ONLY DEVIDAS ! Me to myself & You ! Top Marathi and Hindi articles, poems and gazals. फक्त देवीदास ! साहित्यिक देवीदासाचा स्वतःशी आणि तुमच्याशीही सुरू असलेला सुसंवाद ! आयुष्य तितकेसे सोपे नसतेच कुणालाही . आयुष्याकडे बघतांना बरेच काही जाणवते , आढळून येते. स्वतःच्या व इतर अनेकांच्या आयुष्यातील अनुभवांची ही शिदोरी...फक्त देवीदासाच्या शब्दांत... खास तुमच्यासाठी !
शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४
शनिवार, ३० मार्च, २०२४
नारी शक्ती
०८ मार्च रोजीचा जागतिक महिला दिन जाकीमिऱ्या - भाटीमिऱ्या ग्रूप ग्रामपंचायतीत दिमाखात साजरा .
जाकीमिऱ्यातील देऊळवाडी महिला मंडळाने या प्रथम क्रमांक मिळविलेल्या कार्यक्रमाबरोबरच नारी शक्तीचे एक सुंदर गीतही सादर केले.
रविवार, २४ मार्च, २०२४
गझलेची प्रक्रिया व वृत्ताची अनाठायी भीती
काही वेळा हटकून पूर्ण गझल येतेच. त्यावेळी तुमची प्रतिभा तळमळून तीव्रतेने व्यक्त होते. मात्र तुमची प्रतिभा कायम सर्वोच्च पातळीवर राहू शकत नाही. मग पुन्हा सुरूवातीच्या पातळीवर जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न हा सरावाचाच भाग असतो.
खरे तर, पहिल्या ओळीतच गझल , गीत की कविता होणार हे ठरते. कवीने इथेच ठरवायचे असते. यालाच जमीन निश्चित करणे म्हणतात. लिहिण्याच्या ओघात आपण सजग राहणे कठीण असते. आपली तंद्री लागली की आपण भावनिक झाल्याने सजगता डळमळते. इथेच लक्ष ठेवावे लागते. एकदा लेखनाचे स्वरूप ठरवलात की पुढे जाण्यास प्रतिभेला वाव मिळतो. त्यामुळे आपले शब्द कोणते स्वरुप ( कविता, गीत , गझल इ. फॉर्मॅट) घेत आहेत , हे सुरूवातीलाच निश्चित करावे.
तुमच्या स्वभावातच गझलेची तीव्र ओढ असेल तर तुमच्यात आपोआपच गझलियत असते. अशावेळी गझलियत किंवा गझलेची वृत्ती ही तुमच्या आतच असते. ती सरावाची वाट बघत बसत नाही. गझलेतच व्यक्त होते. गझलियत म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गझलेचे अंगभूत सौंदर्य असते. व्यक्त होण्यात सशक्तता असते. गझल म्हणूनच अधिक प्रभावी माध्यम बनते. त्यात जोरकसता असते. ठामपणा असतो. तरलताही तितकीच उत्कट असते.
गझल ही शिकवण्याची गोष्ट नाही. ते गणित नाही. व्यवहारात येणारे अनुभव कवीच्या भावनाविश्वाला खोलवर छेडतात वा छेदतात तेथे प्रभावी गझलकाव्य निर्माण होते. क्वचित प्रसंगी निसर्गतः व काही वेळा सरावाने निर्माण होते . मात्र सराव म्हणजे केवळ वृत्तांचे गिरवणे नव्हे. यमकांची घोकंपट्टी नव्हे. सुरूवातीला हे ठीक आहे. मात्र त्यातच गुंतून राहिल्यास यमके सापडतील पण तुमची गझल तुम्हांला सापडणार नाही. तुमची गझल तुमच्यातच असते. म्हणूनच सुरेश भट नेहमी सांगायचे की स्वतःवर विश्वास ठेवून लिहा.
नेहमी संपूर्ण गझल होत नसते हे अगदी बरोबर आहे. कारण आपण पहिल्यासारखी तल्लीनता टिकवू शकत नसतो. म्हणूनच गझल लिहिताना अस्वस्थपणा जाणवतो. पण पुढे लिहितांना सततचा आटापिटाही निरर्थक ठरतो. र ला ट जोडून गझल होत नसते. इथे सरावापेक्षाही तुमच्या प्रतिभेच्या पुन्हा पहिल्याच पातळीवर येऊन लिहावे लागते. ती पातळी पुन्हा मिळाली की एकसंध गझल कालांतराने पूर्ण होते. शेवटी हा प्रत्येक कवीच्या अंतर्गत भावविश्वाचा, ओढीचा, सरावाचाही भाग असतो. हे सर्व मिळून गझल बनते.
वृत्तांची भीती अगदी निरर्थक असते. सराव केलात तर आपोआपच तुमची कल्पना योग्य त्या वृत्तात उतरतेच. गझल वृत्तात लिहिली जाते हे कळायच्या आधीच मी गझल लिहू लागलो होतो ते केवळ सुरेश भटांच्या गझलांतील शब्दक्रमाच्या लयीवर फिदा होऊन. जसे गीताच्या चालीवर दुसरे गीत सुचावे व लिहावे तसे. सुरेश भटांना मान्य झालेल्या काही गझलांनंतर मी पुस्तकातल्या वृत्तांकडे वळलो. पण तेव्हाही आणि आजही मी अमूक एका वृत्तात लिहायचे आहे असे ठरवून लिहीत नाही. *ओळ ओठांवर येते तेव्हा ती तिला योग्य त्याच वृत्तात येते. ही नैसर्गिक प्रक्रिया केवळ गझलच्या तीव्र ओढीमुळे होत असते.* तीस पस्तीस वर्षे गझल लिहूनही ती ओढ टिकून आहे, हे गझलचे मोठेपण आहे. गझल हळुवारपणे तुमचा हात पकडते, पण पकडल्यावर ती सोडत नाही. प्रेयसीची बायको झाली तरी 😀😀.
#मराठी_गझल_कशी_लिहावी
.... श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील
२४.०३.२०२४ सायं. ०६.००
.............
मराठी गझलबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. अगदी सुरेश भटांच्या हयातीतही ते होते . आजही आहेत. ते तसे असणारच. ते तसे असले तरी भटांनीच ठणकावून सांगितल्याप्रमाणे " दिवस अमुचा येत आहे , तो घरी बसणार नाही " असं म्हणत प्रत्येक नवा गझलकार गझल लिहितोच आहे. खुद्द मराठी गझलकारांमध्ये अनेक मतप्रवाह आहेत. खरे तर, सुरेश भटांनी उभे आयुष्य वेचून मराठी गझलची रचना तयार केली. त्यांचा उर्दू, हिंदी व मराठी भाषांचा दांडगा अभ्यास, संगीताची उत्तम जाण आणि अलौकिक प्रतिभा पाहता त्यांनी शुध्द गझलचा आग्रह धरणे योग्यच आहे. परंतु, त्यांच्या इतक्या तरल व प्रभावी गझला आजवर कोणालाही न जमल्याने अगदी नाईलाजास्तव मराठी गझलचे सुलभीकरण सुरू झाले. हे खरे तर भटांच्या कारकिर्दीतच सुरू झाले. भटांनी सांगितलेली वृत्तबध्दता काहींनी थोड्या वेगळ्या अंगाने घेतली. भटांनी अक्षर गणवृत्तात गझल हवी असे म्हटले. त्यातही त्यांचे एक वाक्य : " पहिल्या ओळीतील अक्षरक्रम शेवटच्या ओळीपर्यंत कायम हवा " हे सोयीने स्वीकारण्यात आले. म्हणजे , पुस्तकातली वृत्ते न घेता जशी पहिली ओळ सुचेल तसा अक्षरक्रम शेवटपर्यंंत ठेवून रचना लिहिण्यात आल्या. तशा आजही लिहिल्या जातात. खरे तर यामुळे नवनवीन वृत्ते तयार झाली असे म्हणता येईल. मूळात पुस्तकी वृत्ते ही लयीसाठी व अनावश्यक शब्दांना लगाम घालण्यासाठी असतात. पण जर या दोन्ही गोष्टी पुस्तकबाह्य अक्षरक्रमाने साध्य होत असतील , ओघवतेपणाला बाधा येत नसेल, तर पुस्तकबाह्य वृत्ते तयार होण्यात अडचण नसावी, असा एक विचारही यामागे असावा. काही असो, सुरेश भटांच्या हयातीतच हे घडू लागले होते . मराठी गझलच्या *सुलभीकरणाचा* हा *पहिला टप्पा* म्हणता येईल.
(क्रमशः:)
#मराठी_गझल
... श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील
२७.०३.२०२४
गुरुवार, २१ मार्च, २०२४
रत्नागिरीची गझलरत्ने
मी नव्या खांद्यावरी... ( फेसबूकवरून साभार )
रत्नागिरी जिल्ह्याच्या #मराठी_गझल चा पस्तीस वर्षांंचा इतिहास व सद्याचे पंचवीस गझलकार अंतर्भूत असलेल्या रत्नागिरीची गझलरत्ने या पुस्तकाचे प्रकाशन.
मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३
Namsaptah 2023 part 2
नामसप्ताहाची सुरूवात : भाग २
मराठवाडीच्या पहिल्या पहाऱ्याची सुरूवात तर आपण पहिल्या भागातील व्हिडिओत पाहिली. आता त्यानंतरच्या पहाऱ्याची म्हणजे देऊळवाडीच्या पहाऱ्याची काही भजने आपण पुढील व्हिडिओत पाहू.
देऊळवाडी
मधली व्रात्य पिढी
एक हृद्य आठवण :
गेल्या वर्षीच्या नामसप्ताहातील बाबाच्या आठवणी जागवणारे काही व्हिडीओ :
Devidas Patil Creation या यू ट्यूब चॅनेलवर नामसप्ताहाचे व्हिडीओ उपलब्ध...
नामसप्ताहात संस्कृतीची देवाणघेवाण
अशा प्रकारे , नामसप्ताह सुरू आहे. त्याचं वार्तांकनही सुरू राहीलच. पण तूर्तास इथेच थांबू ! तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा .
गझल , तूम मेरी जिंदगी बन गयी हो ...
तेरा मतला मेरा काफिया
जो न मौका मिला था कभी, वो मौका मिलने लगा
बढ़ने लगी मुलाकाते .... प्यार में रंग भरने लगा ...
चेहरे पे हंसी आ गयी, दिल में उमंग छा गयी
तिरछी नजर का इशारा अब समझने लगा
नींद ऐसी लगी... ख्वाब ऐसे आये के पूछो मत
किसी तालाब में चांद उतरकर थिरकने लगा
न जाने ये क्या हो गया, न जाने ये कैसे हो गया
तेरी आखो में मेरा खयाल अब झलकने लगा
गझल, तुम मेरी जिंदगी बन गयी हो, क्या कहूँ ?
तेरा मतला मेरा काफिया इक दुजेमें ढलने लगा !
....देवीदास हरिश्चंद्र पाटील
२१.०८.२०२३ दोपहर ०३.३०
गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३
Namsaptah 2023 Part 1
शंभर वर्षाहून जुन्या मंदिरातील
नामसप्ताह २०२३ ...
रत्नागिरीतील जाकीमिऱ्या गावच्या नवलाई पावणाई मंदिरातील सालाबादप्रमाणेचा नामसप्ताह
मंदिर स्थापना : सन १९१३ . जिर्णोध्दार : सन २०१७
17.08.2023 रोजी दुपारी ०१.०० वाजता सुरूवात.
नामसप्ताह २०२३ पाहण्यापूर्वी ...
श्रावण मासारंभ !
नूतन मंदिर व्यवस्थापन समिती
नामसप्ताहाची सुरूवात
गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३
Manus aatmhattya ka karto
माणूस आत्महत्त्या का करतो ?
नितीन देसाईंबाबत फेसबूकवरची पोस्ट ...
घालमेल आणि उलाघाल
तो का बोलू शकत नाही ?
सारे काही संपल्याची तीव्र भावना
मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३
Gadkari as ka bolale : Asle Faltu dhandhe band kara
असले फालतू धंदे बंद करा 😀😀😀 काय छान झापलंय राव !
नितीन गडकरींचा व्हिडीओ
व्हिडीओमध्ये नितीन गडकरी जे बोलले आहेत ते त्यांच्या कानपिचक्या देण्याच्या शैलीला साजेसेच आहे. गडकरी हे अनेकदा या शैलीचा भरपूर उपयोग करतात. काहीसे मिश्किल बोलतांना हसत हसत पण योग्य जागी चिमटे काढण्याचे कसब गडकरींकडे आहे , यात काही वाद नाही. आपल्याकडे काही तरी वेगळेपणा आहे याची झलक गडकरींच्या भाषणांमध्ये बरेचदा झळकते , तशीच ती आताही झळकली आहे. त्यांच्या मिश्किल भाषेमुळे कोणाला जखम होत नाही, हे विशेष . या व्हिडीओत त्यांची भाषा बावनकुळेंबाबतही काहीशी अशीच आहे.
बावनकुळेंचे जातीचे राजकारण
बावनकुळेंचे काय चालले आहे यापेक्षा...
शनिवार, २२ जुलै, २०२३
Hadasa hone ke baad
हादसा होने के बाद
दिन बितते गये हादसा होने के बाद
लोग भुलते गये हादसा होने के बाद
शर्म से शर्म की भी नजर झुक गयी
बेशर्म खुलते गये हादसा होने के बाद
कोई आया मदतगार नमक छिडकनेको
जख्म भरते गये हादसा होने के बाद
किसीने भाषण दिया, किसीने फोटो लिये
वोही चमकते गये हादसा होने के बाद
इतना सब कुछ हुआ , लोग मरे मगर
चर्चेही बनते गये हादसा होने के बाद ...
#shameonthem
#Hadasa
#manipur_hadasa
....देवीदास हरिश्चंद्र पाटील
२२.०७.२०२३ सायं . ०४.००
साहित्य हा समाजाचा आरसा
जेव्हा जेव्हा हादसे होतात तेव्हा तेव्हा वरीलप्रमाणे साहित्यही जन्म घेतं. कारण साहित्य हा समाजाचा आरसा आहे ! साहित्यिक हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. जेव्हा समाजात #मणिपूर सारख्या घटना घडतात , जेव्हा मानवी संस्कृतीच शरमेने मान खाली घालते , पण स्त्रीयांची नग्न धिंड काढण्यासारखे दुष्कृत्य करणारे दुष्ट नराधम निगरगट्टपणे उजळ माथ्याने वावरतात व काही विशिष्ट लोक त्यांचे समर्थन करतात , तेव्हा संवेदनशील साहित्यिकाला त्यावर भाष्य केल्याशिवाय राहवत नाही.
दुनिया पाषाणांची
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
असे कवीश्रेष्ठ सुरेश भट लिहून गेले
आहेत. खरे तर , लोकांच्या मानसिकतेपायी अगतिक होऊन श्रेष्ठतम साहित्यिकांच्याही लेखणीतून असे निराशामय शब्द व्यक्त होतात , तिथे माझ्यासारख्या यत्किंचित लेखकाचं काय ! माझीही निराशा लपून राहिलेली नाही. म्हणूनच मी वरील रचनेच्या सुरूवातीलाच म्हटलंय :
दिन बितते गये हादसा होने के बाद
लोग भुलते गये हादसा होने के बाद
लोकांची असंवेदनशील मानसिकता
याचं कारण असं आहे की अनेक हादसे झाले तरीही त्यावर पुरेश्या संवेदनशीलतेने लोक व्यक्त होत नाहीत. व्यक्त झाले तरी त्यात सातत्य नसतं. वाईट अनेकांना वाटते. पण तसे स्वतः जवळच वाटणे वेगळे आणि सार्वजनिकरित्या व्यक्त होणे वेगळे. दुष्कृत्याविरूद्ध आंदोलनवगैरे करणे तर त्याहून पलिकडचे ! जलद समाज माध्यमांमुळे आजकाल लोकांना दररोज नवा विषय मिळतो . दररोजचे विषय चघळून चघळून लोकांच्या जाणीवाही बोथट होत जातात. त्यामुळे हादसा होऊन दिवस लोटत राहतात तसे लोक घटना विसरून जातात. झाल्याचं तर आणखी काही दिवस चर्चा होत राहतात !
अपडेटसही येत राहतात
हादसे का होतात ?
#सुरेश_भट
#समाजमाध्यमे
#manipur_hadasa
manipur case
Manipur incident
#हादसा_होने_के_बाद
#हादसाहोनेकेबाद_क्याहोताहै