजून एक संकट आमच्यासमोर आ वासून उभं राहिलं.
मी : कुठलं भाई ?
मित्र : आम्ही दोघे दवाखान्यात. मग मुलांना सांभाळणार कोण ? माझी मुलगी ८ वर्षांची आहे आणि मुलगा ४ वर्षाचा. दोघेही लहान, त्यामुळे आम्ही दोघेही अगदी हतबल झालो.
मी : फिर ?
मित्र : अरे जवळच्या सगळ्या लोकांनी हात वरती केले. वरून शेजाऱ्यांनीही साफ नकार कळवळा. म्हणून मग शेवटी, हिच्या एका मैत्रिणीच्या हातापाया पडून त्यांना मनवलं आणि सुटकेचा निःश्वास सोडला.
मी : बरं झालं.
मित्र : अरे पण या सगळ्यात माझा बराच खर्च झाला. आधी सर्वांच्या टेस्ट आणि नंतर ट्रीटमेंट, यामुळे जवळ उरलेले सगळे पैसे संपले. एकतर लॉकडाऊनमुळे कॉर्पोरेटमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहेत.
मी : हो ना.
मित्र : मग काय. शक्य असेल त्या सगळ्यांसमोर हात पसरले. मात्र सगळ्यांनी नाईलाज सांगितला.
मी : हो ना. सगळेच कोंडीत सापडलेत.
मित्र : अखेरीस खूप अपेक्षेने त्या मित्राला कॉल केला. ज्याच्या लग्नाला त्यादिवशी रविवारी गेलो होतो.
मी : मग ?
मित्र : तू ऐकून शॉक होशील. मात्र एकतर सुरुवातीलाच त्याने पैसे द्यायला साफ नकार दिला. शिवाय शेवटी मला म्हणाला की, तू लग्नाला नसता आला तरी चाललं असतं. उगाच एवढा प्रॉब्लेम करून ठेवलास.
मी : कठीण आहे.
मित्र : तूच बघ आता. म्हणजे ज्याच्या शब्दखातर मी, स्वतःचा जीव धोक्यात टाकून, एवढ्या दूरच्या लग्नाला उपस्थित राहिलो. तोच मला सांगतोय की, उगाच मी तो बावळटपण केला.
मी : अक्कल बंद पडते.
मित्र : भाई कुणी कुणाचं नसतं. हे तेव्हा कळतं, जेव्हा आपण स्वतः संकटात असतो. बायकोने मला थांबवायचा प्रयत्न केला होता. पण माझा हट्ट माझ्याच पश्चातापाचं कारण बनला.
मी : सच बात.
मित्र : म्हणून आजच्या तारखेला, स्वतःपेक्षा स्वतःच्या कुटुंबाचा विचार करण्याची अधिक गरज आहे. कारण आपली एक चूक, त्या सर्वांचा जीव धोक्यात टाकू शकते.
मी : खरं आहे.
मित्र : आम्ही दोघेही कमावते आहोत. महिन्याला १ लाख रुपये पगार मिळतो आम्हाला. पण आजच्या तारखेला, आमची मुलं जेवलीत की उपाशी आहेत ? याचीही आम्हाला खबर नाही.
मी : नको तसा विचार करू.
मित्र : मनात येतात रे विचार. एवढ्या दिवसात कधी त्या तिघांना स्वतःपासून वेगळं होऊन दिलं नाही. मात्र आज माझ्या एका चुकीची शिक्षा, त्या तिघांना भोगावी लागते आहे.
मी : हो ना.
मित्र : लोक सध्याच्या परिस्थितीला फार कॅज्युअली घेत आहेत. त्यांना तुझ्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की, परिस्थितीचं गांभीर्य ओळखा. एखाद्या लग्नाला नाही जाणं झालं. कुणी नाराज झालं, तर आभाळ कोसळणार नाहीये. परंतु तिथे जाऊन जर अनावधानाने तुम्हाला या आजाराचा संसर्ग झालाच, तर मात्र तुम्ही एका संकटात अडकणार आहात. शिवाय तुमच्या मनमानीची झळ, निष्कारण तुमच्या कुटुंबालाही सोसावी लागणार आहे.
मी : सच बात.
मित्र : मी तर फक्त एक उदाहरण आहे. आजकाल आपल्या आजूबाजूला अश्या बऱ्याच घटना घडत आहेत, ज्या ऐकून आपणही थक्क होतोय. म्हणून प्रत्येकाने निष्काळजीपणा बाजूला सारून, वेळीच शहाणं व्हायला हवं. नाहीतर माझ्याप्रमाणे पश्चातापाची वेळ अटळ आहे.
मी : खरं आहे.
मित्र : भाई नक्की लिही यावर. एखाद्याला तरी यातून शहाणपण आलं तरी पुरेसं आहे.
मी : हो भावा. आजच लिहितो आणि शेअर करतो.
मित्र : मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. 
मी : काळजी घे.
मित्र : हो. तुही काळजी घे.
*फक्त वाचून उडवू नका.*
................   

 व्हाॅटस्अप ग्रूप : तंत्रशिक्षण समन्वय
मेसेज बाय : श्री. अरूण नाईक 
मेसेज : 

*बहिर्जी नाईक- एक अज्ञात थोरपण*
१०-१० दिस अन्नपाणी शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…!
धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..!
तलवार,भाला,फरीगगदा,पट्टा, विटटा,धनुष्य,असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा…!
शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो,तर खुद्द औरंगाजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकून बक्षीस घेऊन येऊ शकतो…!
माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही,जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा..!
मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय,सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड…!
खर सांगतो गड्यानो…हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता..!
आणि शिवराय त्याला इतके मानतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक…!
गड्यानो,महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास…!
पाची पातशाहिना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळत होते नाईक….!
महाराजांचा अभिषेक सुरु होता,महाराज मुक्त हस्ताने गरीब फकिराना ओंजळ भरभरून द्रव्य दान करत होते आणि एक म्हातारा फकीर त्या रांगेत उभा होता…!
जक्ख म्हातारा हुंदके देऊन रडत होता आणि डोळे भरून महाराजांना पाहत होता…..महाराजांनी जेव्हा त्या फकिरला पाहिले तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला…!
ओठावर मिशा नव्हत्या तेव्हा पासून या बहिर्जी आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले….आणि आज मराठेशाही स्थापन होत आहे,राज्य आनंदात आहे,आणि ज्याने आजवर सारी संकटे आपल्या छातीवर झेलली तो बहिर्जी फकीर होऊन याचकांच्या रांगेत उभा आहे…!
काय बोलावे या प्रकाराला….कसली वेडी माणस असतील ती…!
एका मंदिराला फरशी दान दिली की साऱ्या घराण्याची नावे टाकणारे तुम्ही आम्ही त्या बहिर्जी नाईकांच्या काळजाला कधी समजू शकू का ?
स्वतःच्या बायकोला सुद्धा अगदी शेवटपर्यंत माहिती नव्हते की ज्याच्या सोबत मी सात जन्माचे बंधन बांधले आहे….तो खुद्द स्वराज्याच्या गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक आहे….इतकी कमालीची गुप्तता…!
आणि एवढा विलक्षण त्याग करुन राजे त्यांना देत तर काय होते ओ …?
काहीच नाही….उलट प्रत्येक मोहिमेत जीवाचा प्रश्न…माघारी येईल का नाही शाश्वती नव्हती…!
हि वेडी खुळी माणसे अशी का जगली असतील ??
बस्स…एवढ्या एका प्रश्नाचे उत्तर ज्याला समजून येईल त्याच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नव्हते….!
...............

मेसेज बाय : श्री. अनिल अ. शिवलकर , रत्नागिरी

मेसेज : 

🟣 *दिनविशेष* 
🔖  *सोमवार दि. २९ जून २०२०*
▪️ १९८६: आर्जेन्टिना ने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.
▪️ २००१: पं.हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.
▪️ २००७: ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.
▪️ १८६४: शिक्षणतज्ज्ञ व वकिल आशुतोष मुखर्जी यांचा जन्म.
▪️ १८७१: मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९३४)
▪️ १८९१: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९७८)
▪️ १९८१: मराठी साहित्यिक दि.बा. मोकाशी यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९१५)
▪️ २०००: ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १९११)
▪️ २०१०: विचारवंत, वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९२७)
.........
🟣 🟣
फाँरवर्डेड मेसेज बाय : श्री. विनय परांजपे , रत्नागिरी

मेसेज : 
*आम्हाला २०२० ने काय दिले !! एक सुंदर विचार पुढे वाचा*:

नमस्कार मंडळी.
काल मला एका मित्राने विचारले, २०२०  काय देत आहे. 

कोरोना, चक्रीवादळ, व्यवसाय, नोकरीत आर्थिक झटका, मानसिक तणावात आत्महत्या. 
चीन, पाकिस्तान यांच्या कारवाया.
नाही मित्रा, 

*२०२० ने आम्हाला संघर्ष करायला शिकवला. *
देशात स्वच्छता किती गरजेची आहे. 
काळजी घेणे. 
एकमेकांना मदत करणे. 
निसर्गाला वाचविणे.
अन्नाची किंमत.
मानसिक भावना.
अनेक नवीन मेनू.
अनेक वैचारिक लेख आणि पोस्ट.
अनेक विनोदी पोस्ट मनाला आल्हाद देत आहेत.
कमी खर्चात विवाह.
कमी संख्येत अंत्यसंस्कार.
विना मेकअप चे खरे चेहरे.
घरात राहण्यासाठी लागणारा संयम.
घरातील लोकांशी संवाद साधण्यासाठी मिळालेली अमूल्य संधी.
आपल्या अवती भवती चे शेजारी नातेवाईकांन पेक्षा ऐन वेळी महत्वाचे.
प्रदूषण कमी.
पुढे येणाऱ्या कोणत्याही मोठ्या संकटाना सामोरे जाण्याची मानसिक तयारी, हे सगळे २०२० देत आहे.
या काळात खूप मौल्यवान लोक पण गमविले.
गरीब श्रीमंत एकाच पातळीवर आणले. 
खरे देवदूत आम्हाला दिसले, जे आम्ही फक्त आमच्या प्रार्थना स्थळात बघत होतो.
जगण्याची किंमत कळाली.
जीवन किती मौल्यवान आहे ते कळाले.
पुढील दिवस नक्की चांगले असू दे, ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
........

*फू बाई फू फुगडी फू* 
*कधी दमशील मेल्या*                 *corona तू रे corona तू*
आज बंद उद्या बंद
बंद किती बंद,
आज बंद उद्या बंद
बंद किती बंद,
कारण नसताना बाहेर फिरतात,        ते सगळे मंद...         
आत्ता फुगडी फू...
*फू बाई फू फुगडी फू* 
*कधि दमशील मेल्या*            
 *corona तू रे corona तू*

ताई नाही माई नाही
कोणी नाही भेटत,
ताई नाही माई नाही
कोणी नाही भेटत,
लॉक डाऊन चे दिवस 
चालले आहेत रेटत रेटत..
आत्ता फुगडी फू....
*फू बाई फू फुगडी फू*
*कधी दमशील मेल्या*               
*corona तू रे corona तू*
काम ना धंदा 
जेवण तीन तीनदा 
एबीपी वर ज्ञानदा 
आणि 
भांडी घासा चारदा
हाच उरलाय धंदा 
आता फूगडी फू....

*फू बाई फू फूगडी फू* 
*कधी जाशील मेल्या*           
     *corona तू रे corona तू*।
............