शुक्रवार, २७ मार्च, २०२०

कोरोना विषाणू भारतीय पद्धतीने

Corona




#कोरोना भारतात पसरतोय. आजची आकडेवारी दहशत पसरवणारी आहे. राज्य सरकारे व केंद्र सरकार आपापले काम करीत आहेत. काही महत्वाच्या घडामोडी पहा.

एक दिवसीय लॉक डाऊनचे अपील 


1. दि. 22 मार्च एक दिवसीय लॉक डाऊनचे अपील व सायं. 05 वा. थाळी नाद ज्याचे लोकांनी ढोलवादनात व गर्दी करण्यात रूपांतर केले. काही लोकांनी  लॉक डाऊनच्या उद्देशाचे तीन तेरा वाजवले.

24 मार्चच्या मध्यरात्रीपासून


2. दि. 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 21 दिवसांचा म्हणजेच 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन जाहीर झाला. वेळ रात्री 8 ची. परंतु अनेक ठिकाणी खरेदीसाठी लोकांची झुंबड सुरू आहे. पोलीसांना गर्दी आवरण्यासाठी दंडूकशाही करावी लागते आहे आणि लोकांचे काही ठिकाणी पोलीसांवर आक्रमण होते आहे. तसेच डाँक्टरांविरूध्दही काही लोक आक्रमक झाले आहेत.

आर्थिक पॅकेज जाहीर


3. दि. 26 मार्च ... केंद्र सरकारमार्फत अर्थमंत्र्यांकडून आर्थिक पँकेज जाहीर झाले आहे.

      जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 * 7 चालू ठेवण्याचाही निर्णय महाराष्ट्र राज्याने घेतला आहे..

        मुंबईत कोरोनाची संख्या एकाच दिवसात वाढली आहे.

        काही सामाजिक संस्थांनी गरीबांना मदतीचा हात देण्यास सुरूवात केली आहे.

गंभीर प्रश्न

         सगळयात मोठे दुर्दैव म्हणजे शहरांत हातावर पोट असलेले लोक शहरे सोडून जात आहेत. काहींचे गांव तर 400 किमी. वर आहे. बायकामुलांना घेवून हे लोक एवढे अंतर पायी कसे पार पडतील , हा गंभीर प्रश्न आहे. त्याशिवाय, रस्त्यावरील गर्दीही वाढत आहे. काही ठिकाणी कंटेनरमधून लोक कोंबून प्रवास करीत आहेत. असे काही कंटेनर्स पोलीसांनी पकडलेही आहेत.


4. दि. 27 मार्च .   काही ठिकाणी लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत नाही अशी अवस्था आहे. काही ठिकाणी दर वाढवून वस्तू मिळत असल्याच्याही बातम्या येत आहेत. गॅस सिलेंडर्स घरपोच मिळत नसल्याने मुंबईत लोक सिलेंडर्ससह रस्त्यावर आल्याचे बातमीपत्रात दाखविण्यात आलेले आहे. सरकारी घोषणा , आवाहने आणि लोकांच्या मनातला वाढता संभ्रम यांचा ताळमेळ होत नसल्याने गोंधळ वाढतो आहे. त्यातच सोशल मिडीयांवर फिरणारे काही संदेश अफवा पसरवत आहेत. आदमापूर येथे बाळूमामांच्या नावाने चहामध्ये हळद , भंडारा टाकून चहा प्याल्याने कोरोनाला प्रतिबंध होतो , अशी अफवा पसरली व कोल्हापूरमध्ये गर्दी करून लोकांनी हेच सुरू केले. आज कोल्हापूरात कोरोना वाढल्याचे दिसून येते आहे. ट्वीटसचीही भर पडतेच आहे .  नेमकेपणा नसल्याने लोकांना धीर कुठून मिळणार हाच खरा प्रश्न आहे. लोक अजूनही लॉक्ड डाऊन गंभीरपणे घेत नसल्याने कोरोनाचा वाढता प्रसार रोखणे कठीण होत आहे. भारतात बाधीतांची संख्या हजाराच्या दिशेने वाटचाल करते आहे.

 महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा पाचवा बळी

 
           महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे. लोक अजूनही शहाणे होत नाहीत. भारतातील लोक घोषित लॉक्ड डाऊनही गंभीरतेने पाळत नाहीत .  हे लोक स्वत:ची जबाबदारी ओळखून , काही नेत्यांच्या मागे मेंढरासारखे धावणे सोडून , आवाहने करण्याची वेळ येऊ न देता , पोलीसांचे फटके पडू न देता , स्वयंप्रेरणेने , स्वयंबुध्दीने व जबाबदारीने निर्णय घेतील , तो भारतात सुदिन म्हणावा लागेल !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: