शनिवार, २२ जुलै, २०२३

Hadasa hone ke baad

हादसा होने के बाद



दिन बितते गये हादसा होने के बाद

लोग भुलते गये हादसा होने के बाद


शर्म से शर्म की भी नजर झुक गयी

बेशर्म खुलते गये हादसा होने के बाद


कोई आया मदतगार नमक छिडकनेको

जख्म भरते गये हादसा होने के बाद


किसीने भाषण दिया, किसीने फोटो लिये

वोही चमकते गये हादसा होने के बाद


इतना सब कुछ हुआ , लोग मरे मगर

चर्चेही बनते गये हादसा होने के बाद ...


#shameonthem 

#Hadasa

#manipur_hadasa

....देवीदास हरिश्चंद्र पाटील

२२.०७.२०२३ सायं . ०४.००

साहित्य हा समाजाचा आरसा 

जेव्हा जेव्हा हादसे होतात तेव्हा तेव्हा वरीलप्रमाणे साहित्यही जन्म घेतं. कारण साहित्य हा समाजाचा आरसा आहे ! साहित्यिक हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. जेव्हा समाजात #मणिपूर सारख्या घटना घडतात , जेव्हा मानवी संस्कृतीच शरमेने मान खाली घालते , पण स्त्रीयांची नग्न धिंड काढण्यासारखे दुष्कृत्य करणारे दुष्ट नराधम निगरगट्टपणे उजळ माथ्याने वावरतात व काही विशिष्ट लोक त्यांचे समर्थन करतात , तेव्हा संवेदनशील साहित्यिकाला त्यावर भाष्य केल्याशिवाय राहवत नाही. 


दुनिया पाषाणांची

मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते 

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही

असे कवीश्रेष्ठ सुरेश भट लिहून गेले

आहेत.‌ खरे तर , लोकांच्या मानसिकतेपायी अगतिक होऊन श्रेष्ठतम साहित्यिकांच्याही लेखणीतून असे निराशामय शब्द व्यक्त होतात , तिथे माझ्यासारख्या यत्किंचित लेखकाचं काय ! माझीही निराशा लपून राहिलेली नाही. म्हणूनच मी वरील रचनेच्या सुरूवातीलाच म्हटलंय : 

दिन बितते गये हादसा होने के बाद

लोग भुलते गये हादसा होने के बाद 


लोकांची असंवेदनशील मानसिकता


याचं कारण असं आहे की अनेक हादसे झाले तरीही त्यावर पुरेश्या संवेदनशीलतेने लोक व्यक्त होत नाहीत. व्यक्त झाले तरी त्यात सातत्य नसतं. वाईट अनेकांना वाटते. पण तसे स्वतः जवळच वाटणे वेगळे आणि सार्वजनिकरित्या व्यक्त होणे वेगळे. दुष्कृत्याविरूद्ध आंदोलनवगैरे करणे तर त्याहून पलिकडचे ! जलद समाज माध्यमांमुळे आजकाल लोकांना दररोज नवा विषय मिळतो . दररोजचे विषय चघळून चघळून लोकांच्या जाणीवाही बोथट होत जातात. त्यामुळे हादसा होऊन दिवस लोटत राहतात तसे लोक घटना विसरून जातात. झाल्याचं तर आणखी काही दिवस चर्चा होत राहतात !

अपडेटसही येत राहतात 

अशा दुर्दैवी हादसादायक घटनांचे अपडेटसही येत असतात. नुकताच मणिपूरमध्ये आणखी एक अतिप्रसंग घडला . आता तर टोळक्याने महिलेवर सामुदायिक बलात्कार केल्याची बातमी आहे. भर रस्त्यावर इतका किळसवाणा प्रकार घडण्यामागची विशेषतः पुरूष वर्गाची घाणेरडी मानसिकता आपला सुसंस्कारीत देश कुठे चालला आहे हे दर्शवते आहे. असहाय्य असो वा कशीही असो , स्त्रीवर इतक्या तात्काळ बलात्कार कसा काय केला जाऊ शकतो , हाच खरा प्रश्न आहे ! अंतर्मनात प्रचंड द्वेष भिनल्याशिवाय अशा प्रसंगी तात्काळ ताठरता येणार नाही. विज्ञानाच्यादृष्टीनेही याचा विचार केला गेला पाहिजे. तसेच , आपण इतिहासातल्याप्रमाणे आदिवासीपणाकडेच चाललो आहोत , ते का ? पुढे जाण्याऐवजी आपण मागेच का जाऊ इच्छितोय , याच्यामागच्या मानसिकतेचाही शोध घेतला गेला पाहिजे. 

हादसे का होतात ? 

असे सगळे होते खरे... पण तुम्ही एक विचार केला आहे का : हादसे का होतात ? हादसा ही आपल्याला अचानक घडणारी गोष्ट वाटते. दिसायला तरी ते तसे दिसते. प्रत्यक्षात ते तसे असते का ? हे बघूया प्रत्यक्ष एका व्हिडिओत. 

Hadase kyu hot hai


#सुरेश_भट

#समाजमाध्यमे

#manipur_hadasa

manipur case

Manipur incident

#हादसा_होने_के_बाद

#हादसाहोनेकेबाद_क्याहोताहै

शुक्रवार, २ जून, २०२३

लिखना तो चाहता हूॅं

 हूनर


लिखना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं

इतना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं


हारता हूॅं इसलिये के जीत नहीं सकता

जितना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं


ये रात बीत जायेगी, चाॅंद निकल जायेगा

सपना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं


तूम मिलो न मिलो, मिलनेकी आस तो हैं

मिलना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं


बात रखनेका हूनर शायद नहीं हैं मुझमें

कहना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं

            

... देवीदास हरिश्चंद्र पाटील

#howtowriteinhindi

#translation

आता आपण वरील रचनेचा ढोबळ अनुवाद पाहू. 

ही एक हिंदी रचना आहे. गझल स्वरूपात. यात जो मतला ( पहिल्या दोन ओळी ) आहे त्याचा अर्थ असा आहे : 

लिहू तर इच्छितो ... पण भीती वाटते ...
इतकेच तर करू पाहतो , पण भीती वाटते

थोडक्यात , माणसाला कसली ना कसली तरी , कुणाची ना कुणाची तरी भीती वाटत असते. इथे लिखाणाची भीती वाटतेय.‌ कसल्या तरी दहशतीमुळे लिहूही शकत नाही, इतकंही करू शकत नाही , अशी स्थिती झाली आहे. 

आता आपण पुढील ओळींचीही माहिती घेऊ. 

हरतो एवढ्यासाठी की जिंकू शकत नाही
जिंकायला तर पाहतो पण भीती वाटते !

भीती ही जिंकण्याच्या आड येते. भीतीमुळे जिंकायची इच्छा असूनही हरावं लागतं.‌ अशी ही भीती वाढत जाते आणि पुढील ओळीत आणखी डोके वर काढते .

रात्र तर निघून जाईल... तिच्यासवे चंद्रही !
स्वप्नं तर बघू इच्छितो ,  पण भीती वाटते !

हे असं आहे. रात्रीबरोबर चंद्रही निघून जाईल आणि ज्याचं स्वप्नं बघायचं तो स्वप्नीचा चंद्रच गेला तर स्वप्नं तरी कुणाचं बघायचं आणि कसं बघायचं ! ही भीती इथे आहे.

पुढे पुढे तर प्रेयसीच्या भेटीबाबतही साशंकता निर्माण होते...कवी म्हणतो :

भेट वा भेटू नको, भेटण्याची आस तर आहे
भेटायला तर हवे आहे पण भीती वाटते !

माणसाचं मन डगमगतं. हिचकिचतं. मागे पुढे होतं. प्रेमात तर फारच द्विधा मन:स्थिती होते ! तिची भेट हवीहवीशी आहे , भेटावसं असंही वाटतं... पण समाजाचे पहारे जिकडे तिकडे उभे असतात. आता असं असल्यावर काय करणार ? प्रेमात सफल कसं होणार ? ही भीती प्रितीच्याच मूळावर येतेय की काय ! 

पाहू या पुढे काय होतंय...शायर म्हणतो :

कदाचित मलाच नीट बोलता येत नसावे
बोलावेसे खूप वाटते...पण भीती वाटते !

आता बोलण्याची हातोटी सगळ्यांकडे नसते. काही जण बिनधास्तपणे हवं नको ते सहज बोलून मोकळे होतात. पण काहींचे फार हाल होतात. त्यांना आपले म्हणणे नीट मांडताच येत नाही. ते व्यक्ती समोर आली की हडबडून जातात , एक तर तोंडातून शब्दच बाहेर पडत नाही किंवा पडलेच तर अस्पष्ट पडतात. ततपफ होते. ऐकणाऱ्याला कळतच नाही की हा काय म्हणतोय ! मग भलतेच ओठांवर येते आणि पाय काढता घेतला जातो‌ ! माणूस ओशाळून जातो. 

काहीही असो ; भीती ही भीतीच असते. किती काही म्हटले तरी ती वाटतेच ! अगदी त्या हिंदी गझलमध्येही म्हटले आहे की " प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता हैं..." म्हणजे मनात भीती असते म्हणून तर शायर म्हणतो की प्रेमाचे पहिले पत्र लिहायला वेळ तर लागतोच ! ती गझलच ऐकू या की...




किती मनापासून जगजितसिंगानी गायिली आहे ही गझल ! त्या महान कलाकाराला सलाम ! 

थोडक्यात, हे केवळ काव्य नाही , तर या रचनेत भीतीचे काही प्रकार सांगितले आहेत. थोडीफार भीती वाटणे तसे स्वाभाविक असते. किंबहुना, माणसाला ती आवश्यकच असते. पण ही भावना वाढीस लागली तर मात्र तिच्यावर उपाययोजना आवश्यक ठरते. 

भीती ही अशी भावना आहे जिच्यावर मात करण्याचीही काहींना भीती वाटते. यावर उपाय म्हणजे स्वयंसूचना .‌ मी बिनधास्त होत आहे , मी कशालाही घाबरत नाही , अशा स्वयंसूचना मनाला सतत देत राहणे , हा याच्यावरचा बिनखर्चाचा आणि सहज करता येतो असा , खात्रीशीर उपाय आहे.  हळूहळू मनातली भीती जाऊ लागते ! 

#pyarka_pahla_khat_likhaneme_derto_lagati_hai

#जगजितसिंग

#more_in_hindi : 

............

कोरा.काॅम या साईटवर देवीदास हरिश्चंद्र पाटील यांच्या हिंदी कविता , गझला , गीत , लेख यासाठीचा मंच : 

कोरा.काॅम पर नया मंच : देवीदास पाटील का मंच

https://devidas-patil-ka-manca.quora.com/

कोरा पे मंच

#quoramanch

#quora

बुधवार, २९ मार्च, २०२३

ती टाळते की भाळते...

मराठी गझल

मराठी गझल



ही एक #मराठी_गझल आहे.‌ 

यामध्ये ज्या दोन दोन ओळी दिसत आहेत त्या प्रत्येकीला #शेर म्हणतात. शेर हा वेगळा काढून वाचला तरी तो अर्थपूर्ण असतो. गझलच्या पहिल्या दोन ओळीतच ( याला गझलचा मतला म्हणतात ) तिची  जमीन तयार होते.‌ म्हणजे , गझलचे #वृत्त , यमक , अंत्ययमक इ.सह अर्थातच रचना तयार होते. मूळात कोणतीही रचना कविता होणार आहे , गीत होणार आहे की गझल होणार आहे , हे प्रामुख्याने पहिल्या ओळीतच ठरते. आता वरती जी रचना आहे , तिची पहिली ओळच सांगून जाते की ही गझल होणार आहे. तर ही गझल झाली आहे.  यात मिळते , जाळते , माळते , चालते , फेटाळते , पाळते ही ' अ ' अलामत असलेली #यमके आहेत , तर ' माहीत नाही ' हे #अंत्ययमक आहे. गझलच्या शेवटच्या शेराला मक्ता म्हणतात . मक्त्यामध्ये कवी स्वतःचे नांव गझलच्या वृत्तात बसेल असे लिहू शकतो. 


रसिक वाचकांना विशेष विनंती

यातले सर्व शेर सुटे घेऊन वाचा. ज्यांचा स्वतंत्रपणे वाचल्यावर अर्थबोध होत नाही , अशा कोणत्याही एकत्रित असलेल्या दोन ओळी मला कमेंट द्वारे कळवा. तुमची प्रतिक्रिया मला माझ्या लेखनात #सुधारणा घडविण्यासाठी आवश्यक आहे !

मराठी गझल ही कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी असते. यामध्ये रचनेचा म्हणजेच तंत्राचा आणि मंत्राचा म्हणजेच गझलीयतचा  किंवा वृत्तीचा सामावेश असतो.‌ यात प्रामुख्याने अनेकांना प्रश्न पडतो तो वृत्ताचा !  

.........................................................

अशी शिका मराठी गझल या लिंकवर आपण वाचू शकता मराठी गझलबाबत एक विशेष लेख.

.........................................................

हा लेख वाचल्यानंतरही मराठी गझल लेखनाबाबत काही शंका असल्यास त्याही अवश्य विचाराव्यात , ही विनंती.‌ 

#अशी_शिका_मराठी_गझल

सोमवार, १३ मार्च, २०२३

एक सुखद आठवण...

 एक सुखद आठवण अशीही....

वरील लिंक मध्ये दडलीय एक अनोखी स्मृती... लिंकला अवश्य क्लिक करा....



तुम्हांला म्हणून थोडक्यात सांगतो  : 

खरंच , काही आठवणी अशाच असतात ; सुखद ! आपलं आपल्यालाच आश्चर्य वाटतं की खरंच आपण असं भाषण गुरूजन आणि विद्यार्थी यांच्यापुढे देऊ शकलो .... एक सुखद आश्चर्य ! नक्की वाचा हं #एक_सुखद_आठवण .

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

काव्यसुगंध कार्यक्रम

 काव्यसुगंध कार्यक्रम

शिरगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरगांव, ता . चिपळूण येथील काव्यसुगंध कार्यक्रम. 


#रयत_शिक्षण_संस्थेच्या शिरगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरगांव, ता . चिपळूण येथे दि. 12.01.2023 रोजी भेट देण्याचा योग आला. प्रयोजन होते तेथील विभागप्रमुख मा. श्री. रमेश बाजीराव शिंदे सरांच्या सेवा सदिच्छा सत्कार समारंभाचे. 

त्यासोबतच सुरु असलेल्या विज्ञान प्रदर्शन व सायंकाळी सुरू होणारे स्नेहसंमेलन यातूनही काव्यसुगंध या कवितांच्या कार्यक्रमाचे आवर्जून आयोजन करण्यात आले होते. कवितेसाठी केवढी ही धडपड ! खरंच, खूप कौतुक वाटले !










निमंत्रित कवी म्हणून माझ्यासोबत कवयित्री सौ. सुनेत्रा जोशी होत्या .‌ सौ. सुनेत्रा जोशी यांनीही सुंदर कवितांनी कार्यक्रमात रंगत आणली ! 



आमचा हा एकत्रित असा पहिलाच #कार्यक्रम आणि तिथेही आम्ही नवखेच होतो ! माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसमोर कोणत्या कविता म्हणायच्या वा गायच्या हा तसा प्रश्नच होता. पण मिळालेल्या प्रतिसादामुळे कार्यक्रम रंगतच गेला. ज्याच्या कारने आम्ही गेलो होतो तो मयूर घोसाळेही मध्येच कार्यक्रमात येऊन बसला होता , यावरून कार्यक्रमाच्या रंगण्याची कल्पना तुम्हांला येईलच. 


विविध कार्यक्रमांतूनही कवितांचा कार्यक्रम ठेवण्यावरून शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांचा अमाप उत्साह व कवितेप्रती असलेले प्रेम दिसून आले.‌



कवितांचा हा कार्यक्रम आमच्या अपेक्षेपेक्षा चांगला झाला ते आपुलकीने केलेले आदरातिथ्य व उत्तम प्रतिसादामुळे. शिक्षक शिक्षिकांची दाद तर मिळत होतीच , पण आठवी नववीतले विद्यार्थीही अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत टाळ्या पिटून वारंवार योग्य ठिकाणी दाद देत होते . इतकेच नाही तर कार्यक्रम संपल्यानंतरही कविता आवडल्याचे विद्यार्थी - विद्यार्थीनींनी आम्हांला भेटून सांगितले, हे विशेष ! यामागे शिक्षकांचे संस्कारही दिसून आले ! शिक्षकवर्गाचा उत्साह खूपच होता. त्यांनी तर आम्ही कोणी सेलिब्रिटी असल्यासारखे आमचे खूप फोटो काढले. यात आघाडीवर होते ते रसायनशास्त्राचे श्री. पवार सर. त्यांनी आमच्यासोबत सेल्फीही काढले आणि नंतर आठवणपूर्वक ते सगळे फोटो आम्हांला  काही तासांतच पाठवलेही ! या सगळयांमागे मुख्याध्यापक श्री. रोकडे सर हे आधारस्तंभ भासत होते ! 



सेवानिवृत्त झालेले श्री. रमेश बाजीराव शिंदे सर तर सेवानिवृत्त झाले आहेत असे वाटतच नव्हते. त्यांनी आणि त्यांच्या सौ. यांनी तर आपुलकी आणि आदरातिथ्य यात कसलीही उणीव ठेवली नाही ! खरा सत्कार त्यांचाच असूनही त्यांनीच अगदी आगत्याने शाल , श्रीफळ व मानधनही देऊन आमचा सत्कार सोहळा घडवून आणला ! अशी व्यक्तिमत्वे भेटणे हा फार मोठा दुर्मिळ योग म्हणावा लागेल !


या कार्यक्रमाशी आम्ही जोडले गेलो त्या मा. श्री. श्रीकृष्ण साबणे सरांशी माझे कालच फोनवरून बोलणे झाले तेव्हा ते म्हणाले होते की तिथे शिंदे सर आहेत ते तुम्हांला काही कमी पडू देणार नाहीत , ते अक्षरशः खरे निघाले ! 


या सर्व आपल्याच माणसांचे आभार मानणे म्हणजे त्यांच्या आमच्यावरच्या व कवितेवरच्याही प्रेमाला गालबोट लावण्यासारखे आहे. पण या सर्वांसाठी प्रेमाचा एक आदरपूर्वक नमस्कार तर क्रमप्राप्तच ठरतो ! खरंच, या सर्वांना नमस्कार ! कुणाचा उल्लेख राहून गेल्यास दिलगिरी व्यक्त करतो. तसेच , श्री. आर. बी. शिंदे सरांसह सर्वांनाच त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹 !


... श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील.  

दि. 13.01.2023

सकाळ 08.20


रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

Devanandchya cinematil gaane

देवानंदच्या सिनेमातील गाणे 

Dev Anand and his film


#जुनी_गाणी कुणाला आवडत नाहीत ?

आजही गाण्यांच्या विविध स्पर्धांमध्ये जुनी गाणी अत्यंत तन्मयतेने म्हटली जातात.‌ त्यांना भरपूर प्रतिसादही मिळतो ! अगदी आजही ! ही जुनी गाणी पडद्यावरही खूप कलात्मक रीतीने सादर केली गेली होती. त्यातले नायक नायिकाही खूप छान वाटायचे.‌ विशेषतः देव आनंद सारखा रोमॅंटिक हिरो असला तर खूपच बहार यायची ! देव आनंद माझा खूप आवडता. मराठी शाळेत असतांनाच शेजारी राहणाऱ्या गंगाराम रेवाळेने मला एकदा रात्रीच्या पिक्चरला शहरातल्या टाॅकीजमध्ये नेलं. खरं तर , मी आदल्या दिवशीच पडलो होतो आणि माझं उजवं ढोपर ठणकत होतं. पण गंगाराम ऐकत नाही म्हटल्यावर माझाही नाईलाज झाला. त्याने माझ्या घरच्यांची परवानगीही मिळवली . मला तेव्हा फारसं काही कळत नव्हतंच. मी तेव्हा पाचवीत शिकत होतो ! हिंदी भाषेचा नुकताच कुठे परिचय होऊ लागला होता ! 

मी पाहिलेला देव आनंदचा पहिलाच चित्रपट : हरे रामा हरे कृष्णा . 

मी पाहिलेला तो देव आनंदचा पहिलाच आणि एकूणच माझा दुसरा चित्रपट होता ! सखू आली पंढरपुरा हा मराठी चित्रपट मी चौथीत असताना पाहिला होता. तो गुरवांच्या बेबल्याने मला दाखवला होता. मला बहीण नाही. तिला भाऊबीजेला मी ओवाळायचो.‌ मराठी शाळेत जायच्या आधीपासूनच मी गुरव मंडळीत जास्त असायचो. बेबल्याताई आज हयात नाही पण तिच्या स्मृती आहेत !

गंगारामने मला पिक्चरला नेलं तो पिक्चर होता हरे रामा हरे कृष्णा ! 

Dev Anand's cinema


देव आनंदचा चित्रपट ! पण मला मूळात तो चित्रपट पाहण्यापूर्वी देव आनंदच काय , कुठलाच हिरो माहीत नव्हता ! गंगारामचं याबाबतीतलं ज्ञान मात्र भारीच होतं. त्यानेच मला हा हिरो देव आनंद आहे म्हणून सांगितलं , तेव्हा कुठे मला कळलं की ह्या चिकण्या नटाला देव आनंद म्हणतात ! चित्रपटात छोटा देव आनंद  आणि त्याच्या बहिणींचं जे विदारक आयुष्य दाखवलं ते पाहून त्या छोट्या वयात मला रडू कोसळलं होतं. ते गाणं ऐकू या...





पण पुढे  नायिकेच्या मागे दुडक्या चालीत तिरका तिरका धावणारा देव आनंद पाहण्यातही मी रमून गेलो ! कोणाला त्याचं दिल तोडावेसे वाटेल...? बघा ना , कांची रे कांची रे ...म्हणत देव आनंद कसा धावतोय ते....



हा देव पाहण्यात मी इतका की माझ्या दुखावलेल्या ढोपरावरची जखम चिघळत जातेय याचंही मला भान राहिलं नव्हतं ! चित्रपट संपला तेव्हा मी खुर्चीतून उठायला गेलो तर माझा उजवा पाय आखडल्याचं जाणवलं. मला पाऊल पुढे टाकता येईना ! गंगारामने मला कसंबसं टाॅकीजच्या बाहेर आणलं , सायकलवर बसवलं आणि घरी आणलं. मी गुपचूप अंथरूणात शिरलो.‌ सकाळी मला उठवेना ! थंडी भरून ताप आला ! मग शाळा तीन चार दिवस  बुडालीच !  

तर...देव आनंदशी माझी ओळख ही अशी झाली


Dev sahab

Dev Anand the stylish hero



पुढे पुढे तो भेटतच गेला. प्रकर्षाने भेटत गेला ! त्याच्या विविधांगी व्यक्तिमत्वावर चे अनेक लेख वाचले.‌ त्याची खूप गाणीही मी पाहिली, ऐकली . 

देव आनंदच असंच एक जुनं गाणं... 

खणखणतं नाणं... मला खूप आवडतं... आवडेल तुम्हांलाही... कमेंट्स करालच...

ख्वाब हो तूम या ... कोई हकीगत....


तीन देविया या चित्रपटातील हे सुंदर गीत आहे.  

देवानंदचं गाणं

( फोटो सौजन्य : गुगल व यू ट्यूब .)

#देव_आनंद

#देवानंद

#cinema

#devanand

#picture

#gaana

#hindigeet


Ye dil tum bin

जुनी गाणी आजही अवीट आहेत. खूप खूप आवडतात. त्यापैकीच एक हे गाणं... तुम्हांलाही आवडेल ... आणि तुम्हीही म्हणाल... ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं....

ये दिल तुम बिन

हिंदी गीत

प्रेमात पडलं की...

खरंच , प्रेमात पडलं की... खरं तर... पडलं की जखम होणं स्वाभाविक आहे म्हणा...इथेही जखम होतेच , पण ती मनाला, काळजाला ! जखमेची तीव्रता ही इथे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. म्हणजे , काही वेळा , विशेषतः सुरूवातीला , थोडी छेडाछेडी , मस्करी , लाडालाडाची धूसफूस , खोटाखोटा राग रुसवा , मग कधी तरी खराखुरा राग , खरेखुरे भांडण , आदळाआपट , बाचाबाची आणि कधी कधी तर चक्क मारामारीही होते ! म्हणजेच , हवीहवीशी हूरहूर , गोड भांडण , एकमेकांना आजमावणे, टोकाचे भांडण ते दुरावा , तडफड , तगमग , मारामारी...कधी कधी कायमची सुटका ... असाही हा प्रवास होतो !

खरं प्रेम खूप हळवं असतं ! 

काही असो ; पण खरं प्रेम खूप हळवं असतं ! जणू ऊनपाऊस मिश्रित श्रावणधाराच ! रिमझिम रिमझिम प्रेम पुढे सरकत असतं. मध्येच कुठेतरी मिठाचा खडा अलगद पडतो आणि एक गोड स्वप्नं विस्कटतं. उगाचच दुरावा दोघांमध्ये येतो.‌ रुसवाफुगवा होतो. पण कितीही राग रुसवा झाला तरी , कितीही ताटातूट झाली तरीही वेडी मनं एकमेकांशिवाय कुठेच रमेनाशी होतात !  मनाला काही रुचेनासं होत जातं ! मन कातर होतं , मन व्याकुळ होत जातं ! अगदी घायकुतीला आणि रडकुंडीलाही येतं... दुरावा आता सहन होत नाही ; अजिबात सहन होत नाही . भेटीसाठी मन पेटून उठतं. मन बेचैन होतं आणि ओठ गाऊ लागतात... ये दिल तुमबिन कहीं लगता नहीं... 

#ye_dil_tum_bin

#juni_gaani

#gaana








सोमवार, ६ जून, २०२२

Devidasachi Diary a : new youtube channel

  नवीन यू ट्यूब चॅनेल : देवीदासाची डायरी

#diary

#devidasachi_diary

Devidasachi Diary

नमस्कार रसिकहो ! मी देवीदास हरिश्चंद्र पाटील आपलं स्वागत करतो देवीदासाची डायरी या माझ्या नव्या यू ट्यूब चॅनेल वर ! ही डायरी सुरू होते ती दि. १२ नोव्हेंबर २०१२ रोजी !

 योगायोग असा की नेमके याच दिवशी मी माझे देवीदास पाटील हे पहिले वहिले यू ट्यूब चॅनेल निर्माण केले होते . नुकतेच त्याचे नांव मी देवीदास पाटील क्रियेशन असे ठेवले आहे. गेली दोन वर्षे आपण सर्वांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिल्याने ते प्रगतीपथावर आहेच.



माझे आणखी एक मराठी चॅनेल आहे आणि एक इंग्रजी चॅनेल आहे. मग हे चौथे चॅनेल कशाला ? खरं सांगू ? गेली दोन वर्षं आपण मला जे प्रेम देत आहात , त्यामुळे तुमच्याशी माझे एक वेगळेच नाते जुळले आहे . आता मला तुमच्याशी अधिक जवळीक साधायची आहे. माझं अंतर्मन तुमच्याशी बोलू इच्छितय . निव्वळ याचसाठी ही देवीदासाची डायरी आहे ! 

डायरी सलग लिहिली जातेच असे नाही. माझेही डायरी लेखन सलग झालेले नाही. पण जे मी डायरीत लिहिले आहे ते तुम्हांला मी सांगणार आहे. ही डायरी आयुष्यातल्या घटनांचा जिवंत चित्रण आहे. अनेक प्रवाहांमधला तो प्रवास आहे.



कशी झाली आहे तुमच्या देवीदासाची डायरी ते हया पहिल्या भागापासून कमेंट्स द्वारे सांगा बरं का ! व्हिडिओ लाईक करा , शेअर करा , चॅनेल सबस्क्राईब करा. चला तर मग देवीदासाची डायरी वाचायला सुरूवात करूया. 



या पहिल्या भागाला मी शिर्षक दिलंय : 


माझ्या मना, तुला सलाम !


याला कारणही असंच आहे . ऐका म्हणजे नक्की कळेल बरं का....


माझ्या मना, गेल्या वर्षी मी डायरी लिहिण्याचा संकल्प सोडला होता. पण डायरीत एक अक्षर लिहिले असेन तर शप्पथ ! 


... आणि एक वर्षानंतर प्रत्यक्ष डायरी लेखनाला अशी सुरुवात केली आहे बघा ...:


माझ्या मना , एक वर्षानंतर आपण इथे भेटतोय ! तसे आपण खूप ठिकाणी सतत भेटत आलोय . आपण दोघे आहोतच कुठे ? आपण एकच तर आहोत. हे माझ्या मना , एक वर्ष आपण ह्या डायरीत भेटलोच नाही . पण आपलं स्वगत चालूच होतं ! 


अनेक प्रसंग या दरम्यान आले .बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले . आपण दोघांनी मिळून ते पहिले ! अनेक विसंगत बाबी आयुष्यात आल्या . आपणच त्या सुसंगत करीत गेलो ! अश्यावेळी तुझी साथ नसती तर ? माझे एकट्याचे काय झाले असते कोण जाणे ! 


पण तू सतत सोबत राहिलास ! अनेकदा मी नाउमेद झालो ! खचून गेलो ! डोळे भरून आले ! पण तू धीर दिलास ! समजावलेस ! खरेच मी तुझा किती आभारी आहे याची कदाचित तुलाही कल्पना नसेल !


शनीच्या साडेसातीतले ते कदाचित अखेरचे वर्ष असावे ! इतके भयंकर दिवस होते ते ! त्यातून सुटेनसे वाटलेच नव्हते ! सतत घायाळ , घायाळ आणि घायाळच होत होतो ! खूप खोल घाव झाले होते ! पण माझ्या बरोबरीने तू ते सारे सोसलेस !


 तू माझा सखा झालास . तू माझा परमेश्वर झालास ! माझे प्रत्येक खचणारे पाऊल तू उचलून धरलेस ! कधीही तोल जाऊ दिला नाहीस ! हे माझ्या मना , केवळ तू होतास म्हणून मी तरलो !


तसे पाहिले तर ०१ ऑक्टोबर २००९ ते २१ ऑगस्ट २०१२ हा संपूर्ण कालावधीच जीवनातला काळोखाचा कालावधी होता . त्यातला गेल्या वर्षभरातला कालावधी तर अंत पाहणारा होता . पण तुझ्या सोबतीने हा सारा प्रवास थोडाफार सौम्य झाला ! आज १२ नोव्हेंबर २०१२ . दिवाळीच्या आदला दिवस . ह्या पवित्र दिवशी , माझ्या मना, माझा तुला सलाम ! 

#devidas_patil

..............




 

बुधवार, ३० मार्च, २०२२

तारण : मराठी गझल

 तारण 

#gazal

#marathi_gazal


सोडून व्हायचे मी साजण दिले कधीचे

तेव्हा तसे तिनेही कारण दिले कधीचे...



जमिनीवरीच माझा संसार थाटला मी 

आकाश पाखरांना आंदण दिले कधीचे...



मजलाच हाय माझे झाले नकोनकोसे

सोडून हाय मीही भांडण दिले कधीचे 



माझा अखेर मीही झालो समुद्र होतो

त्यांना चिपीतले मी खाजण दिले कधीचे



आयुष्य सर्व माझे गेले तिच्याचसाठी !

गझलेस मीच माझ्या तारण दिले कधीचे



... देवीदास हरिश्चंद्र पाटील



शुक्रवार, १८ मार्च, २०२२

Superb Facebook Post

 गुरूवर्य सुरेश भटांची एक आठवण...

#sureshbhat


आदरणीय सुरेश भटांना मी एक गझल पाठविली होती, जी त्यांच्याबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त करीत होती. गेली अनेक वर्षे मी ही गझल आणि माझ्या त्यासंदर्भातील भावना याबद्दल कोठेही लिहिले नव्हते.‌ पण आजच्या विशेष दिनी ती माझ्या रसिक चाहत्यांसाठी फेसबूकवर पोस्ट केली . त्या फेसबूक पोस्टची ही लिंक  ओन्ली देवीदास वरील माझ्या रसिक चाहत्यांसाठीही इथे देत आहे. फेसबूकवर खूप सुंदर अभिप्राय आले आहेत ; आपलाही अभिप्राय इथे जरूर द्यावा, ही विनंती.