सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१९

प्रत्येक कुटुंबासाठी

Important Appeal to all families in the world




                  


 




MY DEAR FRIENDS , 

HERE IS AN APPEAL FOR YOU ! 

IT IS VERY VERY IMPORTANT TO ALL THE 

MEMBERS OF EVERY FAMILY . THERE ARE 

QUARRELS IN FAMILIESPLEASE GIVE 

YOUR REASON OR REASONS BEHIND THE 

FAMILY DISPUTES . IT IS A WORLWIDE 

QUESTION AND REALLY CLOSE TO EACH 

ONE AND EACH FAMILY . HOPE YOU WILL 

EXPRESS YOUR VIEWS ON THIS 

IMPORTANT ASPECT TO EVERYBODY. 

SEND ME EMAIL ON  devidaspatiljm@gmail.com


             मित्र हो !



                   या , आपण व्यक्त होऊ या !
                   मतांची देवाणघेवाण करू या !


विविध विषयांवर आपली अनेक मते असतात ; विचार असतात !  या मतांची आपण देवाणघेवाण केली तर ? नव्हे , करुयाच ! मला माहीत आहे तुम्हांला फार वेळ नसतो . म्हणून थोडक्यात भाष्य करु या . सुरुवात म्हणून , मी जिव्हाळ्याचा एक विषय इथे देतो आणि त्यावरचे माझे भाष्यही मांडतो . तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा असाच एक विषय आहे –
                      
               “ कुटुंबातील भांडणांची कारणे “

                
या विषयावर माझे मत पुढीलप्रमाणे आहे –

 “ एखाद्या किंवा अनेक विषयांवरील वेगवेगळी मते कुटुंबात मतभेद निर्माण करतात . परस्परांबद्दल आपुलकी कमी किंवा अजिबात नसेल तर कुटुंब सदस्यांमधली ही दरी अधिक रूंद होत जाते . कौटुंबिक वादावादींची किंवा भांडणाची ही दोन अत्यंत महत्वाची कारण आहेत . “


याशिवाय , इतरही अनेक कारणे आहेतच की ! बघु या , तुमच्यापैकी कोण कोण , कोणत्या कोणत्या कारणांवर भाष्य करतो ते ! तुमचे वास्तववादी , पारदर्शक भाष्य साधारणतः १०० शब्दात लिहा. आपण कृपया मंगल फॉंंट वापरून माझा ईमेल आयडी ' devidaspatiljm@gmail.com 'वर ईमेल करा किंवा कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट्स लिहा .

रविवार, ८ एप्रिल, २०१८

“ डोळ्यात आसवांच्या ”

“ डोळ्यात आसवांच्या ”



शोधतो मी रंग त्याचा मझिया रंगांमधे
काल जो सांगून गेला रंग माझावेगळा !

       हे जेव्हा माझ्या वाचनात आले तेव्हाच मी ओळखले की मीही तोच रंग तीस वर्षापूर्वी शोधत होतो ! तो आणखी असेही बोलला “ मी वरवर कोठे जगलो , आयुष्य गझलमय होते ! ” तेव्हाच मला त्याच्या खोलीचा अंदाज आला होता ! बंगल्यामधुनी निघाल्या चळवळी , घेत साध्या झोपड्यामधले बळी ”  , असे त्याने लिहिले आणि तो मला अधिक पटू लागला ! पुढे , “ मी दाखवतो डोळ्यांना जगण्याचे वास्तव माझ्या  स्वप्नांच्या येण्यावर केव्हाच विसंबत नाही ”, असाही त्याचा शेर भेटला ! होय , मी त्याच गझलगोविंदाबद्दल बोलतोय जो भयानक वास्तव गझलांमधून सहजतेने मांडतो आणि त्याच वेळी , “  कोण अंकुरले मघाशी माझिया गात्रांतुनी , हा कुणाचा श्वास आहे पाकळ्यांहुन कोवळा ”, असेही म्हणतोय ! “ पान अळवाचे तशी तू .. थेंब पाण्याचा असा मी , भेट होते .. स्पर्श होतो .. पण बिलगता येत नाही ! ” ही तरल लाडीक तक्रारही तो किती सहजतेने करतोय ! “  डोळे भरून माझ्या वाचू नकोस गझला , पडतील शब्द माझे प्रेमात आसवांच्या ” , असे गोविंद नाईक या ताज्या दमाच्या गझलकाराने सांगितल्यामुळे मग “ डोळ्यात आसवांच्या ” ह्या त्याच्या पहिल्या गझलसंग्रहाकडे वळणे स्वाभाविकच होते ! तसा मी वळलोही. पण गेले काही महिने त्यासाठी पुरेसा वेळ देवू शकलो नाही , याबद्दल मला अपराधीपणा जाणवतो .

        रंग पुन्हा ह्या रानाचा हिरवा झाला तर ?
        ढग एखादा ओलेता हळवा झाला तर ?

        असा हळवा होणारा गोविंदा ,

        एक तिरंगा जपून ठेवा काळजातही
        रंग उध्या झेंड्याचाही भगवा झाला तर ?

        असे उध्याचे वास्तव छातीठोकपणे लिहितो !

        पुतळ्यांनी आकाश गाठले
        माणुसकी तळ गाठत आहे

        अशी उंची ह्या संग्रहात गाठतोय ! पुढे तो असेही सांगतोय –

        सोडुनी गेलेत जे रण काळजी त्यांची नको
        जे उभे आहेत त्यांचे धैर्य टिकले पाहिजे !
         मग खरी समजेल रामाच्या मनाची थोरवी
          रावणाने शिवधनुष्याला उचलले पाहिजे ! म्हणजेच आपण फक्त एकाच बाजूचे कौतुक न  
    करता आयुष्याची दुसरी बाजूही तितक्याच समतोलपणे पाहिली पाहिजे ! हा खरा गझलकाराचा दृष्टीकोण असला पाहिजे आणि तो गोविंदाकडे आहेही !

          आसपासचे भयाण वास्तव गझलकारांने टिपून त्यावर तितकेच प्रत्यंतकारी लिहिले पाहिजे . केवळ स्वप्नंरंजन आणि मनोरंजन हा गझलचा हेतू नाही ! हे गोविंद जाणतो आणि म्हणूनच तो लिहितो -         
   केवढा श्रीमंत होता बाप .. कळले
   राख पोरांनी विकाया काढल्यावर !

हे तो लिहू शकतो , कारण , “ शिकवते बाराखडी आयुष्य माझे , पुस्तके मी पाळली नाहीत कुठली ! असे त्याचे आयुष्य त्याला शिकवून चुकले आहे !

           कधी तरी बघ डोळे उघडून वर देताना
           काय तुझ्या चरणावर अर्पण होते आहे … आणि
          
           दूरदूर माणसे चालती माणसांतली
           हे कुठल्या शतकात पदार्पण होते आहे , तसेच

           हळू हळू वाढत जाते इच्छांची उंची
           रोज तोकडी नशिबाची चादर आठवते

           हे शेर माणसांना विचार करायला लावणारे आहेत !

           अशाच काही सुंदर , प्रभावशाली ओळी मला ह्या संग्रहात मिळाल्या –

           मलाच देण्यास मी दिलासा फिरुन माझ्याकडे निघालो , बघून आक्रोश चाललेला समोर लाचार यौवनाचा , घरात मी घेतले उगीचच अनोळखी चेह-यास माझ्या , धरून हातात हात माझा कुठे तुझी सावली निघाली , अखेर मारेकरीच माझा जिवास माझ्या फितूर झाला, असे कसे हे भरून प्याले समोर तू ठेवलेस दैवा , हरेक क्षण ऐकवून गेला जगावयाची उदात्त गीता इ. मात्र , शेरांच्या ह्या पहिल्या ओळींना दुस-या ओळींची अधिक उंचीची साथ लाभायला हवी होती , म्हणजे गझलची अधिक मजा घेता आली असती , असे वाटते ! अर्थात , मी जुना गझलकार असलो तरी मी काही समीक्षक नाही . एक रसिक म्हणून लिहिले आहे . तेव्हा चुकल्यास जाणकारांनी क्षमा करावी . गोविंदाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतांना एक आश्वासकता जाणवते आहे . ती ही की तो यशाची हवा डोक्यात जावू देणार नाही ! जो रंग तो शोधतो आहे , त्या रंगाने डोक्यात हवा जावू देवू नका आणि अधिकाधिक चांगले लिहा असेच त्याच्यासोबतच्या आणि त्याच्या नंतर विजा घेवून येणा-या प्रत्येक गझलकाराला सांगितले आहे ! तो रंग म्हणजेच आदरणीय सुरेश भट ! मराठी गझलचा खराखुरा रंग ! गोविंद नाईक हा रंग नक्कीच ओळखतो !


…. श्री . देवीदास हरिश्चंद्र पाटील



       


शुक्रवार, ३० मार्च, २०१८

मराठी गझल : लोकशाही बंद झाली !

लोकशाही बंद झाली !



लोकशाही बंद झाली !
हुकुमशाही छंद झाली !

रंग बेरंगास आला !
संयमी स्वच्छंद झाली !

बेबनावाशीच नाते !
भावकी बेबंद झाली !

सभ्यता शरमे न आता !
शरमही बेधुंद झाली !

प्रतिक्रिया उमटे न कोठे !
माणसे का मंद झाली !

.... श्री . देवीदास हरिश्र्चंद्र पाटील

मराठी गझल : सत्य ते गंगेस ठावे !

सत्य ते गंगेस ठावे !  


सत्य ते गंगेस ठावे !  मी कहाणी सांगणारा !
पाप न्हाते , पुण्य होते ; धन्य होतो नाहणारा !

ठेवले बगलेत ज्यांनी लपवुनी आहे सु-याला
वाटते त्यांना तसा तो राम नाही पावणारा !

भावनांना हात जेव्हा घातला काही खुळ्यांनी
कायद्याने हात त्यांचा कलम केला वाढणारा !

एक वेडा दाखवाया लागला स्वप्नें नको ती ...
वाटला त्याला अडाणी काय जो तो भेटणारा  ?

देश म्हणजे गावचा तो पार नाही बैठकीचा
गावगप्पांनी कधी हा देश नाही चालणारा !

... देह उर्फ देवीदास हरिश्चंद्र पाटील

मराठी गझल : अर्धे अर्धे !

Life is half half ... No full satisfaction you get from many incidents in life. This half half situation in life is described in the following marathi gazal . 


आयुष्य कसे अर्धे अर्धेसे ... ब-याच गोष्टी अशा अर्ध्या अर्ध्याच राहतात ! बोलणे अर्धे , आजमावणेही अर्धे ! रस्ता , चालणे , पौर्णिमा चांदणेही अर्धेच असते ! जीव जडतो तोही अर्धा आणि त्याचे किंवा तिचेही दुरावणेही अर्धेच ! असा आयुष्याचा रंग उडता उडता ... स्वाभाविकपणे रंगणेही अर्धेच राहते  ! आयुष्यात धड काही पूर्णत्वाने घडतच नाही ! अशा वेळी काय करायचे ?..... मग अशी मराठी गझल जन्मते !


कसे बोलणे होते ... अर्धे अर्धे !
आजमावणे होते ...अर्धे अर्धे !

कसा संपतो रस्ता फिरता फिरता ...
कसे चालणे होते  ... अर्धे अर्धे !

कशी पौर्णिमा होती अर्धी अर्धी !
कसे चांदणे होते ... अर्धे अर्धे !

कसा जीवही जडला अर्धा अर्धा
कसे तोडणे होते  ... अर्धे अर्धे !

कसा रंग होता तो उडता उडता ...
कसे रंगणे होते ... अर्धे अर्धे !

... देवीदास हरिश्चंद्र पाटील

शनिवार, १३ जानेवारी, २०१८

ते मला उघड्या डोळ्यांनी दिसतं !

ते मला उघड्या डोळ्यांनी दिसतं !


खरेच सांगतो , ही कपोलकल्पित कहाणी नाही ! माझ्या दुस-या ब्लाॅगवर मी इंग्रजी भाषेत यापूर्वी या  विषयावर लिहिले आहेच . काल म्हणजे 10 जानेवारी 2018 रोजी रात्री साडेदहाच्या दरम्याने मी अगदी जागा असतांना आणि पत्नीशी बोलत असतांना माझ्या डोळ्यांसमोर जे दिसले , त्याची प्रचिती दुस-या दिवशी दुपारी सव्वा तीन वाजता आलेल्या फोनमुळे आली ! हा विषय तसा थोडा विचित्रच आहे . सुरूवातीला तरी मलाच विचित्र वाटला होता ! तसे हे सारेच अविश्वसनीय आहे ! माझाही यावर विश्वास बसला नव्हता ! किमान मला पूर्ण जागेपणी , उघड्या डोळ्यांनी काही घटना घडत असतांना दिसतात ! काही माणसे , काही ठिकाणे बसल्या ठिकाणी दिसतात ! नंतर त्या घटना प्रत्यक्षात जशाच्यातशा किंवा थोड्याफार बदलाने घडतात !  !  अगदी अलिकडच्याच दोन घटना पहा . त्यानंतर 11 जानेवारी 2018 रोजी काय घडले ते सांगतो  !

2017 च्या डिसेंबर महिन्यात मी आजारी पडल्याने मला एका हाँस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते . सकाळची वेळ होती . सलाईन लाऊन नर्स गेली होती . माझी पत्नी माझ्याशी बोलत होती . अशक्तपणामुळे मी डोळे मिटून बोलत होतो . अचानक मला आमच्या स्पेशल रूममध्ये पाद्री , नन आणि काही जण क्रॉस घेऊन आलेले दिसले . माझ्या ऊशाशी त्यांनी क्रॉस ठेवला आणि मी डोळे उघडून पाहिले तर तिथे फक्त माझी पत्नीच होती . मी दरवाजाकडे बघितले तर दरवाजा चक्क बंद होता ! मी पत्नीला ह्या चमत्कारिक  देखाव्याबद्दल सांगितले . तेवढयातच  वरच्या मजल्यावर जाणा-या जिन्यावर दाणदाण असे पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले ! पाच मिनिटांनी चक्क प्रार्थनेचे शब्द माझ्या कांनी पडले ! डावीकडच्या खिडकीतून पाहिले तर त्या दिशेने वरच्या मजल्यावरून ते शब्द येत होते . तेव्हा मला मघाचच्या पाद्री , नन , क्रॉसचा अर्थबोध झाला  ! हे तसे लगेचच आलेले प्रत्यंतर ! मात्र ,  दुस-या दिवशी दिसलेल्या घटनेचे प्रत्यंतर दोन तीन दिवसांनी आले !

 ती घटना जबरदस्त आहे आणि जगाच्या चिंतेत भर घालणारी आहे !  त्या दिवशीही मला सलाईन लावलेलेच होते. मी आणि माझी पत्नी बोलत होतो . दुपारची वेळ होती . बोलणं थांबलं . मी क्षणभर डोळे मिटले ...आणि मला जे दिसले ते फार भयानक होते ! माझ्या रूमच्या समोरच्या रूममधून एक जगभरात मोस्ट वाँटेड असलेला अतिरेकी बाहेर पडतांना दिसला ! त्याची पॅसेजमध्ये पडणारी पावले मी पाहिली ! पिवळसर सफेद झब्ब्यातल्या त्याला मी स्पष्ट पाहिले ! अवघ्या काही फुटांवरून चालतांना !  त्याच्या चेह-यावर गूढ स्मित होते ! मला या स्मिताचा अर्थ दोन तीन दिवसांनी तो त्याच्याच देशाच्या नजरकैदेतून सुटल्याची बातमी टीव्हीवर पाहिली , तेव्हा कळला ! माझ्या पत्नीलाही या प्रकाराने धक्काच बसला ! पुढे होणा-या घटना मला आधी अगदी जागेपणीसुध्दा दिसतात , यावर आता तिचाही विश्वास बसू लागला होता !

तर पहिल्या परिच्छेदातली ताजी घटना सांगतो . 10 जानेवारी 2018 ला मी माझ्या एका काकांच्या घरात एका खोलीत उभा दिसलो . वेळ रात्री 08 ते 09 ची असावी .  माझ्यासमोर माझे काका अंथरूणावर बसलेले आणि त्यांचे कुटुंबीय अंथरूणात आडवे झालेले दिसले . मी तिथे गेलो तेव्हा ते आपसात बोलत असावेत . मला एवढेच दिसले की माझे काका माझ्याकडे कटाक्ष टाकीत आहेत . ते खूप बारीक झालेले माझ्या लक्षात आले आणि माझी लिंक तुटली . प्रत्यक्षात माझ्या त्या काकांचे निधन होऊन दोन वर्षे झालेली आहेत . मयत काका जिवंत परंतु अतिशय बारीक  दिसले . असं कसं दिसलं असावं , याबद्दल माझी व पत्नीची चर्चा झाली आणि स्मरणकेंद्रात पडून राहिलेल्या काही घटना अशा अचानक डोळयासमोर तरळतात , असे आम्ही दोघेही म्हणालो . मला पटत नसूनही झोप महत्वाची असल्याने मी चर्चेला पूर्णविराम देऊन झोपी गेलो . पण मला काही तरी खटकत होते . मला भीती वाटत होती . काही तरी होणार , अशी मी मनाशी खूणगाठ बांधली होती . झालेही तसेच . मात्र मी शहरामध्ये माझ्या कामात काहीसा व्यस्त असल्याने मी काहीसा गाफील झालो होतो . पण घडणारे घडलेच होते . दुपारी 03.15 ला मला माझ्या एका शेजा-याचा फोन आला . बातमी वाईट होती . माझ्या मित्राच्या पत्नीचे निधन झाले होते ! काल डोळयासमोर मयत काका जिवंत दिसले होते आणि आज जिवंत वहिनी मयत झाली होती . ती नेमकी त्या काकांच्या मागच्या बाजुच्या लगतच्या घरातलीच ! ती बरीच वर्षे आजारीच होती आणि खूप बारीकही झाली होती ! माझ्या मनात ते काकांचे बारीकपण घोळू लागले आणि सगळी उकल झाली ! मी माझे काम गुंडाळले आणि तडक मित्राचे घर गाठले !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील
१३.०१.२०१८

रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

Happy New Year

O my lovely new year 2018 I was eagerly waiting for you  ! However,  it's not an easy thing to put behind a whole year like 2017  ! The 2017 was also a fabulous year.  Quite memorable for me  ! I have been involved in the social media through out 2017  ! At the starting I was posting more on face book. I tweeted a bit this year,  in fact,  my first tweet was in the last quarter of 2017 ! I wrote on Linked in too ! But that was very rarely.  Mostly I posted on face book  . I got many likes and many friends on face book this year  ! But I can't forget the December 2017 ! This is the month in which I started blogging again . This time with more interest , with more passion ! I concentrated on my blogs so much that I almost forgot that face book page is waiting for me  ! Again I was doing something on YouTube too ! Again,  I have continued chatting on whatsapp throughout 2017  ! So as far as internet is concerned, I was mostly on line in 2017 ! In fact,  2017 is my most fruitful year for me ! Even for my village Jakimirya,  where I live,  2017 is an historic year as scuba diving activity on Jakimirya Beach has got fine start  ! This is a nice happening particularly after the Okhi sea storm hit here  !

Almost one hour remaining for the start of 2018 ! I am eager as many of my dear friends all over the world are eager to welcome the new year  . In fact, many people in some countries must have welcomed it due to their time zone priority  ! I wish all of you Happy New Year  ! Let it be the international year of peace and humanity  ! Let it be the year of equality , prosperity, love , friendship ! Let it be year of  human relationships . Let the bad tendencies be transformed into good  ones and the good ones get united !

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

फुलेल प्रीत ही कधी ?


फुलेल प्रीत ही कधी ?



प्रत्येक क्षेत्रात नवोदित असतात . साहित्य क्षेत्रातला तोही काव्य प्रांतातला एक नवोदित मला परवाच भेटला . गोष्ट साहजिकच त्याच्या भावी वाटचालीवर आली .
तो त्याबाबत ठाम होता. कवीच तो , त्याने मला दोन दोन ओळी ऐकवल्याच !  

                       तुझेच श्वास लाडकेतुझेच भास अंतरी  
                      अजून दूर तू तरी , तुझा निवास अंतरी

                ती त्याची अत्यंत लाडकी होती ! तिचे श्वास, भास सर्व काही त्याच्या मनात होते . ती दूर असली तरी तो तिला विसरूच शकत नव्हता ! तिचे  स्थानच मुळी त्याच्या काळजात होते ! प्रश्न एवढाच होता की ती अंतरात असूनही खूप खूप दूर होती. कोण होती ती ? ती  तर त्याची प्रतिभा होती ! तो नवोदित होता याची त्याला जाणीव होती. म्हणूनच  तो तिला वर काढू इच्छित होता .

                आपण जुने ते  सोने म्हणतो . पण तो म्हणत  होता :

                                 नकोनकोच  वाटती   जुनेच  मार्ग कालचे 
                                 तुझेच लागले  अता नवीन  ध्यास अंतरी

               तो नाविन्याचा  भक्त आहे .  त्याला रोज नवीन ध्यास लागलेले आहेत .   अर्थात प्रतिभेचेच !  कारण तो तिच्यावर जिवापाड प्रेम करतो . त्याने मला सांगितले की तो तिला सारखा विचारता असतो :

                             फुलेल प्रीत ही कधी ?  जुळेल गीत हे कधी ?
                              कधी फुलेल गे तुझा वसंतमास अंतरी ?

                 आणि मला ही  भीती वाटत होती की , वसंत आला निघून गेला , मला कुठे ( त्या नेमक्या वेळी ) देहभान होते, अशी तर ह्याची अवस्था व्हायची नाही ना ? नको नकोच ! देवा असे होऊ देवू नकोस ! कारण तो तर  बिचारा  तिच्या भेटीसाठी आतुर झाला होता ! अतिशय आर्तपणे तो तिला साद घालीत  होता : 

                           उशीर लावतेस का ?   दुरून छेडतेस का ?
                          अधीर  जाहली अता . . .  तुझीच  प्यास अंतरी !

                 मला वाटते की आता तिने त्याला भेटावेच !  कारण ,                     
                        " क्षणोक्षणी जिथे तिथे दिसे मला तुझा ऋतू 
                          तुझाच जाहलो अता , तुझाच  दास अंतरी  "    


                
याप्रकारे तो आता तिचाच दास झालेला आहे ! त्याचा देवदास होता त्याची मनोदेवता - साहित्यप्रतिभा -  त्याला भेटावी , हीच ईच्छा  !