ONLY DEVIDAS ! Me to myself & You ! Top Marathi and Hindi articles, poems and gazals. फक्त देवीदास ! साहित्यिक देवीदासाचा स्वतःशी आणि तुमच्याशीही सुरू असलेला सुसंवाद ! आयुष्य तितकेसे सोपे नसतेच कुणालाही . आयुष्याकडे बघतांना बरेच काही जाणवते , आढळून येते. स्वतःच्या व इतर अनेकांच्या आयुष्यातील अनुभवांची ही शिदोरी...फक्त देवीदासाच्या शब्दांत... खास तुमच्यासाठी !
Pages
- ABOUT ME
- Privacy Policy
- पान परिचय
- अशी शिका मराठी गझल व गझलविषयक अन्य लेख
- माझ्या मराठी गझला
- माझ्या हिंदी गझला
- माझे कार्यक्रम माझी भाषणे
- विचित्र स्वप्ने भयानक घटना
- माझ्या मराठी कविता
- माझी मराठी गाणी
- माझी मराठी भक्ती गीते
- आवडती गाणी
- माझे मराठी लेख
- राजकीय लेख
- मागे पुढे
- कोरोनाचा काळ
- स्फूट लेखन
- नवलाई पावणाई मंदिर , जाकीमिऱ्या
- कुटुंबासाठी
- पुस्तक परिक्षण
- सुंदर संदेश
- बोलके काव्य
गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३
Namsaptah 2023 Part 1
गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३
Manus aatmhattya ka karto
माणूस आत्महत्त्या का करतो ?
नितीन देसाईंबाबत फेसबूकवरची पोस्ट ...
घालमेल आणि उलाघाल
तो का बोलू शकत नाही ?
सारे काही संपल्याची तीव्र भावना
मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३
Gadkari as ka bolale : Asle Faltu dhandhe band kara
असले फालतू धंदे बंद करा 😀😀😀 काय छान झापलंय राव !
नितीन गडकरींचा व्हिडीओ
व्हिडीओमध्ये नितीन गडकरी जे बोलले आहेत ते त्यांच्या कानपिचक्या देण्याच्या शैलीला साजेसेच आहे. गडकरी हे अनेकदा या शैलीचा भरपूर उपयोग करतात. काहीसे मिश्किल बोलतांना हसत हसत पण योग्य जागी चिमटे काढण्याचे कसब गडकरींकडे आहे , यात काही वाद नाही. आपल्याकडे काही तरी वेगळेपणा आहे याची झलक गडकरींच्या भाषणांमध्ये बरेचदा झळकते , तशीच ती आताही झळकली आहे. त्यांच्या मिश्किल भाषेमुळे कोणाला जखम होत नाही, हे विशेष . या व्हिडीओत त्यांची भाषा बावनकुळेंबाबतही काहीशी अशीच आहे.
बावनकुळेंचे जातीचे राजकारण
बावनकुळेंचे काय चालले आहे यापेक्षा...
शनिवार, २२ जुलै, २०२३
Hadasa hone ke baad
हादसा होने के बाद
दिन बितते गये हादसा होने के बाद
लोग भुलते गये हादसा होने के बाद
शर्म से शर्म की भी नजर झुक गयी
बेशर्म खुलते गये हादसा होने के बाद
कोई आया मदतगार नमक छिडकनेको
जख्म भरते गये हादसा होने के बाद
किसीने भाषण दिया, किसीने फोटो लिये
वोही चमकते गये हादसा होने के बाद
इतना सब कुछ हुआ , लोग मरे मगर
चर्चेही बनते गये हादसा होने के बाद ...
#shameonthem
#Hadasa
#manipur_hadasa
....देवीदास हरिश्चंद्र पाटील
२२.०७.२०२३ सायं . ०४.००
साहित्य हा समाजाचा आरसा
जेव्हा जेव्हा हादसे होतात तेव्हा तेव्हा वरीलप्रमाणे साहित्यही जन्म घेतं. कारण साहित्य हा समाजाचा आरसा आहे ! साहित्यिक हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. जेव्हा समाजात #मणिपूर सारख्या घटना घडतात , जेव्हा मानवी संस्कृतीच शरमेने मान खाली घालते , पण स्त्रीयांची नग्न धिंड काढण्यासारखे दुष्कृत्य करणारे दुष्ट नराधम निगरगट्टपणे उजळ माथ्याने वावरतात व काही विशिष्ट लोक त्यांचे समर्थन करतात , तेव्हा संवेदनशील साहित्यिकाला त्यावर भाष्य केल्याशिवाय राहवत नाही.
दुनिया पाषाणांची
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
असे कवीश्रेष्ठ सुरेश भट लिहून गेले
आहेत. खरे तर , लोकांच्या मानसिकतेपायी अगतिक होऊन श्रेष्ठतम साहित्यिकांच्याही लेखणीतून असे निराशामय शब्द व्यक्त होतात , तिथे माझ्यासारख्या यत्किंचित लेखकाचं काय ! माझीही निराशा लपून राहिलेली नाही. म्हणूनच मी वरील रचनेच्या सुरूवातीलाच म्हटलंय :
दिन बितते गये हादसा होने के बाद
लोग भुलते गये हादसा होने के बाद
लोकांची असंवेदनशील मानसिकता
याचं कारण असं आहे की अनेक हादसे झाले तरीही त्यावर पुरेश्या संवेदनशीलतेने लोक व्यक्त होत नाहीत. व्यक्त झाले तरी त्यात सातत्य नसतं. वाईट अनेकांना वाटते. पण तसे स्वतः जवळच वाटणे वेगळे आणि सार्वजनिकरित्या व्यक्त होणे वेगळे. दुष्कृत्याविरूद्ध आंदोलनवगैरे करणे तर त्याहून पलिकडचे ! जलद समाज माध्यमांमुळे आजकाल लोकांना दररोज नवा विषय मिळतो . दररोजचे विषय चघळून चघळून लोकांच्या जाणीवाही बोथट होत जातात. त्यामुळे हादसा होऊन दिवस लोटत राहतात तसे लोक घटना विसरून जातात. झाल्याचं तर आणखी काही दिवस चर्चा होत राहतात !
अपडेटसही येत राहतात
हादसे का होतात ?
#सुरेश_भट
#समाजमाध्यमे
#manipur_hadasa
manipur case
Manipur incident
#हादसा_होने_के_बाद
#हादसाहोनेकेबाद_क्याहोताहै
शुक्रवार, २ जून, २०२३
लिखना तो चाहता हूॅं
हूनर
लिखना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं
इतना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं
हारता हूॅं इसलिये के जीत नहीं सकता
जितना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं
ये रात बीत जायेगी, चाॅंद निकल जायेगा
सपना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं
तूम मिलो न मिलो, मिलनेकी आस तो हैं
मिलना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं
बात रखनेका हूनर शायद नहीं हैं मुझमें
कहना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं
... देवीदास हरिश्चंद्र पाटील
#howtowriteinhindi
#translation
आता आपण वरील रचनेचा ढोबळ अनुवाद पाहू.
किती मनापासून जगजितसिंगानी गायिली आहे ही गझल ! त्या महान कलाकाराला सलाम !
भीती ही अशी भावना आहे जिच्यावर मात करण्याचीही काहींना भीती वाटते. यावर उपाय म्हणजे स्वयंसूचना . मी बिनधास्त होत आहे , मी कशालाही घाबरत नाही , अशा स्वयंसूचना मनाला सतत देत राहणे , हा याच्यावरचा बिनखर्चाचा आणि सहज करता येतो असा , खात्रीशीर उपाय आहे. हळूहळू मनातली भीती जाऊ लागते !
#more_in_hindi :
............
कोरा.काॅम या साईटवर देवीदास हरिश्चंद्र पाटील यांच्या हिंदी कविता , गझला , गीत , लेख यासाठीचा मंच :
कोरा.काॅम पर नया मंच : देवीदास पाटील का मंच
https://devidas-patil-ka-manca.quora.com/
#quoramanch
#quora
बुधवार, २९ मार्च, २०२३
ती टाळते की भाळते...
मराठी गझल
ही एक #मराठी_गझल आहे.
यामध्ये ज्या दोन दोन ओळी दिसत आहेत त्या प्रत्येकीला #शेर म्हणतात. शेर हा वेगळा काढून वाचला तरी तो अर्थपूर्ण असतो. गझलच्या पहिल्या दोन ओळीतच ( याला गझलचा मतला म्हणतात ) तिची जमीन तयार होते. म्हणजे , गझलचे #वृत्त , यमक , अंत्ययमक इ.सह अर्थातच रचना तयार होते. मूळात कोणतीही रचना कविता होणार आहे , गीत होणार आहे की गझल होणार आहे , हे प्रामुख्याने पहिल्या ओळीतच ठरते. आता वरती जी रचना आहे , तिची पहिली ओळच सांगून जाते की ही गझल होणार आहे. तर ही गझल झाली आहे. यात मिळते , जाळते , माळते , चालते , फेटाळते , पाळते ही ' अ ' अलामत असलेली #यमके आहेत , तर ' माहीत नाही ' हे #अंत्ययमक आहे. गझलच्या शेवटच्या शेराला मक्ता म्हणतात . मक्त्यामध्ये कवी स्वतःचे नांव गझलच्या वृत्तात बसेल असे लिहू शकतो.
रसिक वाचकांना विशेष विनंती
यातले सर्व शेर सुटे घेऊन वाचा. ज्यांचा स्वतंत्रपणे वाचल्यावर अर्थबोध होत नाही , अशा कोणत्याही एकत्रित असलेल्या दोन ओळी मला कमेंट द्वारे कळवा. तुमची प्रतिक्रिया मला माझ्या लेखनात #सुधारणा घडविण्यासाठी आवश्यक आहे !
मराठी गझल ही कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी असते. यामध्ये रचनेचा म्हणजेच तंत्राचा आणि मंत्राचा म्हणजेच गझलीयतचा किंवा वृत्तीचा सामावेश असतो. यात प्रामुख्याने अनेकांना प्रश्न पडतो तो वृत्ताचा !
.........................................................
अशी शिका मराठी गझल या लिंकवर आपण वाचू शकता मराठी गझलबाबत एक विशेष लेख.
.........................................................
हा लेख वाचल्यानंतरही मराठी गझल लेखनाबाबत काही शंका असल्यास त्याही अवश्य विचाराव्यात , ही विनंती.
#अशी_शिका_मराठी_गझल
सोमवार, १३ मार्च, २०२३
एक सुखद आठवण...
एक सुखद आठवण अशीही....
वरील लिंक मध्ये दडलीय एक अनोखी स्मृती... लिंकला अवश्य क्लिक करा....
तुम्हांला म्हणून थोडक्यात सांगतो :
खरंच , काही आठवणी अशाच असतात ; सुखद ! आपलं आपल्यालाच आश्चर्य वाटतं की खरंच आपण असं भाषण गुरूजन आणि विद्यार्थी यांच्यापुढे देऊ शकलो .... एक सुखद आश्चर्य ! नक्की वाचा हं #एक_सुखद_आठवण .
शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३
काव्यसुगंध कार्यक्रम
काव्यसुगंध कार्यक्रम
शिरगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरगांव, ता . चिपळूण येथील काव्यसुगंध कार्यक्रम.
#रयत_शिक्षण_संस्थेच्या शिरगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरगांव, ता . चिपळूण येथे दि. 12.01.2023 रोजी भेट देण्याचा योग आला. प्रयोजन होते तेथील विभागप्रमुख मा. श्री. रमेश बाजीराव शिंदे सरांच्या सेवा सदिच्छा सत्कार समारंभाचे.
त्यासोबतच सुरु असलेल्या विज्ञान प्रदर्शन व सायंकाळी सुरू होणारे स्नेहसंमेलन यातूनही काव्यसुगंध या कवितांच्या कार्यक्रमाचे आवर्जून आयोजन करण्यात आले होते. कवितेसाठी केवढी ही धडपड ! खरंच, खूप कौतुक वाटले !
निमंत्रित कवी म्हणून माझ्यासोबत कवयित्री सौ. सुनेत्रा जोशी होत्या . सौ. सुनेत्रा जोशी यांनीही सुंदर कवितांनी कार्यक्रमात रंगत आणली !
आमचा हा एकत्रित असा पहिलाच #कार्यक्रम आणि तिथेही आम्ही नवखेच होतो ! माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसमोर कोणत्या कविता म्हणायच्या वा गायच्या हा तसा प्रश्नच होता. पण मिळालेल्या प्रतिसादामुळे कार्यक्रम रंगतच गेला. ज्याच्या कारने आम्ही गेलो होतो तो मयूर घोसाळेही मध्येच कार्यक्रमात येऊन बसला होता , यावरून कार्यक्रमाच्या रंगण्याची कल्पना तुम्हांला येईलच.
विविध कार्यक्रमांतूनही कवितांचा कार्यक्रम ठेवण्यावरून शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांचा अमाप उत्साह व कवितेप्रती असलेले प्रेम दिसून आले.
कवितांचा हा कार्यक्रम आमच्या अपेक्षेपेक्षा चांगला झाला ते आपुलकीने केलेले आदरातिथ्य व उत्तम प्रतिसादामुळे. शिक्षक शिक्षिकांची दाद तर मिळत होतीच , पण आठवी नववीतले विद्यार्थीही अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत टाळ्या पिटून वारंवार योग्य ठिकाणी दाद देत होते . इतकेच नाही तर कार्यक्रम संपल्यानंतरही कविता आवडल्याचे विद्यार्थी - विद्यार्थीनींनी आम्हांला भेटून सांगितले, हे विशेष ! यामागे शिक्षकांचे संस्कारही दिसून आले ! शिक्षकवर्गाचा उत्साह खूपच होता. त्यांनी तर आम्ही कोणी सेलिब्रिटी असल्यासारखे आमचे खूप फोटो काढले. यात आघाडीवर होते ते रसायनशास्त्राचे श्री. पवार सर. त्यांनी आमच्यासोबत सेल्फीही काढले आणि नंतर आठवणपूर्वक ते सगळे फोटो आम्हांला काही तासांतच पाठवलेही ! या सगळयांमागे मुख्याध्यापक श्री. रोकडे सर हे आधारस्तंभ भासत होते !
सेवानिवृत्त झालेले श्री. रमेश बाजीराव शिंदे सर तर सेवानिवृत्त झाले आहेत असे वाटतच नव्हते. त्यांनी आणि त्यांच्या सौ. यांनी तर आपुलकी आणि आदरातिथ्य यात कसलीही उणीव ठेवली नाही ! खरा सत्कार त्यांचाच असूनही त्यांनीच अगदी आगत्याने शाल , श्रीफळ व मानधनही देऊन आमचा सत्कार सोहळा घडवून आणला ! अशी व्यक्तिमत्वे भेटणे हा फार मोठा दुर्मिळ योग म्हणावा लागेल !
या कार्यक्रमाशी आम्ही जोडले गेलो त्या मा. श्री. श्रीकृष्ण साबणे सरांशी माझे कालच फोनवरून बोलणे झाले तेव्हा ते म्हणाले होते की तिथे शिंदे सर आहेत ते तुम्हांला काही कमी पडू देणार नाहीत , ते अक्षरशः खरे निघाले !
या सर्व आपल्याच माणसांचे आभार मानणे म्हणजे त्यांच्या आमच्यावरच्या व कवितेवरच्याही प्रेमाला गालबोट लावण्यासारखे आहे. पण या सर्वांसाठी प्रेमाचा एक आदरपूर्वक नमस्कार तर क्रमप्राप्तच ठरतो ! खरंच, या सर्वांना नमस्कार ! कुणाचा उल्लेख राहून गेल्यास दिलगिरी व्यक्त करतो. तसेच , श्री. आर. बी. शिंदे सरांसह सर्वांनाच त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹 !
... श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील.
दि. 13.01.2023
सकाळ 08.20
रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२
Devanandchya cinematil gaane
देवानंदच्या सिनेमातील गाणे
#जुनी_गाणी कुणाला आवडत नाहीत ?
मी पाहिलेला देव आनंदचा पहिलाच चित्रपट : हरे रामा हरे कृष्णा .
तर...देव आनंदशी माझी ओळख ही अशी झाली !
देव आनंदच असंच एक जुनं गाणं...
खणखणतं नाणं... मला खूप आवडतं... आवडेल तुम्हांलाही... कमेंट्स करालच...
ख्वाब हो तूम या ... कोई हकीगत....
तीन देविया या चित्रपटातील हे सुंदर गीत आहे.
( फोटो सौजन्य : गुगल व यू ट्यूब .)
#देव_आनंद
#देवानंद
#cinema
#devanand
#picture
#gaana
#hindigeet
Ye dil tum bin
जुनी गाणी आजही अवीट आहेत. खूप खूप आवडतात. त्यापैकीच एक हे गाणं... तुम्हांलाही आवडेल ... आणि तुम्हीही म्हणाल... ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं....
ये दिल तुम बिन
प्रेमात पडलं की...
खरंच , प्रेमात पडलं की... खरं तर... पडलं की जखम होणं स्वाभाविक आहे म्हणा...इथेही जखम होतेच , पण ती मनाला, काळजाला ! जखमेची तीव्रता ही इथे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. म्हणजे , काही वेळा , विशेषतः सुरूवातीला , थोडी छेडाछेडी , मस्करी , लाडालाडाची धूसफूस , खोटाखोटा राग रुसवा , मग कधी तरी खराखुरा राग , खरेखुरे भांडण , आदळाआपट , बाचाबाची आणि कधी कधी तर चक्क मारामारीही होते ! म्हणजेच , हवीहवीशी हूरहूर , गोड भांडण , एकमेकांना आजमावणे, टोकाचे भांडण ते दुरावा , तडफड , तगमग , मारामारी...कधी कधी कायमची सुटका ... असाही हा प्रवास होतो !
खरं प्रेम खूप हळवं असतं !
काही असो ; पण खरं प्रेम खूप हळवं असतं ! जणू ऊनपाऊस मिश्रित श्रावणधाराच ! रिमझिम रिमझिम प्रेम पुढे सरकत असतं. मध्येच कुठेतरी मिठाचा खडा अलगद पडतो आणि एक गोड स्वप्नं विस्कटतं. उगाचच दुरावा दोघांमध्ये येतो. रुसवाफुगवा होतो. पण कितीही राग रुसवा झाला तरी , कितीही ताटातूट झाली तरीही वेडी मनं एकमेकांशिवाय कुठेच रमेनाशी होतात ! मनाला काही रुचेनासं होत जातं ! मन कातर होतं , मन व्याकुळ होत जातं ! अगदी घायकुतीला आणि रडकुंडीलाही येतं... दुरावा आता सहन होत नाही ; अजिबात सहन होत नाही . भेटीसाठी मन पेटून उठतं. मन बेचैन होतं आणि ओठ गाऊ लागतात... ये दिल तुमबिन कहीं लगता नहीं...
#ye_dil_tum_bin
#juni_gaani
#gaana

























